१९५० च्या सुमारास घडलेली ही खरी घटना आहे.
साने गुरुजीच्या पुस्तकांनी महाराष्ट्राची तरुण पीढी भारावलेली होती. त्यातच एका १८/१९ वयाच्या युवकाचा समावेश होता. दुर्दवाने त्या युवकाला असाध्य अश्या आजाराने गाठलेले होते. मरण्यापूर्वी साने गुरुजींना भेटावे असे त्याला वाटत होते. त्याच्या पालकांनी साने गुरुजींना तसे कळविळे आणि भेटता येईल का असे विचारले. पत्राची वाट पाहत असतांना प्रत्यक्ष साने गुरुजीच त्यांना भेटायला त्याच्या गावी आले. ( नाशकातील ही सत्य घटना आहे.).
माझ्या माहितीप्रमाणे मुंबईच्या एका उडुपीच्या हॉटेलचे उद्घाटन सानेगुरुजींच्या हस्ते झाले होते.
सानेगुरुजींचा असा प्रचंड जनसंपर्क होत असायचा. माझ्या मते महाराष्ट्रावर साने गुरुजी आणि गाडगे बाबा याचा बराच प्रभाव होता.
अशा सानेगुरुजींना बरीच विचारप्रर्वतक पुस्तकांचे लिखाण केले अश्या १२५०० पानांचे समग्र सानेगुरुजी ४६ पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन आणि वितरण १ फेब्रु ला पुण्यात वरदा प्रकाशनातर्फे होत आहे.
सानेगुरुजींचे आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य आज मला असे समजले कि साने गुरुंजीच्या गाण्यांनी अनेक सेवादलाच्या आणि सघां च्या कार्यक्रमात गायली जात असत. ( बलसागर भारत होवो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे इत्यादी इत्यादी).
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5075
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरल साधी ओघवती भाषा, कुठलेही
आपल्या उस्फुर्त प्रतिक्रिये
In reply to सरल साधी ओघवती भाषा, कुठलेही by मृत्युन्जय
सहमत.
In reply to सरल साधी ओघवती भाषा, कुठलेही by मृत्युन्जय
खरय (हि पुस्तके मला मुंजीत
In reply to सहमत. by आत्मशून्य
बाकी काहीही असो
साने गुरुजींसारखा तळमळ असलेला
आजिबात नको!