Skip to main content

आपण का जगतो?

लेखक अवलिया यांनी सोमवार, 17/01/2011 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी नुकतेच दोन दिवसांपूर्वी कूणीतरी मला खरड करुन विचारले "आपण का जगतो?" यावर मी खूप विचार केला. खरं तर विचार करणं ही माझ्या कुवतीबाहेरची गोष्ट! पण कुवतीबाहेर आहे म्हणून करु नये असे थोडीच आहे. तर मी माझ्या परीने खूप विचार केला. (खुलासा - इथे विजुभाऊंच्या परीचा काही संबंध नाही) पण मला सुस्पष्ट असे उत्तर मिळाले नाही. म्हटले जरा मिपाकरांचा विचार घेउ ! म्हणून ह्या काथ्याकुटाचा प्रपंच !! (प्रपंच करावा नेटका - रामदासस्वामी) तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत?

वाचने 21051
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

सहमत.

अत्यंत अहंकारी प्रश्न! आपण जगतो म्हणजे यात आपण काही कृती केल्याचा जो आभास आहे तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. एकवेळ मरणे आपल्या हातात आहे पण जगणे आपल्या हातात नाही. केवळ आपले हृदय चालू आहे आणि रक्त आपल्या शरीरात खेळते आहे म्हणून आपण जिवंत आहोत. हृदय चालवण्यासाठी आपण स्वतः कोणतेही प्रयत्न करत नाही आणि करूनही काही उपयोग होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे वरती स्पा म्हणाला तसं जन्माला आलो म्हणून आणि कार्यकर्ते म्हणाले तसं अजून मेलो नाही म्हणून आपण जिवंत आहोत.

In reply to by नगरीनिरंजन

म्हणजे तुम्ही रक्त/हृदय स्वतःपासून वेगळे मानता का? जर मानत असल्यास मग स्वतः म्हणजे नक्की काय? आणि मानत नसल्यास स्वप्रयत्नाने हृदयाचे ठोके कमी जास्त करता येतात असे काही मानतात त्यावर काय मत? तसेच स्वतःचीच जी गोष्ट जी शरीराकडून केली जाते तिला आपले प्रयत्न कारणीभुत नाही असे कसे म्हणता येते?

In reply to by अवलिया

रक्त आणि हृदयापासून मी वेगळा नाही पण फक्त रक्त आणि हृदय म्हणजेच मी नाही. 'मी ' म्हणजे शरीर, त्यातल्या सगळ्या रासायनिक क्रिया आणि ऊर्जा हे सगळं मिळून निर्माण होणारं जे काही आहे ते असं मला वाटतं. स्वप्रयत्नाने हृदयाचे ठोके कमी-जास्त करता येत असतील तर थांबवता आणि सुरु का करता येत नाहीत? मीपणाची भावना ही सुद्धा मेंदूतली एक रासायनिक प्रक्रिया आहे असे मला वाटते. बर्‍याच प्राण्यांमध्ये ती नसते. आपण म्हणतो की आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागतो पण या इच्छांची निर्मीती कशी होते ते आपल्याला माहिती नाही. काही ठराविक बाह्यसंवेदनांनी ठराविक इच्छा निर्माण केल्या जाऊ शकतात त्यामुळे आपल्या इच्छांवरही आपला ताबा असतो असेही म्हणणे अवघड आहे. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे एकापेक्षा जास्त अर्थांनी खरं असावं.

पूर्वसंचित कर्म जे असेल त्याप्रमाणे आपण जगतो. त्यातून सुटका नाही. का जगतो आणि किती, हे त्यावर अवलंबून.

In reply to by गुंडोपंत

पूर्वसंचित कर्मावर मात कशी करता येते? जर मात करता येत नसेल तर मानवी प्रयत्न व्यर्थ मानावे का? मानवी प्रयत्न व्यर्थ नसतील तर पूर्वसंचित मानावे का?

In reply to by अवलिया

पूर्वसंचित कर्मावर मात कशी करता येते? कर्माचा विपाक करुन. तो कसा करायचा ह्या साठी लोकमान्यांनी लिहीलेले गीतारहस्य कर्मविपाक वाचावे. येथे दोन चार ओळीत नाही देता येणार. जर मात करता येत नसेल तर मानवी प्रयत्न व्यर्थ मानावे का? भोग भोगावेच लागतात. मानवी प्रयत्नांनी कर्म संचित कमी करु शकता. मानवी प्रयत्नांनी भोग भोगायची शक्ती येते. मानसिकतेत सुधार होतो. ... मानवी प्रयत्न व्यर्थ नसतील तर पूर्वसंचित मानावे का? पूर्व संचित मानणे न मानणे एखाद्याच्या मनाच्या घडणीवर अवलंबून आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कर्म बंधनातून मुक्त होण्या मधला एक टप्पा आहे. आपण कोठल्या काँशियस लेव्हल वर आहात ह्या वर अवलंबून आहे.

In reply to by रणजित चितळे

रणजितराव, सुयोग्य आणि नेमके उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाची ओळख करून देणारी एक लेखमाला लिहावी अशी विनंती मी आपल्याला करत आहे.

In reply to by अवलिया

हे' प्रश्न 'तुम्हा'ला खरंच पडलेय्त? की 'जगाच्या कल्याणा' च्या भूमिकेतून 'परिप्रश्नेन सेवया'....??? असो. पूर्वसंचित कर्मे भोगूनच संपवावी लागतात. 'खरे' संत आपल्याला असेच आचरण करुन दाखवतात (उदा. रामकृष्ण परमहंस) त्यांच्याकडे 'आमचे येथे प्रारब्ध अथवा संचित बदलून मिळेल' असा बोर्ड नसतो. अर्थातच त्यामुळे( जनरली) कमी अथवा अजिबात प्रसिद्धी नसलेल्या जागी आढळतात. तसेच ते बर्‍याचदा त्यांच्या 'क्लास'मधील दारिद्र्य रेषेखाली आढळतात. असो. आपणच केलेल्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असते. चांगले किंवा वाईट आपण ठरवतो. संचित आपल्या पर्यंत तथाकथित सुख अथवा दु:ख घेऊन येते. सुखी किंवा दु:खी होणे, न होणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. पूर्वी आंब्याचे झाड लावले असेल तर आंब्याचे फळ मिळ्णार हा निसर्ग नियम आहे. (आंबा कुठला, कसा लावला, कशी मशागत केली,किती मोहोर आला, हवा पाणी कसे इ.इ. सगळा विचार करुन त्या त्या प्रकारचे फळ येईल पण फळ आंबा'च') बाभूळ लावली असेल तर काटे.....!!! आज केलेले कर्म उद्या संचित होणार असल्याने विहित कर्म करणे (जे आपल्या हातात आहे) हेच करणे उत्तम. बाकी आपण का जगतो....??? या प्रश्नाचे उत्तर को हं सारखेच. आत्मशोध घेणे.म्हणून आत्मा वा अरे श्रोतव्यो,.....

In reply to by प्यारे१

पूर्वसंचित कर्मे भोगूनच संपवावी लागतात. आज केलेले कर्म उद्या संचित होणार असल्याने विहित कर्म करणे (जे आपल्या हातात आहे) हेच करणे उत्तम. ह्म्म.. परत एका सहस्रप्रतिक्रियासक्षम वादाची सुरुवात.. :) काहींना जे काही भोगावं लागतं त्याला त्यांचं पूर्वसंचित म्हणणं म्हणजे क्रूर चेष्टा आहे. अशा वेळी मग त्या व्यक्तीला "नेमकं काय घडलं होतं त्याच्या हातून? कधी ?" ते ऐकण्याचा किमान अधिकार असता तर किती बरं असं वाटतं. फाशी, जन्मठेप शिक्षा सुद्धा देताना आरोपपत्र वाचून दाखवले जाते. पण इथे काय ? .. सगळाच आनंद. आणि एकदा या जन्मीच्या जन्मतिथीपर्यंत काही थांग लागत नाही म्हटल्यावर "राज पिछले जनम का".. की मग बोलतीच बंद.. :) यंदा ज्यांना वाईटाचे फळ नाही मिळाले त्यांना पुढच्या जन्मी मिळेल..आणि आत्ता ज्यांनी काय वाईट केले हे सांगता येत नाही त्यांनी गतजन्मी केले असेल.. :) काय ते नेमकं माहीत नाही, उमजत नाही, कळत नाही म्हणून किती सोयीस्कर उत्तरं शोधून काढतो ना आपण ?

In reply to by गवि

>>>>काय ते नेमकं माहीत नाही, उमजत नाही, कळत नाही म्हणून किती सोयीस्कर उत्तरं शोधून काढतो ना आपण ? गवि, नेमकं काय हे माहित करुन घ्यायचं ठरवलं तर अगदी तर्कशुद्ध उत्तरं मिळतात. ह्या तथाकथित सोयिस्कर उत्तराचा थोडा विचार करु. आंब्याचंच उदाहरण घेऊ. झाडाला आंबे येण्याचा कालावधी हा काही वर्षांचा. अगदी कच्च्या कैरीचा आंबा व्हायला देखील एखादा महिना पकडू शकतो ना आपण...??? मग कधीतरी पूर्वी केलेल्या कर्माचे फळ पक्व होण्यास वेळ लागला तर नवल काय....??? दुसरी गोष्ट म्हणजे आपण च लावलेलं आम्ब्याचं झाड कधी लावलं कुठं लावलं कशा प्रकारे वाढलं हे आपण जरी विसरलो ( डोक्यावर पडलो) तरी आंबे यायचे आणि गोडपणा द्यायचं थांबणार थोडीच आहे...??? फळ हे येणारच. हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो. अगदी तुम्ही म्हटल्या प्रमाणे 'राझ पीछ्ले .....' स्टाईल नाही तरी आणि कारणमीमांसा द्यायची म्हटले आणि सगळी लिस्ट (मला कशाची कसली शिक्षा मिळते आहे याची) समोर आली तर विचार करा की काय अपराधी पणाची भावना येईल..? मान्य करणार नाही आपण की हे सगळे आपणच केले म्हणून. उदा. एक गाडी आपण चालक, गाडी चालवताना अपघात. विस्मृती. काही वर्षांनी दुसरी गाडी चालवतोय. पोलिसांना आधीचा अपघात कळाला. शिक्षा देतीलच ना???? हा ही विचार बाजूला सोडा. माझ्या कानाने मला कमी ऐकू येते. का कमी ऐकू येते???? कारण मीमांसा करु का??? त्याने काय होईल??? संचित / प्रारब्ध मानले. त्रागा कमी झाला. दुसर्‍या कुणावर दोषारोप नाहीत, असूया ईर्ष्या, द्वेष, मत्सर नाही. ऑपरेशन करवणे हे कर्म. हे करताना मी चांगल्या डॉक्टरकडेच जाईन.त्यातही सक्सेस रेट किती असेल हे ठाऊक नसल्याने पुन्हा प्रारब्धावर भरवसा. नॉट अ बॅड डील ......

In reply to by प्यारे१

हे ठीक.. पण म्हणजे माहीत नसल्याने मानले असेच झाले ना. पाप आहे, पुण्य आहे हे मानले+ या सर्वाची नोंद ठेवणारी यंत्रणा आहे हे मानले + गतजन्म मानला की मग सर्व सरळ सोपे आहे. आंब्याचे उदाहरण प्रस्तुत मुद्द्यासाठी फार फार ढोबळ वाटते. ..पण स्थूलमानाने एकूण मुद्दा पटला.

In reply to by गवि

स्वतःचे काम १००% करत राहिल्यानंतरच हा 'हातचा' मानणे इष्ट ठरते. ( असेल हरी.... अजिबात नाही.) (असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे - तुकाराम, रेखा ( तळहातावरील रेषा)तितुकी पुसोन जाते हे तो प्रत्ययास येते मग डोळे झाकणी करावी काये निमित्त- रामदास) असे 'मानणे' आपण बर्‍याच ठिकाणी करतो.... गणीतात क्ष मानतोच की! औषध देणार्‍या़ डॉक्टरला :- मला या औषधाचे संपूर्ण रासायनिक समीकरण द्या मी स्वतः बघतो, करतो आणि मग मीच बनवलेले औषध घेऊन बरा होतो असे कुणी म्हटल्याचे ऐकिवात नाही..... तिथे 'रेडी टू यूज' वरच 'श्रद्धा' असते. कारण लवकरात लवकर बरे व्हायचे असते ना.... तिथे आपली 'के हेच्च ए ए जे' कुठे जाते....??? 'संतांनी, आम्ही अनुभव घेतलाय तुम्हाला सांगतो' असे म्हटले की आलेच बाहुं मध्ये स्फुरण.... ३०० -४००-१००० वर्षांपूर्वी होऊन गेलेले हे संत काय पैसे उकळणार असतात कोण जाणे....??? ३% च्या ऐवजी २ % मिळाले म्हणा एखाद वेळी हाय काय आन नाय काय ....!!!

"का जगतो" याचं सोप्पं उत्तर म्हणजे जन्माला आलो म्हणून.,..... आणि मरण येत नाही म्हणून.... अवलिया साहेब.. हे फायनल उत्तर आहे.. अजून आता वाद घालू नका

तेज्यायला हा मिपाकंटक नाना अजुन जिवंत आहे का? नान्या तु लेका मिपाचे वातावरण दुषित करायला जगतोस असे कोणीतरी सांगीतले होते ना मागच्यावेळी ?

पराशी सहमत. पण परा अर्धी लाकडे पोचलेल्याला लेका का म्हणत असावा बरे?

माझे कुतूहल शमलेले नाही, म्हणून मी जगतो आहे. इतरांबद्दल सांगू शकत नाही.

जीव जात नाही म्हणून ...... जीव गेला तर कोण कशाला जगेल ? ;)

मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस वेगवेगळं देईल. प्रत्येकजण आपाआपले संस्कार, विचार, अनुभव जसे असतील, तसं उत्तर देईल. रामदास स्वामी किंवा शिवाजी महाराज यांचं जगण्याचं कारण वेगळं होतं, तर एखाद्या अय्याश नबाबाचं जगण्याचं कारण वेगळं असेल. कष्ट करून एखादी आई आपल्या बापाविना असलेल्या मुलाना वाढवते, तिचं जगण्याचं कारण तिच्यापुरतं तेवढच खरं आणि महत्त्वाच असेल. मी तर म्हणेन, "आपण का जगतो?" या प्रश्नाचा विचार करूच नये. शक्य तेवढं मस्त जगावं, चांगलं जगावं. जास्त विचार करत राहिलात तर खरे जगण्याचे क्षण वाळूसारखे हातातून निसटून जातील!

In reply to by पैसा

पुन्हा तेच.. "साठी" आणि "मुळे" चा घोळ. "का जगतो ?" याचा अर्थ काहींनी "कशासाठी" जगतो, म्हणजे काय करण्यासाठी जगतो असा घेतला आहे. (खाण्यासाठी, राज्यस्थापनेसाठी, संगीतसाधनेसाठी) "कशामुळे" जगतो असाही अर्थ त्या "का ?" त आहे आणि तोच विचारणार्‍याला अभिप्रेत असावा. "व्हॉट कॉजेस लिव्हिंग" (किंवा "व्हॉट कॉजेस लाईफ"), ऐवजी आपण नेहमीच "व्हाय आय वाँट टू लिव्ह" असाच प्रश्नार्थ घेतो.. :)