Skip to main content

एक प्रश्न

लेखक शिल्पा ब यांनी सोमवार, 06/12/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
बाबासाहेबांच्या धाग्यावरून एक आठवले अन प्रश्न पडला... असे म्हणतात कि आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे. आरक्षण म्हणजे आपल्यात काही कमी असेल तर मुख्य प्रवाहामध्ये कमी त्रास व्हावा म्हणून मागितले जाते ते अशी माझी समजूत...उदा. अपंगासाठी वेगळी पार्किंग वगैरे. मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत? ते तर बाजूलाच पण आता मराठा समजही आरक्षण मागू लागला आहे....अशाने काय होणार? आणि आरक्षण मागून स्वतःच आपल्यात काहीतरी कमी आहे अन बाकीचे आपल्यापेक्षा उच्च आहेत हेच नाही का कबुल करत? टीप: मला कोणाचाही अपमान किंवा उपहास करायचा नाही...केवळ एक genuine प्रश्न पडला म्हणून विचारले.

वाचने 23153
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by आजानुकर्ण

बाकीचे मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण...
कोणीही पेमेंट सीट स्वरूपातील आर्थिक आरक्षणाचा उल्लेखही केलेला नाही यावरून हा निष्कर्ष मी काढला आहे.
पेमेंट सीटची (आर्थिक) आरक्षणाशी तुलना तितकीशी सयुक्तिक वाटली नाही. शिक्षण ही बाजारातील एक कमॉडिटी आहे अशा दृष्टीने विचार करू. म्हणजे मागणीपुरवठा तत्त्वानुसार मूल्यनिश्चिती, ज्याला परवडेल त्याने घ्यावे, ज्याला परवडणार नाही त्याने घेऊ नये, वगैरे वगैरे. (गुणवत्ता, बारावीचे मार्क वगैरेंचा विचार केलेला नाही. एक म्हणजे बारावीचे मार्क आणि गुणवत्ता / पात्रता यांचा अर्थाअर्थी काही थेट संबंध असतोच, याबद्दल साशंक आहे, आणि दुसरे म्हणजे समजा असलाच, किंवा अन्य प्रकारे गुणवत्ता असली, तर त्याचा उपयोग फारफार तर पुढील शिक्षणाशी अधिक सुलभतेने cope up करण्यासाठी त्या विद्यार्थ्यास होऊही शकेल, पण तो त्या विद्यार्थ्याचा खाजगी मामला आहे. कमॉडिटीविश्वात आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही, आणि प्रवेशासाठी निकष म्हणून तर त्याच्याशी काहीच घेणेदेणे नाही. कोणीही यावे आणि खुल्या बाजारातून शिक्षण विकत घ्यावे, परवडत असेल तर उत्तम, नाही तर टफ लक - पण मूल्य हे मागणीपुरवठा तत्त्वावरच राहील. वगैरे वगैरे.) या दृष्टिकोनातून पाहिल्यास पेमेंट सीट हा वास्तविक खुला प्रवर्ग (कदाचित एकमेव खुला प्रवर्ग) ठरावा, आणि उलट (थत्त्यांनी वर म्हटल्याप्रमाणे) नॉन-पेमेंट सीट (सरकारी किंवा खाजगी, तथाकथित 'आरक्षित' किंवा तथाकथित 'खुला प्रवर्ग') या सर्वच 'आरक्षण क्याटेगरी'त मोडाव्यात. (खाजगी कॉलेजांतील 'पेमेंट सीट'च्या बाबतीत खाजगी कॉलेजची जबरदस्त फी - जी खाजगी कॉलेजांत प्रवेश घेऊ पाहणार्‍या सर्वांनाच द्यावी लागते - ही तर असतेच, शिवाय कॉलेजला देणगी हाही प्रकार असतो, अशी माझी समजूत आहे - चूभूद्याघ्या. म्हणजे खाजगी कॉलेजांत नॉन-पेमेंट सीटसाठीसुद्धा सबसिडीचा प्रश्न येणार नाही असा याला आक्षेप घेता येईल. हरकत नाही. पेमेंट सीट ही बाजाराच्या तत्त्वानुसार 'टू द हायेस्ट बिडर' विक्री आहे हे लक्षात घेता, हा खुल्या बाजाराचा, आणि म्हणूनच 'खुल्या प्रवर्गा'चा प्रकार मानता यावा, असे वाटते. उलटपक्षी तथाकथित 'आरक्षित' जागांबरोबरच तथाकथित 'खुल्या प्रवर्गा'तील जागा - खाजगी अथवा सब्सिडाइज़्ड - या तथाकथित 'गुणवत्ते'साठी - म्हणजे बारावीच्या मार्कांसाठी वगैरे - जरा कमी पैसे देऊ शकणार्‍यांसाठी आरक्षित जागा म्हणता येतील.) मुळात शिक्षण - त्यातसुद्धा खास करून उच्चशिक्षण - ही एक कमॉडिटी न मानता (१) एक मूलभूत मानवी हक्क, किंवा (२) गुणवंतांची मक्तेदारी/हक्क यांपैकी काहीही (किंवा दोन्ही) मानण्यातून हा सगळा गोंधळ आहे. मुळात शिक्षण हा कोणाचाही हक्क का असावा? त्यातसुद्धा एखादा गुणवंत आहे म्हणून त्यास काहीही करून संधी उपलब्ध करून दिलीच पाहिजे, याला काय आधार आहे? जमत असेल, परवडत असेल तर त्याने शिक्षण घ्यावे, नाही तर स्वतःच्या उन्नतीचा अन्य काही मार्ग शोधावा! कोणीही कोणालाही चरितार्थ देणे लागत नाही, सरकार तर नाहीच नाही. आणि सरकारने (स्वस्त दरात) सार्वजनिक शिक्षणाच्या धंद्यात का असावे? नाही, यातून सरकारी सब्सिडाइज़्ड शिक्षणास विरोध करण्याचा उद्देश नाही, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांनाही विरोध करायचा नाही आणि आरक्षणाला तर मुळीच विरोध करायचा नाही. शिक्षण हे जितक्या जास्त जणांपर्यंत जितके अधिक पोहोचेल तितके ते समाजाच्या फायद्याचेच आहे, आणि म्हणून त्या उद्देशाने जे जे काही करता येईल किंवा केले जाईल ते ते स्वागतार्हच आहे. मात्र हे सर्व करायचे ते त्यातून समाजाचा अंततः फायदा होतो म्हणून स्वागतार्ह आहे; कोणाचा 'मूलभूत हक्क' आहे, किंवा कोणाची 'पात्रता' (आणि म्हणूनच अप्रत्यक्ष मक्तेदारी) आहे, म्हणून नव्हे, एवढेच मांडायचे आहे.
आम्हाला देशपांडे आडनावाचे एक सर होते त्यांनी मर्ढेकरांची 'प्रेमाचे लव्हाळे' ही कविता शिकवताना लव्हाळे या शब्दाचा अर्थ 'लव्ह + आळे' असा सांगितला होता. या उदाहरणावरून सर्व देशपांडे गुणवान नसतात असा निष्कर्ष मी काढला नाही.
सहमत. शुद्धलेखन, व्याकरण किंवा तर्क ही कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही. उलटपक्षी, शुद्धलेखनाचा मुडदा, व्याकरणावर बलात्कार किंवा तर्काशी फारकत हीदेखील कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही. पण लक्षात कोण घेतो?

In reply to by पंगा

पंगा, तुमच्या बहुतेक सर्वच मुद्द्यांशी सहमत आहे.
कमॉडिटीविश्वात आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही, आणि प्रवेशासाठी निकष म्हणून तर त्याच्याशी काहीच घेणेदेणे नाही. कोणीही यावे आणि खुल्या बाजारातून शिक्षण विकत घ्यावे, परवडत असेल तर उत्तम, नाही तर टफ लक - पण मूल्य हे मागणीपुरवठा तत्त्वावरच राहील. वगैरे वगैरे.
इथे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. अजूनही आपल्या देशात अभियांत्रिकी क्षेत्र फार जास्त पुढारलेलं आहे असं म्हणवत नाही. (माझं म्हणणं खोटं असेल तर आनंदच आहे.) अशा वेळी देशात चांगले इंजिनियर (फक्त इंजिनियरच का, डॉक्टर, सर्वच क्षेत्रातले संशोधक, इ.इ.) तयार झाले पाहिजेत आणि ते भारतातच राहिले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत .... अभियांत्रिकी शिक्षणाला फक्त कमॉडीटी म्हणावं अशी आपल्या देशाची आज स्थिती आहे काय? पण हा प्रश्न सदर धाग्यात कदाचित अवांतर ठरावा.

In reply to by आजानुकर्ण

मागासवर्गीय लोक गुणवान नसतात याबाबत कोणतेही पुरावे किंवा आकडेवारी उपलब्ध नाही. असं मी कुठेही म्हटलेलं नाही. मी त्या उदाहरणा संबंधात बोलत होतो. उगाच वादासाठी जनरलायझेशन नको. खुल्या प्रवर्गातील मुलांना जी परीक्षा द्यावी लागते तीच मागासवर्गीयांना द्यावी लागते. दोघांचे पेपर तपासणारे शिक्षक एकच असतात. त्यामुळे गुणवत्तेचा मुद्दा अग्राह्य धरावा. खरंय. पण खरी मजा गुण मिळाल्यावर येते. एकाला ८५% मिळूनही प्रवेश नाही आणि दुसर्‍याला ५०% मिळाले तरी आनंदाने प्रवेश. इथे प्रॉब्लेम आहे. जो आरक्षण घेतो तो खरंच मागासलेला असेल तर काहीच हरकत नाही. पण आर्थिक दृष्ट्या सबल वर्गातली मंडळी जेव्हा केवळ जात वेगळी म्हणून वेगळा सवलती मिळवतात तेव्हा त्रास होतो.

कालच मी दोन चिमणे पाहीले. एक चिमणा जिथे टिपत होता तिथेच दुसर्‍याला टिपायचं होतं. बाकी ठीकाणी रान मोकळं होतं पण हे दोघं एकमेकांचं अन्नच टिपायच्या मागे लागले होते. मला हे कळत नाही आता जगभर मुबलक संधी उपलब्ध झाल्या असताना आपल्या देशातल्या आरक्षणांसाठीच भांडण्यात काय अर्थ आहे? मूव्ह ऑन!!!! __ काही चुकतय का माझं?

In reply to by शुचि

दोन चिमणे 'एकमेकांचं' अन्न टिपायच्या मागे लागले होते, असे निश्चित म्हणता येणार नाही. मुळात जे अन्न आहे ते 'फक्त' माझ्यासाठीच असा दोहोंपैकी कोणत्याही चिमण्याचा समज झाल्यास तो चुकीचाच आहे. ते सर्व चिमण्यांसाठी आहे. दुसरे म्हणजे समजा दुसर्‍या चिमण्याला हवे असणारे अन्न अशा रानात आहे जेथे जाण्यासाठी त्याला ठराविक बँक बॅलन्स, व्हिजादी सोपस्कार, स्थलांतरादी कर्मे इ. आवश्यक (मॅन्डेटरी या अर्थाने) ठरणार आहे नि यांपैकी एक किंवा अनेक काही कारणांनी शक्य होणारे नाही; मग त्यावेळी सध्याच्याच रानात असलेले अन्न टिपायचे प्रयत्न त्याने केले तर त्याचे काय चुकले? पण दुसर्‍या रानात जाऊन दाणे टिपणे 'सहज' शक्य असलेला पहिला चिमणा जर या रानात दाणे टिपत असेल, तर या दुसर्‍या चिमण्याचा तळतळाट अस्थानीही मानता येणार नाहीसे वाटते. मला वाटते देशातील आरक्षणाबद्दल अशीच काहीशी परिस्थिती असावी. (पक्षीप्रेमी)बेसनलाडू भारतातील ठराविक संधीसाठी स्पर्धा करणारे - एक खुल्या प्रवर्गातील नि दुसरा आरक्षित वर्गातील - भारताबाहेर कोणत्याही स्वरूपाच्या आरक्षणासाठी पात्र ठरत नसले (विशेषतः जातीवर आधारीत) तरीही नागरिकत्त्व आणि त्यायोगे मिळणार्‍या सवलतींचा लाभही ते घेऊ शकत नाही. ज्या संधी केवळ त्या त्या देशांतील नागरिकांसाठी किंवा कायमस्वरूपी राहणार्‍यांसाठी 'राखीव' आहेत, तेथे हे दोघेही स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे मूलतःच देशातील उपलब्ध संधी आणि इतरत्र (पक्षी देशाबाहेरच्या) उपलब्ध असलेल्या (जागतिकीकरण किंवा अन्य कारणांनी) संधी यांचा विचार समान पातळीवर करण्यात अर्थ नाही. (जागतिक)बेसनलाडू

माफी करा पण हे ब्रेड नाही तर केक खा सांगण्यासारखे नाही का? अहो त्यातला एक चिमणा अशक्त आहे त्याच मनोबल खच्ची झालय इतक्या दशकांत.. त्याला उडण्यासाठी पंखात बळ नको का द्यायला.. त्याची शैक्षणिक, सामाजिक प्रगती नको का बघायला एकूण चिमण्यांची प्रगती व्हायला हवी असेल तर? - (चिमणा) उपास

In reply to by उपास

मला वाटते त्यांना नेमके उलट म्हणायचे असावे. म्हणजे ज्यांना केक मिळू शकतो त्यांनी केकच्या मागे (हिरव्या कुरणांकडे?) "मूव्ह ऑन" व्हावे, (आधीच तुटपुंज्या असलेल्या) ब्रेडसाठी रडत बसू नये. ब्रेडचे वाटेकरीही कमी होतील, आणि केकमागल्यांनाही समाधान मिळेल. पुढेमागे ब्रेडमागल्यांच्या पंखात बळ आले की तेही केकमागे धावतील, वगैरे वगैरे. पण सगळ्यांनी त्याच तुटपुंज्या ब्रेडसाठी भांडण्यात काय हशील आहे? (अवांतरः 'आरक्षणामुळे आमची जागा गेली' हे रडणे तितकेसे पटत नाही. एक म्हणजे कमी जागांसाठी स्पर्धा इतकी प्रचंड आहे, की जर जागा मिळाली नसेल, तर ती आरक्षण नसते तर नक्की मिळाली असती, या म्हणण्याला काहीही आधार नाही. बहुधा तरीही मिळाली नसतीच. दुसरे म्हणजे इतर संधी उपलब्ध नाहीत असेही नाही. मात्र त्यांचा उपयोग करण्याची (मानसिक) लवचिकता पाहिजे. जगातील - किंवा गेला बाजार भारतातील - सर्वांनी इंजिनियर, डॉक्टर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेच पाहिजे, आणि न झाल्यास जग बुडाले, असे काहीही नाही. डोळे उघडे ठेवल्यास संधी सहसा कोठे ना कोठे सापडते, ब्रेड मिळतो, कधीकधी केकही मिळू शकतो. जी मिळेल ती संधी घेण्याची आणि तिचा उपयोग करून घेण्याची मानसिकता मात्र पाहिजे.) थोडक्यात, 'आरक्षणाविरुद्ध बोंब मारत बसणे हे डिफीटिस्ट मनोवृत्तीचे लक्षण आणि काउंटरप्रॉडक्टिव आहे' असे त्यांना म्हणायचे असावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

In reply to by पंगा

छान.. असेच असावे.. पटलेच. :) काय लोभस चित्र आहे! सशक्त चिमणे केक पाठी (पक्षी: अमेरिका) उडताहेत तर विकसनशील चिमणे तेथेच (भारतात) ब्रेड खात बागडतायत... जो जे वांच्छील तो ते लाहो!

In reply to by उपास

नाही मला काय वाटतं - लेट मी ट्राय. एक तर विचार शब्दांत मांडता येत नाहीत मला. ___ बरोबर - पण हेच :) ....... जेव्हा मोठ्ठा दगड समोर येतो तेव्हा २ च पर्याय असतात त्या दगडावर डोकं फोडणे अथवा वळसा घालून मूव्ह ऑन!!!!!

In reply to by शुचि

शुचि, २ पेक्षा अधिक पर्याय खचितच असू शकतात की.. म्हणजे दगडातून मूर्ती बनविणे.. किंवा दगड रस्त्यात असेल तर तो (एकट्याने जमत नसेल तर चार जणांनी मिळून) बाजूला करणे किंवा तेही शक्य नसेल तर वळसा घालून पुढे गेल्यावर, तो दगड तिथे आहे त्याच काही तरी करायला हवं अशी संवेदनशीलता ठेवून, जबाबदारीचे भान ठेवून त्याप्रमाणे विचार आणि कृती करायला हवी.. त्यामुळेच विश्वास आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाज प्रगतिमान होईल.. मुव्ह ऑन पण डोंट रन अवे :)

In reply to by उपास

एक म्हणजे आजकाल अमेरिकेत केक तितकासा उरलेला नाही. (दुरून डोंगर साजरे म्हणतात, पण) त्या मानाने आजकाल भारतात (निदान काही क्षेत्रांत तरी) केक मिळण्याची शक्यता त्या मानाने बरी असावी, असे वाटते. पण ते जाऊ द्या. केक म्हणजे अमेरिकाच असायला पाहिजे, असे काही नाही. केक कोठेही असू शकतो - भारतातसुद्धा. आणि केक ज्याला दिसू शकतो, जेथे कोठे दिसू शकतो, आणि मिळवता येतो, त्याने अशा केकमागे जाण्यात काहीही गैर नाही. (मात्र केक दिसावा लागतो.) दुसरे म्हणजे, केकमागेच धावले पाहिजे, असेही नाही. दुसरा ब्रेड दिसत असेल तर त्यामागेही धावण्यास हरकत नसावी. एकाच तुटपुंज्या ब्रेडसाठी सगळ्यांनी झगडण्यात, आणि मग 'त्याने माझा ब्रेड हिसकावला' म्हणून रडण्यात काय हशील आहे? जरा इतरत्रही बघावे - डोळे उघडे असले तर ब्रेड कोठे ना कोठे सापडावाच. 'तो ब्रेड आहे' हे ओळखण्याची नजर मात्र पाहिजे.

In reply to by पंगा

पंगा, तुमच्या आणि शुचिच्या मताशी सहमत आहेच.. केक खाण्यात आणि आपला मार्ग आपण शोधण्यात गैर नाहीच उलट चांगलेच, पण माझे म्हणणे इतकेच की केक खाताना जे ब्रेड खातायत त्यांच्या बद्दल संवेदनशीलता बाळगून त्यांच्या पंखात बळ कसे येईल हे पहायलाच हवे इतकच. दुसरीकडे उडून जाऊन आपल्या सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष होता कामा नये असे वाटते, अमेरिकेचे एक सर्वमान्य उदाहरण (गेल्या १० वर्षांचा [१० महिन्यांचा नाही] पक्षांचा प्रवाह बघता)म्हणून दिले बाकी ब्रेड/ केक शोधक नजर पाहिजे हे तर खरेच.. आरक्षणाच्या संदर्भात, जोपर्यंत मनापासून दोन स्तर एक मेकांजवळ येत नाहीत तोपर्यंत आरक्षण हा पर्याय अपरिहार्य वाटतो, त्याला नेमकी अमुकेक (उदा. दहा)वर्षे असं ठेवता येण म्हणूनच कठीण आहे.

In reply to by उपास

आरक्षणाच्या संदर्भात, जोपर्यंत मनापासून दोन स्तर एक मेकांजवळ येत नाहीत तोपर्यंत आरक्षण हा पर्याय अपरिहार्य वाटतो,
आरक्षणाचा हेतू, स्कोप इ. दोन स्तरांना मनापासून एकमेकांजवळ आणणे हा नसून, विकासाच्या पातळीवर एकमेकांजवळ आणणे हा आहे, असे वाटते. मानसिक दरी, इतिहासात काय घडले वगैरे बाबींचा आरक्षणाशी, आरक्षणाच्या हेतूशी काहीही संबंध नाही. विकासाची पातळी असमान आहे याच्याशी निश्चित आहे. (मानसिक दरी, इतिहासात काय घडले वगैरे पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. त्याचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही.)
त्याला नेमकी अमुकेक (उदा. दहा)वर्षे असं ठेवता येण म्हणूनच कठीण आहे.
विकासाची पातळी समान व्हायला जो काही वेळ लागेल तो लागेल. त्याला कालमर्यादा लावता येणार नाहीच. आणि त्यासाठी जेवढा वेळ आरक्षणासारख्या योजनांची गरज भासेल, तोवर त्या राबवणे इष्टच आहे. त्यात काहीही गैर नाही. मात्र त्यात इतर मुद्द्यांची सरमिसळ करणे काउंटरप्रॉडक्टिव ठरेल.

In reply to by पंगा

>>(अवांतरः 'आरक्षणामुळे आमची जागा गेली' हे रडणे तितकेसे पटत नाही. एक म्हणजे कमी जागांसाठी स्पर्धा इतकी प्रचंड आहे, की जर जागा मिळाली नसेल, तर ती आरक्षण नसते तर नक्की मिळाली असती, या म्हणण्याला काहीही आधार नाही. बहुधा तरीही मिळाली नसतीच. स्वानुभवावरून सहमत आहे. माझा गेट स्कोअर ७६ माझ्या मित्राचा ५५ मला एमटेकसाठी प्रवेश मिळाला नाही. त्याला मिळाली. प्रथमदर्शनी मत- आरक्षणामुळे मला प्रवेश नाही. आरक्षण नसते तरी मला प्रवेश मिळालाच नाही. लिस्टमधला माझा क्रमांक एकूण जागांच्या जवळपासही नव्हता. नंतर तो "सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असलेले आय आय टी-एम टेकचे शिक्षण" घेऊन आणि "सर्वांना समान असलेली परीक्षा" देऊन एमटेक झाला.

वरील सर्व चर्चेत बर्‍याच जणांना "आरक्षण असलं म्हणून काय झालं? इतर संधी आहेतच आणि त्या शोधल्या पाहिजेत, हिंमत पाहिजे, मूव्ह ऑन.." असं वाटतंय हा त्यांच्या कर्तबगारीचा आणि उमदेपणाचा पुरावाच आहे. मूळ प्रश्न होता (जसाच्या तसा): मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत? ते तर बाजूलाच पण आता मराठा समजही आरक्षण मागू लागला आहे....अशाने काय होणार? आणि आरक्षण मागून स्वतःच आपल्यात काहीतरी कमी आहे अन बाकीचे आपल्यापेक्षा उच्च आहेत हेच नाही का कबुल करत? मला वाटतं यातून बहुधा असे समानार्थी प्रश्न निघत होते की: "आरक्षण असावं का?", "योग्य आहे का?","ठराविक जातीचे म्हणून किंवा ठराविक वर्गात जन्माने आहोत म्हणून काही सवलती मिळाव्यात आणि इतरांना त्याच कारणाने (ठराविक जातीचे म्हणून किंवा ठराविक वर्गात जन्मान) त्या मिळू नयेत हा न्याय करण्याचा बेसिस योग्य आहे का?" सूडगत न्याय हा प्रकार (तू माझी गाय मारली म्हणून मी तुझी गाय मारतो.. किंवा तुझ्या बापाने माझ्या बापाच्या घरी चोरी केली म्हणून मी तुझ्या घरी करणार आणि तीही कायद्याने) भारतीय दंडसंहितेत तरी अग्राह्य आहे हे सर्वांनाच कबूल असेल. मग आताच्या चालू चर्चेचा रोख पाहून, चर्चा ही "मुळात आरक्षण आहेच" हे गृहित धरून मग त्याचं प्रमाणच कसं कमी आहे, इतर काय काय उपाय करुन "अनारक्षित" वर्गाने स्वतःचे समाधान करावे किंवा मार्ग काढावा , किंवा अशीही त्यांना ती संधी मिळालीच नसती, आरक्षणामुळे नाही काही गेली ती संधी, मुळुमुळू रडत बसू नका, आपले भविष्य आपण घडवू. वगैरे या वळणावर कशाला? मग ती वेगळीच चर्चा होईल ना : विषय" आरक्षणाला कसे स्वीकाराल / तोंड द्याल" कसे? :)

आरक्षणामुळे मागच्या ५०-६० वर्षात दलित समाजाचा बराच विकास झाला. पण दलित समाजाची लोक संख्या पाहता मिळणारं आरक्षण फारच कमी आहे. दलिताना मुख्य प्रवाहात सामावुन घेणे देशाच्या हिताचं काम आहे. काहि बामणाना देशाचं हित नको आहे. म्हणुन ते दलितांच्या विकासाचे मार्ग बंद करण्याच्या मार्गाने प्रयत्नशिल असतात. या देशाचं नुकसान करणारा समाज म्हणजेच ब्राह्मणी समाज ज्यानी दलितांची, मागासलेल्या वर्गाची निर्मीती करुन एका संपन्न देशाला देशो धडिला लावलं, ते परत आरक्षण बंदिचा कट रचुन परत एकदा देशाला अंधारात नेण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील बहुसंख्य समाज हा दलित समाज आहे, आणि ज्या देशाचा एक मोठा समाज मागासलेला असेल तो देश पुढे जाणार नाही हे उघड आहे. ईथे आर्थिक निकषाला पुढे करुन संवर्णाना मलाई वाढण्याचा कावा दिसतोय. हे संवर्ण इन मिन ३% आहेत. या बामणानातिल जवळपास सगळेच संपन्न आहेत. समजा संपुर्ण ३% बामण भिकेला लागले असे जरी गृहित धरले तरी देशाच्या प्रगतीवर काहिच बाधा येणार नाही. मग उगीच या तिन मधिल काहिना आर्थिक निकषावर का म्हणुन आरक्षण दयावे. पण दलित, बहुजन समाज जो देशातील बहुसंख्य समाज आहे त्यांचा विकास महत्वाचा आहे. किंवा हा समाज मागे राहिला तर त्या मुळे येणारं परिणाम हे मोठ्या प्रमाणत असेल. आणि हा परिणाम देशाचं नुकसान करेल. अगदी याच्या उलट ३% वाल्यांचा परिणाम आला तरी तो जाणवणार नाही. म्हणुन कुठल्याच किमतीत आर्थिक निकषाला पुढे करुन इतराना आरक्षण देऊ नये. कारण या इतरांमुळे देशाच्या कुढल्याच घटकावर फारसा प्रभाव पडणार नाही. पण बहुजन समाज मागे राहिला तर सगळ्याच घटकांवर प्रभाव पडेल आणि परत देशाचं (जो आता कुढे सावरायल लागला) वाट्टोळं होईल.

In reply to by मधुकर

आपण बामण शब्दाऐवजी ब्राह्मण असा योग्य शब्द वापरलात तर आख्या समाजावर उपकार होतील. बामण हा शब्द जसा ब्राह्मणांना हिणवण्यासाठी वापरला जातो तसाच तो इतर जातींना हिणवण्यासाठी देखील वापरला जातो. या शब्दाचा उगम बा + म्हण या दोन शब्दांत आहे. म्हणजे जो आपला बाप म्हणण्यासारखा असतो तो बामण. शब्द कुठल्याही अर्थाने वापरला गेला तरी तो हिणकस जातिवाचक शब्द आहे आणि त्यामुळेच अयोग्य आहे. आपण आपला प्रतिसाद संपादित करुन योग्य त्या सुधारणा केल्या तर बरे होइल.

In reply to by मृत्युन्जय

आपण बामण शब्दाऐवजी ब्राह्मण असा योग्य शब्द वापरलात तर आख्या समाजावर उपकार होतील.
बा आणि ब्रा मधे खुप फरक असल्यामुळे ब्राम्हण हाच शब्द योग्य वाटतो असे सुचवु इच्छितो .

आरक्षण ही समाजाला लागलेली कीड आहे .. बाबासाहेबांनी घेतलेली निर्णय योग्य होता .. कालावधी ठरवुन घेतलेले आरक्षण योग्य होते .. परंतु राजकारणं करुन तसेच जे आरक्षण उपभोगत आहेत त्यांनाच या गोष्टीची पर्वा नाहीये ... त्यांनाच या महामाणवाचे शब्द आठवत नाही .. तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ? मराठा समाज आरक्षण मागत आहे .. हे मान्य असले तरी सगळ्या मराठ्यांना आरक्षण नको आहे. आरक्षण मागणार्यांनी सर्वांची मते गृहीत कशी धरली हेच कळत नाही . एक मराठा असुनही मला ह्या असल्या लोकांची घ्रूणा आहे.. स्वताच्या भल्यासाठी .. स्वताला मोठे करण्यासाठी आपल्या जातील लोक कसे उपेक्षित रहात आहे हे चित्र दाखवुन हे स्वताला बाबासाहेब समजु लागले आहेत असे वाटते .. सामान्य माणुस आदराने जगु इच्छितो .. मात्र धर्मांद माणसे अआणि राजकारणी यांनीच .. ब्राम्हण कसा श्रेष्ठ .. मराठा कसा मोठा .. दलीत कसे पिडीत .. हे अमके अआणि तमके .. असले प्रश्न निर्माण केले आहेत .. वाईट वाटते .. पण काहीच करु शकत नाही . ह्याचा खेद आहेच .. पण कोठे अश्या चर्चा झाल्याकी माझे म्हणने कसे बरोबर ह्यावर्च भांडन होताना पाहिले आहे .. ते ही वाईटच .. माणसाने माणुस म्हणुन जगावे असे खुप वाटते .. पण जणावरांना कीतीही घरात घेतले तरी ते आपली तंगडी वर करणारच .. काय करणार .. सवय ही अशीच असते ..

मृत्युंजय, तुम्ही तुमचा अर्थ घ्यावा, मी माझा घेतो. आणि माझा अर्थ असा आहे. ब्राह्मण = एक जात. बामण= जातियवादी म्हणुन संबोधताना वापरण्यात येणारा शब्द. काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत. त्यानी हे सगळं केलं नसतं तर आज सगळे समान असेत, म्हणजे आरक्षणाची गरजच पडली नसती. आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. बामणी व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजाला फायदा पोहचविण्याच्या हेतुने (वाईट मार्गाने ) काम करत होती (आणि संधी मिळाली तर आजही तसेच वागेल). जर त्यावर बोलायचे नको तर मग आरक्षण ( जो चांगल्या हेतुने) राबविल्या जाते त्यावर बोट उचलण्याचेही कारण नाही. काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही.

In reply to by मधुकर

काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत.
वाह बामणांना निदान भुतकाळ तरी होता हे एकुन आनंद झाला :) विशेषतः ज्यांना भुतकाळच काय तर वर्तमान देखील मान्य न्हवता म्हणुन ज्यांनी धर्म बदलला त्यांच्या तोंडुन तर हे ऐकुन अजुन आनंद झाला. एखाद्या जातीच्या नावाने इतक्या खालच्या दर्जाला जाउन टिका होत असताना देखील संपादक शांत आहेत हे बघुन आश्चर्य वाटले. हिच टिका 'बामणेतरांवर' अथवा इतर धर्मावर असती तर आतापर्यंत बर्‍याच कारवाया झाल्या असत्या :) असो....

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>>एखाद्या जातीच्या नावाने इतक्या खालच्या दर्जाला जाउन टिका होत असताना देखील संपादक शांत आहेत हे बघुन आश्चर्य वाटले. हिच टिका 'बामणेतरांवर' अथवा इतर धर्मावर असती तर आतापर्यंत बर्‍याच कारवाया झाल्या असत्या चालायचेच. असो. ज्याची त्याची जाण समज अक्कल हेतु इत्यादी... पण असो... शांतता ठेवायची आहे आपल्याला आणि ती सुद्धा एकतर्फी !!

In reply to by मधुकर

तुमच्या बामण या उपाधीत मग अन्याय करणारे मराठा (पक्षी क्षत्रिय) आणी वैश्य लोक सुद्धा येतात का? सवर्णांमध्ये हे पण येतात आणु चातुर्वर्ण्य पद्धतीचा लाभ / दुरुपयोग यांनी पण केला. शिवाय बामण हे ब्राह्मण लोकांबद्दलच केवळ बोलतात हे न कळण्याएवढे मुर्ख तुम्ही असाल असे वाटत नाही. (चुकीचे असेल तर माफ करा एक डाव). पुर्वी हे असे झाले म्हणुन आज त्याच्या उलटे व्हायला पाहिजे ही सुलतानी पद्धत झाली. शिवाय पुर्वी एखाद्याने विवक्षित जातीवर्गावर अन्याय केला म्हणुन आज त्याच्या वंशजांना जातिवाचक अपशब्द वापरणे योग्य आहे असा तर्क तुम्ही कुठुन लढवता आहात हे कळाले तर आनंद होइल. अन्याय करणारे सगळे ब्राह्मण म्हणजे बामण असा तर्क तुम्ही कुठल्या मुद्द्यावर लढवता आहात तेही कळु देत. अजुनही काही लिहिणार होतो पण प्रतिसादांना पंख लागतील आणि समोरचा माणूस हिणकस प्रतिवाद करतो म्हणुन मी पण करतो असा कोणाचा समज होउ नये म्हणुन अधिक काही लिहित नाही. बाकी संपादक मंडळ योग्य ती दखल घेत आहे अशी आशा करतो.

In reply to by मधुकर

>>काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत. त्यानी हे सगळं केलं नसतं तर आज सगळे समान असेत, म्हणजे आरक्षणाची गरजच पडली नसती. एक महत्वाचा मुद्दा सांगतो इथं. फक्त एका जातीला ह्या साठी वेठीस धरणे चुकीच आहे. कारण स्वतःला उच्च म्हणवणार्या सर्व जातींनी हात धुवून घेतले आहेत. महाजनांना गावाबाहेर काढण्या इतक प्रभुत्व ब्राह्मणांकड कधीच नव्हतं. फार तर मंदीरात कुणाला घ्यायच आणि कुणाला नाही इतकाच अधिकार त्यांच्याकडे असावा. आणि त्यांनी तस शिकवलं म्हणून क्षत्रिय तस वागले आणि व्यापारी वर्गानं त्यांची साथ दिली हा युक्तीवाद हा मूर्खपणाचा कळस आहे. क्षत्रिय आणि व्यापारी वर्गानं आपली डोकी कुठ गहान ठेवली होती? आणि आज जे आरक्षण आणि इतर कायदे वगैरे सुधारणा झाल्या आहेत त्या घडवून आणायला काही ब्राह्मणनांनीच पुढाकार घेतला होता. अगदी आंबेडकरांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरुजीही ब्राह्मणच होते. आजची तुमची ही प्रतिक्रिया बाबासाहेबांनी जर वाचली असती तर शरमेने मान खाली झुकली असती त्यांची. त्यांनी ब्राह्मण द्वेष कधीच केला नाही. ह्याचा एक ठळक पुरावा म्हणजे त्यांनी आपल आम्बेडकर हे ब्राह्मणी आडनाव कधीच बदलल नाही. >>आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. Two wrongs don't make a right ! >>बामणी व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजाला फायदा पोहचविण्याच्या हेतुने (वाईट मार्गाने ) काम करत होती (आणि संधी मिळाली तर आजही तसेच वागेल). जर त्यावर बोलायचे नको तर मग आरक्षण ( जो चांगल्या हेतुने) राबविल्या जाते त्यावर बोट उचलण्याचेही कारण नाही. संधी मिळालेकी सगळेच फायदा घेतात. त्याला बहुजनही अपवाद नाहीत. काही जण आज तिसर्या पिढीतही आरक्षणाचा फायदा घेतात. अजून असे बरेच बहुजन आहेत ज्यांना हा फायदा कधीच मिळाला नाही. मग शिकलेले आणि आर्थिक परिस्थिती चांगले असेलेल लोक ती अडमीशन किंवा नोकरी इतर जास्ती गरज असलेल्या बहुजनांसाठी का नाही सोडत? अपवाद आहेत पण फार कमी. म्हणजे बघा बहुजनांमधेच आरक्षाणामुळे काही ब्राम्हण तयार नाही का झाले. तुमच्या मतानुसार फार वाईट झालं नाही का? विरोध मुळात आरक्षणाला नाही आहे. त्याचा जो गैरवापर होतो त्याला आहे. >>काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही. स्वार्थ, द्वेष आणि इतर कुठली ही भावना अगदी त्याग सुद्धा जात बघून निपजत नाही. जाती व्यवस्था चुकीची होती, त्याच्या पलिकड जावून विचार करणं गरजेच आहे.

In reply to by मधुकर

काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही. हाहाहाहा .. भारी!! सकाळी सकाळी हापिसात चाय-काफी घेताना असं काही हसू आणणारं वाचलं की किती छान वाटतं! पुढचा सगळा दिवस छान जाणार याची खात्रीच पटते. (चाकरमानी)बेसनलाडू

सर्व मान्य करु म्हणतानाही: आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. या लॉजिकविषयी संभ्रमित झालो. तपशील आवश्यक वाटल्यासः त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? याच अन्यायकर्त्यांच्या पूर्वजांच्या नावाने खडे फोडण्याचे कायदेशीर रूप "आरक्षण" हे असेल तर मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. हे म्हणजे प्रोग्र्याम लूपमधे फसल्यासारखे झाले.

विषय आरक्षणावरून ब्राम्हण बॅशिंगकडे वळल्यामुळे ह्यावर बोलणं थांबवत आहे. आजकालच्या युगात ब्राम्हणांना भटे, बामन म्हणून हिणवलेलं चालतं. पण ब्राम्हणांनी कुणाला महार चांभार म्हणलं की मात्र कायदेभंग होतो. कलियूग आहे, चालायचंच. सगळ्या क्षेत्रात आंधळं आरक्षण राबवल्याचे परिणाम आपण बघतोच आहोत. इति लेखन सीमा.

In reply to by आदिजोशी

फक्त साडेतीन टक्क्यांची भीति उरलेल्या शहॅण्णौ पूर्णांक पाचांना का वाटावी ? आणि तेही इतके दिवस ? कोण आहे रे तिकडे ? या साडेतीन टक्के पाप्यांना देशोधडीला लावा.

येथे प्रतिसाद देताना बहुसंख्य सदस्यांनी आरक्षणामुळे तथाकथित ढासळणार्‍या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केल्याने पेमेंट सीटवरील 'गुणवंतां'मुळे ही गुणवत्ता वृद्धींगत होते काय असा मला पडलेला प्रश्न होता. त्याऐवजी कॉलेजांचे अर्थकारण हा मुद्दा चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद. आता माझा वैयक्तिक अनुभव हा आरक्षणामुळे प्रवेश मिळालेले मागासवर्गीय विद्यार्थी अधिक झटून अभ्यास करतात असा आहे. शिवाय हल्लीच्या सात आठ वर्षांमध्ये खुल्यावर्गाच्या गुणांची टक्केवारी व मागासवर्गीयांच्या गुणांची टक्केवारी यात फारसा फरक नाही असे दिसून आले आहे. (anecdotal माहिती आहे.) मी 1999 साली इंजिनियरिंगला प्रवेश घेतला तेव्हा खालीलप्रमाणे प्रवेशाची गुणवारी होती. खुल्या वर्गाचे प्रवेश - 292/300 ओबीसी - 291/300 एससी - 282/300 एनटी - 275/300 एसटी - 260/300 या टक्केवारीत वर उल्लेख केल्यानुसार 85 टक्के व 55 टक्के असा मोठा फरक नाही.

In reply to by आजानुकर्ण

खुल्या वर्गाचे प्रवेश - 292/300 ओबीसी - 291/300 एससी - 282/300 एनटी - 275/300 एसटी - 260/300 मी एफ वाय बी कॉम ला प्रवेश घेतला (वर्ष १९९९) तेव्हा खुल्या वर्गाचे प्रवेश ८१% ला बंद झाले . आणि त्याचवेळेस ओबीसी गटात ६५% आणि एससी / एनटी गटामध्ये ४०% ला प्रवेश मिळत होते. ही टक्केवारी बी एम सी सी, पुणे येथील आहे. सर्व जागा भरल्यानंतर सायन्स वरुन कॉमर्स ला येणार्‍या काही मुलांनी अ‍ॅडमिशन कॅन्सल केली म्हणुन मला प्रवेश मिळाला (मला ८०.५% होते). जेव्हा मी कायद्याचा अभ्यास सुरु केला तेव्हा आय एल एस. पुणे मध्ये कायद्याच्या पदवीच्या प्रवेशासाठी खुल्या गटाला ६५% ची अट होती (पदवी परीक्षेला). एस सी / एन टीला इथे देखील फक्त ४०% ची तर ओ बी सी ला ५०% ची अट होती. जेव्हा मी पुणे विद्यापीठातुन इंपोर्ट एक्स्पॉर्ट चा पोस्ट ग्रेज्युअ‍ॅट डिप्लोमा केला तेव्हा खुल्या वर्गातील मुलांसाठी केवळ १० जागा होत्या आणि रेझर्वेशनच्या ३२ जागा होत्या. काही जागा मुलींसाठी राखीव होत्या. तुमच्या वेळेस फरक फारसा नव्हता हे चांगले झाले. तुम्हाला कदाचित त्याची झळ बसली नाही. पण २ वर्षे प्रचंड मेहनत घेउन ८०.५% मिळवल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेल्या महाविद्यालयात एफ वाय बी कॉम ला देखील अ‍ॅडमिशन मिळु नये. आणी आपल्या डोळ्यासमोर वर्गातल्या सहाध्यायाला (त्याचे वडील गवर्मँट कॉण्ट्रॅक्टर होते. करोडपती होते) केवळ निम्न जातीतील असल्यामुळे ५६% वर प्रवेश मिळावा हे बघणे खुप क्लेशदायक होते.

In reply to by आजानुकर्ण

पेमेंट सीटवरील 'गुणवंतां'मुळे ही गुणवत्ता वृद्धींगत होते काय असा मला पडलेला प्रश्न होता. त्याऐवजी कॉलेजांचे अर्थकारण हा मुद्दा चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद.
पेमेंट सीटचा आणि गुणवत्तेचा संबंध काय? मला वाटते "पेमेंट सीटवरील 'गुणवंतां'मुळे ही गुणवत्ता वृद्धींगत होते काय" हा न-प्रश्न आहे. उत्तर उघड आहे. फुका कळफलकाची वाफ का दवडायची? तरीही, स्पष्टपणे बोलायचेच असेल, तर पेमेंट सीटचा निव्वळ कॉलेजांच्या अर्थकारणाशीच संबंध आहे, गुणवत्तेशी त्याचे काहीही देणेघेणे नाही. असो.

In reply to by आजानुकर्ण

त्याऐवजी कॉलेजांचे अर्थकारण हा मुद्दा चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद.
आपल्याला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' असे तर म्हणायचे नाही?

ब्राह्मण समाजाचा उल्लेख करताना तो 'साडेतीन टक्केवाले' असा करणे बहुधा वस्तुस्थितीशी विसंगत ठरावे. साडेतीन टक्के हा उल्लेख प्रथम १९३० सालानंतर प्रचलित झाला असावा. कारण त्या वर्षी ब्रिटीश सरकारने मुंबई इलाख्यातील जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जेधे-जवळकरांच्या लेखनात हा उल्लेख आढळून येतो. काही जण 'साडेतीन टक्केवाले' हा शब्दप्रयोग रुढ केल्याचे श्रेय लक्ष्मण मानेना देतात, पण हा शब्दप्रयोग ब्राह्मणेतर चळवळ ऐन भरात असतानाच म्हणजे १९३० ते १९५० या काळात सर्रास वापरला जात होता. सांगायचा मुद्दा असा, की स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण समाजाने कुटूंब नियोजनाचा दूरदर्शीपणा दाखवल्याने अगदी आजही बहुतेक ब्राह्मणांच्या घरात 'हम दो हमारे दो' आणि आता 'हम दो हमारा एक' हा ट्रेंड आढळतो. यामुळे ब्राह्मण समाजाची संख्या उत्तरोत्तर कमीच झाली आहे. सध्या ती दोन-सव्वादोन टक्क्याच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. निश्चित आकडेवारी सरकारने ताजी जातिनिहाय जनगणना जाहीर केली तर त्यातून स्पष्ट होईलच. पण तोवर १९३० सालचेच प्रमाण नमूद करत बसणे हेही चुकीचे ठरेल. एरवी मलाही 'साडेतीन टक्के' शब्द खूप आवडतो. किती महत्त्व आहे त्या शब्दाला! देवीची साडेतीन शक्तीपीठे...पेशवाईतील साडेतीन शहाणे...साडेतीन मुहूर्त...एक दोन साडे माडे तीन...मेरी जान आना घर, साडेतीन बजे... आणखी बरेच काही...

मायबोलीवर झंडु म्हणुन एक आय डी आहेत त्यांचा प्रतिसाद मला इथे द्यावासा वाटतोय म्हणुन देते. (त्यांची पुर्वपरवानगी घेतली आहे.) झंडु | 6 December, 2010 - 06:43 मपतप्रदर्शन करण्याचं टाळून आरक्षणाचा इतिहास समोर ठेवतोय.. पहिल्या गोलमेज परिषदेमधे हिंदूंचे प्रतिनिधित्व गांधीजी करत होते तर मुस्लिमांचे आपले स्वतःचे प्रतिनिधी होते. भारताला स्वायत्ता देण्याच्या दॄष्टीने सर्वांचे समाधान होईल अशी राज्यप्रणाली असावी असा हेतू या परिषदेमागे होता. तिथं डॉ आंबेडकरांनी दलित समाजाचे प्रश्न हे हिंदू समाजापेक्षा वेगळे असल्याने त्यांना वेगळा गट समजलं जावं ही मागणी केली. ब्रिटीशांना ते वेगळे कसे आहेत हे पटवून दिल्यानं आणि समाजाची त्यांच्याकडं पाहण्याची दृष्टी, निवडणुका झाल्यास दलित उमेदवाराबाबतची मानसिकता याबद्दलच्या सर्व शंका उपस्थित केल्या. दलित उमेदवारास कुणी मत देणार नाही आणि त्यांना स्वतःच्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणीतरी मिळायला तर हवा. ज्याला चटका बसलेला नाही त्याला या प्रश्नांची जाण असणार नाही हे त्यांनी ठासून सांगितलं. यावर उपाय म्हणून दुबार मतदारसंघाची उपाययोजना त्यांनी सुचवली. म्हणजे महाराष्ट्रात ४० जागा असतील तर ४० च्या ४० जागेवर सर्वसाधारन उमेदवार उभे राहतील. त्यानंतर दलितांचे त्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी स्वतंत्ररित्या उभे राहतील. म्हणजे पुण्यात जर दलित उमेदवार असेल तर पुण्यात एकूण दोन उमेदवार उभे राहतील. जिथे दलित लोकसंख्या जास्त आहे तिथंच हा उमेदवार असणार होता. सर्वसाधारण उमेदवारास सर्वच जण मत देतील. कारण काही समस्या या सर्वांच्या सारख्याच असतात. पण दलितांचे विशेष प्रश्न मांडण्यासाठी दलित उमेदवारास फक्त दलित उमेदवाराने मत द्यावं ही सूचना होती. म्हणजेच त्या उमेदवारास सर्वसाधारण गटातील शक्तिशाली गटांचे मत मिळवण्यासाठी तडजोडी कराव्या लागणार नाहीत ही भावना त्यामागे होती.. आज या राखीव जागांवर निवडून येणारे उमेदवार हे त्या त्या पक्षाला बांधील असल्याने ते दलित समाजासाठी काहीच करू शकत नाहीत. पण या जागांमुळे त्या त्या पक्षाला हक्काच्या जागा मिळत असल्याने या जागा बंद होऊ दिल्या जात नाहीत. दुबार मतदारसंघाच्या या वाताघाटी समजल्यावर गांधीजी इंग्लंडला गेले आणि त्यांनी मुस्लिमांना आपल्या बाजूने केले. त्यासाठी त्यांच्या ब-याचशा अटी त्यांनी मान्य केल्या. या दोन गटांनी एकत्र येऊन मग दलितांच्या हक्कांना विरोध केला. पण बाबासाहेब काही समझोत्यास तयार होईनात. त्यातून पुढे गांधीजी पुणे येथे येरवडा जेल मधे उपोषणास बसले. प्राणांतिक उपोषणामुळे वातावरण तंग झालं होतं. गांधीजींची प्रकृती जशी ढासळली तशा बाबासाहेबांना धमक्या येऊ लागल्या. या धमक्या वाढल्यानंतर काही मित्रमंडळींनी त्यांना समजावून सांगितलं कि तुमची बाजू योग्यच आहे. न्यायाची आहे. पण ज्यांच्यासाठी ही लढाई तुम्ही लढता आहात तेच असंतोषाचे बळी ठरून मारले गेले तर तुम्ही कुणासाठी लढणार ? हा प्रश्न योग्य होता.. त्यासाठी बाबासाहेबांनी चर्चेची तयारी दर्शवली. या वाताघाटींदरम्यान दुबार मतदारसंघाचा दावा बाबासाहेबांनी सोडून दिला तर त्याची भरपाई राखीव जागांद्वारे करण्याचं आश्वासन गांधीजींनी दिलं. राखीव जागेबाबत बाबासाहेब साशंक होते म्हणून काही काळासाठी प्रयोग म्हणून हे धोरण राबवून पुढे सुधारणा करण्याचं ठरल. हे झालं राजकिय क्षेत्रातील राखीव जागांबाबत . सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्र : पाकिस्तानला मुस्लिमांच्या संख्येच्या प्रमाणात जमीन आणि वेगळं राष्ट्र दिलं गेलं. त्या काळी रिझर्व बँकेच्या गंगाजळीतील मुस्लिमांच्या वाट्याला येणारी रक्कम सुमारे ५५ कोटी रूपये ही देखील दिली गेली. पण वर्षानुवर्षे सर्वच अधिकारांपासून वंचित असणा-या दलितांचे काय ? जमिनीचा बोटभर तुकडाही नाही. पशूधन नाही. उपजीविकेचे साधन / व्यवसाय नाही. सगळेच इतरांनी ओरबाडून घेतलेलं. भारत हे एक राष्ट्र नाही. अनेक राष्ट्रांचं बनलेलं ते एक राष्ट्र आहे असं बाबासाहेब म्हणत. मुस्लिमांना ज्याप्रमाणे पाकिस्तान दिलं गेलं त्याप्रंमाणेच बाबासाहेबांनी दलितस्तान मागितलं असतं तर ते नक्कीच द्यावं लागलं असतं. अशा स्वतंत्र राष्ट्रामधे दलितांचंच सरकार असतं, त्यांची स्वतंत्र भूमी असती आणि स्वतःचाच अजेंडा असता. या ठिकाणी राखीव जागांची गरजही भासली नसती. पण बाबासाहेबांनी ही मागणी कधी केली नाही. त्यांना ते योग्य वाटलं नाही. भारताच्या राष्ट्रीय संपत्तीत दलितांचा ३० टक्के वाटा आहे. दलितांची खरी लोकसंख्या ३० टक्के असल्याचं बोललं जातं. त्यामुळं संपत्तीचं समप्रामाणात वाटप झालं पाहीजे हे कुणीही नाकारू शकणार नाही. पण हे कुणालाच करायचं नसल्यानं तडजोड म्हणून आहे त्या सिस्टीममधे राखीव वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात ठेवला गेला.

>>भारताच्या राष्ट्रीय संपत्तीत दलितांचा ३० टक्के वाटा आहे. दलितांची खरी लोकसंख्या ३० टक्के असल्याचं बोललं जातं. त्यामुळं संपत्तीचं समप्रामाणात वाटप झालं पाहीजे हे कुणीही नाकारू शकणार नाही. पण हे कुणालाच करायचं नसल्यानं तडजोड म्हणून आहे त्या सिस्टीममधे राखीव वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात ठेवला गेला. मान्य. आता ह्या ३०% च्या आत घुसुयात. मी वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मांडलेले मुद्दे पुन्हा ह्याच संदर्भात मांडतो. समजा की आपण दोघेही दलित आहोत. पण माझ्या वडीलांनी आरक्षणाचा फायदा मिळाला होता. ते चांगले शिकलेले आहेत आणि माझी आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा चांगली आहे. तुमच्या घरात शिकणारे तुम्हीच पहिले आहात. आणि तुमची आर्थिक परिस्थिती माझ्या इतकी चांगली नाही. आणि आता आपण बारावीची परीक्षा देवून ईंजिनियरींगला जाणार आहोत. मला क्लासेस आणि इतर सर्व सुविधा आहेत आणि तुम्हाला नाहीत. आणि राखीव जागांमध्येही मार्कांवरच ती कुणाला द्यायची ही ठरते. आणि आपल्या दोघांनाही ओपन कॅटेगरीमध्ये अ‍ॅडमिशन मिळण्याइतके मार्क मिळाले नाहीत. इथ जरी हे काल्पनिक दाखवल असल तरी हे प्रत्यक्षात नेहमीच होतं आता ह्या परीस्थितीवर आधारीत काही प्रश्नांची उत्तरं शोधनं गरजेच आहे. १. माझ्यातील आणि तुमच्यातील स्पर्धा फेयर आहे का? २. माझ्या किती पिढ्या तीस ट्क्क्यात राहणार आणि तुमच्या सारख्या इतरांना तुमच्या हक्का पासून वंचित ठेवणार? ३. आणि जर मीच माझ्या दलित बांधवांसाठी ती जागा सोडणार नसेल तर इतर ७०% वाल्यांनी त्यांच्या जागा चांगले गुण मिळालेल्या दलिताला का द्याव्यात? ह्या प्रश्नांची उत्तरं देणे सोपं नाही आहे. आरक्षणाचा मुळ हेतू कुठ तरी हरवला आहे. मागसलेल असण्याचा फायदा असा त्याचा गैरवापर चालु आहे अस वाटायला लागल आहे :(