अनादिसिद्ध हें आघवें ... होत जात स्वभावें ...
कधी कधी रिकामा वेळ सापडतो. सर्व कामं आटोपलेली असतात. पुढली कामं अवकाशाने केली तरी चालणार असतात. मस्त निवांत वेळ असतो. अशा वेळेस बसल्या बसल्या कधी एखादे गाणे गुणगुणतो, रेडीओ, सीडीप्लेअर लावतो अथवा टिव्ही लावतो. पण कधी कधी त्याचा कंटाळा येतो. मग उगाच टिवल्या बावल्या करण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचत बसतो. हे तर झाले नेहमीचे. पुस्तकातही सतत डोके घालुन वाचण्याचा कंटाळा आला की एखादे जुनेच वाचलेले पुस्तक मधुन मधुन पानं उघडत नजर टाकत, त्यातल्या एखाद्या वाक्यावर विचार करत बसणे हा माझा आवडता उद्योग. असंच एक पुस्तक उघडलं आणि त्यातल्या एका वाक्यावर नजर पडली.
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवा का शोचावे । सांग मज ॥
बघता बघता मन विचारांच्या गर्तेत कसे गेले ते समजलेच नाही. हे जग कसे झाले, मी कोण आहे, कशाकरता हा पसारा आहे हे खरं तर सनातन प्रश्न. प्रत्येकालाच पडतात असं नाही. ज्यांना पडतात त्यांना त्याची उत्तरं मिळतातच असं नाही. ज्यांना मिळाली त्यांनी इतरांना सांगितली ती भावतात असं नाही. पण समजतच नाही असंही नाही. हे प्रत्येकाचे दैवच आहे असं म्हटलं तरी चालेल. किती तरी वेगळे विचार एकाच दिशेने जातात असं वाटतं पण ती दिशा दिसतेच असं नाही. जरा स्पष्ट झालं असं वाटतं तोच अंधारुन येतं. अंधारात खोल खोल जाणार असं वाटतं तोच चांदणं पडतं. समजत नाही हेच खरं.
ते सांगतात दा़खले मिळतात त्याच्या अस्तित्वाचे, देहधारी रुपाचे. कशावरुन म्हटले तर म्हणतात आमच्या गुरुंनी सांगितले. ते कसे खोटे असेल? खरं आहे. गुरु मार्गदर्शक असतो. चुकीचा मार्ग दाखवणार नाही पण मला भावत नाही त्यांचा विचार. विचार करतो तो देहधारी कसा दिसेल? मानवासारखा हात, पाय, तोंड असलेला पण उच्च कोटीची ताकद, बुद्धी असलेला असेल. असु शकेल. का पशुरुपी परंतु मानवी भावभावनांनी बनलेला अशा पद्धतीचा असेल. होय तसाही असु शकेल. देव झाला तरी माणसाच्याच रुपाचा असला पाहिजे हे थोडेच आहे? का शक्तिरुपी असेल? पृथ्वीवरील जीवनाचा प्रेरक आहे त्याची पूजा करा ते सांगतात. पण मला दिसत नाही तो त्याचे काय? मी विचार करतो.
मी घाबरतो. त्यांना दिसतो मग मला का दिसत नाही. मी आधार शोधतो. कुणी सांगतं अमुक अमुक महान तपस्वी आहेत ते तुला सांगतील काय ते. मी त्यांच्याकडे जातो. सांगा म्हणुन लकडा लावतो. माझे मनातले प्रश्न जणु त्यांना ठाऊक असतात पण त्यांची भाषा मला कळत नाही. ते अनेक सिद्धांत सांगतात. सर्परज्जु, शुक्तिरुपे इत्यादी काहीबाहीबोलतात. म्हणतात ईश्वरी अधिष्ठान शरीर विरहीत असल्याने ते प्रेरक होवु शकत नाही. कारण व्यवहारात तशी प्रचिती येत नाही. राष्ट्राचे नियामक असलेला राजा (वा प्रतिनिधी) हा शरीर रुपातच असतो. शरीरविरहीत राजा असुच शकत नाही. त्यामुळे ईश्वर मानणा-याला ईश्वराचे इंद्रियाधारभुत शरीर मानावे लागते. पण असे शरीर मानता येते का ? तर नाही मानता येत. कारण उघड आहे, प्रथम सृष्टी नंतर शरीर असाच क्रम आहे. म्हणजेच सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी शरीराचे अस्तित्व शक्य नाही. म्हणजेच ईश्वराला शरीर नाही त्यामुळे तो प्रेरक होणे शक्य नाही. व्यवहारात सुद्धा असाच अनुभव येतो. ते उलगडुन सांगतात.
मला काही म्हणता काही कळत नाही. त्यांना धीर धरुन विचारतो पण तो स्वेच्छाधारी असेल तर. ते हसतात आणि म्हणतात आता जर असे म्हटले की ईश्वराला स्वेच्छेने शरीर धारण करता येते तर तसे मानता येणार नाही. कारण सरळ आहे ते असे की असे मानल्यास ईश्वर इंद्रियाद्वारे भोग भोगतो असे मानावे लागेल. असे मानल्यास त्याच्या ईश्वरतत्वाची संगती लागत नाही, कारण ईश्वर भोग भोगतो असे मानल्यास त्याचे ईश्वरतत्व नाकारले जाते. नाकारावेच लागते.
मला घाम फुटतो. तर्काचा प्रांत आपला नव्हे. मी आपला शांत बसुन रहातो. शुन्यात नजर टाकुन बसतो. तिकडुन एक जण येतो. सगळं जग क्षणिक, भ्रांती आहे, शून्य आहे सांगतो. मी आपली मान डोलावतो. तोच मागचा तपस्वी पुढे येत म्हणतो पण शुन्याच्या साक्षीची गरज आहेच ना? क्षणिक भ्रांतीला अधिष्टान हवेच ना? ते कोठुन आणणार? त्या दोघांना सोडून मी चालत जातो. दुरुन एक स्वर ऐकु येतो. मधुर. आश्वासक. अगदी आतुन आल्यासारखा.
मी जवळ जातो. त्याच्या समोर बसतो. माझी तगमग त्याला आधीच कळली असावी. डोक्यावरुन हात फिरवतो. तो आश्वासक स्पर्श मिळतो. किती तरी दिवसांपुर्वी आई असाच हात फिरवायची. कधी घाबरलो, धडपडलो की आई असाच हात फिरवुन मला जवळ घ्यायची. सर्व जगातली दु:ख त्याच क्षणी मिटुन जायची. मी शांतपणे डोळे मिटुन घेतो. कानावर हलके हलके शब्द पडत असतात. मनातली किल्मिषं शंका सगळ्या दुर होत आहेत असं वाटतं. उरलेल्या शंका आता पटकन मिटतील असं वाटतं. तृप्त होत मी डोळे उघडतो. समोर कुणी नसतं असतं ते मगाचच पान आणि डोळे खिळलेले त्याच वाक्यावर
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवा का शोचावे । सांग मज ॥
हे सर्व अनादी (प्रारंभ नसलेले ) जग आपल्या स्वभावाने उत्पन्न होत आहे, व नाश पावत आहे, तर सांग तुला येथे शोक करण्यासारखे काय आहे ?
माझे डोळे भरुन येतात. समोरचं धुसर व्हायला लागतं पण त्यातुन काही प्रतिमा दिसायला लागतात. मी डोळे फाडुन फाडुन बघण्याचा प्रयत्न करतो. तीच मगाचीच आश्वासक आकृती दिसते. काही तरी बोलत असते मी कानात प्राण आणुन ऐकतो. शब्द बासरी सारखे मधुर निनाद करत कानातुन हृदयापर्यंत जातात. समोर बसलेले शांत पणे पहात असतात. त्यांच्या डोळ्यातुन अखंड अश्रु धावत असतात. मला समजत नाही. मी शांतपणे पहात बसतो. हळुच तो उठतो. उठुन एकवार सर्व लोकांकडे पाहुन मान लववुन नमस्कार करतो आणि शांतपणे मागे न पहाता चालु लागतो. सगळे पाषाणासारखे स्तब्ध होत त्याच्या कडे पहात असतात. दोघं चौघं त्याच्या मागोमाग चालु लागतात. तो पुढे जातो. एका विवरापाशी येतो. शांतपणे आत पाउल टाकतो. मागे आलेले चारजण बाजुचा मोठा दगड शांतपणे त्या विवराच्या तोंडाशी ठेवतात. आणि मागे फिरतात. सर्वजण स्वतःशीच विचार करत डोळ्यातल्या पाण्याला वाट देत हळुवार स्वरात आक्रंदत असतात.
माझ्या डोळ्यातले पाणी सरकन गालावर येते. खोल श्वास घेत मी फक्र एक उसासा टाकतो आणि हलक्या स्वरात विठ्ठल विठ्ठल नाम घ्यायला लागतो. हळु हळु मनातल्या भावना स्थिर होतात. हलकेच डोळे पुसुन मी हातातले पुस्तक मिटतो. समोर नजर टाकतो विठ्ठलाच्या फोटोशेजारी तीच आश्वासक मुर्ती दिसते.
आई ज्या मायेने आपल्या लेकराला हात धरुन अ आ इ ई शिकवते, चुकले तरी संभाळुन घेते, मायेचा पदर देते त्याच मायेने आर्त मनाला निवारा देणारा, आश्वासक शब्दांत मर्म उलगडुन सांगणारा तो तत्वज्ञ.
पुरुष असुनही सारं जग त्याला माउली असंच म्हणते.
ज्ञानेश्वर माउली !
मी उभा राहतो. हातात टाळ घेतो आणि विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणत ताल धरुन नाचायला लागतो. मन अगदी प्रसन्न होतं. सगळ्या विवंचना, काळज्या कुठे जातात ते कळत नाही. कुणी माझ्याबरोबर ताल धरत नाचु लागतं तर कुणी खि खि करुन खिल्ली उडवत बाजुने निघुन जातं. खिल्ली उडवली तरी मला फरक पडत नाही. कारण मला ते अडवु शकत नाहीत. तेच काय, प्रत्यक्ष सत् चित् आनंदाचे सगुण रुप असलेला, कमरेवर हात ठेवुन उभा असलेला तो विठ्ठल, त्याच्यात सुद्धा मला अडवण्याची ताकद नाही. रहा उभा मुकाट्याने माझं भजन संपेस्तोवर.
सर्व प्राणिमात्रांच्या, मनुष्यांच्या रुपाने एक चिद्रुपाने असलेला मी अनंत काळ होतो आणि अनंत काळ असेल. माझं भजन इतक्या सहजा सहजी आणि इतक्या लवकर संपणार नाही. वेगवेगळ्या रुपाने मीच भजन करत राहिल आणि तो पर्यंत तो विठ्ठ्ल तसाच उभा राहिल.. युगानुयुगे!
*
कार्तिक वद्य त्रयोदशी ३ डिसेंबर ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधि दिवस. आज पासुन आळंदी येथे तीन दिवस उत्सव असतो.
ज्ञानेश्वर माउलींना शतशः प्रणाम.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!
याद्या
7358
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
अतिशय सुंदर नानबा ओघवत्या
>>प्रत्यक्ष सत् चित् आनंदाचे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
क्लासिक ...
गुंतली फासळी निर्माल्यात.
अत्यंत भावुक आणि रोमांचक असं
एकदम सहमत!
In reply to अत्यंत भावुक आणि रोमांचक असं by नगरीनिरंजन
ज्ञानोबा माउली तुकाराम !
छान लिहीले आहे.
सुरेख!
अगदी अप्रतिम
नानबा...साष्टांग नमस्कार
सुरेख लिहिलंयस रे नानबा!
सुंदर प्रकटन
नेहमी प्रमाणेच उत्तम
नानाच्याचुकलं अवलियाच्या नजरेत आलं असेलच.) ;)अप्रतिम लेखन...ओघवती व रसाळ
अप्रतिम लेखन
खुप छान अमोल केळकर
सुंदर
अमृतातेहि पैजा जिंके
सर्रकन काटा आला अंगावर! अतिशय
कधी कधी रिकामा वेळ सापडतो.
धन्यवाद
ही निष्क्रियता नव्हे; हा मानसिक बिघाड!
क्लास
नाना कवित्वलक्षण|
+१
In reply to नाना कवित्वलक्षण| by असुर
+२
In reply to +१ by यशोधरा
छान
अरे वा!! वाट बघतोय मी पण.
In reply to छान by नंदन
छान
वा!!! बुवा
हे
ओघवते, प्रासादिक !
सुंदर! श्रामो --> +१
वा! अतीशय ओघवत्या शैलीत
सुर्रेख रे नाना..
सुरेख!
अप्रतिम
सर्व मायबाप वाचक,
सुंदर निरूपण. कधी कधी असे