२६/११ पासून धडा घेउन आपण करण्यासारखं काय आहे?
(ह्या विषयी पूर्वी काही उहापोह झाल्या असल्यास क्षमस्व)
२६/११ आला की मेणबत्या लावणे, श्रद्धांजली वाहणे हे नैमित्तिक झालं की सगळे आपापल्या संस्कारांप्रमाणे 'झालं-गेलं गंगेला मिळालं' ह्या वृत्तीने आपापल्या कामाला लागतो. फार तर वाचकांच्या पत्रात किंवा आंतरजालावरून (चार भिंतीआड बसून) राग व्यक्त करतो व नेत्यांना शिव्या घालतो.
ही परीस्थिती पुन्हा निर्माण होउ नये म्हणून आपण कोणते "ठोस" उपाय उचलू शकतो?
१. सार्वजनिक ठिकाणी दक्ष राहणे. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तूंची माहिती त्वरीत पोलिसांना देणे.
२. शाळांमधून्/कॉलेज/ऑफिस्/फॅक्टरीज मधून फायर-ड्रिल च्या सारखे दहशतवादी हल्ला झाल्यास काय करायचे याचे शिक्षण देणे व त्याचे ड्रिल वारंवार करणे... प्रथम पूर्वसूचना देउन आणि मग पूर्वसूचना न देता जेणेंकरून अशा परिस्थितीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होउ नये.
३. शाळांमधून शारिरीक शिक्षण म्हणून फक्त कवायत (का ?) शिकवली जाते, त्या ऐवजी कराटे/ज्युडो सारखे स्वसंरक्षणाचे प्रकार शिकवावे.
४. दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स प्रत्येक शहरात असणे आवश्यक आहे.
५. रस्तावरून पोलिसांची गाड्या, रुग्णवाहिका किंवा आगीचे बंब जेव्हा सायरन वाजवत जातात तेव्हा रस्त्यावरिल वाहनांने त्यांना वाट देउ केली पाहिजे जेणेकरून त्यांना वाट काढणे सोपे जाईल. (असं होताना मुंबईत मला तरी कधी दिसलेलं नाही उलट रुग्णवहिकेला ओवर्टेक करून जाणारे महाभाग दिसतात)
वरिलपैकी काही उपायांची परिणामकता मोजता येउ शकेल असे आणखी उपाय शोधायला हवेत जेणेकरून आपण (आपण म्हणजे विभागाची नगरपालिका/ग्रामपंचायत इ.) प्रत्येक शहराचे/विभागाचे स्कोरकार्ड बनवता येतिल. ज्या शहरात / विभागात योग्य प्रगती दिसत नाही त्यांवर लक्ष केंद्रित करता येइल. जर मिडियाने ह्या स्कोर ठेवला व त्याला जर ग्लॅमराइज केलं तरी हरकत नाही, म्हणजे आपले शहर्/विभाग पहिला यावा यासाठी सगळे नागरीक प्रयत्न करतील. (ह्यात फक्त भ्रष्टाचार होउ नये.. आपल्या देशाला तोही एक शाप आहे, माणसं नियम पाळण्याऐवजी त्यातून पळवाटा शोधण्यात जास्त पटाईत असतात.) तरूणांमधे व शाळकरी मुलांमधे ह्याविषयी जर जागरूकता निर्माण झाली तरच काही वर्षांत परिस्थितीमधे थोडा फरक पडण्याची आशा आहे. ह्यासाठी हे उपाय प्रत्येकाने पाळले पाहिजेत. ह्यासाठी व्यक्तीगत शिस्त फार महत्वाची आहे. दुर्दैवाने भारतात एकूणच नियमांचे पालन होताना दिसत नाही. इतकंच काय कोणी नियमांचं काटेकोरपणे पालन करताना दिसलाच तर तो हास्यास्पद ठरतो. ही मानसिकता बदलणे अतिशय जरूरीचे आहे. नियम हे मोडण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात. त्यामुळे आपलाच फायदा आहे हे समजायला हवं.
असे आणखी काय ठोस उपाय आहेत?
याद्या
4168
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
मराठे साहेब माफ करा ..पण काहि
+१ टेन्शन काय को लेने का?
In reply to मराठे साहेब माफ करा ..पण काहि by अविनाशकुलकर्णी
साहेब आम्हि शेरात र्हातो
जीवाची तमा बाळगू नये
+१
In reply to जीवाची तमा बाळगू नये by यकु
+१
In reply to +१ by धमाल मुलगा
१ नंबर!
In reply to जीवाची तमा बाळगू नये by यकु
समजू शकलो तरी
In reply to जीवाची तमा बाळगू नये by यकु
सहमत
सहमत + सुधारणा
In reply to सहमत by सुनील
आतापर्यंत संसदेवर हल्ला, १३
युवापिढीला शस्त्रशिक्षण आवश्यक!
एनसीसी मध्ये कुस्तीचे
In reply to युवापिढीला शस्त्रशिक्षण आवश्यक! by डॉ.प्रसाद दाढे
सामान्य लोकांना शस्त्र
जसा रोग तसा इलाज
जागृती
सत्राशे साठ ना हरकत परवाने
In reply to जागृती by यकु
लाखातलं बोललात!
In reply to सत्राशे साठ ना हरकत परवाने by डॉ.प्रसाद दाढे
उपाय
२६/११ पासून धडा घेउन आपण
त्यापेक्षा मोंगलाना परत
In reply to २६/११ पासून धडा घेउन आपण by परिकथेतील राजकुमार
त्यापेक्षा मोंगलाना परत
In reply to त्यापेक्षा मोंगलाना परत by अवलिया
यावर थत्तेचाचा मार्गदर्शन
In reply to त्यापेक्षा मोंगलाना परत by परिकथेतील राजकुमार
चॉईस
In reply to त्यापेक्षा मोंगलाना परत by परिकथेतील राजकुमार
http://www.misalpav.com/node/10726
बाकी काही नाही तरी..
आपण शिकलो काहीच नाही.
आजच्या बातम्या...