गोष्ट-२ लिंगबदल
लिंगबदल
भीष्मांनी आपला सावत्रभाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करण्याचे ठरवले. त्याचवेळी काशीराजाने आपल्या तीन मुली अंबा,अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर योजिले होते. भीष्म त्या ठिकाणी गेले व त्या तीन मुलींना उचलून आपल्या रथात ठेवले व जमलेल्या सर्व राजांना युद्धाचे आव्हान दिले. सर्वांचा पराभव करून त्यांनी त्या मुलींना घरी आणून आपल्या आईच्या ताब्यात दिले व सांगितले की विचित्रवीर्याच्या लग्नाकरिता यांना आणले आहे. त्या वेळी अंबा त्यांना म्हणाली की " माझे शाल्व राजावर प्रेम आहे व आम्ही लग्न करावयाचे ठरविले होते".
भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठविले पण शाल्वाने तिचा स्विकार करावयाचे नाकारले. अनाथ अंबा भीष्मांचे गुरू परशुराम यांना शरण गेली. परशुरामांना वाटले की आपला शिष्य भीष्म आपले ऐकेल. त्यानेही अंबेचा स्विकार करण्याचे नाकारले व मग परशुराम - भीष्म यांचे चौवीस दिवस भीषण युद्ध झाले. त्यातही भीष्म हरला नाही तेव्हा परशुरामांचाही नाइलाज झाला. अंबेला आता करण्यासारखे काहीच उरले नाही. तेव्हा तिने अतिशय कडक तपस्चर्या केली. शंकराने तिला दर्शन देऊन वर दिला की " तुझ्या हातून भीष्माचा वध होईल." अंबेने विचारले " माझ्यासारख्या स्त्रीच्या हातून हे कसे शक्य आहे ?" शंकर म्हणाले " माझे शब्द खोटे होत नाहीत. पुढील जन्मी तू मुलगी म्हणूनच जन्मशील पण तुला पुढे पुरुषत्व प्राप्त होईल व तुझ्या हातून भीष्माचा वध होईल. " आपले ह्या जन्मीचे कार्य संपले असे समजून अंबेने चिता रचली. "भीष्मवधार्थ" असे म्हणून त्या चितेत उडी मारली व जीव दिला. हा झाला पूर्वार्ध.
त्याच सुमारास अपत्यप्राप्तीकरिता द्रुपद शिवाची आराधना करत होता. महादेव प्रसन्न झाल्यावर द्रुपदाने मुलगा-मुलगी मागितलेच पण आणखी सांगितले की "मला भीष्माची खोड मोडावयाची आहे; त्या करिता पुत्र पाहिजे." महादेव म्हणाले "या वराने तुला स्त्रीपुरुषात्मक एकच अपत्य होईल. प्रथम कन्या व पुढे पुरुष असे अपत्य तुला होईल." मग द्रुपदाने ते आपल्या बायकोला सांगितले. यथावकाश द्रुपदपत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले पण तिने राजाला ' मला पुत्रच झाला" असे कळविले.तिला पुत्रासारखेच वाढविले. सत्य फक्त त्या दोघा आईवडिलांनाच माहीत होते.तिचे नावही "शिखंडी" असे पुल्लिंगी ठेवले. ती मोठी झाल्यावर द्रुपदाची काळजी वाढू लागली पण शंकराच्या वचनावर विश्वास ठेऊन त्याने शिखंडीचे लग्नही हिरण्यवर्मा नावाच्या राजाच्या मुलीशी केले. पण तिला लगेचच कळले की आपला नवरा आपल्या सारखाच स्त्री आहे. तिने त्या प्रमाणे आपल्या वडिलांना कळविले व द्रुपदाने फसविले म्हणून हिरण्यवर्मा सैन्य घेऊन द्रुपदावर स्वारी करण्यास आला.
आपल्यामुळे हे संकट ओढावले म्हणून शिखंडी वैतागली व नगर सोडून एका अरण्यात गेली. तिथे तिला एक मोठा वाडा दिसला.त्या जाऊन ती रडत बसली. तो वाडा स्थूणाकर्ण नावाच्या एका यक्षाचा होता. कुबेराचा तो मोठा अनुचर होता. त्याने विचारले " तू का रडतेस ? तुझी काय इच्छा असेल ती मी पूर्ण करेन". शिखंडीने काय अडचण आहे ती सांगितली. यक्ष म्हणाला "ठीक आहे. काही काळापुरते मी माझे पुरुषत्व तुला देतो व तुझे स्त्रीत्व घेतो.पण तुझे काम झाले की तू परत येऊन माझे पुरुषत्व परत कर. शिखंडीने ते कबूल केले व शिखंडी पुरुष झाला व स्थूणाकर्ण स्त्री.
शिखंडी नगरात येतो व द्रुपदाला काय झाले ते सांगतो. शंकराचे वचन खरे झाले म्हणून द्र्पद हर्षभरीत होतो व व्याह्याला निरोप पाठवितो की " शिखंडी पुरुषच आहे, आपण काय ती खात्री करून घ्यावी." हिरण्य़वर्मा पेचात पडला. मग त्याने" अत्यंत मनोहर, रूपमती,वरारोहा व उन्मत्तयौवना निवडक स्त्रीया शिखंडीकडे पाठविल्या. त्यांनी शिखंडीकडे येऊन त्याचा अनुभव घेतला व त्या समाधान पावल्या. परत येऊन त्यांनी राजाला सांगितले की शिखंडी मोठा जोरकस पुरुष आहे..राजाने द्रुपदाची भेट घेऊन त्याची माफी मागितली, कन्येला दम दिला, शिखंडीला भेटी दिल्या व काही दिवस द्रुपदाकडे राहून तो माघारी गेला.
राजधानीत हा उत्सव चालू असतांना अरण्यात एक दुसरेच नाटक चालू होते. कुबेर आपल्या तो बरोबर काही सेवक घेऊन आकाशातून हिंडत असताना कर्मधर्मसंयोगाने स्थुणाकर्णाच्या वाड्यापाशी येतो. तो खाली उतरून वाड्यात येतो पण त्याला भेटावयास स्थूणाकर्ण बाहेर येत नाही म्हणून तो भडकतो. त्याचे सेवक सांगतात की "स्थूणाकर्णाने आपले पौरुष्य शिखंडीला दिले असून तो स्त्री झाला आहे म्हणून लाजेने तो बाहेर येत नाही. तडकून तो सेवकांना त्याला बाहेर घेऊन येण्यास सांगतो व स्थूणकर्णास म्हणतो की " तू हे यक्ष जातीला लाजीरवाणे कृत्य केले आहेस, आता रहा कायमचा स्त्री म्हणून." इतर सेवक बरीच रदबदली करतात व म्हणतात की एवढी कठोर शिक्षा नको. कुबेर ते कबूल करतो व म्हणतो की "ठीक आहे. जो पर्यंत शिखंडी जिवंत आहे तो पर्यंत तो पुरुष व हा स्त्री राहील व शिखंडी मेल्यावर हा परत पुरुष होईल." कुबेर निघून जातो.
वचन दिल्याप्रमाणे शिखंडी पुरुषत्व परत करण्यास स्थूणकर्णाकडे येतो. स्थूणकर्ण त्याला म्हणतो " तू परत आलास हे चांगलेच केलेस. पण दैवगती निराळी आहे. आता मरेपर्यंत तू पुरुषच रहा."आनंदाने शिखंडी राजधानीला परततो. पुढे द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेऊन एक महान योद्धा होतो व भारतीय युद्धात भीष्मांचे पतन होण्यास कारणीभूत होतो.
(महाभारत, उद्योगपर्व, अंबोपाख्यानपर्व, अ. १७३ -१९२.)
शरद
प्रतिक्रिया
भीष्म क्षत्रिय असूनही
प्रश्न
केवळ महाभारतातील गोष्टींविषयी?
Genaralization
+१
भीष्मांना अर्जुनाने मारले.
सहमत
भीष्म क्षत्रिय असूनही
काही उत्तरे
मनोरंजक
मस्स्त! महाभारतासारख्या सुरस
कथा माहिती होती, पण तुमच्या
मिळालेल्या शापाचा खुबीने वापर
शमीच्या झाडावर बहुधा !
खल्लास.......................
शरदराव ! जियो ! मस्त लेखमाला
एक माहिती म्हणून छान
कल्पित पात्रे
<<<मुळात ही सगळी कल्पित
मला वाटतं लिंग बदलाच्या
रोचक!! महाभारताच्या एका