शाहरुख कडून वेगळी अपेक्षा आहे का?
चित्रपट क्षेत्राची विश्वासार्हता काय ?
कोणाकडे ए.के.४७ मिळते,कोणीतरी धु॑दीत गाडी चालवून काही जीव घेतो,तर कोणी दाउदच्या पार्टीत उपस्थित राहतो
अशा लोका॑कडून काय अपेक्षा ठेवायची?
आणि तरिही आम्ही त्या॑चे चित्रपट पहातोच.
आम्ही देशाभिमान विसरलो हेच खरे.
एल ओ एल.
पण सीरियसली, हिमालयाने सिंधू नदीला पूर आणून त्या पापाचं प्रायश्चित्त घेतलं असं वाटत नाही का तुम्हाला? की त्याचं श्रेयदेखील आपल्या राजकारण्यांना देणार?
अरेरे ! काय या शाहरूखला करावे तरी ? आमच्या अगदी हात धुवून मागे लागलाय. त्याच्या रोजच्या नवीन नवीन भांनगडींमुळे तो आम्हाला दुसरं काही चांगलं काम करायचं सुचूच देत नाही. किती त्याच्यावर वॉच ठेवायचा तरी ? लंडन, पॅरीस, अमेरिका कुठे कुठे त्याच्या मागे फिरायचं तरी? त्याने आम्हाला चांगलंच कामाला जुंपलेलं आहे. बरं तो बॉलिवूडचा प्रसिद्ध नट. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावच लागतं. त्याशिवाय आम्हाला प्रसिद्धी कशी मिळणार ? शाहरूकबाबा रोज रोज अशी काहीतरी लफडी करितच राहा म्हणजे आम्हालाही कामधंदा मिळेल. नाहीतर आम्ही फुकट बेकार राहू.
धर्म आणि व्यवसाय यात गफलत कशाला करायची? शाहरुख काम करुन जे पैसे मिळवणार ते तर भारतातच येणार ना? शाहरुखच कशाला या काळात आपला नित्य व्यवसाय म्हणून अनेकानी आपापली कामे केली असणार... ते सगळे गुन्हेगारच का?
( बाय द वे, मालदीवात पाकिस्तानहून आयात झालेला बासमती तांदूळ मिळायचा, लई झ्याक लागतो ... सिंधू नदीच्या खोर्यात तयार झालेला भात अगदी अप्रतिम असतो... )
शाहरुख खान मात्र ब्रिटनमधील एका पाक चॅनलसाठी नाच-गाण्यासह डीनर पार्टीची तयारी करीत असल्याचे उघड झाले आहे
नाचगाणी करुन पैसा मिळवणेहे त्याचे कामच आहे.त्याच्या त्या नाचणार्या ताफ्यात अनेक धर्माचे लोक असतील.कुठे दिसला नियमबाह्य धंदे करताना की मानगूट पकडा की त्याची.
हे सगळे लोक पैशांसाठी त्यांच्या चित्रपट धंद्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात ना, मग बघा कि त्यांचे चित्रपट pirated CDs आणून. आपोआप बुडेल त्यांचा पैसा.. एवढा केला तरी पुरेसा आहे.
घ्या... पाकिस्तानचे चॅनेल झाले आता बांग्ला देशच्या झाडाना मिठ्या मारतोय.. आपले राजकारणी तर आपल्याच देशातील भैय्याना मिठ्या मारत नाहीत !
http://green.in.msn.com/greennews/article.aspx?cp-documentid=4633248
जागो मोहन (भार्गव) प्यारे ! :)
ना मी श्रध्दान्जली वाहीलि ना कूठे पार्टी केली. पण ती घट्ना मनात अजूनही दूखः नीर्माण करतेय. काही घटना उगीचच मनात घर करून राह्तात ? मग ते पानीपत असो अथवा २६/११ सामान्यासाठी दूर्दैव ते दूर्दैवच नाहीका ?
शाहरुखने जे केले ते कायदेशीर कीं बेकायदेशीर हा मुद्दा नसून ते योग्य की अयोग्य हा मुद्दा आहे! आज आपल्या दोन देशांतर्गत जी परिस्थिती आहे (काश्मीरमध्ये पाकिस्तान्यांची लुडबूड, तिथे लढायला अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले ही 'मुश'ची कबूली, "लष्कर-ए-तोयबा", "तेहरीक-ई-तालीबान पाकिस्तान (TTT) यासारख्या दहशतवादी संघटनांनी माजविलेला उद्रेक, इ.) ती पहाता शाहरुख त्यांना मदत करायला धजला कसा? कारण त्याच्यासारख्या श्रीमंतांना, प्रसिद्धीप्राप्तांना व उच्चभ्रूंना भीतीच राहिली नाहीं! मीडियाने खरं तर असल्या दुष्कृत्यांचा अशांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करायला हवा पण त्यांना चघळायला महाफालतू विषय चालतात पण महत्वाच्या विषयांचे मात्र वावडे.
शेवटी "देशसेवा" हा फक्त मध्यमवर्गीय, पापभीरू, भावनाप्रधान लोकांसाठीचा विषय तर नाहीं ना रहिला?
सणसणीखेज बातम्यांचे आयुष्य एक आठवड्याचे! मग ती आदर्श कॉलनीची असो किंवा कॉमनवेल्थ गेममधील भ्रष्टाचाराची असो! कालच वाचले कीं CBI ने दाखल केलेल्या FIR मध्ये कलमाडीचे नावही नाहीं! आता बोला!
मागे मी भारतात असताना "सलमानखानच्या दाऊदबरोबर झालेल्या संभाषणाची टेप पोलिसांकडे आहे" अशी (पोलिसांच्या सूत्रांकडून बाहेर आलेली) बातमी मी स्वतः वाचली आहे. पुढे काय? चार माणसांच्या अंगावरून (शेजारी बसलेल्या पोलिसाच्या साक्षीने) गाडी चालवून त्यांना जिवे मारलेला व हरणे मारल्यामुळे रीतसर शिक्षापात्र ठरलेला सलमान आरामात फिरतोय् आणि आपण अशा माणसाच्या "दबंग"सह प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार घालायचे सोडून ते बघतो तरी कसे याचेच मला आश्चर्य वाटते. असल्या अभिनेत्यांच्या चित्रपटांवर खरं तर 'जनताकर्फ्यू' घालायला हवा. तीच गत संजय दत्तची. सलमान, संजय, शाहरुख यांच्यासारख्या संशयित लोकांवर जनतेला सहज बहिष्कार घालता येईल व त्याला कसल्याही proof ची जरूरी नाही! वाटते की आपल्यातच कांही स्वाभिमान-देशाभिमान उरलेला नाहीं! नेतेही तसेच व आपण प्रजाजनही तसेच.
मी आणखी एका संस्थेच्या ई-सभासद आहे व तिथे आम्ही ५-६ जण हा बहिष्कार पाळतो! कदाचित् याची कुचेष्टा होईल, पण "पर्वा इल्ला!" असे "सामाजिक/सामूहिक बहिष्काराचे शस्त्र आपण उगारायलाच हवे.)
या सार्वत्रिक सर्वसामान्य उदासीनतेमुळे 'मोठे' लोक कांहींही करतात व आपल्यासारखी सामान्य माणसं चडफडतात व पुढे कांहींही करत नाहींत. शाहरुखसारख्यांना आतापर्यंत कळले आहे कीं त्याने कांहीही अयोग्य (inappropriate) वर्तन केले तरी त्याच्या केसाला सरकारतर्फेच नव्हे तर आम भारतीयांच्याकडूनही कसलाच धोका नाहीं. मग तो न उधळता तरच नवल, नाहीं कां?
'न्यूक्लियर डिसेप्शन'नंतर मी Being Indian या पुस्तकाच्या अनुवादाचे भाषांतर हातात घेत आहे. कालच याबद्दल मला या पुस्तकाचे मूळ लेखक श्री पवनकुमार वर्मांची व ई-सकाळची अनुमती मिळाली. (श्री वर्मा सध्या भूतानचे राजदूत आहेत.) या पुस्तकात आपण भारतीय असे स्वदेशाला घातक अशी कामे कां करतो याची चर्चा आहे व प्रत्येक वाक्य काळजाला भिडते.
नेहमीप्रमाणे मिपावर पहिल्यांदा पोस्ट करेन व अर्धे पुस्तक संपल्यावर ई-सकाळ वर मालिकेच्या रूपात ते प्रकाशित होईल असा सध्याचा बेत आहे.
शाहरुख
चित्रपट क्षेत्राची विश्वासार्हता काय ?
In reply to शाहरुख by kamalakant samant
अरेरे ..... अमोल
ह्म्म्म.. ह्म्म...
हिमालय नावाचा हिन्दुस्थानी
(विषय दिलेला नाही)
In reply to हिमालय नावाचा हिन्दुस्थानी by भडकमकर मास्तर
मास्तर
In reply to हिमालय नावाचा हिन्दुस्थानी by भडकमकर मास्तर
एल ओ एल
In reply to हिमालय नावाचा हिन्दुस्थानी by भडकमकर मास्तर
शाहरूख !
मला नाही बोलावल साल्यानी
धर्म आणि व्यवसाय यात गफलत
त्याला नावे ठेवण्याचे काय्
काय म्हणताय मुलानो ??
बघा, भाईजान पार्टी सोडून आपली
In reply to काय म्हणताय मुलानो ?? by शाहरुख
शाहरुख खान, युसुफ खान सगळे
संजय दत्तबद्दल काय म्हणाल? की
In reply to शाहरुख खान, युसुफ खान सगळे by शिल्पा ब
संगत नडली असावी पण आपल्या
In reply to संजय दत्तबद्दल काय म्हणाल? की by शैलेन्द्र
आपल्या बाळासाहेबांनी? त्याला
In reply to संगत नडली असावी पण आपल्या by शिल्पा ब
संगतीचे म्हणाल तर शारुखला
In reply to आपल्या बाळासाहेबांनी? त्याला by शैलेन्द्र
पण इतक्या वर्ष "संगती"
In reply to संगतीचे म्हणाल तर शारुखला by परिकथेतील राजकुमार
अहो
हे सगळे लोक पैशांसाठी
घ्या... पाकिस्तानचे चॅनेल
@ आत्मशून्य
मला फक्त वाइट वाटत आहे दोन वर्षापूर्वी घड्लेल्या घटनेचे
मग तो न उधळता तरच नवल, नाहीं कां?