Skip to main content

महाप्रतापी हरबन्ससिंग

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10… लोकसत्तेतील ही बातमी वाचण्यात आली. हरबन्ससिंग नामक कुणी काँग्रेसी नेत्याने रेल्वे क्रॉसिंगपाशी धिंगाणा घातला. त्याला कुठेतरी जायचे होते. आणि रेल्वे फाटक बंद असल्यामुळे दोन तीन वाहने पुढे उभी होती. त्याने आपल्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्या लोकांना वाहने हटवायला सांगितली. त्यांनी असमर्थता दाखवल्यामुळे धमक्या, शिवीगाळ वगैरे प्रकार केले. मंत्री वगैरे हिंडतात तेव्हा सामान्यांचे हाल होतात हे आता नवीन नाही. पण असले धमकावणे वगैरे जरा जास्तच, युपी बिहार स्टाईलचे वाटते. हा कोण असा नेता आहे जो मुंबईत असे वागू धजतो? ह्याची खूप वट वगैरे आहे का? कृपाशंकर सिंगाचा हा नातेवाईक आहे असे ऐकून आहे. ह्याला ह्या प्रकरणी शिक्षा होईल का यथावकाश हेही प्रकरण "नियमित" करुन घेतले जाईल? लोकशाही प्रकाराची थट्टाच चालली आहे. ह्यांच्यात आणि पूर्वीचे राजे, नबाब, सुलतान, जहागिरदार यांत काय फरक आहे? निवडणुका आल्या की ढोंगी भाषणे देणे एवढाच बह्धा.

वाचने 2309
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अटक झाली की ह्या माणसाला. ज्या व्यक्तीला त्रास झाला ती व्यक्ती विवेक गोएंका होती, ह्याचा परिणाम म्हणून का होईना, पण अटक तर झाली! सुटेल हे अलाहिदा.

तपशीलात फरक वाटतोय. रेल्वे फाटकापाशी नाही तर वाशीच्या सिग्नलला असे वाचल्याचे स्मरते. हा गुंड रोजच त्या रस्त्याने जातो आणि त्या ठराविक सिग्नलला वळतो. सिग्नल नसला तरी ट्रॅफिक पोलिस त्याला रोज जाऊ द्यायचा. त्यादिवशी पुढे गाड्या असल्यामुळे त्याला थांबावेच लागले, म्हणून त्याने तिथल्या पुढच्या गाड्यांवर राग काढला. मनसे वाले का गप्प बसले आहेत ? सामान्य भैय्यांना चोपता मग या महाभैय्याला ही चोपा की हिंमत असेल तर!

In reply to by तिमा

तपशिलात घोटाळा झालेला दिसतो आहे. मला असे वाटले की हे रेल्वेच्या क्रॉसिंगपाशी झाले. पण तरी हे बिहारी, उप्रच्या संस्कृतीचे कलम महाराष्ट्रात रुजू पहाते आहे ते लवकर छाटायला हवे. अर्थात ज्याला धमकावले तोही एक बडी असामी असल्यामुळे हे उघडकीस आले हे नाकारता येत नाही.

हा कोण असा नेता आहे जो मुंबईत असे वागू धजतो? यांचा परिचय तुम्हास नसणे याहून मोठे पातक ते काय? हे साहेब श्री. कृपाशंकरसिंह यांचे मेव्हणे आहेत असं वाचायला मिळालं (आणि धन्य पावलो!) मध्यंतरी. काय म्हणालात, कोण कृपाशंकर? कृपाशंकरसिंहजी काँग्रेस या पक्षाचे माननीय आमदार तसेच मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आहेत. त्यांचा महिमा असा की, महाराष्ट्राचे ३-३ मुख्यमंत्री (विलासरावजी, सुशीलकुमारजी आणि अशोक(राव)जी) कृपाजींच्या 'पुढे-पुढे' करायचे सतत. मग आता सांगा की, अशा माणसाच्या नातेवाईकाला धक्का लावायची हिंमत आहे का मनसे सारख्या 'देहशतगर्द' पक्षाला? भारी समर्थ

हुप्प्या तु एवढा कसा रे अडाणी. तुला काँगेस वाल्यांबद्दलचे दोन नियम माहिती नाहीत का ? नियम नंबर १ ) कॉग्रेसवाले कधीही गुन्हा करीत नाहीत. नियम नंबर २) काँग्रेसवाल्यांनी केलेले कोणतेही काम गुन्हा या सदराखाली येत नाही. उगीच स्वताच्या आणि दुसर्याच्या डोक्याला ताप देतोस.