बुद्ध व बौद्ध धर्म ..एक टिपणी
बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी
(१) बुद्ध आणि चातुर्वर्ण
(अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो.
(आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई. बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.
(२)बौद्ध धर्म प्रसार
बुद्धाच्या हयातीत फक्त १०५ भिक्षू संघांत सामिल झाले होते. त्यातले ब्राह्मण ३९, क्षत्रिय २८, (बरेचसे त्याच्याच शाक्य कुळातले), उच्चकुलीन २१, व फक्त ८ शूद्र जातीतले. ब्राह्मणातले सुखवस्तूच जास्त, पुरोहित वगैरे नगण्य. बुद्धाच्या हयातीत अस्पृष्यांनी त्याकडे फार लक्ष दिलेले दिसत नाही. ( क्र. ३ पहा.)
(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.
(४) तात्विक फरक
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही. याचे साधे कारण हिन्दू विचारसारणीतली विविधता. तुम्ही कोणताही तत्वज्ञानातला विचार मांडावयाचा ठरवला तर येथील कोणत्या तरी दर्शनात त्याची पुसट का होईना छाया तुम्हाला आढळून येईलच. बुद्ध धर्मातील किती तरी विचार उपनिषदांत दिसतात. डॉ. र्हिस डेव्हिड्स (पाश्चात्यांना बौद्ध धर्माची ओळख करून देणारा, "बुद्धिझम" या ग्रंथाचा लेखक) म्हणतो "" गौतम बुद्ध हा अतिशय शहाणा,विद्वान, थोर पुरुष होता. तो सर्वोत्कृष्ठ हिन्दू होता." दुसर्या बाजूने जगत्गुरू शंकराचार्यांना "प्रच्छन्यबुद्ध" म्हणतात. दोघेही सरळ किंवा आडवळणाने वेदप्रामाण्य नाकारतातच. दोघांनाही पुनर्जन्म मान्य आहे. वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.
(५) डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्म
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला. पण या धर्मांतरात तांत्रिक गोंधळ झालाच. डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रतिसाद
मेख
आजच्या
एक असाही विचार.
पध्दत ठरविणार कोण ? जी ठरवली
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही.
आज जे लोक किंवा अनुयायी किंवा
वेदांतात व बौद्ध धर्मात
दुर्गा भागवत..
ते पुस्तक माझ्याकडे आहे आणी
बुद्ध
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे