हम्म्म. रसरशीत अनुभवातून वाचलेला माणूस नंतर विद्वान म्हणून आम्हाला वंदनीय ठरतो आणि त्याचं भक्ष्य ठरलेला मूर्ख म्हणवला जातो.
अर्धवटरावा छान लिहीले आहेस. अर्थात नेहेमी लिहीतोसच. तुझ्या अनुभवामुळे आमचेही ज्ञान थोडे वाढते नेहेमी.
ते खरेच पोलिस होते म्हणून बरं.. एकदा पोलिसांना तोंड द्यायचा प्रसंग आम्हालाही फ्रांकफुर्टात आला. एकदा असेच मित्रांकडून रात्री १ च्या सुमाराला पार्टी करुन आम्ही शेवटची सबवे पकडायला हवी म्हणून घाई करत स्टेशनकडे चाललो होतो. सब वे कडे जाणारे सगळे जिने रात्री ११ नंतर सुरु न ठेवता एखादाच रस्ता चालू ठेवतात आणि बाकीचे बंद करतात त्यामुळे आम्ही जिने उतरत होतो,परत चढत होतो. ते गस्तीच्या पोलिसांनी पाहिले असावे. त्यातले दोघे आमच्यामागे येऊन आम्हाला गाठून आउसवाइस बिटं.. म्हणजे ओळखपत्राची विचारणा केली. अर्थात रात्री १ वाजता आमच्याकडे कुठले पासपोर्ट असायला? आम्ही सांगितले, घरी आहेत. आत्ता आमच्याजवळ नाहीत. आमची शेवटची गाडी गेली तर पंचाइत होईल. रात्रभर स्टेशनात सुध्दा बसता येणार नाही. आमच्या घरी चला आणि पासपोर्ट बघा. त्यांच्या गस्तीच्या गाडीतून घरी जाण्याची कल्पना काही वाईट नव्हती.कारण मध्ये २ तास स्टेशनही बंद करतात. ते ऐकायला तयार होईनात. शेवटी जन्मतारीख आणि पत्ता विचारला.कुठेतरी एक फोन केला तेथे आमच्या जन्मतारखा आणि पत्त्यावरुन त्यांना सगळी कुंडली मिळाली. मग आता जा, म्हणाले. मग आम्ही आवाज केला.. आता आमची गाडी गेली असेल तर आम्ही काय करायचं? मग ते दोघं आम्हाला एस्कॉर्ट करायला आले.:)
स्वाती
विविध अनुभव घेतलेत तुम्ही आफ्रिकन सफारीत.
ग्रेट आहात.
आम्ही एकदा कलकत्त्याला रात्रि ११ वाजता लोकल रेल्वे स्थानकात उतरलो. येथुन २०-२५ मिनीटाचा टॅक्सीने प्रवास करुन महाराष्ट्र भवनला पोहोचायच होतं. मी, मित्र,मित्राची बायको आनी दोन लहान मुली. थोडेसेच प्रवासी होते ते पटापट आपापल्या मार्गाने निघुन गेले. स्टेशनमधे एकदोन जणांकडे चौकशी केली तर " एवढ्या रात्री कशाला बाहेर फिरायच. त्यात बरोबर लेडिज. हा भाग तसाही सुरक्षित नाही. बघा बाबा तुमचं तुम्ही." असले सल्ले मिळाले.
म्हनुन तिथे एका पोलिसाकडे चौकशी केली. तर त्यानेही तेच ऐकवले. त्याला बाहेर येऊन टॅक्सी करुन देण्याची विनंती केली तर त्याने नकार दिला.वरुन काऴजी घ्या असा सल्ला द्यायला विसरला नाही. शेवटी बाहेर येऊन टॅक्सी शोधली, संपुर्ण प्रवासात मी टॅक्सी ड्रायवर कडे संशयाने पहात होतो कारण रस्ता माहीतीचा नव्ह्ता, हा माणुस नेमकं कुठे घेऊन चाललाय ते कळायचाही काही मार्ग नव्हता आणि एकदाचे आम्ही महाराष्ट्र भवनला पोहोचलो
कुठलाही वाईट प्रसंग न घडताही फार मोठ्या थरारक प्रसंगातुन सुटल्यासारखे वाटले.
मागच्या भागातला ते छत्रपती शिवाजी वाला शिद्दी जौहर लई भारी आणि जसं मांडलत ते तर लईच भारी!!!!!
मी तर हसलोच पण ज्यांना दाखवले/लिंक दिली ते पण हसले.
अवांतर: हे हबशी लोक उगाच भयंकर वाटतात. कुणीही बघा - सतत आतून काहीतरी टोचत असल्यासारखा वाकडा-तिकडा होत असतो. पोरी सुध्दा.
अतिअवांतर: हे लोक सूटाबूटात असले तर सूट कधीच मापात नसतो - एक कॉलर खाली, एक वर (पाहा: २०१२ मधला ओबामा)
चांगलीच सुटका करून घेतलीत.
वाचताना अजिबात कंटाळा येत नाही.
तुम्ही पुन्हा मॅगीच खाउन झोपलात म्हणून मजा वाटली.
माझी एक मैत्रिण तीन वर्षे साउथ आफ्रिकेत राहिली होती.
ती आम्हाला कधीकधी तिकडच्या गोष्टी सांगते.
तिची मोलकरीण ही घराची मालकिण असल्यासारखीच वागायची.
त्या बाईच्या घरी जे जे सामान नसेल ते हिच्या घरून खुशाल घेउन जायची.
लहान मुलीला वरणभातासाठी म्हणून नेलेली मैत्रिणीची चांदीची वाटी त्या बाईला आवडली म्हणून सरळ आपल्या पिशवीत घालून घेउन गेली.
तुमच्या पोतडीत सगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले आहेत. विनोद आहे, करूण रस आहे (जेवणाचे हाल झाल्यामुळे), आता भीतीचाही अनुभव आला. आणि आलेल्या प्रसंगातून चातुर्याने सुटका करून घेतलीत हे महत्त्वाचं. या विविधरंगांच्या अनुभवात आम्हालाही सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद! छान! असेच लिहिते रहा. आणि आम्हाला उत्तम लेखांची मेजवानी द्या!
सहज, सुंदर आणी लयीत जाणारी मालीका एवढ्यात संपवु नये असे वाटते..
परदेशात तसं कुणावरही पटकन विश्वास बसत नाही ,अगदी पोलीस असला म्हणुन काय झालं? ;-)
असो..
पू भा प्र... :)
प्रतिक्रिया
बापरे
हम्म्म. रसरशीत अनुभवातून
पुण्याचे पेशवेशी सहमत
बापरे...
सुंदर वर्णन
बापरे....भयंकर प्रसंग
थरारक अनुभव
हुश्श
हेच म्हणतो..
वाचनीय
मस्त!
संपली मालिका? मॅगीच्या
संपली नाहिये अजुन. पुढचा एक
शिद्दी जौहर लई भारी
चांगलीच सुटका करून
मालक हुषार आहात बॉ लेखन
(तुम्ही खरे तर लेखमाला
थरारक!
सहज, सुंदर आणी लयीत जाणारी
लेख मस्त