स्पष्टीकरण
माझ्या http://www.misalpav.com/node/13353 या धाग्यावरील मजकूर आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारी आल्याच्या कारणाने अप्रकाशित केला गेला होता. परंतु सदस्यांचे माझ्यावर टीका करणारे प्रतिसाद मात्र अप्रकाशित झाले नव्हते. त्यामुळे माझी कोंडी झाली होती. म्हणून संपादक मंडळाला आणि बिपिन कार्यकर्ते यांना विनंती केली असता माझे पुढील प्रमाणे म्हणणे त्या धाग्यावर प्रकाशित केले गेले आहे. परंतु मागे गेलेला धागा वर मात्र आला नाही त्यामुळे माझे आता नव्याने प्रसिद्ध झालेले म्हणणे सदस्यांपर्यंत पोहोचू शकले नाही.
तो धागा वर आणण्याची व्यवस्था करावी अशीही विनंती केली परंतु ते कदाचित तांत्रिक दृष्ट्या शक्य नसावे.
म्हणून त्या धाग्यावर संपादक मंडळाने प्रसिद्ध केलेले माझे म्हणणे येथे प्रसिद्ध करीत आहे.
नितिन थत्ते यांचे स्पष्टीकरण
माझ्या जालीय आयुष्यात मी कुणाची बदनामी केली नाही. जे वाक्य आक्षेपार्ह वाटले तेथेही * चिह्न देऊन तळटीप लिहिली होती. (*शत्रूबाबत असेच म्हणायचे असते अशी पद्धत त्याहीकाळी होती).
लेखाचा मूळ उद्देश "शाहिस्तेखानाची बोटे तोडणार्या, आता पराभूत झालेल्या आणि भर दरबारात औरंगजेबाचा अपमान करणार्या शिवाजीलाही सर्वशक्तिमान औरंगजेबाने तत्काळ ठार मारण्याचा मार्ग अवलंबला नव्हता" हा मुद्दा ठसवणे हा होता. आणि अफजल गुरू आणि कसाब जिवंत असल्याबद्दल रोज सकाळ संध्याकाळ दु:ख करणार्यांसारखेच त्याकाळी कोणी लोक असतील तर त्यांची मुक्ताफळे काय असतील याची कल्पना केली होती.
हा धागा एक दिवस येथे ठेवून नंतर उडवला जावा अशी संपादक मंडळाला विनंती.
प्रतिक्रिया
(*शत्रूबाबत असेच म्हणायचे
विरोध मान्य
>>>मी काय लिहिले होते त्याला
सत्य व वदंता
.
नंतर
स्पष्टीकरण
.
प्र.का.टा.आ.
चुकीचा प्रतिसाद !
लेख अप्रकाशीत केला ते बरेच
>>लेख अप्रकाशित करुन
थत्तेंचा मूळ लेख काही मी
महाराजांचा एकेरी उल्लेख
+१
मिपाच्या नव्या मिळमिळीत रुपड्या मुळे आजकाल
लेख उडवला की प्रतिसाद पण