वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो.
नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते.
जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो.
मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही.
पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.
एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात.
पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!!
वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस...
अंतर अपुले असे निरंतर
जरा हसावे.. जरा रुसावे
कधी ओलावा कधी दुरावा
शोधत जावे… गवसत जावे
क्या बात है.....
तात्या.
कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….!
छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !
सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको.
क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले.
नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)
प्रतिक्रिया
अंतर
सुरेख...
छान
शुक्रिया !!
प्रकटन..
छान