आजच दुकानात जाऊन फेअर अँड लव्हलीच्या डब्यावरचे घटक वाचले.
त्या घटकांपैकी कार्यशील एकच मला दिसला - तो म्हणजे सूर्याची अति-जांभळी (अल्ट्राव्हायोलेट) किरणे थांबवणारा पदार्थ. हा पदार्थ कातडीवर असला तर ती किरणे त्वचेच्या आतल्या पेशींपर्यंत पोचत नाहीत. या किरणांना प्रतिक्रिया म्हणून पेशी काळे द्रव "मेलानिन" निर्माण करतात. मलमामुळे ते द्रव तितके निर्माण होत नाही. अशा प्रकारे मलमाचा थर जोपर्यंत त्वचेवर आहे, तोवर त्वचा उन्हाने रापण्याचे प्रमाण थोडे कमी होते.
मात्र मलमाचा थर चेहर्यावर दिवसभर ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्वचेतून कळे-न-कळे सारखा घामाचा पाझर होत असतो, आणि तो आपल्याकडून पुसला जात असतो. त्यामुळे फासलेले मलम लवकरच पुसले जाते. मग त्वचा रापायची ती रापतेच.
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा.
हा हा हा! कुकराचा दांडा बाकी मस्तच! :)
मला विचाराल तर (अजून लग्न व्हायचे आहे हो माझे!;) होणारी बायको ही काळी किंवा गोरी असण्यापेक्षा पाहताचक्षणीच मनात भरणे महत्वाचे! मग रंगाने ती कशीही असो...
एनीवेज, म्यारेज इज नॉट माय कप ऑफ टी! :)
तात्या.
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो.
हर किसी को मुकम्मल जहांन नही मिलता...किसि को जमीन तो किसीको आसमांन नही मिलता.( प्रत्येकालाच परफेक्ट जग मिलते असए होत नाही कोणाला नुस्ते आकाश तर कोणाला नुस्ती जमीन मिळते)
चांद मिलता नही हर किसीको यहां है दिया ही सही रौशनी के लिये.
पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा.
हा हा हा!
माझ्या मते(म्हंजी तूला आहे तर) रंगापेक्षा स्वभाव महत्वाचा.मन चांगलं हवं,रंगरुप काय आज आहे उद्या नाही.
(आजन्म अविवाहीत) निमगोरा इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
माझी मावसआजी इत्तक्की सुंदर होती की तिला तुल्यबळ स्थळच मिळत नव्हतं. इत्तक्की प्रचंड गोरी, सुंदर, उंचेली, नाजूक, गृहकृत्यदक्ष, सुगरण, सालस वगैरे की विचारता सोय नाही ! त्याकाळात ती घोडनवरी झाली आणि तिच्या घरच्यांना सो कॉल्ड समाजाकडून बरंच काही सुनावलं गेलं आणि शेवटी तिचे लग्न माझ्या मावसआजोबांशी झाले. ते दिसायला एकदम ढुस्स काळे, उंचीलाही आजीपेक्षा कमीच.. आजोबा आजीहून उजवे असतील तर ते त्यांच्या स्वभावाच्या, ताकदीच्या आणि अक्कलहुशारीच्या बाबतीत. दिसण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका विजोड जोडा कुठला दुसरा नसेल पण असण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका यशस्वी जोडा दुसरा कुठला नसेल ! आजोबांनी लग्नात घेतलेला उखाणा मला आठवत नाहीये पण त्यात कोंबड्याला हिरकणी मिळाली असं ते म्हणाले होते म्हणे. दिसण्याचा इतरांनीच इतका बाऊ केला होता पण ते दोघे अगदी सुखाने मश्गुल होते एकमेकांत ! इतके जिंदादील जोडपे.. अशा दिग्गजांकडे पाहिलं की आजकालच्या सो कॉल्ड तरूणांच्या सौंदर्यकल्पनांबद्दल कीव येते.
पण तरुणपणी ते जाणण्याची गुणग्राहकता आपल्यात असतेच असे नाही. आपण दिखाऊ गोष्टींनी भुलतो!
आणि निसर्गाचेही असेच काही गणित त्यामागे असावे जेणेकरुन हे असेच मुख्यत्वे होत राहील अन् पिढ्या मागून पिढ्या ह्या कोड्याची उकल करीत रहातील!
यदाकदाचित ती गुणग्राहकता पुढेमागे आलीच, तरी त्यावेळी का होईना त्याचा उपयोग करुन घेणं हे जमायला हवं.
सबब, निराश होऊ नका सगळे जग सुंदरच आहे फक्त ते तुम्हाला पाहता यायला हवे!
चतुरंग
सुंदर जोडीदार कोणाला नको असतो? पण माझ्या मते तरी मनाचा समजुतदारपणा जास्त महत्वाचा आहे,,,,,नुसत दिसण्यावर जाण्यात काहीच अर्थ नाही !!!!!
दोघांचे स्वभाव जर खुप भिन्न असतील तर बायको माधुरी सारखी सुंदर असुन सुद्दा त्यांच एकमेकांशी पटणार नाही.....
(अजुनतरी अविवाहीत)
मदनबाण>>>>>
एकदा आमच्या सरदार मास्तरनी प्रश्न विचारला होता.
You have two choices...
one to marry with a educated but ugly girl
Other to maary with a beautiful but uneducated girl
And his answer was second
Beautiful but uneducated girl
(uneducated girl can be made educated the other way is not possible)
('दिल' के साथ) डोक्यानी विचार करणारा सरदार. अर्थात मी पाहिलेला
~X(
सरदार (चेतन)
शादी वो लड्डू है जो खाए वो पश्ताए, जो ना खाए वोभी पश्ताए.
कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात.
खर्या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.
कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात.
वाह!!
खर्या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.
:)) :)) तरी म्हणलं, काका अचानक असे गंभीर वगैरे कसे झाले?
प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. कुणाला गोरी बायको हवी असेल तर ती त्याची वैयक्तिक आवड आहे. त्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही.
कुणी म्हणेल की गोरीच बायको कशाला? सावळ्या मुली काय संसार नीट करीत नाहीत? :W
त्याचही उत्तर हेच आहे की वैयक्तिक आवड.
व्होडका पिणारा व्हिस्की का पीत नाही? आवड.... दुसरं काय?
बरं, दुसरी गोष्ट म्हणजे गोरी बायको केली तर ती संसार नीट करेलच याची खात्री नाही....
हे खरे आहे.
पण हेच विधान सावळ्या मुलीच्या बाबतीतही वापरता येईल.
तेव्हा कोणी काय करावे यावर आपण भाष्य न करणे चांगले. "लोकांना त्यांच्या "लायनीपरमान" जाऊ द्या"
आमचे वैयक्तिक मत विचाराल तर ............
शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही. विचार करायचा असेल तर मुलीच्या फिगरचा करावा, रंगाचा नाही.
पण हा सुद्धा प्रश्न ज्याचा त्याचा....
आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
हे चूकीचे आहे . बायको नुसती गोरी असून काय उपयोग . ती घरातल्यांशी कसे वागेल ,ती समजूतदार आहे का, भांडखोर ,आळशी,घमेंडी नाही ना हे पाहणे महत्वाचे. जे रंगाने गोरे नाहीत त्यांनी काय करायचे?
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे.
कळावे
कॉ.विकि
>>>प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे.
कळावे >>>
विकी साहेब ,मी लेखात वरच लिहले आहे मी येथे फक्त सु॑दरता ह्या विषयी लिहले आणिआहे, मला इथे सा॑गायचे आहे की प्रत्येकाच्या मनात आपला साथीदार कसा असावा ह्याची चौकट असते बाह्यरुपाची (मनाचा था॑ग आपण जेव्हा त्या व्यक्तीच्या २४ तास जवळ राहतो तेव्हाच लागतो असे माझे व्ययक्तीक मत आहे) आपल्या मनाच्या चौकटीत परफेक्ट बसेल असा साथीदार कोणाला तरी मिळतो, पण ज्या॑ना मिळत नाही, त्या॑नी मनाला सजावुन त्या चौकटच्या जवळ पास बसण्यार्या व्यक्तीशी स॑सार करावा असेच सा॑गायचे आहे.
मधुबाला ही सै॑दर्याचा मानबि॑दु होती, पण प्रत्येकाला तशी सु॑दर बायको कशी काय मिळणार, म्हणुन मिळेल ते गोड मानुन घ्यावे एवढेच सा॑गायचे आहे.
कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम्
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना:
हेच खरे.
(कुठल्याही लग्नात मुला मुलीचे रंग न पहाता फक्त मिष्टान्ने चापणारा) आंबोळी
प्रतिक्रिया
यामुळेच
फार थोडा उपयोग होत असावा
मनात भरली पाहिजे..
चहा आणि कप
:)
चांद मिलता नही हर किसीको यहां है दिया ही सही रौशनी के लिये.
झालं... आज
असेच म्हणतो
का भूललासी वरलीया रंगा
सौंदर्य - एक शाप?
खरं सौंदर्य हे आधी मनाचं असतं मग बाह्य!
मन चांगलं हवं
एकदा
शादी..
काका...
प्रत्येकाची आवड
???
खत्तरी !
धन्यवाद...
गोरीच बायको हवी !
मधुबाला
हे हे हे...!!
मिष्टान्ने