कोणत्या लढाईत शहीद???
मागच्या महिन्यात माझा एक मित्र काही परदेशी पाहुण्यांना अमृतसर दाखवायला घेऊन गेला होता. त्याने जे पाहीलीले सांगीतले, त्याचा खोलवर विचार केला तर एक राष्ट्र म्हणून आपले काय स्थान आणि भवितव्य आहे असा मोठा प्रश्न मनात येतो. आणि त्याचे उत्तर काही आशावादी येत नाही.
सुवर्णमंदिराजवळ एक शिखांचे संग्रहालय आहे. तिथे भिंद्रनवालेचे मोठे चित्र लावले आहे. त्यावर मथळा आहे "१९८४ साली शहीद झालेले"
हे पाहून परदेशी पाहुण्यांनी विचारले, "१९८४ साली भारताची कुठल्या देशाशी लढाई झाली होती? आणि त्यात ह्या गृहस्थांची कामगीरी काय होती?"
ह्याला माझ्या मित्राकडे उत्तर नव्हते.
आपल्या माहितीनुसार (मतानुसार)
* हा वरील अनुभव आपण ऐकला किंवा पाहिला आहे का? (मला माझी ऐकीव माहीती पडताळून पहायची आहे, कारण ती खरी म्हणून स्विकारणे मला कठीण जात आहे.)
* भारतात शहीद ची अधीकृत व्याख्या काय? भारतीय सैन्याने १९८४ साली केलेल्या कारवाईत मारलेल्या ह्या माणसाला ह्या व्याक्खेनुसार शहीद म्हणता येईल का?
* असे लाजीरवाणे प्रद्रर्शन काढून टाकण्यासाठी कोणी राजकीय पक्षांनी कारवाई केली नाही का? भाजपा चे ह्यावर काय म्हणणे आहे?
* ज्या पक्षाचे नेते स्वतः एक आदरणीय शिख आहेत, त्या पक्षाचे सरकार अशा प्रदर्शनाला मान्यता कशी देते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चालायचंच
नजरीया?
खालिस्तान
भिंद्रनवाले
बाजू/नजरिया
आपण लिहीले
"भारतात
+
भारत आणि कुंपण
कोण कुठुन
हा हा हा
त्या
शिखांचे संग्रहालय.....
भिंद्रनवा
शहीद
"स्वस्ताई"
मस्त
तरणतारणमधील गुरूद्वारा आणि अकाली दलाची खलिस्तानवरील भूमिका
पॉलिसी"....
इथं असंच