Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 05/04/2010 - 00:15
आज ३ मे २०१० पासून मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन्स यांनी बेमुदत अन्नाचा त्याग करून आंदोलन उभारले आहे... या बाबाबत एक प्रवासी आणि नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते? आधीच संपूर्ण दिवस मर मर काम करून थकलेल्या प्रवाशांचे अशा प्रकारे हाल होतात, त्यांना लोकलची तासन तास वाट पहावी लागते.. ही या आंदोलनाची एक बाजू झाली... पण अशा प्रकारे आंदोलन करावे लागले त्यामागे आंदोलनकर्त्यांचीही काही कारणे असतीलच की - ती समजून घेणारे भाष्य करणारे फारसे कोणी दिसले नाही.. मुळात हे मोटरमन रात्र - दिवस सेवा बजावत असतात, त्यांना योग्य वेतन आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे पुरेशी विश्रांती मिळायलाच पाहिजे. या बाबतीत आपल्याला काय वाटते? एक संपूर्ण सर्वसमावेशक चर्चा होउन जाऊ द्या... -- इंटरनेटप्रेमी, मुंबई.
  • Log in or register to post comments
  • 14463 views

प्रतिक्रिया

Submitted by छोटा डॉन on Tue, 05/04/2010 - 13:02

Permalink

राहुल गांधी ?

च्यायला, अशा महत्वाच्या वेळी 'लोकल प्रवासफेम युवराज राहुल गांधी' कुठे गायब झाले ? आत्ताच संसदेत शिवसेनेच्या 'मोटरमन संपाच्या प्रश्नावरील' गोंधळामुळे कामकाज दुपारपर्यंत तहकुब झाले आहे, निदान राहुल यांनी आत्ता मुंबईत येऊन प्रश्न सोडवायला मदत करायला हवी असे आम्हाला वाटते, कारण कसे आहे की राहुल समजा लोकलकडे निघाला की आपसुकच पार मुख्यमंत्र्यापासुन ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे "लक्ष" ह्या प्रकरणाकडे जाईल व तोडगा निघेल ... बाकी जे झाले ते चुकीचे झाले आहे, दोष मोटरमन आणि सरकार अशा दोघांचाही आहे. पगार वाढवावा की नको ह्या निर्णयासाठी नेमलेल्या समितीला ४ महिन्यात १ साधा निर्णय घेता येत नाही ? जे काही व्हायचे ते होऊ देत पण सामान्य प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबावा हीच अपेक्षा !!! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 05/04/2010 - 15:52

Permalink

मध्यंतरी

मध्यंतरी लोकसत्तामध्ये मोटरमन यांच्यावर एक लेख आला होता. त्याना कंपलसरी ओव्हरटाइम करावे लागणे वै वै अशी माहिती त्या लेखात होती. त्याची लिन्क पकाकाका शोधुन देतीलच. :) कदाचित ह्या चर्चेत मोलाची भर पडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 05/04/2010 - 17:35

Permalink

मोटरमन

उपनगरी रेल्वेमधे मोटरमनची संख्या कमी आहे असे मागे छापून आले होते. त्यामुळे मोटरमन्स् ना ओव्हरटाईम करावा लागतो. पण कुठल्याही अन्यायाबद्दल काहीच न करणे व परिस्थिती टोकाला गेल्यावर त्यावर समिती नेमणे हे भारतीय सरकारचे वैशिष्ट्यच आहे. परिस्थिती चिघळण्यातच सर्व राजकीय पक्षांचा फायदा असतो. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Tue, 05/04/2010 - 17:38

In reply to मोटरमन by तिमा

Permalink

+१

+१ सहमत.................
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल नागपूरकर on Tue, 05/04/2010 - 17:58

Permalink

मोटरमेननी

मोटरमेननी त्यान्चा सम्प मागे घेतला आहे. शासनाने त्यान्च्या मागण्यान्चा १५ जून पर्यन्त विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 05/04/2010 - 18:02

Permalink

संपला संप !

संपला संप ! मोटरमन्सने मागे घेतला ! २० जण सस्पेंड आणि १७० जणांना अटक झाल्यावर बहुदा निर्णय बदलण्यात आला असावा. कारणे उद्या समजतीलच. बघू? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Tue, 05/04/2010 - 19:54

In reply to संपला संप ! by विशाल कुलकर्णी

Permalink

हो

हो.....आणि या संपाची सांगता सुद्धा नेहमीच्याच पद्धतीने झाली :) (मोटरमनांच्या सगळ्या मागण्यांबाबत विचार केला जाणार, या संपात त्यांच्या वर दाखल केलेल्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जाणार, कुठलीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही वगैरे वगैरे....) :) आता प्रश्न हा पडतो की जर हेच व्हायचं होतं तर सरकार दोन दिवस का थांबलं :? प्रवाशांचे हाल बघायला??????????
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 05/04/2010 - 21:12

In reply to हो by समंजस

Permalink

अगदी हेच्च

अगदी हेच्च डोक्यात आलं ... आतातरी न्याय्य मागण्या मान्य कराव्यात सरकारने! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Tue, 05/04/2010 - 18:07

Permalink

चाकरमाने क्खुश्श.........

चाकरमाने क्खुश्श........
  • Log in or register to post comments

Submitted by भारद्वाज on Tue, 05/04/2010 - 19:33

In reply to चाकरमाने क्खुश्श......... by मितभाषी

Permalink

क्खुश्श

क्खुश्श आणि हुश्श्श्श्श्श्श..........
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Wed, 05/05/2010 - 01:09

Permalink

आभार

सर्व मिपाकरांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आपल्या मिपाचे हे मनाला भावणारे वैशिष्ट्य आहे की कोणत्याही सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यावर इथे मनापासून आणि उत्साहाने चर्चा होते - अशा प्रकारच्या वैचारिक चर्चेतून समाजाची जडण घडण होत असते . मोटरमन्सच्या न्याय मागण्या लवकरात लवकर मान्य होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 05/05/2010 - 14:35

Permalink

आपली चर्चा

आपली चर्चा वांझोटी आहे. मोटरमन लोकांना योग्य त्या प्रमाणात मोबदला मिळतो आहे. त्यात योग्य वेळेस व्रुद्धीही होत असते. नाकरते सरकार संप मोडून काढायला कमी पडले व मोटरमनची तळी उचलून धरली. यांना शासन व्हायला पाहीजे होते. अन सरकारने त्या दोन एक दिवसाच्या मालगाड्या रद्द करून त्यांचे ड्रायव्हर लोकलला पुरविले पाहिजे होते. कसला संप करतात अन काय? सामान्यांचे किती हाल झाले ते त्यांना ठाऊक आहे का? म्हणे उपास करतात! Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 05/05/2010 - 16:44

In reply to आपली चर्चा by पाषाणभेद

Permalink

काय

काय म्हणता तुम्ही?? या महागाईच्या दिवसात त्या मोटरमनांना रु. १,२०,०००/महीना मिळणारा पगार अपुरा पडतो त्याला बिचारे ते काय करणार :( सरकारने पगार वाढवून द्यायला हवा.....नाहीतर ते पुन्हा संपावर जाणार आणि आपल्या लोकशाहीत अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणे हे मान्य आहे त्यामुळे त्यांच्या वर सरकार कशी काय कारवाई करणार :? (प्रशासनास वेठीला धरायला असला एखादा चांगला मार्ग प्रवाशांना केव्हा उपलब्ध होणार :> )
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 05/05/2010 - 18:50

Permalink

हे

हे वाचा. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on गुरुवार, 05/06/2010 - 02:33

Permalink

+१

असेच म्हणतो... मला वाटतं की प्रत्येक माणसाला मग तो कामगार असो व अधिकारी त्याचे योग्य ते वेतन हे मिळालेच पाहिजे. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com