सर्वप्रथम मी येथे हे नमुद करु इच्छितो कि मी शिवसेना ह्या पक्षाचा समर्थक/सदस्य वगैरे नाहि.
गेले काहि दिवस हवतर काहि महिनेच म्हणा,शिवसेनेवर चहुबाजुने हल्ले होताना दिसतात.
प्रसारमाध्यमे त्यातहि हिंदि/इंग्रजी माध्यमे,इतर राजकीय पक्ष,काहि मराठी वृत्तपत्रे,आयबीन नेटवर्कच्या सर्व वृत्तवाहिन्या
वगैरे मंडळि शिवसेनेच्या हात धुवुन पाठिशी लागल्याचे चित्र दिसतेय.
मुद्दा महाराष्ट्राच्या विकासाचा असो,मुंबईतील मराठी माणसाचा असो,हिंदुत्वाचा असो वा मराठीचा असो ह्या सर्वाच्या अधोगतीला
शिवसेनाच जबाबदार आहे असा सुर ही मंडळि लावत असतात.
निखिल वागळे,हेमंत देसाई,राजदीप सरदेसाई,प्रताब आसबे,राजीव खांडेकर,राजु परुळेकर, कुमार केतकर ह्यांसारखी मंडळी अगदि इमान इतबारे
शिवसेनेला लक्ष करताना आढळतात.हिंदि मिडिया तर इतर काहि बातम्या देण्यासाठी नसतील तर शिवसेना वगैरे विषय काढून बसतात.
त्यातल्या त्यात आयबीएन नेटवर्कच्या वृत्तवाहिन्यांनी शिवसेनेला संपविण्याची सुपारीच घेतलीय की काय असा
संशय येतो.परवाच्या आयबिएन लोकमत वाहिनीवरील ग्रेट भेट ह्या कार्यक्रमात देखिल श्री.पुष्पा भावे ह्यांनि असाच सुर लावला होता.
अर्थात शिवसेनेच्या काहि चुका निश्चितच असल्या पाहिजेत परंतु महारष्ट्रातला कुठलाच पक्ष धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ नाहि हे वास्तवाचे भान ह्या मंडळींना
नसावे का?
गेल्या साठ वर्षात जेमतेम ५ वर्षेच सत्तेत असणा-या ह्या पक्षाने महाराष्ट्राचे असे काय घोडे मारले आहे की ह्या पक्षाला ह्या सर्व टिकेला तोंड द्यावे लागत आहे?
राहुल गांधी व शाहरुख खान ह्यांच्याबद्दल शिवसेनेने घेतलेल्या भुमिकेबद्दल आपल्याला काय वाटते हे देखील वाचायला आवडेल.
वाचने
2897
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला
माझ्या मते
१००%
In reply to माझ्या मते by अनामिका
शिवसेना
सहमत
+१
In reply to सहमत by अन्या दातार
उद्धव
In reply to +१ by योगी९००
घर फिरलं कि...
स्मिता
स्मिता ठाकरे म्हणतात " मी शिवसेनेत कधीही नव्हते..