नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंना डोळे झाकून पाठिंबा.
मी मराठी!!
जय मराठी!!
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
माझ्या नात्यातली काही मंडळी कन्नड बोलत नाहित, पण कर्नाटकप्रवासावर आहेत. त्यांना चोर-दरोडेखोरांनी लुटले-मारले, तर कन्नड शिकेपर्यंत पोलीस मदत करणार नाहीत, तक्रार नोंदवणार नाहीत, हे वाचून अत्यंत काळजी वाटू लागली आहे.
मात्र कर्नाटकातील गुन्हेगारांसाठी उत्तम बिझिनेस प्लॅन आहे : कन्नड न-येणार्या व्यक्तीला हेरून त्यांची चोरी-बलात्कार वगैरे करा. पोलिसांपासून कायदेशीर सूट आहे! (हा बिझिनेस प्लॅन गोव्यात चालत नाही. छे, छे गोव्याचे नतद्रष्ट सरकार नेहमी बिझिनेस-विरोधी असते.)
धनंजय यांचा प्रतिसाद मजेशीर आहे पण मुद्द्याचा विपर्यास करतो आहे का?
कन्नड यायला हवे असे अधिकार्यांना सांगितले आहे. कन्नड न येणार्याची तक्रार नोंदवू नका असे सांगितले नसावे.
नितिन थत्ते
धनंजयच्या प्रतिसादात काही विपर्यास जाणवला नाही. काही विपर्यास असेलच तर तो श्री गाजरे यांच्या 'कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात' या वाक्यात आहे.
:-)
माझा स्वानुभव आहे, की महाराष्ट्रात पोलीस मराठीत(ही) नोंदणी करतात.
(महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्यसेवेत नोकर असताना पोलिसांशी व्यवहार करण्याचा प्रसंग आला होता - १०-१५ वर्षांपूर्वी. माझा पोलिसांशी बहुतेक व्यवहार मराठीत होता, पण वैद्यकीय चाचणीचा अहवाल तेवढा मात्र मी इंग्रजीत लिहिला होता, हे आठवते आहे. पोलिसांची पंचनामा नोंदही मराठीतच होती.)
**"अमुक राज्यात अमुक होते, आणि तमुक राज्यात तमुक होते" वगैरे विधानांमध्ये "आपल्या राज्यात मात्र वेगळेच काही होते" असा गर्भित आरोप असतो. अशी विधाने अन्य राज्यांबाबत चुकलेली असतात, आणि आपल्या राज्याबाबत चुकलेली असतात, असे पुष्कळदा लक्षात येते. पण तर्कातील बहुतेक विधाने गर्भित ठेवलेली असतात, त्यामुळे प्रतिवाद करण्यासाठी शब्द नसतात. सर्व गर्भित विधानांपासून "मी असे कुठे म्हटले" म्हणून हात झटकता येतात. अशा परिस्थितीत युक्तिवाद सुरुवातीला गर्भितांसह जसाच्यातसा स्वीकारून त्याच्या पुढील पायर्या दाखवून "रिडुक्सियो आड आब्सुर्डुम" करण्यावेगळा पर्याय मला दिसत नाही. अनर्थक निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी "तुमचे अमुक गर्भित विधान होते" असे मला म्हणावे लागत नाही, आणि त्या गर्भित विधानापासून कोणाला हात झटकून वेगळे होण्याचाही मार्ग नसतो.**
धंनजय यु टु =))
असो.
कर्नाटकविषयी काही माहीती नाही. मोठा भाउ बरेच दिवस कर्नाटकमध्ये होता. त्याला विचारुन बघतो.
--
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
फार कमी पोलिसांना हिंदी येते. तेव्हा हिंदी येते पण बोलत नाहीत असा प्रकार नाही आहे. वरील भाषणात राज ठाकरे "भाषेची भिंत उभी केली पाहिजे" असे म्हणतात. हिंदी मराठी बाबत ते कठिण आहे.
हिंदी आणि मराठीची लिपी देवनागरी आहे.दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य आहे. हिंदीचा प्रामुख्याने प्रसार महाराष्ट्रात(मुंबई/ठाणे/पुणे) होण्याचे कारण-
१)बॉलिवूड आणि त्यातून होणारी सांस्कृतिक देवाण घेवाण.(बॉलिवूड म्हणजे केवळ चित्रपट नाही तर त्याच्याशी निगडीत असंख्य व्यवसाय्-ह्यात लाखो लोक आहेत.)
२)अगणित बँका,कंपन्यांच्या मुख्य कचेर्या.
३)अनेक केंद्रिय संस्थाची कार्यालये येथे आहेत.
(वरील तिन्ही गोष्टींचा मुंबईकरांना अभिमान वाटतोच की!!)
शिवाय राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणांमुळे राज्यात हिंदीचा वापर गेले अनेक वर्षे केला जातो.
दाक्षिणात्या भाषांचे तसे नाही. बेंगळुरु पासुन ४०किमी वर होसूर गाव आहे. हे तामिळनाडूत येते.तिकडच्या माणसाला इकडे काम करायचे म्हंटले तरी कन्नड लिपी शिकावी लागेल.काम इंग्रजीतून होत असेल तर भाग वेगळा.
भेंडी
कन्नड मधे अजुनहि पोलिस स्टेशन मधे क्म्प्लेन कन्नड मधेच घेतात , हिन्दि वा ईन्गजी चालत नाहि>>>>
थोडीशी शब्दरचना बदलण्याची गरज आहे असे वाटते..... कंप्लेंट कन्नडमध्येच लिहून घेतली जात असेल कदाचित, सांगणार्याने कन्नडमध्येच सांगायला हवे असे थोडेच आहे. एखाद्या परभाषिकाला ज्याला कन्नड येतच नाही त्याने काय तक्रार नोंदवायचीच नाही? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
नेहमीप्रम
जर राज
ह्म्म्म्म..
कोणती ?
जय राजाभाऊ!
मागे सकाळ
अरेरे
हा हा
विपर्यास
विपर्यास कोण करतंय?
सॉरी
:-) गंऽमत वो नुसऽती
धंनजय यु
हिंदी
कन्नड मधे