प्रकटन फार आवडल्...शाळेचे रम्य दिवस परत आठवले. आमच्या शाळेतले बरेच शिक्षक सुद्धा आठवले...
विशेष म्हणजे चोपडे सर आठवले,कधी टाळक्यात केमिकल लोचा झाला तर त्यांच्यावर नक्की लिहीन.
(नेहमीच इध्यार्थी)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
वा सकाळची सुरुवात इतक्या छान लेखानी झाली :)
स्वाती फार सुन्दर लिहीता तुम्ही.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
मनापासून लिहिलय बाईंबद्दल!
अश्याच आठवणी असलेले इंग्लीशचे दामले सर यांची आठवण झाली. मी पाचवीत असतानाच ते रिटायरमेंटला आले होते. आताशा शिक्षकांकडे बघून मुलांनी कोणते आदर्श ठेवावेत हे पालकांनाच कळत नाही अश्या वातावरणात जोशीबाईंसारख्या शिक्षकांच्या आठवणी मन ताजं करून जातात.
रेवती
छान आठवणी... माझ्यासुद्धा जागा झाल्या.
एकदम शांत, कधीही मुलांवर ओरडणे नाही आणि तरी देखील मुलांना आदरयुक्त प्रेम आपसुक करायला लावणारे हे व्यक्तिमत्व होते.
कधीतरी ६वी, ७वीत असताना त्या off period ला आल्या आणि मुलांना कंटाळा आला म्हणून हिचकॉकची "सायको" ची गोष्ट सांगायला लागल्या. अर्थातच ती पुर्ण झाली नाही. मग जेंव्हा केंव्हा आमचे शिक्षक गैरहजर असत तेंव्हा जोशीबाई येऊन ती गोष्ट पूर्ण करतील याची वाट पहायचो.
अगदी अव्वल नंबरी कार्ट्यांनाही बाईंबद्दल अतीव आदरच होता.
हे नक्की कुणाला उद्देशून लिहीत आहेस? ;) बाकी तुझ्या वरील वाक्याशी माझा संबंध नाही :-). पण त्यामुळे माझी एक विशेष व्यक्तीगत आठवण जागी झाली: एकदा एका वर्गात एक नवीन शिक्षिका आल्या. कदाचीत त्यांची शिक्षकीपेशाची नवीन सुरवात असेल अथवा टेन्शन आले असेल, काही कारण असेल पण सुरवातीस काहीतरी गडबड झाल्याने, मुले गोंधळ घालू लागली. त्यांनी त्यात मला अचानक फारच गडबड्या (याहून कडक शब्दात) म्हणत माझी अक्षरशः निर्भत्सना केली. आता गुरूचे वाक्य खोटे कसे ठरवायचे? म्हणून मी देखील त्या जे काही म्हणाल्या ते खरे करायचा निश्चय केला आणि आमलात आणू लागलो. :-) काही दिवसांनी जोशी बाईंनी तास संपल्यावर मला बाहेर बोलावले (वास्तवीक त्या आमच्या वर्गशिक्षिकाही नव्हत्या) आणि प्रेमाने विचारले की, "अरे सध्या टिचर्सरूम मधे सारखे तुझेच नाव चर्चेस येते? तुझ्याकडून अशी कधीच वागणे झाले नाही आणि अपेक्षाही नाही, मग असे का वागतोयस"? मग म्हणले, "मला (उगाच) जसे म्हणले (ठरवले) गेले, तसे मी असू शकतो हे दाखवून देत आहे". त्या मनमोकळेपणाने हसल्या. "अरे ती अजून नवीन आहे, नवखी आहे, असे वागणे बरोबर नाही. सोडून दे असा राग..." केवळ इतके प्रेमाने आणि हक्काने म्हणले म्हणल्याबरोबर मला अजून पटवावे लागले नाही. काही दिवसांनी परत बाजूला येऊन त्यांनी माझ्या वागण्यातील फरक टिचर्स रूम मधे "acknowledge" झाल्याचे सांगितले. ;)
"It takes a village to raise a child" अशी जी म्हण आहे त्यात शाळेचे महत्व खूप असते. केवळ अभ्यास आणि अभ्यासूवृत्तीच नाही तर अवांतर गोष्टी (extracurricular activities), अवांतर पाठांतर/वाचन आणि "सोशल स्कील्स"चे संस्कार शाळा करत असते. आज मागे वळून पाहताना आपण त्यातील बरेच काही त्या काळात आणि वयात नकळत शिकलो असे वाटत राहते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
बाईंना खूप दिवसात भेटलो नाही, एकदा वेळ घेऊन जायला हवं, नवीन लिहिलेलं,वाचलेलं बाईंशी शेअर करायला हवं.. बाईंना खूप बरं वाटेल. मित्रमंडळींकडून बाई आजारी असल्याचं समजलं तेव्हा तर असं फारच वाटलं.
आणि एक दिवस समजलं की 'जोशीबाई गेल्या..'
सुन्न व्हायला झालं. ह्या भारतभेटीत बाईंकडे जाऊ, नवीन लिहिलं, वाचलेलं बोलू.. असं मनात म्हणत होते ते आता अधुरंच राहिलं ह्याची रुखरुख आहे.
सुंदर लेखन.
स्वाती बरेच दिवसांनी दिसलीस.
पुनरागमन अगदी झोकात.
अवांतर: विकास ह्यांचा अनुभवही आवडला.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
ज्या जोशीबाईंना कधी बघितलंही नाही त्या माझ्याच बाई वाटायला लागल्या हेच त्या व्यक्तिरेखेचं यश! खूप दिवसांनी लिहिलंस स्वातीताई, छान वाटलं वाचून.
तीळगूळ द्यायला गेलं की तोंडावरुन हात फिरवून, कानशिलावर बोटं मोडून, तोंड भरुन हसत "ये रे ये! किती मोठा झालास! कसा आहेस बाळा? हा घे खाऊ." म्हणत हातावर वडी ठेवणार्या आणि निरोप घेऊन निघताना "पुन्हा आलास की असले तर भेटू. माझ्या विठूला काळजी!" असं म्हणून आशीर्वाद देणार्या रसाळबाई आठवल्या आणि डोळे भरुन आले!
चतुरंग
तीळगूळ द्यायला गेलं की तोंडावरुन हात फिरवून, कानशिलावर बोटं मोडून, तोंड भरुन हसत "ये रे ये! किती मोठा झालास! कसा आहेस बाळा? हा घे खाऊ." म्हणत हातावर वडी ठेवणार्या आणि निरोप घेऊन निघताना "पुन्हा आलास की असले तर भेटू. माझ्या विठूला काळजी!" असं म्हणून आशीर्वाद देणार्या रसाळबाई आठवल्या आणि डोळे भरुन आले!
प्रतिक्रिया
प्रकटन फार
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा सकाळची
खूप आवडले.
सुंदर..
स्वातीताई
स्वातीताई
खूप छान
मनापासून
सुरेख साठवण..
आठवणी आवडल्या
आठवणी आवडल्या
सुरेख!! हुप
छान
आवडले.
बाईंना खूप
नेहमीप्रमाणेच..
छान व्यक्तीचित्रण
धन्यवाद
सुरेख शब्दचित्र!
तीळगूळ