सहस्त्रकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण येत्या शुक्रवारी म्हणजे दि. १५.१.२०१० रोजी येत आहे. सदियों के बाद म्हणजे पंधरा हजार चारशे अट्ठावन्न वर्षांनी हा दुर्मिळ अन खतरनाक योग येत आहे! प्रगाढपंडितांच्या मतानुसार, या वर्षीच्या सूर्यग्रहणावर अमावस्येची काळीकभिन्न छाया असणार आहे ;) संपूर्ण जगभरात याचे भयानक परिणाम ( पूर्वलक्ष्यी प्रभावाने) दिसून येणार आहेत.पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर अनुक्रमे पूर व अवर्षण, झालंच तर स्वाइन फ्लू, महागाई, भ्रष्टाचार, चलनवाढीचा वाढता दर, साखरेचे चढते भाव इ.इ. चे थैमान दिसून येणार आहे.
तसेच या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत येत असल्याने एकंदरीत सर्व मनुष्यमात्रांच्या दृष्टीने कठीण काळ आहे हे निश्चित!
परंतू घाबरु नका... या सर्वांवर उपाय आहे.
आमच्या पंचमहाज्योतिषांनी पुढील उपाय सुचवीले आहेत, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच सदर उपाय सर्वाना पत्राद्वारे सुचवून जास्तीत ज्यास्त लोकांना ग्रहणाच्या अनिष्ट परिणामांपासून वाचवा. जो कुणी या पत्राचा अवमान करेल, त्याला राहू-केतूच्या क्रोधाचे धनी व्हावे लागेल :( व जो कुणी हे पत्र आपापल्या मित्रांना पाठवेल , शनी महाराजांची सरळदृष्टी पडेल!
उपाय :
१ साडेसाती असणार्यांनी या दिवशी साडेसात नंतर घराबाहेर पडू नये.
२ सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणतेही विधी * करु नयेत असे शास्त्रार्थ सांगतो, सर्वांनी याचे कटाक्षाने पालन करावे.
(*पहिला अर्थ घ्यावा ;) )
३ राहू केतूचा कोप टाळण्यासाथी खास उपाय: सकाळी लवकर उठून ताजे व निर्भेळ गोमय (शेण) आणून त्याचे वाटीएवढे पांच दिवे करुन त्यात एरंडेल टाकून घराबाहेर पाजळावेत.
४ घरातील टाकावू कचरा मॉल मालकांना दान करावा!
५ कोणताही एक अगम्य मंत्र (उदा. ओम र्हीं रिम फट स्वाहा छाप) पुट्पुटावा.
६ मांजराचे मुखावलोकन करु नये. ( and vice versa)
अनुभूती
एका गरीब शेतकर्याला वरीलप्रमाणे पत्र मिळाले, त्याने ताबडतोब अकरा मित्रांना पत्रे पाठविली, मात्र पोष्टाच्या दफ्तरदिरंगाईमुळे संबंधीतांना
पत्र ग्रहणानंतर मिळाले. दुसर्याच दिवशी त्याचा पाय घसरला व टिबिया फ्रॅक्चर झाला. त्यानंतर टपाल खात्याची काय हालत झाली हे आपण पाहत आहातच!
एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याला असेच पत्र मिळाले, त्याने दुर्लक्ष केलं, दुसर्याच दिवशी त्याची मलईदार पोस्टींगवरूनतडकाफडकी गडचिरोलीला बदली झाली.
चारवेळा बारावीला नापास झालेल्या एका पुनर्परिक्षार्थी विध्यार्थ्याला हे पत्र मिळाले, त्याने ताबडतोब अकरा मित्रांना हे पत्र पाठवले, अन काय आश्चर्य! बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांच्या घोळामूळे त्याला अवांतर प्रतिसाद नव्हे नव्हे गुण मिळून बर्या गुणांनी तो पास झाला!
असो सदर पत्राचा अवमान करु नये. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवावे, ही विनंती ;)
वाचने
3279
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्धवट
आम्ही कौतुक करतो.
In reply to अर्धवट by अविनाशकुलकर्णी
जाउ द्या
In reply to अर्धवट by अविनाशकुलकर्णी
ग्रहणाच्य
तुम्ही करु
वा वा
अमंळ
धन्यवाद..इतकी सुंदर माहिती पुर्वी कधी मिळाली नाही.
छान
सगळ्यात
उल्लेख
In reply to सगळ्यात by टारझन
मुढांनो
आम्हाला काळजी नाही...