लेखकाच्या मताशी १००% सहमत.आजपर्यंत चालत आलेल्या पारंपारिक जातीव्यावास्थे पेक्षा सुद्धा हि आधुनिक जाती व्यवस्था भयानक आहे.त्यात मागास आणि प्रगत हा भेद फक्त आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे.पारंपारिक जाती व्यवस्था प्रामुख्याने सुरक्षिततेच्या भावनेशी निगडीत असते असे मला वाटते .धर्म,प्रांत,भाषा इत्यादी पण त्याच भावनेची प्रारूपे आहेत.सामाजिक दृष्टीने पुढारलेल्या अशा पाश्च्यात्य राष्ट्रांत आणि अमेरिके मध्ये सुद्धा हि भावना कोणत्या ना कोणत्या रुपामध्ये दिसून येईल.आपल्याकडे ती जातीच्या आणि धर्माच्या रुपामध्ये दिसते
जात न जायला राजकारणी व भारत सरकारच जबाबदार आहे. लोकांनी जात विसरायचा प्रयत्न केला तरी सरकारच कुठल्याही अर्जामधे आपल्याला जात विचारते. तसेच विशिष्ठ जातींना अधोरेखित करुन सवलती देते आणि समाजातली तेढ वाढवते. कुठेही जातीचा उल्लेख न करता फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांनाच मदत दिली पाहिजे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
मुक्तक आवडले. कुठेही द्वेष, त्रागा वा अभिनिवेश नसलेले मुक्तक.
आजच्या आधुनिक युगात जन्माला येणार्या नविन जातींचे काय?
यामुळेच पारंपारिक जाती नष्ट होण्यास मदत होणार आहे.जन्मापेक्षा कर्मावर आधारलेल्या जाती निर्माण होणे हे सामाजिक दृष्ट्या अपरिहार्य आहे. ते योग्य का अयोग्य हा मुद्दा वेगळा.
मिपावर यापुर्वी यावर अनेक सकस चर्चा झालेल्या आहेत. भरकटलेल्या चर्चेतुन देखील सकस मुद्दे टिपता येतात. आजच्या सुधारक सारख्या चिंतनशील मासिकाला देखील मिपाची दखल (सकस चर्चांपुरती)घेण्यास आम्ही भाग पाडले आहे ही जमेची बाजु आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मी जात मानत नाही. ऑफीशीयल कागदपत्रातसुद्धा धर्म / जात लावत नाही. मुलांच्या शाळेच्या दाखल्यात मात्र मला नाइलाजाने धर्म व जात लिहावी लागली.
लिहायला वाईट वाटते की जात लिहीत नाही म्हणून वाट्याला काहीवेळा उपेक्षादेखील आली आहे.
थोडेसे कडवटपणाने लिहितोय पण जात न पाळण्याचा मक्ता हा केवळ उच्चवर्णीयानीच घ्यायला हवा असा सध्या आग्रह असतो. असा अनुभव येतो.
ब्राम्हणाला भटुरड्या म्हंटले तर त्याला अॅट्रोसिटी अॅक्ट लागु होत नाही.
जात मानायचीच नसेल तर मग हा दुजाभाव कशाला करायचा?
शासकीय कार्यालयात नेमणुक बढती या बाबींसाठी तुमची जात ही लिहावीच लागते. त्याशिवाय नेमणुकच होत नाही. तुम्ही जात मानत नसला तरी तो कॉलम पुर्ण करण्यासाठी जात मानीत नाही असा शेरा लिहिण्याची सोय नाही. बिंदुनामावली सारखे प्रकरण जे बढती साठी वापरले जाते त्यात केवळ जात नव्हे तर उपजात ही लिहावी लागते.
आरक्षण ही गोष्ट जोपर्यंत आहे तो पर्यंत शासनदरबारी जात लिहिणे अनिवार्य आहे.
ब्राम्हणाला भटुरड्या म्हंटले तर त्याला अॅट्रोसिटी अॅक्ट लागु होत नाही.
या विषयी कायदेतज्ञ अधिक सांगु शकतील. अॅट्रोसिटी अॅक्टचा उद्देश जर जातीभेद दुर करणे असेल तर कुठल्याही जातीचा अपमानदर्शक उल्लेख हा दंडनीय असला पाहिजे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
सर्वप्रथम मूळ लेख हा संयमीत वाटल्याने आवडला. जात ही कुठल्यान लुठल्या पद्धतीने राहतेच पण धर्माने आणि जन्माने "आहेरे" आणि "नाहीरे" असे समाज आणि त्याला अनुषंगून अत्याचार/अन्याय करणारी जातीव्यवस्था मात्र मनापासून जायला हवी असे वाटते. ते कर्तव्य सर्वप्रथम तुम्हाआम्हा - वडीलोपार्जीत कुठल्याही जातीच्या "शिक्षितांचे" आहे. मगच आपण स्वतःसा "सुशिक्षित" आणि "अधुनिक" म्हणायच्या लायकीचे ठरू. त्या चष्म्यातून एकमेकांकडे पहाणे आणि त्यावरून लिहीणे, इतिहास ठरवणे बंद केले पाहीजे.
ब्राम्हणाला भटुरड्या म्हंटले तर त्याला अॅट्रोसिटी अॅक्ट लागु होत नाही.
अॅट्रॉसिटीचा कायदा हे १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्हि.पि.सिंग यांई जम्मू-काश्मीर सोडून उर्वरीत स्वतंत्र भारतास दिलेली देणगी आहे. वास्तवीक पहाता atrocity या शब्दाची व्याख्या काहीशी, "An extremely cruel act; a horrid act of injustice" अशी आहे. अर्थात त्याचा संबंध हा "बळी तो कान पिळी" मधे असलेल्या अनिर्बंध शक्ती (पॉवर) शी आहे, जातीशी नाही. अजूनही संपूर्ण भारताचा विचार केल्यास तसे अन्याय हे The Scheduled Castes and Scheduled Tribes वर जास्त होत असावेत असेच वाटते. म्हणूनच: "This Act may be called the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989." असे म्हणले गेले आहे.
अर्थात अन्याय हा एकाच बाजूने होतो असे ठरवून सरकारने एक मोठी चूक केली आणि नंतरच्या कुठल्याच सरकारने ती राजकीय अडचण होऊ शकते म्हणून बदलण्याचा प्रयत्न केला नाही.
जात मानायचीच नसेल तर मग हा दुजाभाव कशाला करायचा?
यावरून आठवले की, इंदीरा गांधींनी आणिबाणीच्या काळात अथवा त्या आधी थोडेसे, भारत हे "सेक्युलर" राष्ट्र म्हणून घोषित केले. पण "सेक्यूलर" म्हणजे काय ह्याची व्याख्या केली गेली नाही. नंतर जनता सरकारने ती "सर्वधर्मसमभाव" म्हणून व्याख्या करायचा प्रयत्न केला पण तत्कालीन विरोधी पक्षाने (इंदिरा काँग्रेस) तो प्रयत्न हाणून पाडला...हे सांगायचे कारण असे की धार्मिक समजणार्यांचा येथे प्रश्न नाही कारण ते जाहीर धर्म मानतात, पण स्वत:स सेक्यूलर अथवा कम्युनिस्ट समजणारे मात्र निधर्मी होत नाहीत आणि खर्या अर्थाने त्या विचारांना तत्व म्हणून आमलात आणत नाहीत. अर्थात त्याचे कारण सरळ आहे : राजकारण....म्हणूनच, Politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it wrongly and applying unsuitable remedy... असे कुणाचे तरी वाक्य आहे :-)
"हिंदु धर्म आणी त्यातील जाती व्यवस्था हा म्हणजे चाऊन चोथा झालेला विषय, त्यात अजुन आणी नविन काय ते लिहिणार. कोळसा किती पण उगळला तरी पण काळाच..."
असे लिहिणारे, वाचणारे, वाचन आवडणारे, चिंतन, मनन करणारे खुप झाले.. होतील. पण तो कोळसा ऊगाळताना, त्याच्या आत लपलेल्या हीर्याचा शोध घेणारे असे किती?
"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे"
स्वतःच्या हातानी ओढवुन घेतलेल्या गुलामीतुन बाहेर पडायला आम्हाला १५० वर्षे लागली... पण गेली हजारो वर्षे आमची मने ह्या गंजलेल्या रिती-रिवांजांचा पाठपुरवठा अगदी नेमाने करीत आहेत, त्याला कोण काय करणार?
भारतीय म्हणतात भारत गुलामगिरीतुन सूटला, पण नक्की भारत सुटला का ईंडीया, हे तपासुन पहायची वेळ आली आहे.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
पण तो कोळसा ऊगाळताना, त्याच्या आत लपलेल्या हीर्याचा शोध घेणारे असे किती?
जाती भेदाच्या कोळ्श्याच्या आत कोणता हिरा लपला आहे?
त्याला कोण काय करणार?
आपल्या सर्वांची काहिच ने॑तिक जबाबदारी नाहि का?
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की उद्या जातीव्यवस्था नष्ट केली की लगेच वर्णभेद, भाषाभेद, प्रांतभेद, गरीब श्रीमंत भेद असे भेदभाव उभेच आहेत ...नंबर लावून
थोडक्यात काय माणूस कुठल्या ना कुठल्या प्रकार समुदाय करतो आणि मग दुसर्या समुदायाच्या विरोधात कुरघोडी चालू. कुठलं ना कुठलं लेबल लागलं की... एका गटाचा भाग झाल्याचं समाधान.
आपण आपल्या परीने जे करता येईल ते करायचं दुसरं काय!
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो
प्राणीजात.
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
लेख खूप आवडला. अशा लिखाणाला उत्तेजन दिले पाहिजे.
जात 'पासपोर्ट'मधून नाहींशी झाली, पण इतरत्र बोकाळली आहे.
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
प्रतिक्रिया
मुक्तक
+१
आधुनिक जाती व्यवस्था.
छान वाटले आपले विचार!
छानच झालय
जात
चांगले
उत्तम मुक्तक
जात !
शासकीय अपरिहार्यता
कायदा तसेच ऐतिहासीक कारणे...
गुगलवरून
संयमीत व
झाले बहु
???
एक गोष्ट
शंका
लेख खूप आवडला.
यातायातीधर्म नाही विष्णुदासा