लेख वाचला होता सकाळीच. फार चलाख लेखन आहे हे. मी काही शिवसेना, मनसे, भाजप किंवा संघ यांचा समर्थक नाही. आहे विरोधकच. तरीही या लेखनात मधू कोडा असोत किंवा मनू शर्मा - यांच्या पक्षाचा उल्लेख ज्या चलाखीने टाळला आहे ते पाहून हसू आले. कोडा यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा उल्लेख जरूर केला जातो, संघाचाही उल्लेख केला जातो. पण त्यांचे मुख्यमंत्रीपद हे नंतर कॉंग्रेसच्या जोरावर होते हे मात्र सांगितले जात नाही. आणि त्याच काळात हा भ्रष्टाचार झाला आहे. मनू शर्माचेही तेच. तो म्हणे राजकीय नेत्याचा मुलगा. कोण बॉ हा नेता? कॉंग्रेसचा विनोद शर्मा. कोण हा विनोद शर्मा? तो कसा मोठा झाला? पक्षातील त्याचे वजन का टिकून आहे? मनूचा पॅरोलचा अर्ज ज्या गतीने मंजूर झाला ते अचंबित करणारे आहे अशा आशयाची टिप्पणी केल्याने विषय संपतो का? तो अर्ज शीला दीक्षितांनी मंजूर केला आहे, ज्यांचा एरवी आपण दिल्लीतील समर्थ राज्यशासनाबद्दल गौरव करत असतो. इथं त्या गौरवाच्या प्रमाणात टीकाही झाली पाहिजे. नावं घेऊन. ते होत नाही. राज ठाकरे, मराठी हे मुद्दे तर अशा लेखनासाठी सोपेच. पुन्हा, राजबरोबरच आपण मनू शर्मा आणि कोडा यांनाही पिंजऱ्यात उभे केले असे चित्रही निर्माण करता येते. पण मग म्हणूनच दाखल्यांसाठी निवडलेल्या या प्रकरणांना मोठ्या संख्येतील लोकांनी सामान्य म्हणून स्वीकारले तर त्याचे वावगे वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. कारण या गोष्टी लोकांना कळत असतात. लोकांना कळत नाही हा आपला भ्रम असतो.
आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्यांनी अशी आगळीक करावी हे अधिक खटकणारे आहे.
राज, मधू, मनू या तिन्ही चुका, त्या चुका असे म्हणताना त्या चुकांचे माप योग्य पदरात न घालण्याचीही चूकच. विचारवंतांनी (हा शब्द मिपावर एरवी ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने वापरलेला नसून, प्रामाणीक अर्थाने वापरतो आहे) अशा चुका करायच्या आणि वर समाजावर दोष टाकून मोकळे व्हायचे हा कुठला न्याय?
मी हा लेख सकाळमधे वाचलाच होता पण मगाशी इथेही परत वाचला होता. मनात अगदी असेच नाही पण काहीसे असेच आले होते. अर्थात, पक्षांची नावे घेतली नाहीत इतके लक्षात आले नाही पण काही शंका जरूर आल्या. मला वाटते, या प्रकारचे लेख कसे वाचावेत याचे हा प्रतिसाद उत्तम उदाहरण ठरावे. असो.
मोडकांनी पुढे आणलेले मुद्दे आहेतच. पण मला नेहमी पडणारा एक प्रश्न या निमित्ताने परत एकदा मनात आलाय.
विचारवंत, समाजशास्त्रज्ञ वगैरे लोकांनी समाजावर वचक ठेवून त्याला एक निश्चित दिशा देणे अपेक्षित आहे आणि या प्रकारचे लेख त्याच प्रकारचे असतात. पण विचारवंत दोष काढतात, पण उपाय मात्र क्वचितच सुचवतात. याच लेखाचे उदाहरण घेऊ.
पोखरलेली राजकिय व्यवस्था हा मूळ विषय गाभा आहे. आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे इत्यादी विषयांची मदत घेतली आहे. पण याच लेखात डॉक्टर महोदयांनी काही उपाय योजना सुचवणे अपेक्षित. शिवाय, राज ठाकरेंच्या एकंदरीत वर्तनाला विरोध करताना, ते जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्याबद्दल कधीच काही भाष्य अथवा उपाययोजना सुचवली जात नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या मनात पक्षपात होत असल्याची भावना आल्यास दोष त्यांचा नाही.
बिपिन कार्यकर्ते
अगदी शास्त्रशुद्ध नाही, पण वरवर सांगायचे झाले तरी -
उपाय सुचवायचे झाले की सगळ्यांचे पाप त्यांच्या-त्यांच्या मापात टाकावे लागते. तसे केले तरच उपायांची दिशा सापडू शकते. कारण उपाय त्याचवेळी समोर येऊ शकतो, जेव्हा तर्कसंगतीने चुका कळलेल्या असतात. इथं चुकाच कळून घ्यायच्या नाहीत. उपाय कसला मिळणार? या स्वरूपाच्या लेखनातून मिळणारा साधा उपाय म्हणजे - असे वागू नये बाबा!!!
पोखरलेली राजकीय व्यवस्था असा मुद्दा मांडताना, त्या पोखरणीला जबाबदार कोण, हे आधी ठरवावे लागेल. मग कॉंग्रेसचीही व्यवस्था पोखरलेली आहे हे सांगावे लागेल. मग होते काय, की सारेच चोर आहेत हे कळू लागते. मग त्यातल्या-त्यात सुधारू शकेल असा कोण हे हेरावे लागते, आणि सुधारणांचा उपाय मांडावा लागतो. आता इतके करायचे तर बऱ्याच इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो.
मी तर नाही बुवा असं काही उपाय सांगणारं लिहिणार कधीही!!! :)
पोखरलेली राजकीय व्यवस्था असा मुद्दा मांडताना, त्या पोखरणीला जबाबदार कोण, हे आधी ठरवावे लागेल. मग कॉंग्रेसचीही व्यवस्था पोखरलेली आहे हे सांगावे लागेल.
कदाचित लेखकाने हे सांगितलेही असेल.. आणि यावरचे उपायही सांगितले असतील.. पण "सकाळ" वाल्यांनी ते "नेहेमीप्रमाणे" संपादित केले असावे ;) (ते वाचकांचा पत्रव्यवहार मधील पत्रेही संपादित करतात म्हणे..!)
बाकी मला लेख अजिबात आवडला नाही.. :)
--सुहास
श्रावण मोडक: आपल्याशी अंशत: सहमत. मात्र राज ठाकरेन्बद्दल लिहिताना कोन्ग्रेसला दोषी धरले आहे ना?
लेखक तीनही व्यक्तींबद्दल (ठाकरे, कोडा, शर्मा) काहीसे आटोपते घेत लिहित आहेत. खरे तर या तीन घटना एकमेकांशी मुळीच निगडीत नाहीत. म्हणूनच कदाचित "ठप्प झालेले जनमत" ही पट्टी वापरून लेखक ह्या घटनांकडे पाहत असावेत.
बिपीन कार्यकर्ते: "पुढे काय करायचे?" याची रेडीमेड पाककृती अभ्यासकांनी द्यावी अशी अपेक्षा आपण का करतो? हे एका लेखात होणारे काम नक्कीच नाही.
राज ठाकरे यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचा उल्लेख आला आहे, हे बरोबर. पण तो कसा आला आहे? राज यांच्यासंदर्भात सरकारने उचललेल्या (किंवा न उचललेल्या) पावलांमुळे कॉंग्रेसला फायदा झाला असे तेलतुंबडे यांचे म्हणणे आहे (शिवसेना वाढीचा इतिहासही अशाच अंगाने जातो). हा फायदा नेमका काय आहे? असा फायदा करून घेणाऱ्या कॉंग्रेसला लेखकाने झोडलेले दिसत नाही. तिथं केवळ (आपल्या आकलनात बसलेली) तथ्यं मांडली गेली आहेत. राज यांच्यामुळे राजकीय व्यवस्था पोखरली असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे नाते कॉंग्रेसला झालेल्या फायद्याशीही आहे. म्हणजेच, कॉंग्रेसचा फायदा हाही राजकीय व्यवस्था पोखरण्यात हातभार लावणारा आहे हा अर्थही मांडला पाहिजे. तसे करायचे झाले तर कॉंग्रेसच्या नेतृत्त्वालाही पट्ट्यात घ्यावे लागेल. राजकीय व्यवस्था काही केवळ राज, कोडा, शर्मा यांच्यातून साकारतही नसते आणि म्हणून पोखरतही नसते, हे तुम्हालाही मान्य व्हावे.
सर्वप्रथम श्रावण मोडकांचे आभार. संघ/शिवसेना/मनसे/भाजपा आदींच्या अप्रत्यक्ष बाजूने लिहील्याबद्दल अथवा त्यांच्या विरोधात असलेल्यांच्या विरोधात लिहीण्याबद्दलही नाही, तर नीरक्षिर विवेकाने लेखातील एकांगी विचारप्रदर्शन दाखवल्याबद्दल. उद्या असाच अर्धसत्य लेख एखाद्या कम्युनिस्टाच्या अथवा काँग्रेसमनच्या विरोधात आला तरी त्यातील मुद्दे जसेच्या तसे लागू होतील आणि तशा लेखावरपण असाच आक्षेप मी देखील करेन...
बाकी लेखाबद्दल - एकदम टुकार आहे. कारण तो वैचारीक नसून पक्षपाती आहे. बाकी त्यातील वास्तव नवीन नाही आहे तसेच लिहीण्याची समाजभेदी पद्धतपण नवीन नाही आहे.
मूळ लेखकाचे तसेच त्या निमित्ताने तो येथे प्रसिद्धीस देणार्या कालिन्दीताईंचे माओवाद्यांवरील विचार ऐकायला आवडतील. विशेष करून जेंव्हा महाराष्ट्र प्रांतातील माओवादी पक्षाचे प्रमुख ( जे २००७ मधे एटीएसला हवे होते) मिलिन्द तेलतुम्बडे हे डॉक्टर तेलतुम्बड्यांचे बंधू असताना... अर्थात मला माहीत आहे की स्वतः डॉक्टर हे स्वतःला माओवादी/साम्यवादी/आदी काही म्हणत नाहीत तर केवळ डाव्याचळवळीचे विद्यार्थी असे म्हणतात. असो, चालायचचं...
तसे मला मानवीहक्कवाले लोक ही खुप आवडतात. आड ना बुड कशाचाही कशाबरोबर संबध लावुन रिकामे होतात. मुंबई गिरणी कामगारानी सांमताच्या नेत्रुत्वाखाली संप करुन सर्व मिल बंद पाडल्या. पुढे मुंबईतल्या जमीनीचे भाव आकाशाला भिडल्यावर मालकानाही मिल चालवण्यापेक्षा कामगारांची देणी भागवुन गिरणीच्या जागा विकण्यात रस आला.कोहिनुर मिल ची जागा देखिल मालक व सरकारने लिलावात काढली. ती जागा राज ठाकरे व इतरांनी खरेदी केल्यामुळे तेलबुडवेंसारख्या लोकाच्या पोटात दुखु लागले.ती जागा जर मुकेश भाईनी आपल्या बायकोला २५ वाढदिवसाला भेट दिली असती तर ह्या लोकानी त्यावर कौतुकाने डझनभर लेख लिहले असते.
ठाकरे यांनी मराठी अस्मितेचे राजकारण केले आणि "समाजवादी महाराष्ट्रा'चा कणाच मोडला.
हा एक समाजवाद्याचा शिवसेनेवर लाडका आरोप आहे. खरतर समाजवाद्याच एक दुखणं आहे, त्याना स्वःताला मुल होत नाही आणि दुसर्याला मुल झालेले बघवत नाही.
पुढे तेलतुबंडे साहेब मधु कोडांच्या बाबत भाजपचे आमदार होते असा उल्लेख करतात ,परंतु नंतर त्यांनी कॉग्रेसचा पाठिंबा घेवुन सरकार बनवले व भष्टाचार केला हा उल्लेख करण्याची साधी तसदी घेतलेली दिसत नाही.पुढे निवडणुकीच्या काळात कोडा डोईजड ठरत आहेत हे कॉग्रेस नेत्यांच्या लक्षात आल्यावर त्यानी त्याचे भ्रष्टाचार प्रकरण उघडकिस आणले.
शेवटचे उदाहरण मनु शर्मा ह्याचे. त्याची पॅरोलवर सुटका करु नये असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे असताना देखिल कॉग्रेसच्या मुख्यमंत्री शिलाबाय दिक्षित ह्याच्या एका सहकार्याने त्याला पॅरोलवर बाहेर काढले. ह्याचा तेलतुंबड्यानी उल्लेख ही केला नाही.त्याचे वडील आज हरियानात कॉग्रेसचे आमदार आहेत. हे सगळे सोयिस्कररित्या लिहले गेले नाही असे दिसते.
असा हा दळभद्री विचाराचा लेख नक्कीच तेलतुबंडे साहेबाच्या वैचारिक दिवाळखोरीवर विचार करायला लावणारा आहे.
वेताळ
प्रतिक्रिया
हाहाहाहा
प्रतिसादासाठी टाळ्या....
कारण...
पोखरलेली
अतिशय
प्रतिसाद वाचनीय
१००%
+१
प्रतिसाद
धन्यवाद
पोखरलेले विचारवंत
मला लेखकाचे नाव आवडले आहे.
"खरतर