मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा
X( अजिबात पटले नाहि
जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय.
:D हे बरोबर
एरवी शेजार्याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल.
8| आम्हीतर शेजार्याशी चानग्ल्या गप्पा मारतो
रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील
=)) ह्म्म
चुचु
मौन हे विरजणाच्या व्यस्त प्रमाणात असते.
त्यामुळे विजू कितीही मौन पाळून पॉलिटिकल वागण्याचा प्रयत्न करू दे, त्याच्या दुधाचे दही करण्यास आम्ही नागपूरकर तत्पर आहोत. सध्या जरा व्यग्र आहे, वेळ मिळाल्यावर विजूभाऊंवर आमची विशेष विरजणकृपा होईल.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
माझं मुळ गाव सांगली आणि सांगली बद्दल ( किंबहुना सर्वच गावाबद्दल ) विजुभाउंनी इतकं बरोबर लिहिल आहे की अधिक काही लिहिता येणार नाही.
सध्या मी नवी मुंबईकर - त्यामुळे नवी मुंबई बद्दल थोडेसे.
मुंबईचाच एक भाग पण मुंबईपेक्षा निसर्गाशी जास्त जवळीक, प्रशस्त रस्ते, कमी ट्राफीक जॅम, खेळण्यासाठी बागा, आणि मराठी माणसांचे जाणवण्याइतपत अस्तित्व यामुळे नवी मुंबकर ( मुंबईकरांपेक्षा ) आयुष्य बर्यापैकी एन्जॉय करत आहे.. कामासाठी आठवडाभर मुंबईत जाउन वैतागलेला नवी मुंबईकर सुट्टीच्या दिवशी मात्र कुटुंबासमवेत खारघर, बेलापूर , वाशी येथील नवनवीन बनत असलेली प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देतो. हे आता रुटीनच झाले आहे.
मेगा हायवेमुळे नवी मुंबईकर मराठी माणसाची पुण्याशी जास्त जवळीक झाली आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबईतील नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा पुण्यातील नातेवाईकांकडे जाऊन येण्याचे जास्त सोयीचे वाटते ( त्यामुळे की काय येथील मराठी माणसांच्यात टिपीकल पुणेरी स्वभाव ही वाढत आहे ;) . )
(नवी मुंबईकर) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्याचे एक वैषिष्ठ्य>>>>>
ओ विजुभाउ आमच्या कोल्लापुरातबी असतीया की जिल्बी १५ आगस्ट आणि २६ जानेवारीला. त्याशिवाय ते दोन सण पुर्ण होत नाहीत. :)
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला "त्या" जिल्बीचे स्टॉल सातार्यात काय की कोल्हापूरला काय, सगळीकडेच लागत असतील.
पण ह्या दोन दिवशी "ह्या" जिल्बीचे स्टॉल कुठे लागतात कोण सांगेल काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सांगलीकर बोलताना कोणत्याही व्यक्तीला " ते " बनवतील. आदराने नव्हे भाषेच्या लहेज्यामुळे. कॉलेजचे प्राचार्य आले तरी " ते येतय बघ " असे म्हनतील.
असे बोलणे हे तर आमच्या कोल्हापूरचे भुषण आहे.."जेवलंस काय" असे व्याकरण आम्हास शाळेतच शिकवलेले आहे.झलक म्हणून हे बघा..सांगलीवाल्यानी स्टाईल चोरली असेल एखादवेळेस..
बाकी तुमचं ते पुणे, मुंबई, कोल्हापुर, सातारा वगैरे "सोलापुरात" कुठशीकं येतं हो ?
------
(कशाचाही ज्वलंत अभिमान असलेला)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
नशीब डॉन्याने हो चा बे नाही केला अजून ...=))
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
इकडं सगळेच अट्टल राजकारणी!
कॉलेजात एखाद्या झाडाखाली हमखास ८-१० पोरांचं कोंडाळं दिसणार...त्यातले ३-४ तरी कड्डक खादीचे पांढरेशुभ्र शर्ट घातलेले, आणि तावातावानं चर्चा चाललेली, "गप येड्या..दादांनी कसला भारी खोडा टाकला..आता आन्ना बसतंय बोंबलत....."
"आरं घैन्या...आन्नांची गेम वेगळी हाय! तू बघच नुस्ता! आन्नाशी कुणी नादच नाय करायचा" हे असलं काहीतरी नक्की ऐकु येणार बघा.
हल्ली खिशात पैसे खुळखुळायला लागलेत म्हणुन ठीक, नाहीतर दुकानांत ठरलेली वाक्य, "शेठजी, नाव ल्हिऊन घ्या...नावःअमुक तमुक.. ऊसावं प्येमेंट"
मध्येच एखादा अस्सल धनगरी वेषातला वयस्कर धनगर आपल्या सेमी-मॉडर्न वेशातल्या पोरगेल्या लेका/नातवासोबत एखाद्या दुकानात शिरेल.. वस्तु पाहिल..म्हणजे पोरगंच हेरलेली वस्तु दाखवणार, मग बाप/आजा दुकानदाराला विचारणार "किती?.... काय कमी न्हाय का?....लुटा तुमी त्येच्यायला गरीबाला" आणि डोक्याचं मुंडासं सोडुन त्यातल्या वळकटीतुन नोटा काढून टेबलावर फेकणार...
हा किस्सा मी मित्राच्या गाडीच्या शोरुममध्ये पाहिला... त्या पोराला एक दुचाकी घ्यायची होती, आणि त्या बाप/आज्यानं रोख पैसे देऊन गाडी नेली...आम्ही आ वासुन बसलो :)
इथं, गप्पांचा फड जमवणे/बडबड करत बसणे ह्याला 'सभा टाकणे' असा शब्द आहे.
एखाद्या बडबड्याला टाळताना हमखास येणारा शब्द, "नको येड्या, ते लय सभा टाकतं" :)
बारामतीतल्या गप्पा बहुधा ऊस, पाणी, दारी धरणं, कारखाना, राजकारण ह्याशिवाय पुर्णच होत नसाव्यात :)
-(बाराचा..हे आपलं..बारामतीचा) ध.
इजाभौ, भारी चाल्लंय...चालुद्या!
तुम्ही लेख फारच आखडता घेतला...
बारा गावचे पाणी पिणार्याने (पाजणार्याने) फक्त ४ गावचीच माहीती लिहीली? हे गणित काय जमले नाही बुवा..... ह.घ्या.
बाकी तुम्हाला आम्ही सातारकर म्हणायचे कि मुंबईकर?
लेख आवडला. विजुभाऊंचा अलिकडे आवडलेला दुसरा लेख. अभिनंदन.
माझा एक मराठी मित्र गुजरातेत वाढला. शिक्षणानिमित्त नंतर पुण्यात आला आणि मग मराठी मुलीशी लग्न झाले. त्यांच्यातले संवाद प्रचंड मनोरंजक.
तो : (जेवताना) : "अगं ए ती पेणी दे ना !"
ती : "पेणी" ??
तो : म्हणजे ते पॅन.
ती : अरे मग कढई सांग ना !
अहमदाबादेत रहात असता मी ती अनुभवलीय. आमच्या येथे एक मूळ बडोद्याचा मराठी गृहस्थ होता त्याचे मराठी वेगळेच होते. एक उदाहरण :' कार्यक्रम पतून गेला' (समाप्त झाला)'! आणि तो मराठी 'निसरड्या' उच्चाराचे बोलत असे, तेव्हा 'बाबारे, इतके हाल नको करून मराठीचे. तू हवं तर गुजरातीतून बोल आमच्याशी, आम्ही समजवून घेऊ' असे सांगायची वेळ येई अनेकदा!
प्रतिक्रिया
सही. मिरज
मुम्बैकर
आवडला
सध्या
नागपुरकरा
खि खि खि
माझं मुळ
( त्यामुळे
छान ....
झकास
पंधरा
"त्या" आणि "ह्या"
गाव?
सांगलीकर
जिलबी चे
मस्तच हो
लेख ठीकठाक
उभारणे हा
गुणविशेष
गुणविशेष
गुणविशेष
सुमीत
बाकी तुमचं
हो चा बे
कापी
बारामती
विजुभाऊ,
काही विशेष
लेख
गुजरातेतील मराठी
त्या" आणि
विजुभौ