मला वाटत न्युनगंड वगैरे नसावा. आपल्याकडे वैविध्य खूप आहे.
ट्र्क, वडापच्या जीपा, रिक्षा, ट्रॅक्टर, वगैरेवर जी नाव दिसतात ती सर्व्दूर पोहोचली असे मानले जाते. तो पर्यंत शहरी लोकांनी नवी नावे शोधून काढली असतात.
बेलबॉटम ची फ्याशन परत जशी येउ शकते, तशीच लाट जुन्या नावांनाही येऊ शकते. सुमन, कमल, विमल, सुनीता, छाया, माया, जया, गया, ह्यातील जी आवडतील ती टिकतील जी नाही ती नाही.
काळानुरुप आवडी निवडी बदलतात्..त्या प्रमाणे नावे सुद्धा बदलतात.
मला तर यात कुठे न्युनगंड आहे असे वाटत नाही .
नाविन्याची आवड हे एकमेव कारण असावे .
झेलम, कंगना, पायल, बिंदीया .. ही नावे जुनी समजायची की नविन ?
माझ्या एका मित्राने,नाव अनंत,बायको अपेक्षा,मुलगी पूर्ती अशी समर्पक ठेवली आहेत.
दुसरे म्हणजे पूर्वी चांदोबामध्ये इतकी छान छान नावे असायची सूर्यकेतू,चंद्रभान,विरोचन असली!अशी नावे मुलांना ठेवण्याचा फार मोह होत होता.
प्रतिक्रिया
मला वाटत
काळानुरुप
नावे
Pagination