Skip to main content

शिवसेना अधिचि तकत दाखवु शकेल का ? आधिक पर्ययासहित

लेखक थोर्लेबजिराव यांनी शुक्रवार, 23/10/2009 18:48 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2815
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by निमीत्त मात्र

मी कुठे रहाव अथवा राहू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे..........तुंम्हाला स्पष्टिकरण देण्याची मला गरज नाहि......आणि आंम्ही विदेशात राहुन देखिल अस्सल देशी आहोत .......... स्वगत-काय पण भोचक माणसे असतात नसत्या उठाठेवी करायच्या द्यायला उत्तर नसले की. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

मी कुठे रहाव अथवा राहू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे..........तुंम्हाला स्पष्टिकरण देण्याची मला गरज नाहि...
. मान्य आहे...तुम्ही कुठे राहावे ...कुणाचा पट्टा बांधून कुणासमोर शेपूट हलवावी... हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे....मी फक्त विसंगती दाखवली इतकेच...

In reply to by निमीत्त मात्र

आमचे वास्तव्य कुठे आहे हे आंम्ही आमच्या माहितीत उघड केले आहे म्हणून तुंम्हास समजले............भारतात सगळे झोपी गेल्यावर मिपावर निशाचरासारखा वावर करणार्‍या व्यक्ती जगाच्या कुठल्या कोपर्‍यात वास्तव्यास आहेत हे सांगण्याची गरज नक्कीच नाही........अर्थात तुमचे वास्तव्य कुठे असावे हा तुमचा खासगी मामला आहे त्याबद्दल मी आक्षेप घेण्याचे मुळीच कारण नाही........ आणि या वादाला सुरुवात आपणच केलीत .......मी तुमच्या कुठल्याही लिखाणाला अथवा प्रतिसादाला प्रतिक्रिया दिली नव्हती आणि एरवी देतही नाही असे असताना वैयक्तिक होण्याचे आपणांस काहीच कारण नव्हते.....दुसर्‍यावर उगीच वैयक्तिक चिखफेक करताना ती आपल्यावर देखिल होऊ शकते याचे भान ठवले तरी पुष्कळ झाले......मी फक्त अक्षय पुर्णपात्रेंच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांच्या स्पष्टिकरणानंतर त्यांची माफी मागण्याचे सौजन्य माझ्या स्वभावानुसार मी दाखवले होते..... आणि हो !आंम्ही कुणाचा पट्टा गळ्यात घालावा अथवा कुणासमोर शेपुट हलवावी हा अर्थातच सर्वस्वी माझा वैयक्तिक प्रश्नच आहे ......आणि त्याबाबतीत मला कुणाच्या सल्ल्याची अथवा मार्गदर्शनाची गरज नक्कीच नाही... हा विषय मी माझ्या पुरता संपवते आहे....कारण ना मी तुंम्हास ओळखत ना तुंम्ही मला .......आपण कोण आहात ?आपले वय किती आहे? याची मला कल्पना नाही, पण तरिही जर आपण माझ्या पेक्षा वयाने मोठे असाल तरच क्षमस्व. विसंगती बर्‍याच बाबतीत असु शकते. जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

शिवसेना परत उभी राहीली काय किंवा न राहीली काय, मला काहीही फरक पडत नाही, तरीही मी "हो" ला मत दिलेय..! कशाला उगाच कुणाचे वाईट चिंता...? :-) -- सुहास

अ) हो ब) नाहीं क) राज जवल सत्ता दिलि तर हे वरील तीन पर्याय अपुरे नाहींत कां? अनामिकाताई, वेताळ-जी व निमित्त मात्र-जी यांच्यातील वाग्युद्ध त्याचाच परिपाक आहे असे मला वाटते. आणि हे वाग्युद्ध जरासे चुकीच्या दिशेला वहात चालले आहे व भाषाही जराशी अयोग्य वापरली जात आहे. दोन दिवसापूर्वी दिलेले ५ पर्याय पहिल्यापासून दिले गेले असते तर जो निर्णय आला असता तो उपयुक्त झाला असता. अजूनही नीट पर्यायांसह हा कौल पुन्हा घ्यावा असे मला वाटते. बाळासाहेबांच्या चुका झालेल्या आहेतच, पण त्यांनी केलेले काम त्यांच्या चुकांच्या शंभरपटीहून जास्त मोलाचे आहे. म्हणून शिवसेनेच्या पराभवाचे असे अचूक पृथक्करण गरजेचे आहे. कारण त्यातून निर्णयाप्रत नेणारा मार्ग निघू शकतो. माझ्या पर्यायांत एकाद-दुसरा जास्तीचा पर्याय घालायचा असेल तर जरूर घालावा पण हा कौल पुन्हा घ्यावा. १. हो, पण राजच्या नेतृत्वाखाली २. हो, पण राजला परत शिवसेनेत आणले तर ३. हो, राज शिवसेनेत येवो अथवा न येवो ४. नाही. ती खलास झाली आहे ५. बरेचसे शिवसैनिक आता राजला मिळतील व शिवसेना "मनसे" या नव्या नावाने उभी राहील. सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

In reply to by सुधीर काळे

नवीन पर्याय मांडल्यावर मी मत दिले, पण बाकीचे फारसे उत्साहात दिसत नाहींत. पण बरेच लोक राजाभाऊंनी नेतृत्व सांभाळावे याच विचाराचे दिसतात. सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

मराठी चं आरवणं महत्वाचं मग ते सेनेच्या कोंबड्याने असो कि मनसेच्या... सध्या मात्र मनसे कडुन अपेक्शा आहेत. शाकाहाराच्या नावाखालि जी मंड्ळी मराठीं ना घरे नाकारतात अश्या लोकंच्या मुनींसमोर लोटांगण घालणार्यंकडुन कसली अपेक्शा करणार.....