विचारात टाकणार्या प्रवासाची कविता आवडली.
प्रश्न सुरवातीला नसतोच,
ते येतात तेव्हा
उत्तरांचा शोध सुरू होतो.....
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!!!!!!
हे जास्त आवडलं!!!!
(मातीचीच.....)मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
अवांतरः बिकांनी कालच्या प्रवासात 'वोमिटिंग बॅग' वर माती -२ ची टिपणं तर काढली नसतील????? :D
श्रावण,
वाटेला सोडून तू भरकटलास तरी तुझ्या चालण्यामुळे ती आपोआप येईलच तुझ्या अविरत चालणार्या पायांच्या मागेमागे.. पायवाटच आहे ना ती! शेवटी 'मातीचे पाय' हा तुझा जरी दागिना असला तरी तिचा तर श्वास आहे ना!!! नव्या पायवाटेला जन्म देणारा प्रवास आवडला.
संदीप खरेच्या 'एवढंच ना.. एकटे जगू' कवितेतल्या 'मातीच बरी, मातीच खरी.. मातीत माती मिसळत जगू' हे शब्द आठवले.
पायवाट-महामार्ग रूपक आवडले.
*मात्र कवितेतच रूपकांबद्दल ऊहापोह केला तर माझ्या मते रसापकर्ष होतो. उदाहरणार्थ : "वाट राखणे म्हणजेच जगणे, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी" हे रूपकाचे कवीनेच केलेले स्पष्टीकरण वाटते. रूपकाचा अर्थ मनात उमलण्याची जी गंमत असते, तिला रसिक मुकतो.
.
अर्थात अर्थ लावून घ्यायलाही बराच मालमसाला ठेवला आहे - उदाहरणार्थ : "पायवाट मातीची आहे तशीच आहे, पण महामार्ग बदलतो" (म्हणजे नेमके कसा बदलतो, त्याचे प्रत्यक्ष= आधी कुठल्या वेगळ्या प्रकारचा असतो, मग खडी-डांबराचा होतो; आणि अप्रत्यक्ष = असा बदलल्यामुळे महामार्गाचे 'बरे' होते, ते कसे. शिवाय बरे होते यात व्यंजना आहे. खरे तर बरे होत नाही, तर माती तशी असणेच अभिमानास्पद आहे, ते प्रत्यक्ष डांबरी महामार्गाला आणि मातीच्या पायवाटेला लागू करून घ्यायचे.)*
वा वा श्रामो सध्या तुमच्या
दीपावलीचा काव्यबहर......
+२
व्वा.सुंदर
छान कविता...
प्रवास आवडला
हम्म....
सुंदर...!
छान
आवडली.