उत्तम लेख. आवडला.
खंडन करण्यासारखे, भाबडे तसेच प्रक्षिप्त कथानकांवर आधारीत बरेच मुद्दे आहेत पण त्याचे हे स्थळ नाही आणि त्याची आवश्यकता पण नाही. तेव्हा त्याबद्दल नंतर कधीतरी.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
विषय गहन आहे. रामकृष्णांचा तौलनिक अभ्यास इतका सोपा नसावा.
लेख बरा आहे.पण काही उल्लेख टाळता आले असते तर बरे झाले असते.
उदा. राहूल सोलापुरकरांचे 'राधा-धारा' स्पष्टीकरण नकोच होते.
असेच म्हणतो.. लेख आवडला
धर्म म्हणजे एका विशिष्ट समुदायाने आचरलेली जीवन-पध्दती, विचार.
लोकशाहीमध्ये धार्मिक संकल्पना व संदर्भ ग्रंथ ह्यांच्यावर प्रत्येकाला विचार करण्याची मुभा असुन आपले विचार चार-चौघात सभ्यरीतीने प्रदर्शित करता येतात ह्याला विचार-वाचा स्वातंत्र्य म्हणत असावेत. त्या दॄष्टीने वरील लेखाकडे पहाता..
हरे राम हरे राम | राम राम हरे हरे ||
हरे कॄष्ण हरे कॄष्ण | कॄष्ण कॄष्ण हरे हरे ||
आवडला 'राधा' आणि 'सोळा हजार एकशे आठ'बद्दलची माहिती चांगली. रामायणातील घटनांचं विश्लेषणदेखिल पटलं.
अवांतर :- प्रत्यक्षात राम आणि सीता यांच्यापेक्षा धोबी आणि मंथरा यांचेच अवतार जास्त दिसतात का कलियुगात?;)
क्रान्ति
अग्निसखा
सुरेख आणि माहितीपुर्ण लेख ! श्रीकृष्णाबद्दलची माहिती रोचक आणि उद्बोधक !
श्रीरामांबद्दल जशी त्यांच्या अवतारसमाप्तीची माहिती दिलीत तशीच श्रीकृष्णांबद्दलही दिलीत तर अजुन बहार येइल.
धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
श्रीकृष्ण वनात एक पाय दुसर्या पायावर ठेवून बसून बासरी वाजवतानाच्या अवस्थेत - त्याच्या या गोरट्या-गुलाबी तळव्यास हरीण समजून एका व्याधाने बाणा चालवला. ते या अवतरासमाप्तीचे कारण/निमित्त ठरले, अशी अंधुकशी (लोक/दंत)कथा आठवते.
(स्मरणशील)बेसनलाडू
प्रशांत,
लेख चांगला झाला आहे. दोन अवतारांमधील तुलनात्मक संबंध व घटनांमधील परस्परसंबंध/साधर्म्य यांची परिच्छेदपूर्वक मांडणी आवडली. वरील एका प्रतिसादात म्हटल्यानुसार कृष्णाच्या अवतारसमाप्तीविषयीही आख्यायिका असती तर लेखाचा परिपूर्ण शेवट झाला असता.
दोन्ही अवतारांच्या, भूलोकी एक 'मनुष्य' म्हणून वावरण्याशी सुसंगत असलेल्या अपरिपूर्णतेविषयी सुद्धा भाष्य करता आले असते तर बरे झाले असते. कर्तव्यनिष्ठेला अग्रस्थानी ठेवून पतीधर्माला मागे टाकण्याचे रामाचे कृत्य किंवा नंदनवनातून प्राजक्ताची फांदी चोरून आणायचे कृष्णकृत्य ही या अपरिपूर्णतेचीच उदाहरणे म्हणता येतील (त्यामुळेच चोरीसारख्या कुकर्मांची माखनचोरी, प्राजक्ताच्या फांदीची चोरी, स्पमंतक मण्याची चोरी इ. शी सांगड घालून त्यांना 'कृष्णकृत्य' म्हटले असावे का, असाही मजेशीर विचार कधीकधी मनात डोकावतो)
राम आणि कृष्ण - विशेषतः कृष्ण - दोघेही सर्वोत्तम 'डिप्लोम्याट्स' असावेत, असे वाटते (कृष्णाची एकंदर व्यक्तिरेखा तिच्यातील गूढतेमुळे, 'ग्रे' पणामुळेच अधिक आकर्षक झाली आहे, असे वाटते) धर्म, सत्य यांची स्थापना, संवर्धन व संरक्षण या अंतिम ध्येयाप्रत सर्व जगाला नेण्याच्या कार्यात ही डिप्लोमसी जेथे जशी वापरावी लागली, तेथे त्यांनी तशी वापरली. आणि असे करताना मनुष्यस्वभावातील अपरिपूर्णतेचा आधार घेतला, असे मला वाटते.
(अपरिपूर्ण)बेसनलाडू
रामाने सीतेवर अन्याय केला होता.
रामाने शंबूकावर अन्याय केला होता.
रामाने वालीला त्याच्याशी शतृत्व नसतानाही ठार केले.
रामाने भावाच्या प्रेमात पडलेल्या शूर्पणखेचे नाक कापले.
रामाने लक्ष्मणावर अन्याय केला. ( काय ते भुशुंडी रामायणात लिहिलेले आहे)
याबद्दल कोणीच कधी बोलत नाही.
बाकी खंडन करण्यासारखे, भाबडे तसेच प्रक्षिप्त कथानकांवर आधारीत बरेच मुद्दे आहेत या बाबत अवलीयासोबत सहमत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मा.श्री. विजुभाउ यांनी त्यांच्या प्रतिसादात माझा उल्लेख केला म्हणुन हे निवेदन देत आहे. श्री विजुभाउ हे जरी माझ्या मतांशी सहमत असले तरी मी मात्र त्यांच्या प्रतिसादाशी अजिबात सहमत नाही, हा खुलासा मिपाकरांना व्हावा म्हणुन हा प्रपंच.
बाकी माझे ज्ञान कमी असल्याने कदाचित विजुभाउंच्या प्रमाणे ठाम मत मला मांडता येत नाही हे माझे दुर्देव :)
असो.
धन्यवाद.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
प्रतिक्रिया
उत्तम लेख.
राखाडी अक्षरांशी सहमत
+१
लेख
छान लेख
सुरेख आणि
व्याधाच्या बाणाने?
लेख आवडला
लेख चांगला
खरच वाचनीय
लेख चांगला | मनुष्यस्वभावाशी सुसंगत अपरिपूर्णता
अन्यायी राम
खुलासा निवेदन