ह्म्म्...माझ्या मित्राचे वडील अचानक अॅटॅक येऊन गेले तेव्हाही त्यांच्या घरचे असे कोणी नव्हते, ना जवळचे नातेवाईक लवकर येऊ शकत होते...आम्ही मित्रांनीच शेवटी थोडी फार मदत केली...बिल्डींगमधुन त्यांचे प्रेत खाली आणताना त्यांचे (मृतदेहाचे) दोन्ही पाय माझ्याच खांद्यावर होते...तेव्हाही असेच काहीसे विचार माझ्याही मनात आले होते.
काही दिवसांपुर्वीच अजुन एका मित्राचे वडील गेले...जेव्हा मित्राला मी फोन लावला...(तेव्हा मला माहित नव्हते की त्यांच्या वडिलांना अॅडमिट केले आहे...)सहज बरेच दिवस फोन केला नव्हता म्हणुन मी त्याला कॉल केला होता...वडील कोमात गेले असं म्हणाला...जवळ स्मशानभूमी कुठे आहे हा त्याचा प्रश्न होता !!! त्याच्याही मदतीला मित्रपरिवारच कामी आला.
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
काय होणार ?
http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms
वा विजु भाऊ ... जे काही लिहीलंय ते एकदम सुरेख पद्धतीनं लिहीलंय ..
अगदी भावनिक झालो ! खरंच शेजारी मयत झालेली असताना सिरीयल पहाणारे महाभागंच म्हंटले पाहिजेत .. नातेवाईकांच्या वागण्याला काही हिष्टी असावी.
अजुन तरी मी हट्टाकट्टा असल्यानं मरणाचा विचार करत नाही.
-(अंमळ हळवा) टारझन
लिखाण केलंय भाऊ. पुर्वी एकदोनदा बघितलं की अंत्ययात्रेला बरेच लोक आले तरी खांदा कुणी देत नाही. तेव्हापासुन ठरवलं की शक्यतो अश्या ठिकाणी बरोबर कुण्या समविचारी मित्राला घेऊन जायचं म्हणजे वेळेला पुढे येता येतं. पण सोनालीचं पुढे काय झालं. तिच्यावर या घटनेचा खूपच परिणाम झाला असेल ना? ते तिच्या वागण्यात जाणवलं का?
--
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
अगदी मनातलं बोललात विजुभाऊ..
म्हणूनच कोणीतरी म्हटलय.......मित्र असो वा शत्रू ...सुखात आणी दुख्खात सामील व्हावं... मला तर सोनालीपेक्षा तिच्या नातेवाईकांची जास्त कीव वाटते...
-(वरून टणक पण आतून हळवा) प्रभो
वा विजूभौ, एकदम सुन्न करून टाकल तुम्ही.
अवांतर: काल मागणी केली अन आज चांगला लेख हजर. छान. (अवांतर लिहीणार नव्हतो पण आजकाल ईतर लेख / कौलं असे यायला लागले की लिहावेच लागले.)
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
ह्यावर लोकांशी असलेले संबंध ठरतात. तुम्ही लोकांसाठी उपयोगी पडलात तर लोक तुम्हाला निदान शेवटच्या काळात तरी विचारतील.
सोनालीच्या फॅमिलीची हिस्टरी माहीत नाही त्यामुळे आधी नेमके काय घडले, वडिलांचे इतरांशी संबंध कसे होते ते समजणे शक्य नाही, परंतु मेल्यानंतरही ढुंकून बघू नये इतका कोरडेपणा लोकात यावा हे अवघडच.
(लेखाचं शीर्षक जरासं विचित्र वाटतंय - चटकन काही अर्थबोध होत नाहीये.)
चतुरंग
लहानपणापासून माझी आई तिच्या वडलांच्या तोंडचं एक वाक्य सांगते... "बारश्याला नाही गेलं तरी चालेल, पण बाराव्याला गेलंच पाहिजे" ... अर्थ हाच की सुखापेक्षा दु:खात इतरांना साथ आणि मदत जास्त करावी. आत्ता पर्यंत तरी त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतोय. अशा प्रसंगी पुढे होऊन सगळे सांभाळून घेऊन नीट पार पाडणे हे मी कर्तव्य आणि एक पुण्यकर्म म्हणून करतो.
बिपिन कार्यकर्ते
विजुभाऊ!
तुमच्या या अनुभव कथनाने मला लिहायला प्रवृत्त केले........३१ऑगस्ट २००९ रात्री परतीच्या प्रवासाला निघायचे या कारणाने सामानाची बांधाबांध व इतर लगबग सुरू असतानाच मोबाईलवर फोन आला,नंबर आत्ये दिराचा असल्याकारणाने काय रे आत्ता आठवण झाली का?हा प्रश्न विचारण्याच्या बेतात होते....पण पलिकडचा कापरा आवाज ऐकुन कोण बोलतय हा प्रश्न आपसुकच विचारला गेला...पलिकडे नुकतच लग्न होऊन कुटुंबात प्रवेश केलेली जाऊ होती.....इतकच म्हणाली "वहिनी आई गेल्या" ...मी एकदम सुन्न झाले ....तरीही मन घट्ट करुन तिला घरी कुणि आहे का ? असे विचारले असता म्हणाली ."घरी कुणीच नाही.. हे थोड्यावेळापुर्वीच ऑफिसला गेलेत्.........मला काही कळत नाहि .मी ताईंना फोन केलाय त्या निघाल्यात यायला.....माझ्या कडे फक्त इतर नातेवाईकांपैकी तुमचाच नंबर होता म्हणुन तुंम्हालाच आधी कळवतेय्....तुंम्ही जरा सगळ्यांना कळवाल का?"मी हो म्हणुन तिला १५ मिनिटात पोहोचते असे सांगुन फोन ठेवला. ....सगळ्यांना कळवताना चुलत सासर्यांना प्रथम फोन केला जे एकाच शहरात राहतात... कधी गेली ?कशी गेली ? कश्याने गेली?इतकेविचारुन त्यांनी फोन संभाषण अर्धवट असताना चक्क ठेऊन दिला......मला वाट्ले धक्का बसला असेल्..मी पण इतरांना कळवुन .तिकडे जायला निघाले.....जवळपास ३ वाजता पुण्याहुन इतर नातेवाईक आल्यावर सासुबाईंना न्यायची वेळ झाली तरी एकाच शहरात राहणार्या सख्ख्या बंधुराजांचा अथवा त्यांच्या चिरंजीवांचा पत्ता नव्हता..अर्थात सगळे कार्य आटोपले तरीही त्यांनी येण्याची तसदी घेतली नाही..आणि नंतरच्या कार्याला देखिल नाही.
सख्ख्या भावंडांमधे इतका कोरडेपणा असु शकतो मुळात हि कल्पना मनाला पटत नाही.......भावंडांमधे वाद असु शकतात पण वैर देखिल असु शकत हे मात्र आकलनशक्तीच्या पलिकडच आहे.?...
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
अश्या वेळी समाज किती निश्ठूर अशू शकतो त्याचा अनुभव येतो...
ह्यावरून मराठीत एक म्हण आहे - कितीही वेगळे राहीले तरी चार खांदेकरी येतील एवढा समजाशी संबध ठेवावा लागतो.
-
अफाट जगातील एक अडाणि.
मृत व्यक्तीचा दाखला घेऊन, जन्म-मृत्यु कक्षात जाऊन स्मशान पास घ्यावा.
ससुन, विश्रामबाग वाडा, वैकुंठ अश्या ठिकाणी हि कार्यालये आहेत.
अश्या वेळी समाजातील कोण्या जाणत्या व्यक्तीकडुन आवश्यक वस्तुंची यादी घ्यावी. न मिळाल्यास, असे सामान मिळणार्या दुकानात जाऊन मृत व्यक्तीचे लिंग, जात, धर्म, वय एवढे सांगितले कि सर्व मिळते. अंदाजे खर्च १०००/- पर्यंत येतो.
पुण्यात नेहरु चौक आणि मंडई या परीसरात अशी २ दुकाने आहेत.
माणुस मेला कि वैर संपवावे... हे आपली संस्कृती रामा-कृष्णापासुन शिवरायापर्यंत सोदाहरण सांगते, आपण मात्र गीतेचे पाठ घोकत, मानवतेपासुन दुर जातो.
शेजारी कोणी मृत पावले असता, टी. व्ही बघत बसणार्यांना मनापासुन सलाम!!
माझी आजी, डायलसीस साठी घरातुन बाहेर पडली ती कायमचीच, बेडवर डायलिसीस चालु होण्याआधीच ती गेली. ती वेळ सकाळी ८:१५. शेजारी मामा एकटाच होता, पुर्ण भंजाळला होता... त्याने आम्हाला कळवले ८:२५ ला... आम्ही पोहोचलो ८:४५ ला.. सर्वांना फोन केले माणसे बोलवली, पण १२:४५ पर्यंत मामा, मी आणि मामाचा १ मित्र एवढेच लोक हॉस्पीटल मध्ये होतो
हॉस्पीटल : दीनानाथ मंगेशकर
मामाचे सख्खे नातेवाईक दीनानाथ पासुन १० मिनिटावर (चालत) रहातात. तरी १२:४५ पर्यंत कोणी आले नव्ह्ते, १२:४५ ला आले, अंतयात्रा ५:०० वाजते आहे हे कळल्यावर ४:५० ला घरी आले. नंतर थेट कार्याला जेवायच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे आले.
हा अनुभव मला फार धक्कादायक होता, कारण आमच्या समाजातील झाडून सारी माणसे तीच्यासाठी आले होती, पण सख्खे नव्हते. ह्या सख्ख्या माणसांनी एका वेळी मोठी-मोठी म्हणत तीला राबवुन घेतले होते आणि तीने सुध्दा आनंदाने त्यांचे केले होते. आजी माझी सख्खी नाही, पण संबंध सख्ख्याहुन चांगले होते.
या सगळ्या प्रसंगात शेजारपाजारच्या घरातून एकही बाईमाणूस ;सोनाली आणि तिच्या आईच्या सांत्वनासाठी किंवा त्याना धीर देण्यासाठी हजर नव्हते. त्या ऐवजी बहुतेक घरातून टी व्ही सिरीयल चे आवाज येत होते.
अंत्ययात्रेसाठी एकदोघे जण आले गाडीपर्यन्त सोबत होते त्यानन्तर गायब झाले.
एकता कपूर च्या सिरीयल्स चुकल्या तर काय? असा प्रश्न बहुतेक बायकाना पडला असावा. पन एकंदर अनुभव सुन्न करणारा
ह्म्म... माझे वडील गेले तेव्हा आईला वाटत होते कि ति रात्र तरी तिच्या चुलत बहिणीनी आमच्याकडे राहावे. पण त्याना त्यान्चे संसार मह्त्वाचे. त्या कश्या बश्या ति रात्र राहिल्या न दुसर्या दिवशी पहाटेच निघुन गेल्या. लोकाना (नातेवाइकाना ?) वेळ नाही हेच खरे.
चुचु
प्रतिक्रिया
:(
वा विजु
चटका लावणारे
अगदी मनातलं बोललात विजुभाऊ
सुसाटी
वा विजूभौ,
सुन्न
+१
+२
आपण आपल्या पलीकडे किती पाहू शकतो
+१
सुन्न
हृदयद्रावक!!!
+१ असेच
+२
+३
+२
भावंडांमधे वाद असु शकतात पण वैर देखिल असु शकत ?
हृद्यस्पर्शी प्रसंग...
:-( वाईट वाटले.
मृत
मृत मनाची माणसे
या सगळ्या
ह्म्म...
शेजारधर्म/नातेसंबंध-