Skip to main content

महाभयंकर सत्य

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 01/07/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या जगाचा प्राण आहे असे वाटणारे ईंधन आता लवकरच संपणार. लवकरच म्हणजे किती ? अहो आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं जग बघू शकतील. हे काही तथाकथीत भविष्य नव्हे तर ते एक सप्रमाण सिद्ध केले जाणारे भाकीत आहे. ते लोकप्रभात मांडलय मिलिंद जोशींनी. सगळ्यांना माहीत व्हावे हा या दोन ओळींच्या माहितीचा हेतू.

वाचने 4400
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

बर मग? --अवलिया

In reply to by अवलिया

नेहमीप्रमाणे नाउमेद करणारा प्रतिसाद आपला

In reply to by कुंदन

त्यातल तथ्य मात्र जरा वेगळ आहे अस मला वाटत.. पहिल्यापासुन पराधीन,राहिलेला "मानवाचा पुत्र" ह्यावर ही पर्याय शोधेल असे वाटते... कौल कुठे द्यायचा?>>> माधवरा॑वाच्या माडीसाठी... सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

माफ करा. योग्य ती दुरस्ती वर केली आहे. "येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!" मिपा वरील "लेखन करा" या शिफारसीमध्ये वर लिहील्याप्रमाणे मला चर्चा करावी हा हेतू होता. तसेच गेल्या काही दिवसांत १ /२ ओळीच्या धाग्यावर टिका होत आहे हे वाचुन "या दोन ओळींच्या उल्लेख केला गेला. (अवांतर: पुर्वी काही त्यांच्या लेखकांना त्यांच्या काही लेखात जातीवाचक संज्ञा वापरल्याने त्रास होत असल्याने त्यांनी त्या जागी *** घातले. आताशा तर पुस्तकांत जातीवाचक काही येत नाही. (मला जात / जमात यावर टिका करायची नाही. हे एक उदाहरण समजा.) तसेच कदाचीत मिपावर १/२ ओळींच्या कौलाबाबतीत होईल असे वाटते. पण त्यामुळे आपण चांगल्या माहितीला मुकू शकू.) मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

काहीही काळजी करु नका. सगळे मोप आहे. फुक्कटचा ड्रामा आहे. आतापर्यंत पर्यायी व्यवस्था तयार पण असेल. पण फक्त तीचा एकदम अवलंब केला तर होणारे परिणाम सुद्धा त्रासदायक आहेत. तुम्ही राजीनामा द्यायच्या आधीच तुम्हाला बघायला मिळतील.

In reply to by विनायक प्रभू

पर्यायी व्यवस्था तयार असेल पण बाजारात आणण्याचा मुहुर्त अजून निघाला नाही (ज्यायोगे त्यातून जास्तीत जास्त पैसा मिळवता येइल).

In reply to by विनायक प्रभू

राजीनामा द्यायच्या आधीच काय ते होवुन जावू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

आपण भारतीय लोकांनी काळजी वगैरे करण्याची काहिहि गरज नाही. आपण अजुनही. तेल, काँप्युटर,वाहने, टी.वी. याशिवाय जगतो आहोतच की.शिवाय आपल्या साधुसंतांनी सांगितले आहेच की. "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान " त्यामुळे दगडफोडे भाउ तुम्ही उगाच टेन्शन वगैरे काही घेउ नका.

तेल संपले तरी त्या आधीच नवा ऊर्जा स्रोत सापडलेला असेल असे वाटते. नव्या ऊर्जा स्रोताबद्दल मोठ्या प्रमाणात संशोधन चालूच आहे. एखादा अतीस्वस्त उपाय एव्हाना सापडला सुद्धा असेल पण तेलकंपन्या तो शोध अजून काही काळ दाबून ठेवत असतील अशीही शक्यता मला वाटते. मानवाची हाव त्याच्या बुद्धीला नेहमीच तरतरित ठेवते आहे पण विवेकाला झाकोळते आहे. कुसुमाग्रजांची एक कविता आठवली. अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी ! बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती मातीवर चढणे एक नवा थर अंती ! --लिखाळ.