खास मिपाकर वाचकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कार्याबाबत माहीती.अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी.लोकसंख्या १ कोटी २२६० एवढी प्रचंड .लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचे शहर.शहरात तसेच उपनगरात अनेक लोक झोपडपट्या,चाळी यांतून दाटीवाटीने राहतात. दर १ किमी.परीसरात जवजवळ २८ हजार लोक राहतात.दक्षीण मुंबईसारख्या विभागात कार्यालयांची संख्या जास्त असल्याने दिवसाचे सरासरी पॉप्युलेशन ४० लाख व रात्रीचे २ लाख आहे.मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.दिवसाला सरासरी १ हजार लोक येथे येतात.शहरात १६ हजार धोकादायक इमारती आहेत.ड्रेनेज लाईन ब्रिटीन कालीन असून नव्या लाईनबाबत काम सुरू आहे. मुंबईत सरासरी २२६० एवढा मिमि पाऊस पडतो.पावसाळ्यात हवामान खात्याने ४.५फुट एवढ्या उंचीच्या लाटा उसळण्याचा केलेला अंदाज तसेच २६ जुलै २००५ ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना पालीकेने केल्या आहेत,
यंदा मुसळधार पाऊस पडल्यास शहरातील व्यवस्था कोलमडून जाऊ नये, कमी प्रमाणात जिवीत वा वित्तहानी व्हावी यासाठी यासाठी मुंबईमहानगर पालीकेने आपला आपात्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज केला आहे. शहरात काही आपत्कालीन घटना घडल्यासा १०८ हा दूरध्वनी क्रमांक असून या क्रमांकावर एकाच वेळी दहा जण हा क्रमांक फिरवू शकतात.येणार्या सर्व तक्रार त्या त्या वार्ड ऑफिसरला सांगितल्या जातात व ताबडतोब तक्रार निवारण करण्यात येईल असा दावा देखील पालीकेने केला आहे.तसेच अनधिकृत बांधकामासाठी १९१६ हा क्रमांक आहे..महापालीकेने स्वतंत्र अश्या ११ हॉटलाईन्स तयार केल्या असून त्या नवी मुंबई,आर्मी,नेव्ही,पोलीसा आयुक्तालय,ट्राफीक कंट्रोल,बेस्ट कंट्रोल,मंत्रालय,मध्य-पश्चिम रेल्वे,कुलाबा-सांताक्रुझ वेधशाळा इत्यादींना जोडलेल्या आहेत. दुर्घटना घडल्यास गरजेनुसार ताबडतोब हॉटलाईनद्वारे संपर्क केला जाईल. आपात्कालीन विभागात ३ दूरचित्रवाणि संच असून इलेट्रोनिक्स मिडीया जे प्रसारण करते ते खरे की खोटे याचा आढावा घेतला जातो. मुंबईची जमीनीची पातळी समुद्रसाठी पासून जवळपास सारखी असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ४.२ फुट उंचीच्या लाटा उसळल्यास फ्लुडगेट बंद करण्यात येईल जेणेकरून समुद्राचे पाणी आत येणार नाही. पालीकेने याबाबत संपुर्ण खबरदारी घेतलेली आहे. ताबडतोब संपर्क साधण्यासाठी वीएचएफ(वेरी हाय फ्रीक्वेन्सी)ही प्रणाली ही वापरण्यात येईल.मुंबईत पालीकेने ३५ ठीकाणि रेन गेज बसवले असून त्यातील २८ ठीकाणची आकडेवारी(पावसाचे प्रमाण) संगणक जोडणिद्वारे या विभागात पाहावयास मिळते.टाटा कन्सलटंसी सर्व्हीस ने या कामी महापालीकेला मदत केली आहे.महापालीकेची ईओस(ईमर्जंन्सी ऑपरेटींग सिस्टम )ही सेवा २४ तास कार्यरत आहे. इस्पितळांमध्ये पालीकेने १२०० खाटा दुर्घटना घडल्यास राखीव ठेवल्या आहेत. तसेच प्रत्येक वॉर्डामध्ये टायर-ट्यब यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच बरोबर मुंबई महानगरपालीका आपत्कालीन घटना घडल्यास नागरीकांनी कसे तोंड धावे यासाठी कार्यशाळाही घेत आहे.
वाचने
3059
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपयुक्त लेख
परमेश्वरा
बघुया...
हम्म............
खरे आहे..
In reply to हम्म............ by वेताळ
अत्यंत
यंदाच्या
तात्यानु
In reply to यंदाच्या by विसोबा खेचर
आभार