२३ जुन १७६१. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर अवघ्या ५ महिने आणि नऊ दिवसात पेशवे बाळाजी बाजीराव भट हे पर्वतीवर निवर्तले.
१७४० ते १७६१ या त्यांच्या काळात मराठा साम्राज्य त्याच्या सर्वोच्च यशाच्या शिखरावर पोहोचले. आणि १४ जानेवारी १७६१ ला त्यावर मर्माघात झाला.
आधीच आजारी असलेले नानासाहेब पराभवाच्या, बंधू आणि पुत्रशोकाने खच्ची झाले त्यातच त्यांचे निधन झाले.
काहींनी त्यांना सर्वात चाणाक्ष पेशवा म्हणून गौरवले, तर अनेकांनी त्यांच्या वर कोकणस्थांची नेहमी बाजू घेणे, तुळाजीच्या अधिकारातील आरमाराचा इंग्रजांच्या मदतीने नाश करणे, पानिपतावर अडकलेल्या सैन्याच्या मदतीला वेळेवर न जाणे , त्यांचे त्याकाळातलं विवाह प्रकरण, या आणि अशा अनेक आरोपांनी त्यांना टिकास्नान घातले.
हा पेशवा किती महान होता किंवा किती वाईट होता हे ठरवण्याची बौद्धिक पात्रता माझी नाही.
पण सातारा आणि कोल्हापूर या छत्रपतींच्या दोन गाद्या एक करण्याच्या या पेशव्याच्या प्रयत्नांना यश यायला हवे होते अशी खंत वाटते.
स्मरण दिन : नानासाहेब पेशवे पहिले
वाचने
46
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाना साहेब
मनोहर माळगावकर यांचे फार पूर्वी एक पुस्तक वाचल्याचे आठवते. आता ते कुथाळ्याal नानासाहेब पेशवे वर होते नेमके आठवत नाही. पण काश्मीिर मधून त्या दोन मूुली आणल्या का असे प्रेशवे विचारतात असे बरे लंपट होते असे वर्णन आहे. असे आठवते