चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय.
काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
सुरुवातीलाच ट्रम्पने वेनेझुएलाच्या अध्यक्ष दांपत्याला "Operation Absolute Resolve" च्या नावाखाली बळजबरीने उचलून नेले; पण "डोंगर पोखरून उंदीर काढला" अशी काही अवस्था झालीय असे दिसते आहे. इराणमध्ये सरकारने "बंड मोडून काढले" अश्या बातम्या माध्यमे देत आहेत परंतु अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. बांगलादेशातील हिंदू, ख्रिस्ती व इतर अल्पसंख्याक नागरिकांचे - हत्या, बलात्कार, जाळपोळ, लुटालूट इ प्रकारे शिरकाण सुरूच आहे. भारताने युरोपिअन युनिअनशी महत्वाचा व्यापार करार केला आहे.
महाविद्यालये-विद्यापीठे अश्या उच्च शिक्षण संस्थातून हिंदू विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या फूट पाडू पाहणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यादेशाला सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालसाहित पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी युतीने बहुतांश ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. पण अनेक ठिकाणी महापौर निवडीला अजून मुहूर्त लागला नाहीय. या निवडणुकांत एमआइएमने मिळविलेल्या सव्वाशेहून अधिक जागा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या. याचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर विशेषतः या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल याची उत्सुकता आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे अर्थसंकल्प महीना! यावर्षी पहिल्यांदाच रविवारी (आज) केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे.
मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्यासारखा रोखठोक बोलणारा व वागणारा राजकारणी, अधिकारी-कर्मचारी वर्गात दरारा असलेला कुशल प्रशासक, असंख्य पाठीराखे असलेला लोकनेता आता आपल्यात नाही हे वास्तव नि:शब्द करणारे आहे. त्यांच्या मृत्यूला अजून तेरा दिवसही झालेले नसताना श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.
राजकारण कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात "यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की" असे भाकीत केले होते. चांदीही बरीच वर-खाली होत आहे. शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात एकदम अकरा टक्के घट झाली तरीही दिवाळीआधीच नव्हे तर "अधिक महिन्यापर्यंतच सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल असे दिसते आहे"!
व्यवहार कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
- कांदा लिंबू
वाचने
15317
वाचनखूण
प्रतिक्रिया
187
In reply to इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण by कंजूस
हाहाहा!!
In reply to इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण by कंजूस
अशाच प्रकारचे प्रोजेक्ट्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1In reply to अशाच प्रकारचे प्रोजेक्ट्स by मदनबाण
काहीही वाटलं नाही त्यांना.
मुद्दा भरकटत आहे ??
In reply to मुद्दा भरकटत आहे ?? by लिओ
त्या
विचारधारा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S Janakiरोजच्या
In reply to रोजच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
१.यांच्यावर भारतीय
In reply to रोजच्या by माईसाहेब कुरसूंदीकर
ध्रूव राठीने ( चानेलने)काही
In reply to ध्रूव राठीने ( चानेलने)काही by कंजूस
खरे आहे
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपेयीना नीतिमत्ता नसते!
आता NCERT ची आठवीची नागरिक
In reply to आता NCERT ची आठवीची नागरिक by कंजूस
*दोषी कोण हे हुडका.
In reply to आता NCERT ची आठवीची नागरिक by कंजूस
सत्याची भीती का वाटते आहे ?
NCERT:- अनियंत्रित सत्तेकडे एक पाऊल
आदरणीय मोदीजी भाषेचा स्तर जपला पाहिजे.
अनिल अंबानीचं बांद्रा इथलं घर
In reply to अनिल अंबानीचं बांद्रा इथलं घर by कंजूस
मालमत्ता *अडकवण्यात *आली आहे.
आज Jack Dorsey त्याच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1केजरीवाल निर्दोष
In reply to केजरीवाल निर्दोष by कपिलमुनी
पुरावे देऊन नेमकेपणा सिद्ध
किती टक्के आर्थिक गुन्ह्यात
In reply to किती टक्के आर्थिक गुन्ह्यात by सुबोध खरे
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया
In reply to नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया by आग्या१९९०
या प्रकरणात इडीने आर्थिक
In reply to या प्रकरणात इडीने आर्थिक by कंजूस
काहीही
तसे समर्थनीय कागद वेळेत सादर झाले नाहीत तर ती मालमत्ता कायमची जप्त झाली असे मानण्यात येते.काहीही स्वतःच्या सोयीने लिहू नका. तुम्ही मानताय तसे, कायदा नाही. . अगदी मनी लाउन्ड्रिंगच्या कायद्यानुसारही (कलम ५,८ आदी) 180 दिवसांचा कालावधी हा तात्पुरत्या अटॅचमेंटचा आहे. त्या दरम्यान सुनावणी होते; फक्त “कागद वेळेत दिले नाहीत” म्हणून आपोआप कायमची जप्ती होत नाही. अंतिम जप्तीसाठी न्यायालयीन दोषसिद्धी आवश्यक असते.In reply to काहीही by अभ्या..
मनी लॉन्डरिंग वेगळे.
In reply to काहीही by अभ्या..
१.याविषयी त्यावेळी हिंदुस्थान
In reply to किती टक्के आर्थिक गुन्ह्यात by सुबोध खरे
एपस्टिन फाईल बद्दल बोलू नका
In reply to किती टक्के आर्थिक गुन्ह्यात by सुबोध खरे
मिपा म्हणे
निर्लज्ज सरकार....
In reply to निर्लज्ज सरकार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सलाम
In reply to निर्लज्ज सरकार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर काही सज्जड पुरावे नव्हते
In reply to जर काही सज्जड पुरावे नव्हते by कंजूस
निव्वळ काल्पनिक खटला ?
In reply to निर्लज्ज सरकार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाडगावकरांची पूर्ण कविता देऊन
In reply to पाडगावकरांची पूर्ण कविता देऊन by कंजूस
वावा
जर काही सज्जड पुरावे नव्हते तर सिसोदिया आणि केजरीवालांना खटल्यांत का ओढले? केवळ आपल्या डिपार्टमेंटमेंटच्या मंत्र्यांना खूष करण्यासाठी केले आहे.तुमच्या ह्या वरच्याच प्रतिसादात चक्क न्यायाचा, न्यायव्यवस्थेचा आणि लोकशाहीचाच नुस्ता भंग नाही तर मुडदा पाडण्यात आला आहे आणि तुम्ही कॉपिराईट भंग शिकवताय?In reply to वावा by अभ्या..
खटला दाखल करणे लोकशाहीचा भाग
एक