Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पॅट्रीक जेड on Tue, 07/09/2024 - 21:15
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. लोकशाही असलेल्या देशासाठी हा निश्चितच दुःखद प्रसंग होता. लोकाना आंदोलने वगैरे करता येत नव्हते, झोपडपट्टी हटवणे नी नसबंदीची चुकीची अंमलबजावणी हे दोन मुद्दे पुढे रेटले जातात. पण ह्या आणीबाणीला एक चांगली बाजूही आहे. आजही बर्याच सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत, लाचलुचपत खात्याने सरकारी अधिकारी पकडला तरी “निर्दोष” सुटेपर्यंत त्याचा पगार चालू राहतो, बऱ्याच वर्षांनी काम न करता पगार घेऊन तो परत त्याच नोकरीला चिकटतो. श्रीमंत माणसाने कार चालवून लोक मारले तरी त्या श्रीमंता साठी अख्खी सरकारी यंत्रणा कामाला लागते, उशिरा ब्लड सँपल घेतले जातात नी ते बदललेही जातात. मुंबई पुण्यासारखे शहर पहिल्या पावसातच तुंबतात, कारण नाले /गटार सफाईत भ्रष्टाचार झालेला असतो. कुठेतरी वाचल की मुंबई फक्त आणीबाणी काळात तुंबली नव्हती, कारण नालेसफाई व्यवस्थित झाली होती. तसेच एका मिपाकराचा अनुभव वाचला “आणिबाणीपूर्वी एका ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सरकारकडून फार अपेक्षा नव्हत्या. रेशनला रांगा लावूनही कधी रॉकेल मिळायचे नाही तर कधी साखर संपून जायची. रेशनचा काळा बाजार जोरात चालू असे. एसटी आगारातून खेड्यापाड्यात जाणाऱ्या गाड्या कधीही वेळेवर सुटत नसायच्या आणि बऱ्याचश्या फेऱ्या रद्द व्हायच्या. संपूर्ण आगारातून कायम गर्दी असायची. रात्रीच्या मुक्कामी गाडीलाही गर्दी असायची आणि बऱ्याचदा काहीतरी सटर-फटर कारणाने तीही रद्द झाली की एस्टी आगारातच रात्री मुक्काम करावा लागत असे. तेव्हा रिक्षासारखी खाजगी वाहने तुरळक असायची आणि ती भरायलाही तास तास थांबायला लागायचे. संध्याकाळी तर खेड्यापाड्यात रिक्षा जात नसत. आणीबाणीत रेशन वेळेवर मिळायचे, रॉकेल संपले किंवा साखर संपली असे कधी होत नसे . कोणी तक्रार करेल म्हणून रेशन दुकानदार शिधापत्रिका व्यवस्थित भरत असे. एसटी आगारातून वेळच्या वेळी गाड्या सुटत, गाड्या रद्द होणे बंद झाले त्यामुळे गाड्यांमध्ये होणारी गर्दी कमी झाली. रात्रीच्या शेवटच्या गाडीला फारच कमी प्रवासी असतं. जि. प. च्या कार्यालयात कधी कर्मचारी वेळेवर येत. साहेबपासून शिपयापर्यंत सगळे कार्यालयीन वेळेत जागेवर सापडायचे त्यामुळे कामेही झटपट होत असत. शाळेत जाताना किंवा येताना एसटी वेळेवर मिळत असल्याने वेळेची बचत होत होती.” मी अनेक वयस्क लोकांशी बोललो, ते सर्वसामान्य होते, आणीबाणीत सामान्य माणसाला काहीही त्रास नव्हता असेच त्यांच्या बोलण्यातून दिसले. सरकार “सरकार” म्हणून काम करत होते, सरकारी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक होता, सरकारी नोकर वेळेवर कामावर दाखल होत, रेल्वे वेळेवर धावत होत्या, रस्त्यावर गाडे लाऊन जागा अडवल्या जात नव्हत्या, रात्री फिरायला बंदी होती त्यामुळे गुन्हे कमी झाले होते. वरील सर्व जर खरं असेल तर आणीबाणी हा भारतासाठीचा सुवर्णकाळ मानावा का?? सर्वसामान्य माणसास हवेच काय असते आणखी? ता.क- विनोबा भावे ह्यानी आणीबाणीस “अनुशासन पर्व” असे संबोधले होते.
  • Log in or register to post comments
  • 6472 views

प्रतिक्रिया

Submitted by dadabhau on Tue, 07/09/2024 - 22:42

Permalink

मानसरोग तज्ञ

आणीबाणीत मानसिक आजार कमी झाल्याने मानसरोग तज्ञांचा धंदा पार बसला होता...मिपा वर डु.आयडीवाढल्याने त्या तज्ञांचा धंदा वधारला असेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 07/10/2024 - 01:46

Permalink

'अनुशासन पर्व' पुन्हा एकदा यावे.

सध्याच्या केंद्रीय शासनाने पुन्हा एकदा 'अनुशासन पर्वा'चा 'सुवर्ण काळ' अमलात आणून भारतमातेची पपुवासूर, केजरुवासूर वगैरे असुरांपासून मुक्तता करावी. हा. का. ना. का.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Wed, 07/10/2024 - 06:39

In reply to 'अनुशासन पर्व' पुन्हा एकदा यावे. by चित्रगुप्त

Permalink

सगळ्यांनाईक अनुशासन परवाई

सगळ्यांनाईक अनुशासन परवाई राबवता येईल असे नाही. इंदिरा गांधी ह्या वेगळ्या होत्या. त्यांच्यात देशप्रेम ठासून भरले होते. आपले राज्य भाले नी आपलीक राज्यातील व्यापारी भले अस नव्हत त्यांचं.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Wed, 07/10/2024 - 06:40

In reply to 'अनुशासन पर्व' पुन्हा एकदा यावे. by चित्रगुप्त

Permalink

सुधारित

सुधारित सगळ्यांनाच अनुशासन पर्व राबवता येईल असे नाही. इंदिरा गांधी ह्या वेगळ्या होत्या. त्यांच्यात देशप्रेम ठासून भरले होते. आपले राज्य भले नी आपल्या राज्यातील व्यापारी भले अस नव्हत त्यांचं. आणी आता ते शक्यही नाही. बहुमत कधीच गेलंय :)
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 07/10/2024 - 06:55

In reply to सुधारित by पॅट्रीक जेड

Permalink

सहमत, मोदींना अनुशासन पर्व

सहमत, मोदींना अनुशासन पर्व राबवता येणार नाही. प्रियांका गांधी मात्र अतिशय योग्य असतील. इंदिरा सारख्या दिसतात, अजून काय पाहिजे. राहुल गांधीही योग्य आहेत, आडनाव गांधी आहे. प्रियांका गांधींना दोन मुलंही आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं की झालं. शिवाय ते गांधी आडनाव लावू शकतात. भाजपा सत्तेत राहिला तर २०४७ पर्यंत भारत विकसित होईल न होईल पण राहुल, प्रियांका किंवा प्रियांकाची मुलांनी एकदा सत्तेत येऊन अनुशासन पर्व राबवलं की झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 07/11/2024 - 10:24

In reply to सुधारित by पॅट्रीक जेड

Permalink

आपले राज्य भले = ३. ५

आपले राज्य भले = ३. ५ जिल्ह्याचे पक्ष , यूपीतील यादवांचा पक्ष ? हेच ना खरे देशव्यापी पक्ष म्हणजे भाजप , काँग्रेस आणि कम्युनिस्ट ( औषधाला )
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 07/10/2024 - 05:10

Permalink

"आणीबाणी हा भारतासाठीचा

"आणीबाणी हा भारतासाठीचा सुवर्णकाळ मानावा का?? सर्वसामान्य माणसास हवेच काय असते आणखी?" हे वाचून फुस्कान हसू आले , हे म्हणजे ब्रिटिशा राज्यात एक शिस्त होती असे म्हण्यासारखे आहे शेवटी गुलामी ती गुलामी आणि जी लोक "संविधान खतरे मी है " नावाने शिमगा करीत आहेत तेच आता आणीबाणी चांगली कि वाईट असली चर्चा करू इच्छितात वाह रे वाह
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Wed, 07/10/2024 - 06:43

In reply to "आणीबाणी हा भारतासाठीचा by चौकस२१२

Permalink

हे वाचून फुस्कान हसू आले

हे वाचून फुस्कान हसू आले येणारच. आणीबाणीत इतकं चांगल सुशासन होतं की आजचा काळ पहिला तर हसूच येईल. आणि जी लोक "संविधान खतरे मी है " नावाने शिमगा करीत आहेत संविधान बदलायचंय म्हणून ४०० सीट्स हव्यात अस आधी भाजपेयीच बोंबलत फिरत होते. जनतेने दणका दिल्यावर डोळ्यापुढे तारे चमकू लागले नी मग “मी नाही त्यातली….” हे सोंग घेतले भाजपेयींनी.:)
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Wed, 07/10/2024 - 05:39

Permalink

देश खुप पुढे आलाय.....

आणीबाणी सुवर्ण काळ की काळा कालखंड ही संपूर्ण राजकीय दृष्टीकोनातून केलेली चर्चा आहे. देश पन्नास वर्षे पुढे आला आहे. मागे ढकलू नका. माझ्या दृष्टीकोनातून बाष्कळ चर्चा तर जनतेला सविंधान खतरे मे है, हे सांगून दिशाभूल करणे आणीबाणी पेक्षा जास्त खतरनाक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Wed, 07/10/2024 - 06:46

In reply to देश खुप पुढे आलाय..... by कर्नलतपस्वी

Permalink

आणीबाणी सुवर्ण काळ की काळा

आणीबाणी सुवर्ण काळ की काळा कालखंड ही संपूर्ण राजकीय दृष्टीकोनातून केलेली चर्चा आहे. देश पन्नास वर्षे पुढे आला आहे. मागे ढकलू नका. कर्नल साहेब, दृष्टिकोन राजकीयच आहे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने आणीबाणी नेमकी काय होती?? तुमच्या सारखे अनुभवी जून जाणते लोक नक्कीच सांगू शकतात. माझ्या दृष्टीकोनातून बाष्कळ चर्चा आणीबाणी खरच वाईट होती की तो सुवर्णकाळ होता हे आणीबाणी नंतर वीसेक वर्षणी जन्मलेल्या माझ्य सारख्याना जाणून घ्यायची इच्छा आहे. सविंधान खतरे मे है, हे सांगून दिशाभूल करणे आणीबाणी पेक्षा जास्त खतरनाक आहे. संविधान बदलायच्या घोषणा भाजपेयींनीच केल्या होत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/11/2024 - 09:18

In reply to आणीबाणी सुवर्ण काळ की काळा by पॅट्रीक जेड

Permalink

भुजबळबुवा

भुजबळबुवा तुम्हाला इतका कडक माल कुठून मिळतो? झाझू बुवांना सुद्धा शक्य नाही इतका कल्पनाविलास तुम्ही करून दाखवलाय, तो सुद्धा संपूर्ण ऐकीव माहितीवर. इतका भंपक लेख मिपाच्या इतिहासात क्वचितच लिहिला गेलं असावा! लगे रहो
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 15:19

In reply to भुजबळबुवा by सुबोध खरे

Permalink

डॉ. साहेब,

डॉ. साहेब, ही एकीव माहिती खरी की खोटी तेच जाणून घ्यायचंय.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 07/11/2024 - 10:21

In reply to आणीबाणी सुवर्ण काळ की काळा by पॅट्रीक जेड

Permalink

घटना बदल करताच ना यायला ते

घटना बदल करताच ना यायला ते काय धार्मिक ग्रंथ आहे का
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 07/11/2024 - 10:20

In reply to देश खुप पुढे आलाय..... by कर्नलतपस्वी

Permalink

स्टंटबाजी

माझ्या दृष्टीकोनातून बाष्कळ चर्चा तर जनतेला सविंधान खतरे मे है, हे सांगून दिशाभूल करणे आणीबाणी पेक्षा जास्त खतरनाक आहे. १००% आणि हे कोण म्हणताय तर ज्यांच्या आज्जीने घटना गुंडाळून ठेवली होती ,, लाज वाटली पाहिजे संसदेत ते लाल पुस्तक मिरवताना.. काय ती स्टंटबाजी
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Wed, 07/10/2024 - 08:58

Permalink

अर्थातच काळा कालखंड.

आणीबाणी- “सुवर्णकाळ” की “काळा” कालखंड?
अर्थातच काळा कालखंड, प्रश्नच नाही. त्यात इतकं वेगळा धागा काढण्यासारखं काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Wed, 07/10/2024 - 22:18

In reply to अर्थातच काळा कालखंड. by कांदा लिंबू

Permalink

ते कसं??

ते कसं??
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 07/11/2024 - 10:18

In reply to ते कसं?? by पॅट्रीक जेड

Permalink

बाहुबली ,काय स्वतःसाठी खड्डा

बाहुबली ,काय स्वतःसाठी खड्डा खणताय .. आणि बानी सुवर्णकाळ तर मग एकाधिकारशाही चांगली म्हणावे लागेल तर मग आजची मोदींची एकाधिकार शाही चांगली म्हणावी लागेल ( तुमचा समज पण भाजप ला ३ वेळा लोकांनी निवडून दिलाय चला २.पाच वेळा म्हणू हवे तर , आणि ते आणीबाणी लादून घटना मोडीत काढून सत्तेवर आलेले नाहीत ) काय ते नक्की एकदा ठरवा धागा काढण्यामागचा हेतू काय आहे ते स्पष्ट आहे पण तुम्हीच गोत्यात येताय ...
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 15:18

In reply to बाहुबली ,काय स्वतःसाठी खड्डा by चौकस२१२

Permalink

सामान्य जनतेसाठी मोदींची

सामान्य जनतेसाठी मोदींची हुकूमशाही काहीही कामाची नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 07/11/2024 - 10:23

Permalink

आणीबाणी- “सुवर्णकाळ” की “काळा” कालखंड?

माझ्यामते सुवर्णकाळ. तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. जुनं ते सोनं म्हणायची आपल्याकडे प्रथा आहे त्यामुळे चांगलं म्हणायचं आणि पुढे चालायच. कोणास ठाऊक अजून ५० वर्षानंतर लोकं २०१४ चा काळ देखील सुवर्णकाळ होता असे म्हणतील.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/11/2024 - 10:36

Permalink

३६००० लोक दीड वर्षापेक्षा

३६००० लोक दीड वर्षापेक्षा जास्त काळासाठी मिसा कायद्याखाली विनाचौकशी तुरुंगात डांबले होते. सुवर्णकाळ म्हणणाऱ्यानि केवळ एवढाच एक मुद्दा नीट वाचला तरी पुरे. अन्यथा चालू द्या वैचारिक बद्धकोष्ठ आणि आत्मकुंथन
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 15:18

In reply to ३६००० लोक दीड वर्षापेक्षा by सुबोध खरे

Permalink

मी सर्वसामान्यांच्या दृष्टीने

मी सर्वसामान्यांच्या दृष्टीने बोलतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/11/2024 - 15:32

Permalink

सर्वसामान्य म्हणजे कोण कोण?

अबा, 'सर्वसामान्य' म्हणजे काय? त्याचे लक्षण काय? सर्वसामान्यत्वाचे निकष काय? या प्रकारात कोण कोण बसते आणि कोण कोण नाही? या सर्वावर चिंतन करुन व्यवस्थित प्रतिसाद द्या, म्हणजे चर्चेत काही अर्थ राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 16:09

In reply to सर्वसामान्य म्हणजे कोण कोण? by चित्रगुप्त

Permalink

सर्व सामान्य म्हणजे अ -

सर्व सामान्य म्हणजे अ - राजकीय लोक जे आणीबाणी समर्थक अथवा विरोधक नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/11/2024 - 17:52

Permalink

मी त्यावेळी चोवीस वर्षांचा होतो आणि ...

१९७५ साली माझे वय २४ होते आणि माझे कला-शिक्षण पूर्ण होऊन मी एक छोटी अर्धवेळ नोकरी , चित्रकला, आमचे औषधाचे दुकान होते त्यात काही वेळ बसणे, मित्रांबरोबर भटकंती वगैरे करत होतो. राजकारण, राजकीय पुढारी, त्यांचे पक्ष, याबद्दल अजिबात माहिती वा आवड नव्हती. आमचे कुटुंब, आमचे नातेवाईक आणि परिचित कुटुंबे यापैकी कुणालाही कसलाही त्रास त्याकाळी झाला नव्हता. म्हणजेच अ-राजकीय 'सर्वसामान्य'लोकांना काही त्रास झाल्याचे दिसले नाही. 'बाबू' लोकांची 'खाबू'गिरी बंद झाल्याने त्यांना मात्र त्रास झाला असेल. अर्थात त्याकाळी आमचा कोणत्याही बाबूरावाशी संबंध येण्याचे काही कारणही नव्हते म्हणा. एकंदरित सर्वसामान्यांना आणिबाणीमुळे काही फरक पडला नसावा. मात्र जे हजारो लोक कैदेत होते, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल झाले असतील, हे नक्की. -- आता माझे आई-वडील, काका मामा, गुरुजी वगैरे कुणीही हयात नसल्याने कुणाला विचारता येणार नाही. एक मोठा भाऊ नव्वद वर्षांचा आहे. त्याला आठवत असले तर काही सांगू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 19:38

In reply to मी त्यावेळी चोवीस वर्षांचा होतो आणि ... by चित्रगुप्त

Permalink

व्वा. छान अनुभव. एकंदरीत

व्वा. छान अनुभव. एकंदरीत तुम्ही देखील सर्वसामान्य कॅटेगिरीत होतात नी तुम्हाला काहीही त्रास झाला नव्हता हे वाचून बेयर वाटले. बाबू' लोकांची 'खाबू'गिरी बंद झाल्याने त्यांना मात्र त्रास झाला असेल. हा प्रतिसाद खूप काही सांगून जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/11/2024 - 20:00

Permalink

हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ

हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ आहे आणि या काळात तुरुंगात खितपत पडलेल्या असंख्य लोकांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे. परंतु या धाग्याचा मूळ हेतूच शुद्ध नाही त्यामुळे त्यात लिहून केवळ कालापव्यय करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. आणीबाणी हा सुवर्णकाळ होता असे एकही काँग्रेसी म्हणत नाही याचे कारण शोधून काढा. परदुःख शीतळ असतं हेच खरं. सामान्य माणसं अत्यंत भीतीच्या सावटाखाली वावरत होती कारण कोणताही कारण न देता एखाद्याला अटक होते आणि महिनोन महिने तो आत राहतो याचा सामान्य नोकरदारावर काय परिणाम होतो हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणारच नाही. एवढंच लिहून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 20:37

In reply to हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ by सुबोध खरे

Permalink

परंतु या धाग्याचा मूळ हेतूच

परंतु या धाग्याचा मूळ हेतूच शुद्ध नाही धाग्यात मी दोन्ही बाजू मांडल्या आहेत. बाकी माझा भर “सर्वसामान्य” ह्या शब्दावर आहे. त्यांना काही त्रास झाला नसेल आणी सरकारी नोकर खाबुगिरी नी चिरीमिरी न घेता कामे करत असतील तर ह्यात वाईट काय होते?
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 07/11/2024 - 22:16

In reply to हा काळ माझ्या आठवणीत स्वच्छ by सुबोध खरे

Permalink

सहमत.

सहमत. मी फक्त सात वर्षांचा होतो आणि वडिलांना दीड वर्षे अटकेत काढावी लागली, केवळ संघाचे कार्यकर्ते म्हणून. दिवाळीच्या दोन आठवडे आधी अटक झाली. वैद्यकीय व्यवसाय अचानक बंद झाल्याने घराची जी परवड झाली त्याच्या आठवणी चांगल्या नाहीत. परिचित एक डॉक्टर कानाचे इन्फेक्शन वाढून मरण पावले. त्यांना उपचारही घेऊ दिले नाहीत. बंदिवासी लोकांबद्दल तत्कालीन मामु शंकर चव्हाण यांचे वक्तव्य काय होते ते शोधून पहावे. तसेच अशोक जैन यांचे इंदिरा गांधी हे पुस्तक वाचावे, अभ्यास केला तर आणीबाणी निव्वळ विकृत होती हे स्पष्टपणे कळते. पण.. त्याविषयी बोलायची ही योग्य जागा नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 22:54

In reply to सहमत. by खेडूत

Permalink

आणीबाणीची ही काळी बाजू माहीत

आणीबाणीची ही काळी बाजू माहीत नव्हती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 07/11/2024 - 20:03

Permalink

आणीबाणीत सर्वसामान्य जनतेला

आणीबाणीत सर्वसामान्य जनतेला त्रास झाला नाही उलट फायदाच झाला परंतु सत्ताधारी पक्षाविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय अत्याचारासारखे मुद्दे विरोधी पक्षांनी जोरदार मांडल्याने १९७७ लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचले. सत्तेत आलेले सरकार अंतर्गत कलहाने जेव्हा कोसळले तेव्हा सर्वसामान्य जनतेने इंदिरा गांधींना पुंन्हा सत्तेवर बसवून आपण केलेली चूक सुधारली. जनतेवर आणीबाणीत खरंच अत्याचार झाले असते तर त्यांनी पुन्हा इंदिरा गांधींना सत्ता दिली नसती.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 20:37

In reply to आणीबाणीत सर्वसामान्य जनतेला by आग्या१९९०

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 07/11/2024 - 21:03

Permalink

मला आणीबाणीचा काळ अत्यंत

मला आणीबाणीचा काळ अत्यंत सुखाचा गेला. इकडची काडी तिकडे करावी लागत नसे. सुरुवातीचा बराच काळ मला जागीच लोळत असताना हातपाय न हलवता अन्न पाणी मिळत होते. म्हणजे मी मनसोक्त हातपाय हलवत असे पण अन्न मिळवण्यासाठी नव्हे. स्वतःची मर्जी म्हणून. अगदी पडल्या जागी येऊन सिस्टीममधले सर्व लोक माझी सेवा करणे, लंगोट दुपटी बदलणे हे सर्व करत असत. नंतर काही काळाने जरा बदल घडला असला तरी खिमठ, मेतकूट भात, नाचणी सत्त्व, विविध खिरी वगैरे पौष्टिक आहार मला मुबलक मिळत असे. रेशनिंग नव्हते. इकडे तिकडे रांगणे, सरपटणे आणि बागडण्यास संचारास देखील आडकाठी नव्हती. मी सिस्टीम विरुद्ध अत्यंत जोरदार आवाज उठवू शकत असे. मला दुपट्यात बांधून ठेवू जाता मी प्रस्थापित सिस्टीम वर लाथाळ्या झाडी आणि भोकाडरुपी लाखोली वाही. तरीही मला तुरुंगात टाकले गेले नाही किंवा मुस्कटदाबी झाली नाही. एकंदरीत बहारीचा काळ होता. तसा आयुष्यात पुन्हा आला नाही. पुढे तर मला चक्क कामाला जुंपले गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 07/11/2024 - 21:20

In reply to मला आणीबाणीचा काळ अत्यंत by गवि

Permalink

या प्रतिसादास

या प्रतिसादास "व्याख्या विख्यू विख्यू प्रतिसाद ऑफ द डे" या पुरस्काराने सन्मानित करावे अशी मी संपादक मंडळास नम्र विनंती करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 21:53

In reply to मला आणीबाणीचा काळ अत्यंत by गवि

Permalink

तान्हे बाळ होतात तर :)

तान्हे बाळ होतात तर :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/11/2024 - 22:19

Permalink

"दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ

लेखाचे शीर्षक जरा भडक आहे, त्या ऐवजी 'आणिबाणीच्या काळातील लोकांचे विविध अनुभव' किंवा 'भारतातील आणिबाणी - एक आकलन' असे देणे अधिक उचित झाले असते असे वाटते. -- याशिवाय इतर अनेक धाग्यांवर, सदर धागाकर्त्याकडे 'मोदीद्वेषाच्या काविळेपोटी' उपजलेल्या अनेक प्रतिसादाचा 'पुण्य-संचय' भरपूर असल्याने त्याने काहीही लिहीले, तरी ते मोदी/भाजप-द्वेषातूनच उपजलेले असणार, असे वाचकांना वाटणे क्रमप्राप्तच आहे. -- जाता जाता - विनोबा भावे या प्रतिभावंताने दिलेले 'अनुशासन पर्व' हे नाव अगदी चपखल असल्याचा तात्कालीन 'सर्वसामान्य' लोकांचा अनुभव होता, हेही तितकेच खरे. माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहायचे राहून गेलेले एक म्हणजे मी १९७७ साली दिल्लीला केंद्रीय सरकारच्या नोकरीत रुजु झालो (तेंव्हा आणिबाणी संपली होती की नव्हती ते आता लक्षात नाही) तेंव्हा माझ्या कार्यालयातील सगळ्यांनीच सांगितले होते की दिल्लीतल्या सरकारी नोकरांसाठी ते खरोखर 'अनुशासन पर्व' होते. कोणीही एक मिनीटही उशीरा येणे वा लवकर पोबारा करणे, कामात टाळाटाळ- विलंब करणे, लाच खाणे, असले प्रकार बंद झालेले होते. -- आणखी एक : तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने राबवलेले अनुशसन पर्व हे सर्वसामान्य जनतेसाठी उपकारक होते, असे इथे मिपावर जरी ठरले, तरी त्याचा अर्थ 'त्या इटालियन बयेचे चोपन्न वर्षांचे दिवटे कार्टे' हे पंप्रपदासाठी लायक आहे, असा अजिबात होत नाही. (ते तिहाडात केजरूबरोबर छान शोभून दिसेल. "दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ. हा.का.ना.का.) उदाहरणार्थः दो दीवाने तिहाड में रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढते हैं. इक आशियाना ढूँढते हैं.... इन भूल-भुलइया गलियों में, अपना भी कोई घर होगा अम्बर पे खुलेगी खिड़की या, खिड़की पे खुला अम्बर होगा असमानी रंग की आँखों में बसने का बहाना ढूंढते हैं, आब-ओ-दाना ढूँढते हैं इक आशियाना ढूँढते हैं
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on गुरुवार, 07/11/2024 - 22:58

In reply to "दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ by चित्रगुप्त

Permalink

तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने

तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने राबवलेले अनुशसन पर्व हे सर्वसामान्य जनतेसाठी उपकारक होते ५तुमचा वरील अनुभव वाचून तरी असेच वाटतेय उपकारक होते. पण इटालीयन बाईचा मुलगा लायक असेल तर नक्की व्हावा पंतप्रधान, सध्याचे भाषणं वगैरे पहिले की वाटतंय तसं.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 07/13/2024 - 03:55

In reply to तात्कालीन पंत-प्रधानीण बाईने by पॅट्रीक जेड

Permalink

@पॅट्रिक: अ‍ॅमेझॉनवर आपली चरणधूळ आणि चरणामृत उपलब्ध करून द्यावे

इटालीयन बाईचा मुलगा लायक असेल तर नक्की व्हावा पंतप्रधान
-- आपले चरणामृत प्राशन करू म्हणतो. कृपया अ‍ॅमेझॉनवर चरणधूळ आणि चरणामृत उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Sat, 07/13/2024 - 07:41

In reply to @पॅट्रिक: अ‍ॅमेझॉनवर आपली चरणधूळ आणि चरणामृत उपलब्ध करून द्यावे by चित्रगुप्त

Permalink

आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते

आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट. आपला पप्पू विश्वगुरू दुसऱ्याचा पप्पू पप्पू .
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Fri, 07/12/2024 - 00:40

In reply to "दो दीवाने तिहाडके" असे फिल्मी गाणे आम्ही रचून देऊ by चित्रगुप्त

Permalink

नौटंकी आणि संधिसाधूपणा यात

नौटंकी आणि संधिसाधूपणा यात केजरीवाल हे विद्यमान पंतप्रधान यांच्या तोडीस तोड आहेत म्हणून अजून तरी टिकून आहेत. राहुल गांधी हे भारतीय राजकारणात आवश्यक व्यवहारी आणि धोरणी वृत्ती यात कमी पडत असल्यामुळे एका मर्यादेच्या पुढे येतील असे वाटत नाहीत आणि काही बाबतींत तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे पंतप्रधानपद (जरी) मिळाले तरी स्वीकारतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Fri, 07/12/2024 - 18:09

Permalink

२५ जून आता संविधान हत्या दीन

२५ जून आता संविधान हत्या दीन म्हणून पाळला जाणार. आणीबाणी वाईट नव्हतीच तर हा दिवस का पाळला जातोय?? सर्वसामन्यांचं आयुष्य ज्या दिवसापासून चांगलं झालं, सरकारी कर्मचारी वेळेवर कामे करू लागले, चिरिमिरी घेणं बंद झालं तो दिवस संविधान हत्या दिन? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 07/13/2024 - 03:49

In reply to २५ जून आता संविधान हत्या दीन by पॅट्रीक जेड

Permalink

आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु.

आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु. -- अर्थात चाणाक्ष वाचकांनी तो आधीच ओळखला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅट्रीक जेड on Sat, 07/13/2024 - 07:42

In reply to आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु. by चित्रगुप्त

Permalink

काय हेतू? तुमच्याच

काय हेतू? तुमच्याच अनुभवाप्रमाणे साईकरी कर्मचारी लाच घेत नव्हते. हे काय वाईट होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 07/13/2024 - 13:26

In reply to आता उघड झाला या धाग्याचा खरा हेतु. by चित्रगुप्त

Permalink

त्यात ओळखायचे काय?

आय डी चे आयुष्यमान आणि प्रतिसाद बघीतले की समजतेच.. शिवाय, लोचट आयडी कळत नकळत ओळखता येतोच की...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/15/2024 - 09:42

In reply to २५ जून आता संविधान हत्या दीन by पॅट्रीक जेड

Permalink

emergency-was-a-mistake-it

emergency-was-a-mistake-it-was-accepted-by-indira-gandhi-says-p-chidambaram https://timesofindia.indiatimes.com/india/samvidhan-hatya-diwas-emergency-was-a-mistake-it-was-accepted-by-indira-gandhi-says-p-chidambaram/articleshow/111728795.cms घ्या हा घरचा आहेर आता आपलं काय म्हणणं आहे भुजबळ बुवा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 07/12/2024 - 22:22

Permalink

मनोरंजक प्रतिसाद.... ते मनोरंजक धागा...हा प्रवास सुरू झाला तर..

आनंद आहे... एक जुना मिपाकर बरोबर बोलला की, मिपा, म्हणजे .... डू आय डींची खाण....
  • Log in or register to post comments

Submitted by नठ्यारा on Tue, 07/23/2024 - 21:33

Permalink

संविधानहत्यादिन यामागील तर्क

पॅट्रीक जेड,
सर्वसामन्यांचं आयुष्य ज्या दिवसापासून चांगलं झालं, सरकारी कर्मचारी वेळेवर कामे करू लागले, चिरिमिरी घेणं बंद झालं तो दिवस संविधान हत्या दिन? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
प्रश्न रास्त आहे. त्याचं काये की जरी सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला असला तरी तो तात्पुरता ठरण्याची दाट शक्यता होती. जे दाणे सुपात होते त्यांना जात्यातल्यांचे हाल दिसंत होते. किंबहुना कम्युनिस्ट सत्तेप्रमाणे निरपराध्यांना तुरुंगात डांबण्याची पद्धती सुरू झाली होती. घटनेनुसार मूलभूत अधिकार अनुल्लंघ्य आहेत. नेमकी त्यांनाच आणीबाणीच्या नावाखाली कात्री लावल्याने आणीबाणी ही संविधानाची हत्याच आहे. असा आपला माझा तर्क. -आ.न., -ना.न.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 07/26/2024 - 16:11

In reply to संविधानहत्यादिन यामागील तर्क by नठ्यारा

Permalink

खूप काही लिहिता येईल...

पण, सध्याचे डूआयडी युक्त मिपा आणि आधीचे मिपा, ह्यात बराच फरक असल्याने, त्या काळातील माहिती देऊ इच्छित नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 07/27/2024 - 22:35

Permalink

आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी

आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी युनियन बजेट २०२४ साठी सत्ताधारी लोकांना चांगलेच धारेवर धरलेय. विशेषतः लाँग टर्म कॅपिटल गेन वरील इन्डेक्सेशन संदर्भात त्यांचे भाषण चांगलेच व्हायरल होत आहे. खाली लिंक : https://www.youtube.com/watch?v=BMS1WRiVDJc इन्डेक्सेशन संदर्भात : १२.१५ मि च्या पुढे. खरंतर संपुर्ण भाषणच ऐकण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com