Skip to main content

शाळा की मंदिर

लेखक टीपीके यांनी रविवार, 07/01/2024 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो. सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते. समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे? एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे. सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही. खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल आपला काय विचार ?

वाचने 29973
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या धर्मस्थळाबद्दल पण तुम्हाला हेच वाटत असेल ना की तिथं शाळा व्हायला हवी?

In reply to by धनावडे

सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून काय करनार?? काही ठिकाणी सार्वजनीक शौचालयेही हवीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला लावलेय. मंदिरा किंवा शाळा तर शाळाच हवी अस काहीतरी कोण बोलत होत, बघा बघू कोण होत ते?

माणसाचं मन डेव्हलप व्हायला हवं कि बुद्धी? मूळात हे either or आहे का ??

In reply to by अर्धवटराव

शाळेच्या पातळीवर शिकवलं जाणारं नागरिकशास्त्र हे बहुतांशी मनाने शिकण्याचा विषय असायचा. तेव्हा मन आणि बुद्धी असा काही भेद करता येतो असं वाटत नाही. यमुनेचं पात्र तुडवून केलेला सत्संग, लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असणारे, वगैरे दिव्य आत्मा बघितले तर मंदिरांमध्ये मनाची मशागत होते असं म्हणणं फार धारिष्ट्याचं होतंय.

In reply to by अर्धवटराव

सध्या आपण जे अनुभवतो आहे त्याची माझ्यामते कारणमीमांसा अशी आहे: आपल्या सर्वांच्या आयष्यात ढोबळमानाने चार टप्पे येतात. पहिल्या टप्प्यात आयुष्याची पायाभरणी असते. माझ्या पिढीत (चाळीस वर्षांपूर्वी) नोकरीच्या संधी तशाही फार कमी होत्या. तशात बऱ्याच पांढरपेशा कुटुंबांमध्ये जमीन जुमला वगैरे काही नसल्यामुळे सर्व शक्ती शैक्षणिक पात्रता मिळविण्यासाठीच वापरली जायची. नंतर येते तो आयष्यात स्थिरस्थावर होण्याचा टप्पा. नोकरी, व्यवसाय, संसार असा हा टप्पा. पुढच्या टप्प्यात माणूस यथाशक्ती काही तरी सामाजिक कार्यात भाग घेतो. सत्संग, छंद अशा गोष्टींकडे काही जण वळतात. आपण ओळखलो जाओ अशी एक माफक ते तीव्र स्वरूपाची उर्मी यावेळेस तयार होते. नंतर येतो तो विश्रांतीचा टप्पा. स्वतःला आहोत तसं व्यक्त करणं जसं प्रवास करणं, वाचन अशा गोष्टींमधून आपण व्यक्त व्हायला सुरुवात होते. आत्ताच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर असणाऱ्या मध्यम वर्गीयांनी धार्मिक अस्मिता हे आपली ओळख आणि अभिव्यक्ती करण्यासाठी निवडली आहे हे प्रकर्षाने जाणवते. निव्वळ दिमाखदार सुविधा यांना हा वर्ग विकास समजतो. वाढली महागाई तर वाढू दे, पण मुस्लिम या निमित्ताने एका कोपऱ्यात लोटले जात असतील तर हरकत नाही अशी मानसिकता आहे. येथे चर्चा करणाऱ्यांना कितीही चितपट केले तरी त्यांची धार्मिक निष्ठा त्यांनी कुणाला वाहायच्या हे निश्चित केले आहे.

In reply to by सर टोबी

येथे चर्चा करणाऱ्यांना कितीही चितपट केले तरी त्यांची धार्मिक निष्ठा त्यांनी कुणाला वाहायच्या हे निश्चित केले आहे.
१. धार्मिक निष्ठा कुणाला वाहायच्या हे निश्चित करणे चूक आहे का? २. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठा कुणाला वाहिल्या आहेत? ३. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठांची निश्चिती केंव्हा केंव्हा बदलली आहे? ४. या चर्चेत कुणी कुणास चितपट केले आहे? --- चर्चा म्हणजे माहिती, विचार, मत इत्यादींचे आदानप्रदान असे हिंदू धर्म सांगतो आणि तसे आचरण करतो. चर्चच्या नावाखाली कुणाला चितपट करण्याचे मनसुबे बाळगणे हे हिंदू धर्मास मान्य नाही.

In reply to by सर टोबी

वाढली महागाई तर वाढू दे, पण मुस्लिम या निमित्ताने एका कोपऱ्यात लोटले जात असतील तर हरकत नाही अशी मानसिकता आहे
अरे! पुरोगामी लोक असा विचार करतात! बरं झालं तुम्ही इथे उघड केलेत ते. सनातनी हिंदू धर्म मात्र - ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ अशी सर्वांच्या हिताची कामना करतो.

राज घाट, महात्मा गांधींची समाधी : 40 एकर. शांती वन, जवाहरलाल नेहरूंची समाधी : 53 एकर शक्ती स्थळ,इंदिरा गांधींची समाधी : 45 एकर राजीव गांधींची समाधी : 15 एकर राम मंदिर : 2.7 एकर. गांधी-नेहरूंची समाधी बांधली जात असताना कोणाला शाळा, कॉलेज, हॉस्पिटलचा विचार आला नसेल का? दिल्लितील अशा सुपर प्राइम प्रोपर्टी विकल्या तर किती शाळा, कॉलेज, हॉस्पिटल बान्धता येतील?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तसंच महात्मा गांधी, इंदिरा गांधी वगैरे लोक महान होते. महात्मा गांधीतर खोटंही बोलायचे नाहीत. आजकाल खोटारज्या लोकांचा ऊदऊदो करायची परंपरा आलीय. असो. मंदीरांचा ऊपयोग काय?? संत गाडगेबाबा तर सांगून गेलेत मंदिरात फक्त पुजार्याचे पोट असते. प्रश्नकर्त्याने मंदिर की शाळा असा प्रश्न विचारलाय. समजा गावात मंदीर असेल तर पुजार्याची सोय होईल पण शाळा नसेल तर गावातल्या पिढ्या अशीक्षीत राहतील. विद्या नसेल तर काय होते हे महात्मा फुले आपल्याला सांगूनच गेलेत. मग मंदीर महत्वाचं का शाळा?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मंदीरांचा ऊपयोग काय? मग या समाधी स्थळान्चा तरी काय उपयोग आहे. दिल्ली मधील अतिमहत्त्वाच्या जागा अड्वून ठेवण्या पेक्शा त्या जागान्चा विधायक कार्यासाठी उपयोग करा की! नाही तरी साडे चार कोन्ग्रेसी सोड्ले तर कोण जातय तिथे? मन्दिरात हजारो लाखो भाविक जातात फुल,प्रसाद, खाद्यपदार्थ विक्णारे, रिक्शावाले होटेलवाले इ चे पोट तरि भरते

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काय सान्गताय काय? कोणत्याही नेत्याच्या समाधी स्थळी गड्बड करुन पहा, दन्गल होते की नाही? बाकी तुमच्याकडून अधिक काय अपेक्शा करणार?

In reply to by सुबोध खरे

जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर नाही. माहीतीय मला. देशाच्या अधःपतनाला तो प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे ज्याला वाटतं की शिक्षण, रोजगार ह्यापेक्षा धार्मीक मुद्दे जास्त महत्वाचे आहेत. - पेरियार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या भम्पक युक्तिवादाला कुणाकडेच ऊत्तर नाही. तेन्व्हा तुमच चालु द्या

In reply to by सुबोध खरे

कर्मकांडं , अंधश्रध्दा, ह्यावर तुम्ही लिहीलं नाहीत. शाळा का नको मंदिर का हवं? ह्यावरही तुमच्याकडे ऊत्तर नाही. समजू शकतो. देश मागेमागे का चाललाय हे लक्षात आले असेलच तुमच्या.

In reply to by सुबोध खरे

कुणा सामान्य माणसाने केला असता तर त्याची सामाजिक परिस्थिती, बौद्धिक कुवत वगैरे कसोट्यांवर ते दुर्लक्षणीय होऊ शकले असते. इथे तर शिक्षण, सामाजिक दर्जा आणि नीतिमत्ता यांचा संबंध नसतो असा साक्षात्कार व्हावा अशी परिस्थिती आहे! ज्या काळात हि स्मारके उभारली तेव्हाची शैक्षणिक संसाधने असण्याची गरज आणि आजची गरज याचा काही विचार कराल कि नाही? आज प्राथमिक शाळांची फी देखील लाखाच्या घरात आहे. जी स्मारकं तुम्हाला खुपत आहेत त्यांच्या अगोदरच आयआयटी दिल्ली (स्थापना १९६१), हंसराज कॉलेज (स्थापना १९४८) अशा संस्था होत्या. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था अगदी तालुकाच्या गावापर्यंत पोहोचल्या होत्या.

असा युक्तिवाद कुणा सामान्य माणसाने केला असता तर त्याची सामाजिक परिस्थिती, बौद्धिक कुवत वगैरे कसोट्यांवर ते दुर्लक्षणीय होऊ शकले असते. इथे तर शिक्षण, सामाजिक दर्जा आणि नीतिमत्ता यांचा संबंध नसतो असा साक्षात्कार व्हावा अशी परिस्थिती आहे!
शतश: सहमत शिकलेले लोक (मिपावर प्रतिसाद लिहितात म्हणजे शिकलेले असतील असे समजतो) सुद्धा "मंदिर व शाळा ह्या दोन बाबी म्युच्यूअली एक्स्क्लूजिव नसतात" हे समजून न घेता शाळा की मंदिर असा वाद घालतात याचेच ते द्योतक आहे. अर्थात ही तुम्ही म्हणताय तशी त्यांची बालबुद्धी आहे की त्यांची बदमाशी आहे हेही आहेच.

चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी हाणामारीत ही सूंदर कविता सापडली. शाळा पडू द्या,त्यात लेकरू मरू द्या.... पण तुम्ही देवळे बांधा बापहो….... सोन्याचा कळस चढवा त्यावर , उद्याच भविष्य दडलंय ना त्यात तुमचं ..…… बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर, माणसाच्या जीवनात समृद्धी आणत असेल तर.... विकणारा काय खुळा आहे का ? का मूर्ती घडवणारा खुळा आहे ? तो स्वतःच भलं करण्याऐवजी , बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल ? हे कधी कळणार माझ्या बाप हो तुमाले राष्ट्रसंत गाडगेबाबा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

थोरांचे थोर विचार... उद्याला अमरावतीत जाणार आहे. तिकडे बाबांच्या समाधीस्थळी भेट देणार आहे. आरती प्रसाद झाल्यावर ही कविता ऐकवतो सगळ्यांना