✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कन्नमवार नगर (विक्रोळी ,पुर्व) मुंबई

व
विकि यांनी
Sun, 02/24/2008 - 17:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8465 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विकास Sun, 02/24/2008 - 19:08 नवीन

आलोय...

आपण एकदा याच कन्नमवार नगर पाहून आपला कॉ.विकि

मी पाहीले आहे आणि तेथील लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले आहे.  ते (चांगल्या अर्थाने) बदलू  नये असे वाटते.

  • Log in or register to post comments
व
विकि Sun, 02/24/2008 - 19:14 नवीन

विकास साहेब

आपण कश्याप्रकारे आदरातिथ्य अनुभवले तेही लिहीले असते तर बरे झाले असते.

आपला

कॉ.विकि

  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 02/24/2008 - 19:57 नवीन

आम्हीही

आम्हीही कन्नमवार नगरातील लोकांचे आदरातिथ्य अनुभवले आहे, अनुभवतो.

आमचे कांबळे, गायकवाड, इलपाटे  असे काही खास स्नेही तिथे राहतात ज्यांच्या घरांचे दरवाजे आमच्यासाठी आणि आमच्या घराचे त्यांच्यासाठी सदैव उघडे आहेत.

६ डिसेंबर रोजी ही मंडळी चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांचे वास्तव्य शिवाजी पार्कला आमच्याकडे असते.

आम्ही कधीही दादर ठाणे मार्गावरून जातांना विक्रोळीला कन्नमवार नगरातून या मंडळींना भेटून पुढे जातो.

आपला,
(जगमित्र) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 02/25/2008 - 11:37 नवीन

भूलू नका

कन्नमवारकर,

विकासकांच्या (बिल्डरांच्या) मोठ्या मोठ्या स्वप्नांना भूलू नका!

(मनापासून) मनस्वी

  • Log in or register to post comments
व
विकि Tue, 02/26/2008 - 19:54 नवीन

मनस्वी.

विकासक नव्हे भकासक .

आपला

कॉ.विकि

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
व
विकि Tue, 02/26/2008 - 19:54 नवीन

मनस्वी.

विकासक नव्हे भकासक .

आपला

कॉ.विकि

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
व
विकि Tue, 02/26/2008 - 19:51 नवीन

धोंडोंपंत,

६ डिसेंबर चा उल्लेख आपण का केलात ते कळले नाही. दादर आणि कन्नमवार नगर फार लांब नाही .मुंबईतल्या मुंबईतच आहे.

बाकी आपला प्रतिसाद खुप आवडला.

आपला

कॉ.विकि


 

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 22:07 नवीन

कसायाला गाय .....

धार्जिणी म्हणतात ते खरेच आहे. स्थानिक लोकच चांगल्या प्रतिनिधींना विरोध करून अयोग्य लोकांना प्रतिनिधि करतात व ते अशा प्रकल्पात क्षुल्लक वैयक्तिक लाभासाठी संबंधित नागरिकांचे वाटोळे करतात.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/26/2008 - 22:28 नवीन

पुढच्यास ठेच ...

हे सर्व वाचताना मला बॉस्टनमधे एक ज्यू लोकांवर नाझींनी केलेल्या जर्मनीतील अत्याचारांवर होलोकॉस्ट मेमोरीयल आहे त्याच्यावर वाचलेल्या वाक्याची आठवण झाली:

First They Came for the Jews

First they came for the Jews
and I did not speak out
because I was not a Jew.
Then they came for the Communists
and I did not speak out
because I was not a Communist.
Then they came for the trade unionists
and I did not speak out
because I was not a trade unionist.
Then they came for me
and there was no one left
to speak out for me.

Pastor Martin Niemöller

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाही का? केवळ मुंबईतील मराठी म्हणून नाही तर सर्वच बाबतीत - कधी मराठी म्हणून, कधी मध्यमवर्गीय म्हणून, कधी हिंदू ,निधर्मी - निव्वळ भारतीय नागरीक म्हणून, कधी विद्यार्थी म्हणून तर कधी शिक्षक, शेतकरी इत्यादी म्हणून.

पण सर्वच म्हणणार मला काय त्याचे? थोडक्यात पुढ्च्यास ठेच लागली तरी मागचा शहाणा होत नाही कारण तो आंधळा असतो म्हणून नाही तर डोळेझाक केलेली असते म्हणून....

व.पु. काळ्यांनी कुठेतरी म्हणले होते की, "आपण तीन शब्दांसाठी जगतो - लोक काय म्हणतील?" मला वाटते तसेच  जेंव्हा सामाजीक प्रश्न सोडवायची वेळ येते तेंव्हा आपण तीनच शब्द जगतो, "मला काय त्याचे?"

 

  • Log in or register to post comments
व
विकि Wed, 02/27/2008 - 23:04 नवीन

विकास साहेब

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाहीमराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे मुंबईत परप्रांतीय वाढत आहेत हे मी मनोगत ,उपक्रम आणि आता मिसळपाववर सातत्याने मांडत आहेत.पण आपण करणार काय .केवळ भ्रष्टाचारामुळेच असे होत आहे.तुम्हीच पहा ना राज्य मराठी,भाषा मराठी,माणसे मराठी,राज्यकर्ते मराठी ,पोलीस मराठी,म्युनसीपालटीचा कारभार मराठी तरीही मुंबईत मराठी माणूस कमी होत आहे.काय करणार आपण.

कन्नमवार नगराविषयी म्हणत असाल तर ती म्हाडाची वसाहत आहे म्हाडा अधिकार्‍यांनी जर मनावर घेतले तर ते स्वतःच या नगराचा विकास करू शकतात पण................

आपला

कॉ.विकि

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकि Wed, 02/27/2008 - 23:09 नवीन

मराठी

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाही का?

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे मुंबईत परप्रांतीय वाढत आहेत हे मी मनोगत ,उपक्रम आणि आता मिसळपाववर सातत्याने मांडत आहेत.पण आपण करणार काय .केवळ भ्रष्टाचारामुळेच असे होत आहे.तुम्हीच पहा ना राज्य मराठी,भाषा मराठी,माणसे मराठी,राज्यकर्ते मराठी ,पोलीस मराठी,म्युनसीपालटीचा कारभार मराठी तरीही मुंबईत मराठी माणूस कमी होत आहे.काय करणार आपण.

कन्नमवार नगराविषयी म्हणत असाल तर ती म्हाडाची वसाहत आहे म्हाडा अधिकार्‍यांनी जर मनावर घेतले तर ते स्वतःच या नगराचा विकास करू शकतात पण................

आपला

कॉ.विकि

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चित्रा Wed, 02/27/2008 - 01:37 नवीन

विकासक? की नागरिक?

विकासक येथे येत आहेत आणि येथील रहीवाशांना उंच ,उंच टॉवर ची स्वप्न दाखवत आहेत. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत.

 तुम्ही लेख तळमळीने लिहीला आहे - समजते.   माझी सहानुभूती आहेच.  पण मुंबई काय, पुण्याच्या सदाशिव पेठेत ३० मजली टॉवर उभे राहिले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.  जेव्हा जमिनी शिल्ल्लक उरत नाहीत, किंवा लोकांना कामाच्या ठिकाणाहून लांब जायचे नसते तेव्हा हे असे होणारच.   पण राहत्या जागांचे टॉवर झाले तर पाणी, प्रकाश, वगैरे यांची काय अवस्था होईल याचा विचारही केलेला नसतो.   यावर माझे एक निरीक्षण की काही स्थानिक मंडळींना टॉवर झाले की सुधारणा झाल्या असे वाटते.  रस्ते रूंद झाले म्हणून ठाण्यातील कित्येक लोकांनी मला गोडवे गाऊन सांगितले.  आज ठाण्याचे पूर्वीचे रूप राहिले नाही ही वस्तुस्थिती आहे.    यात नुसते रूप बदलले म्हणून तळतळाट करण्याचे कारण नाही, पण ते जेव्हा बकाल होत जाते, आणि रूपहीन, कळाहीन होते,   तसेच पाणी, वीज, प्रकाश यासारख्या गोष्टीं मिळत नाहीत, तेव्हा काय?.  पण हे विचारात घेतले जात नाही.  
यावर अजूनही लिहीता येईल पण शेवटी  लोकांच्या बळकट इच्छेसमोर अगतिक व्हायला होते.  शेवटी हा निर्णय स्थानिक रहिवाशांचा आहे याप्रत मी येते. आपल्याला तो बदलता येत असल्यास बदलावा नाहीतर निदान एकत्र येऊन जास्तीत जास्त
हवा,नागरी सुविधा पदरी पाडून घ्याव्यात - पाणी, सूर्यप्रकाश, खेळती हवा,मोकळी मैदाने, शाळा, नाट्यगृहे, पार्किंग इत्यादी.  - नुसतेच इमारतींखालचे पोहण्याचे पूल, ट्रॅक्स नव्हे).   माझ्या माहितीप्रमाणे हे बरेचसे मुद्दे जुन्या इमारतींची डागडुजी नीट होत नाही (सरकारकडून) यामुद्द्यावर सुरू झाले आहेत.   कन्नमवार नगर सध्या "self-development" चे मॉडेल वापरण्याच्या विचारात आहे  असे कळते,     चंद्रशेखर प्रभू यांच्या या लेखातून .  हा लेख वाचून तर वाटते की अशाने सर्व आबादीआबाद होणार आहे.  तसेच मला यात नक्की प्रभूंचा काय संबंध ते कळले नाही.  तसेच मध्यंतरी आयुक्त टी. चंद्रशेखर म्हाडातून बाहेर पडले का पडणार असे ऐकले होते,   त्यांचे या विषयी मत काय होते माहिती आहे का?

  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 03/01/2008 - 15:52 नवीन

चित्रा ताई

आपण लिहीलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्याला धन्यवाद. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा