Skip to main content

लोकशाही - स्वतंत्र भारतातील एक शोकांतिका..

लेखक आर्यन मिसळपाववाला यांनी मंगळवार, 29/08/2023 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का . नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल. शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय. ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे. अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी … धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.

वाचने 21070
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by साहना

साहना यांच्या वरील प्रतिसादांतील मुद्दे खालील नकाशांवरून समजण्यास मदत होईल असे वाटते. . . .

In reply to by चित्रगुप्त

मूळ पेपर ची ओपन आवृत्ती इथे मिळाली, जो नकाशा तुम्ही दिलाय तोच इथे देण्यात आला आहे. ज्यांना आवड आहे ते इथे वाचू शकतात. https://dash.harvard.edu/bitstream/handle/1/33785664/rest_a_00023.pdf?s…

In reply to by साहना

हा सुद्धा अतिशय छान पेपर आहे. उपग्रह रात्रीच्या छायाचित्रावरून देशांतील भागांत किती प्रगती काळाच्या ओघांत झाली आहे आणि त्याचा संबंध ब्रिटिश सत्ता आणि संस्थानिक ह्यांचा प्रभावाशी आहे कि नाही हि माहिती इथे आहे. टीप: भारतीय समाज मागासलेला आहे अशी कडू टिप्पणी मी केली असली त्याचे मूळ कारण इथे आहे. हा अभ्यास भारतीयांनी केला आहे. पण अमेरिकन विद्यापीठांत. कुठल्याही भारतीय विद्यापीठांत ह्या दर्जाचा अभ्यास होत नाही. हेच भारतीय लोक देशांत असते तर कुठे तरी आधार कार्ड चष्म्याच्या नंबर ला लिंक करण्याच्या लायिनीत ह्यांचे आयुष्य गेले असते. खरे तर ब्रिटिश सरकारच्या गुन्ह्याचा पाढा अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचण्यात भारतीय विद्यापीठे आघाडीवर असली पाहिजे होती. https://www.cato.org/research-briefs-economic-policy/impact-colonial-in…

In reply to by साहना

>>>हेच भारतीय लोक देशांत असते तर कुठे तरी आधार कार्ड चष्म्याच्या नंबर ला लिंक करण्याच्या लायिनीत ह्यांचे आयुष्य गेले असते. १) चष्म्याचा नंबर आधारला लिंक करावा अशा पद्धतीची योजना अजुन आणलेली नाही. अशी योजना आणण्यात काही फायदा नाही हे कळणारी मंड्ळी शासनात आहेत. २) आधार अपडेट ऑनलाईन सुद्धा करता येते. ज्या गोष्टी प्रत्येक्ष जाऊन करावे लागते अशा कामाला फार वेळ लागत नाही. आणि हे काही रोजचे काम नसते. एखाद वेळेस वेळ लागला तर त्याने आभाळ कोसळत नसते. >>>खरे तर ब्रिटिश सरकारच्या गुन्ह्याचा पाढा अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचण्यात भारतीय विद्यापीठे आघाडीवर असली पाहिजे होती. भारतीय समाज जुने जाऊ द्या मरणालागुनी म्हणून पुढे जातो... ब्रिटीश, तुर्क, मुघल नालायक होते एवढी माहीती त्यांना पुरेसी असते. आयुष्यात ते त्यांच्यपासुन दुर रहातात. त्यांच्याशी व्यवहार करतांना काळजीपूर्वक करतात. त्यांचा उगा उदो उदो करत बसत नाहीत. भविष्याकडे नजर लाऊन स्वतःची, समाजाची, देशाची त्यांच्या परीने उन्नती करण्याचा प्रयत्न करतात. हे ज्यांना समजत नाही... त्यांचे देव भले करो !

सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे. एकाच वाक्यात सांगता येईल " आज भारतात भिकारी सुद्धा क्यू आर कोड कि काय ते वापरून भीक मागतो " यात प्रगती कि जैसे थे कि अधोगती हे ज्याचे त्याने ठरवावे

In reply to by चौकस२१२

क्यू आर कोड ने पैसे दिले घेतले तर पैसे वाढतात काय? काय कौतूक त्याचं? रोख दिले काय नी क्यू आर ने दिले काय काहीही फरक पडत नाही सरकारला ट्रॅक ठेवता येत असला तरी काळा पैसा करनारे करतातच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्य म्हण्यातील गोम कळली नाही बहुतेक इस्कटून सांगतो - एकीकडे क्यू र कोड साठी लागणारे मोबाईल फोन भिकाऱ्या कडे आले आणि दुसरीकडे आज हि भिकारी आहेत हा या देशातील केवढा मोठा विरोधाभास यात कौतुक पण आहे आणि वैषमय पण आहे असे मला म्हनयायचे होते जसे चांद्रयान पण आहे आणि प्रचंड गरिबी पण आहे हाच तो विरोधाभास हेच ७६ वर्षाचे फलित १ वाक्यात अजून "सुन्यास जास्त सांगणे ना लागे "

मी साहना ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत आहे. साहना ह्यांचे प्रतिसाद आरसा दाखवनारे असतात. आपण देशाबद्दल दवनिय लिहीले म्हणजे देश चांगला होत/ठरत नाही. देशाबद्दल गोड गोडच बोलावे तरच देशप्रेमी असेही काही नाही, सुधारणे साठी कटू सत्य ऐकावेच. साहनांनी जे काही मूद्दे मांडलेत ते बिनतोड आहेत. भलेही इंग्रज गेले पण ते त्यांच्या “मर्जीने” गेले. हे काही खोटे नाही ह्यात स्वातंत्र्य सैनिंकांचा अपमान येतो कूठे? इंग्रजांनी ठरवले असते तर अजून लाखो मूडदे पाडून काही वर्षे भारतात राहू शकले असते ते त्यांना कठीण नव्हते. आणी खरंच जर त्यांना शक्य नव्हते तर त्यांचे खरे कंबरडे हिटलर ने मोडले असे म्हणावे लागेल. बाकी खराब रस्ते, निकृष्ठ ऊपचार सेवा, भरमसाठ लाच खानारी बाबूशाही, घाणेरडी शहरे, बकाल वस्त्या, तुंबलेल्या गटारी, लोकसंख्येवर नियंत्रण नसणे, गरीबी, भूकबळी, काहीही विचार न करता घेतलेली आर्थीक धोरणे, छोटे रस्ते, ट्राफीक हे सगळं खोटं आहे का? इंग्लंड, युरोपच्या तूलनेत आपण कितीतरी मागे आहोत नी हेच साहना सांगताहेत तर मान्य करायला जड का जातंय? बरं आता पर्यंत कोंग्रेसच्या नावाने बोंबलता येत होते पण भाजप सरकार येऊन ९ वर्षे झाली तरी परिस्थीती सारखीच आहे. आता कुणाच्या नावाने बोंबलायचं? लोक देशाबाहेर पळताहेत कारण इथे परिस्थीती चांगली नाही हे खोटंय का? स्वतः मी सुध्दा बाहेर पळून जायचा विचार दुसर्या धाग्यात बोलून दाखवलाय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इंग्रजांनी ठरवले असते तर अजून लाखो मूडदे पाडून काही वर्षे भारतात राहू शकले असते ते त्यांना कठीण नव्हते. आणी खरंच जर त्यांना शक्य नव्हते तर त्यांचे खरे कंबरडे हिटलर ने मोडले असे म्हणावे लागेल.
श्री हिटलर यांनी अगोर्‍यांच्या स्वातंत्र्यलढ्याला केलेल्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदतीला मान्यता दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमती दर्शवायला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. या सर्व परीस्थितीला कुठे तरी आपणच जबाबदार आहोत आणि जबाबदारी केवळ दिखावू देशप्रेमापोटी आपण नाकारत असू तर आपल्या करंटेपणाला काही सीमाच राहणार नाही. फक्त असं करतांना काँग्रेसला अतिशय अश्लाघ्य भाषेत दूषणं देणं आणि त्यापेक्षा कठोर टीका ज्यांच्यावर करावी अशा मोदी आणि भाजपवर किरकोळ टीका करावी असा दुजाभाव चांगला नाही. त्यावर कडी म्हणजे मी खूप काही लिहू शकते परंतू माझे विचार समजण्याची तुमचीच कुवत नाही असा आव आणायचा. हे कुणाला आवडेल?

In reply to by सर टोबी

काँग्रेसला अतिशय अश्लाघ्य भाषेत दूषणं देणं आणि त्यापेक्षा कठोर टीका ज्यांच्यावर करावी अशा मोदी आणि भाजपवर किरकोळ टीका करावी . का? काँन्ग्रेस पेक्षा जास्त शिव्या खाण्याच्या लायकीचा भाजप आहे हा तुमचा पण एकांगी पणा

In reply to by चौकस२१२

माझ्या एकांगीपणाचं सोडा. भक्तांची ज्या कडक शब्दात मी निर्भत्सना करतो तशी तुमची करू नये यासाठी तुमची काय पुर्वपिठीका आहे ते सांगा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हो आम्ही हि "पळून" गेलोय पण ते - भारताचा दुस्वास म्हणून नाही - तर फक्त स्वतःचं स्वार्थसाठी ,,, पण पळून गेल्यार जी काही वर्षे झाली त्यात भारतात राहून जे काय अर्थवयवहाराला हात भार लावला असता तेवढा तरी एकूण सर्व भेटीतून लावला आहे बाकी राहिले ब्रेन ड्रेन वैगरे आपण काही हुशार कॅटॅगिरीतील नाही त्यामुळे तो आरोप आपल्यावर तरी होऊ शकत नाही आणो तसेच भारतात राहिलेले कितीतरी आय आय टी चे विंजिनियर शेवटी बँकेतून काम करताना दिसतात .. बरं आता पर्यंत कोंग्रेसच्या नावाने बोंबलता येत होते पण भाजप सरकार येऊन ९ वर्षे झाली तरी परिस्थीती सारखीच आहे. निदान काँग्रेस येवधी वर्षे तरी द्या मग बोला? काय जादूची कांडी आहे का कोणाकडे आणि भाजप काय काँग्रेस चा बाप आला तरी लोकांनी आधी मनावर घेतले पाहिजे ना ? अनेक प्रश्न शेकडो वर्षाचे आहेत .. उदय राहुलजींचा नातू गादीवर आला तरी त्यातील किती सुटतील? मर्सिडीज घ्य्याची ऐपत असते / शिक्षण असत पण रस्त्याचे नियम पाळत नाहीत हि आहे परिस्थितीती.. काँग्रेस काय किंवा भाजा काय करणार डोंबल

स्वतः मी सुध्दा बाहेर पळून जायचा विचार दुसर्या धाग्यात बोलून दाखवलाय. कधी जातायं त्या वंडरलॅण्ड मधे?लवकर निघा नाहीतर तिथेही गर्दी होईल. सहाना यांच्यी मते पुर्वग्रहदुषीत आहेत असा निष्कर्ष त्यांच्याच एका प्रतिसादांतून निघू शकतो.पण तुमचे काय? अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली,तेथील लोकसंख्या किती,नैसर्गिक संसाधने किती व तुलनात्मक दृष्टीकोनातून भारताची काय परिस्थिती? याचा विचार कधी केलात का? युरोपियन औद्योगिक क्रांतीचे पडसाद जसे इतर देशावर पडले तसे भारतावरही पडले.फायदा मात्र सायबाला झाला. सुधारणा फक्त जिथे सायेब रहात होते तिथेच झाल्या. १८९० किंवा त्याच्या आसपास पुण्यात विज,आगगाडी,पोस्ट ऑफिस होते पण थोड्याच अंतरावर आमचे गाव तीथे मात्र १९६० उजाडले का बुवा.... दीडशेहून अधिक काळ या देशावर राज्य करून येथील अर्थ व्यवस्था खिळखिळी केली,जाती,धर्म यांची भुतावळ व दोन फाळण्या करून या देशाला पंच्याहत्तर वर्षात चार युद्ध करावी लागली. तुम्हांला काय सांगायच तुम्ही ज्या आरशात बघतायं त्याचा दोष नाही म्हणता येणार कारण शेवटी डोळे तुमचे आहेत. जयचंद होता म्हणून घोरी आला,नजीब खान होता म्हणून अब्दाली आला. असेच काही लोक होते म्हणून साहेब रुजला, फोफावला. दुसर्‍या महायुद्धात सायबाला मदत करा म्हणजे स्वातंत्र्य मिळेल म्हणण्या पेक्षा सुभाषचंद्र बोस यांना साथ द्या म्हणले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. जाऊ द्यात, तुम्ही काय ते काय आपलेच दात आणी आपलेच ओठ.

खर तर आपल्यात आणि युरोप - अमेरिकेत राहणीमानाचा दृष्टीने भरपूर दरी आहे हे कोणीही मान्य करेल. पण कदाचित २०-३० वर्षांपुर्वी ही दरी मोठी असेल. मला आजही आठवतंय माझ्या गावाहून पुण्याला यायला अख्खा एक दिवस जायचा, अत्ता एका दिवसात जाऊन येऊन होतय. गावाहून तालुक्याला जायला तासन् तास एसटी ची वाट बघायला लागायची आज कोणीही एसटी साठी थांबत नाही. माझ्या लहानपणी परीक्षा असली की पोरांच्या नाकात काजळी जमा होत असे कारण लाईट ही नसायचीच. आज गावात २४ तास लाईट असती. सणाच्या दुसऱ्या दिवशी गावातील काही आया बाया भिक मागायला नक्कीच येत असत आज तसा विचारही कोणी करत नाही कारण गावातच रोजगाराच्या संधी तयार झाल्यात. उन्हाळा आला किंवा घरी कोणी पाहूणा आला की आमच्या अंगावर काटे येत असत कारण पाण्याची सोय नव्हती आज घरा घरात पाणी आलय. सगळेच प्रश्न संपलेत असं नाही आजही आपण बऱ्याच गोष्टीत मागे आहोत पण हळू हळू आपलीही प्रगती चालू आहे. त्यामुळे आजचा भारत आणि प्रगत देशामधील की दरी आहे कदाचित काही दशकात नक्कीच कमी झालेली असेल.

खर तर आपल्यात आणि युरोप - अमेरिकेत राहणीमानाचा दृष्टीने भरपूर दरी आहे हे कोणीही मान्य करेल. पण कदाचित २०-३० वर्षांपुर्वी ही दरी मोठी असेल. अतिशय कठीण परिस्थितीत संघर्ष करुन आयुष्य या टप्प्यावर पोहचले. कधी वाटले नव्हते अम्रीका,फ्रान्स बघायला मिळेल. प्रथमदर्शनीच काय कळाले... आई बाप मुला नातवंडांना भेटायला आली की यांना भिती वाटते. बेबी सिटींग करता आलात का म्हणून चौकशी करायला घरी येतात. यांना यांच्या डे केअर व्यवसायाचे नुकसान दिसते. कधी कधी तुम्ही खरचं नोकरी करता का म्हणून घर तपासायला येतात. कोण कधी कुठे बंदूक काढेल सांगता येत नाही. शेव रेवड्या घ्याल तसे तिथे बंदूक मिळतात. मांजर हरवली तर सगळ्या पंचक्रोशीत हॅण्ड बिल्स लावतात. आईबाप मात्र मुलांना भेटायला आल्यावर हॉटेलात रुम घेऊन राहातात. १०४ ताप आल्याशिवाय दवाखान्यात येवू नका म्हणून सांगतात. फुकट हेल्थ केअर म्हणून दामदुप्पट विमा उकळतात. मुलांना थोडे जरी रागावलात तर पोलिसांना फोन करेन म्हणून धमकी मिळते. लहान अबोध बाळक काही कारणास्तव रात्री अपरात्री यदाकदाचित रडले तर कडक सुटाबुटात काॅप्स दारात हजर. आमच्याकडं बघा सगळंच मोकळं ढाकळं. आणखीन असे कितीही लिहू शकतो. आता यावर कडाडून हल्ला होण्याची शक्यता नाकारत नाही. पण अम्रीके व भारत यांची तुलना करणे म्हणजे संत्रे इक्वल टू एपल म्हणण्या सारखे आहे. चांदणे भौ,आपल्या मताशी मी सहमत आहे. काँग्रेस, जनता,भाजप्पा कोणीही असो देश पुढे नेत आहेत. जनता जागृत होत आहे. स्वातंत्र्य पुर्व पिढी संपत आली आहे. नव्या पिढीने अटकेपार नव्हे तर चंद्रावर झेडें लावलेत. सुंदर पिचई,नडेला आणी अनेक भारतीय विद्वान कित्येक परदेशीयांना आपल्या पंखा खाली घेऊन आकाश भ्रमंती करता आहेत. आता, उडदा माजी काळे गोरे असणारच. थोडा वेळ द्या. उल्टी गंगा वाहाण्यास सुरवात झाली आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

१०४ ताप आल्याशिवाय दवाखान्यात येवू नका म्हणून सांगतात. याचा अर्थ निशाकाळजी पणा असतो असे म्हणेन बरोबर नाही येथेही डॉक्टर किरकोळ तापला उगाच औषध देत नाही . पाणी / अर्रम आणि पॅरासिटोमॉल वर भागवा म्हणतो नाण्याची दुसरी बाजू पण बघा सार्वजनिक आरोग्य यासाठी सरकार जागरूक असते ,, उदाहरण आपली पॅथॉलॉजिकल चाचणी मधून काही सार्वजनिक आरोग्यास धोकादायक जसे कि लिजीनर्स डिसीज वैगरे तटी बी तर इ चहसानी हि खाजगी असली तरी सरकारी + खाजगी यंत्रणा अशी आहे कि लगेच नोंद होते आणि बुलावा येतो अर्थात हे मी ऑस्ट्रेल्या तील वैद्यकीय अनुभवातून सांगतोय .. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्राचे काम कदाचित वेगळे असावे .. ( हायला अमेरिकेचं मानाने मग आमची / इंग्लंड ची सिस्टीम म्हणजे कम्युनिस्ट कि ) मुलांना थोडे जरी रागावलात तर पोलिसांना फोन करेन म्हणून धमकी मिळते. इथे मात्र पाश्चिमात्य देशात "फ्रीडम ऑफ .. चा गैरवापर "असे मान्य आहे

माझ्या भारतातल्या, अमेरिकेतल्या आणि फ्रान्समधल्या (दीर्घ म्हणता येईल अश्या) वास्तव्यातून जाणवले ते असे, की आपापल्या दृष्टीकोणातून अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी (चांगल्या - वाईट म्हणा हवेतर) सगळीकडेच असतात. आपले वय, संस्कार, व्यवसाय, आवडीनिवडी, मनोभूमिका, जबाबदार्‍या, वगैरेनुसार आपले मत बनत जाते. मी वयाच्या चौतिसाव्या वर्षी अमेरिकेतील एका संग्रहालयात चित्रकार म्हणून काम केले होते, पण तेंव्हा आपण तिथे कायमचे रहावे, असे वाटले नाही. तरूण वयातही तिथले मला आकळलेले जीवन आपल्याला मानवणार/झेपणार नाही, असे वाटले. दिल्लीत रहाणे आणि अमेरिकेत रहाणे, यात त्याकाळी जो फरक होता, त्यात मला दिल्लीत रहाणेच जास्त पसंत होते. मात्र पुढे दिल्लीतली गर्दी, प्रदूषण बेसुमार वाढल्यावर मात्र ते नकोसे झाले. -- आता सगळ्या व्यापातून मुक्त झाल्यावर मला कुठेही राहिले तरी फारसा फरक पडत नाही. काही मिळवण्याची इच्छा आणि जबाबदारी काहीच नसल्याने आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे,आणि छंद चालवता आले पाहिजेत, येवढेच पुष्कळ वाटते. लोकांचे म्हणाल तर मला सगळीचकडे चांगले लोक भेटतात, किंवा कशाचा आग्रह नसल्याने सगळेच चांगले वाटतात असेही म्हणता येईल. -- बाकी राजकीय सत्ता मिळवणे, ती टिकवून ठेवणे, सरकार चालवणे हा वेगळाच प्रकार असतो, त्याविषयी काहीच बोलायची माझी कुवत नाही, आणि आवडही नाही. माध्यमातून जे काही आपल्याला खरे-खोटे कळत असते, त्यातून आपली मते बनत असतात, त्यांनाही खरेतर आपल्या वैयक्तिक जीवनात काहीच अर्थ नसतो. उगाचच्या टिवल्याबावल्या, तात्पुरते मनोरंजन एवढेच.

भारताला स्वातंत्र्य मिळाले हे चांगले का वाईट?

In reply to by अहिरावण

यात करायचं/ठरवायचं काय? चांगलंच. आता तुमचीच लोकं तुम्हाला फसवू लागली किंवा अप्रामाणिक झाली तो तुमचा दोष. दोन घरं पुढे आणि तीन घरं मागे अशी चाल सुरू होते. चाललेल्या दोन घरांचा डांगोरा पिटतात. (डंका वाजवतात).

In reply to by कंजूस

यावर सोप्पा उपाय आहे. तोंड फिरवून उभे रहा. दोन घरं पुढे हे आता दोन घरे मागे होईल आणि तीन घरे मागे हे तीन घरे पुढे होईल. हाकानाका.... कसे !

In reply to by अहिरावण

भारताला स्वातंत्र्य मिळाले हे चांगले का वाईट? हा काय खोडसाळ प्रश्न, चांगले कि ,,,,शेवटी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य .. गुलामी ती गुलामी च्यामारी आमचं आजा / पंज्यानी नि राणी ला "राम राम ठोकला" आणि काही वर्षांनी देश बदलल्याने आम्हाला राणीला "राम राम " करावं लागतो ( दोष आमचा ) २००० साली प्रयत्न झाला राणीला येथूनही "राम राम टाटा करण्याचा.".. पण हरलो तुम्ही भारतवासी जिकलात तर करा कि आनंद .. कशाला असले दळभद्री प्रश्न विचारताय ?

In reply to by चौकस२१२

यात काय खोडसाळपणा ते कळाले नाही. अहो वरती अनेक जण त्यांचे आईवडील आजोबा नाकर्ते होते त्याचे खापर सरकारवर फोडत होते म्हणुन विचारले की नक्की काय समजायचं आमच्यासारख्या दरिद्री भारतीयांनी ते परदेशात राहून श्रीमंत झालेल्या महान लोकांना विचारत होतो. तुम्ही नका फार मनावर घेऊ.. :)

In reply to by अहिरावण

स्वातंत्र्य मिळाले ? गोरा साहेब गेला आणि आपला साहेब आला. सामान्य जनतेला किती फरक पडला हे आपण कोण आहात ह्यावर अवलंबून आहे. सामान्य जनतेचा मानेवरील जोखडाचे नाव फक्त बदलले. लगान दुगना नाही तरी GST तिप्पट झाला ! भारत इंग्रजाच्या गुलामीत जास्त काळ राहणे शक्यच नव्हते आणि असला तरी भारतीयांना ब्रिटिश नागरिकांच्या बरोबरीने हक्क मिळणे सुद्धा कमीच शक्य होते. ब्रिटिश सत्तेखाली भारतीय नागरिकांना कमी राजकीय हक्क असते पण जास्त अभिव्यक्ती आणि आर्थिक हक्क असते असे मला तरी वाटते. सध्या देशांत जे कायदे आहेत उदाहरणार्थ आरक्षण, RTE, SC/ST कायदे इत्यादी असणे शक्य झाले नसते. भारतीय लोकांना सध्या जास्त राजकीय हक्क आहेत आणि कमी अभिव्यक्ती तसेच आर्थिक हक्क आहेत. राजकीय हक्कांचा वापर करून इतर हक्क मिळवता येतात पण त्यासाठी समाज प्रगल्भ असणे गरजेचे आहे. भारतीय समाज तसा अजून तरी नाही. पण आर्थिक हक्क जास्त मिळाले म्हणून जनता राजकीय हक्क मिळवू शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे.

कुणाला फ्रेंच गुएना बद्दल माहीती आहे का? तिथल्या नागरीकांना फ्रेंचचं नागरीकत्व असते नी सर्व सुविधा असतात असे वाचले होते, त्याचे काही फायदे तोटे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तसे तर फ्रान्समधील नागरीकांणा पण फ्रेंच नागरीकत्व असते म्हणे. तिथे काही दिवसांपूर्वी सरकारविरुध्द लोक बोंब मारत होते. त्यांना सांगायला पाहिजे असं नका करु म्हणून.

In reply to by अहिरावण

फ्रान्समधील नागरीकांणा पण फ्रेंच नागरीकत्व असते म्हणे. तिथे काही दिवसांपूर्वी सरकारविरुध्द लोक बोंब मारत होते.
पुष्कळ गुंतागुंतीचा विषय आहे, आणि त्यामागे गेल्या काही शतकातल्या विविध गोष्टी आहेत. ब्रिटिश, युरोपियन, अमेरिकनांनी केलेल्या अगणित जुलूमांचे परिणाम आता प्रकट होऊ लागलेले आहेत. त्यांचा सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता त्यांचे रक्षण करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा त्यांचा बळी घेणार देवाक ठाऊक.

In reply to by चित्रगुप्त

>>>त्यांचा सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता त्यांचे रक्षण करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा त्यांचा बळी घेणार देवाक ठाऊक. कोणास ठाऊक सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता सर्वनाश करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा वाचवणार !!

ण अम्रीके व भारत यांची तुलना करणे म्हणजे संत्रे इक्वल टू एपल म्हणण्या सारखे आहे. एकतर अशी तुलना करणे योग्य नाही ,,दोन केवढे वेगळे देश मूल्यमापन कराय चे दोन्हीकडे काही वर्षे तरी घालवून मग करावी !