Skip to main content

खेळ आणि शिक्षण, ह्या माध्यमातून होणारे धर्मांतरण......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 07/06/2023 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
गेमिंग जिहाद बाबतीत, ह्याच महिन्यात वाचलेल्या काही बातम्या... डिसक्लेमर.... 1. खालील बातम्या छापील आहेत.... 2. कुणा बरोबर वाद विवाद घालायचा आणि कुणा बरोबर नाही? हा माझा वैयक्तिक अधिकार आहे .... ------ गेमिंग जिहाद: पाकिस्तान के बाद अब सामने आया गुजरात कनेक्शन, पुलिस को फोन कॉल से मिली मतांतरण की खुफिया जानकारी (https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttar-pradesh/ghaziaba…) ------ https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.dnaind… ------ गाजियाबाद: धर्मांतरण का पाकिस्तान कनेक्शन... आखिर बच्चों को कौन निशाना बना रहा? जांच एजेंसी ने खोली गाजियाबाद टु गुजरात फाइल्स (https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/state/uttar-…) ----- गेम जीतना है तो कुरान पढ़ो:धर्मांतरण का नया सिंडिकेट गेमिंग एप पर करता नाबालिगों का ब्रेनवॉश, 3 राज्यों के चार लड़के फंसे (https://www.google.com/amp/s/www.bhaskar.com/amp/local/uttar-pradesh/gh…) ------- मुंब्रा मधील, 400 हिंदूंचे धर्मांतरण ... https://www.marathi.hindusthanpost.com/social/conversion-of-400-hindus-… ------- गंगा जमना स्कूल.... दमोह के जिस गंगा जमना स्कूल ने गैर मुस्लिम छात्राओं को पहनाया ‘हिजाब’, वहाँ प्रेयर में ‘दुआ’ भी होती है: मध्य प्रदेश सरकार ने दिए जाँच के आदेश (https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/damoh-ganga-jam…) -----' MP: दमोह में हिंदू लड़कियों को हिजाब पहनाने वाले स्कूल पर बड़ी कार्रवाई, प्रशासन ने खत्म की मान्यता (https://www.google.com/amp/s/www.tv9hindi.com/state/madhya-pradesh/madh…) ------ दमोह के गंगा-जमुना स्कूल में धर्मान्तरण का मामला, प्रबंधक कमेटी पर एफआईआर दर्ज, बच्चों के बयान पर की गई कार्रवाई https://www.palpalindia.com/2023/06/07/madhya-pradesh-Damoh-Ganga-Jamun… ------- खेळ आणि शिक्षण, ह्या पवित्र माध्यमांचा वापर देखील, कट्टर धर्मियां कडून होत आहे , असेच जाणवते.... ------

वाचने 4986
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by Trump

लव जिहाद ... शिक्षणा मार्गे ..... मोबाईल गेम मार्गे.... मनोरंजन मार्गे पण होऊ शकतो ..... (नाटक, सिनेमा, पथनाट्य, कव्वाली इत्यादि... ह्या द्वारे आपलाच धर्म किती चांगला, हे सतत बिंबवणे...) कायद्याच्या चौकटीत राहून .... (सज्ञान पाल्य असेल तर, पालक काहीही करू शकत नाहीत ....) ह्या पैकी, सध्याच्या घटकेला, लव जिहादचा वाटा खूप मोठा आहे, म्हणून तो धागा वेगळा काढला ..... पण, हा धागा इतर मार्गाने होणार्या धर्मांतरणासाठी .... -------- नौकरी, धंदा, जोडीदार ह्या मार्गाने देखील धर्मांतरण होण्याचे दिवस दूर नाहीत, असा अंदाज आहे ..... वरील पैकी नौकरी बाबतीत, स्वानुभव आहे.... आखातात नौकरी करत असतांना, ही ऑफर आली होती .... पैशांपेक्षा धर्म मोठा, ही शिकवण असल्याने, मी ती ऑफर नाकारली.... पण, एखाद्याची आर्थिक परिस्थिति नाजूक असेल तर, तो हा मार्ग नक्कीच पत्करू शकतो....

In reply to by मुक्त विहारि

"हलाल अर्थवयवस्था" हा हि एक मोठा भाग आहे ,, सखोल विषय आहे गेलाय वर्षी पासून येथे शॉपिंग माल मध्ये रमझान मुबारक चे फलक जास्त प्रमाणात लागू लागले आहेत असे माझे निरीक्षण , दिवाळी ला बघू काय होतय ते समान वागणूक मिळाली तर ठीक नाही तर हे एकाच अल्पसंख्यांकांचे तुशितकरण यात "विलिंग लेफ्टिस्ट इडिओट्स बाली पडता हे सिद्ध होईल "

लगे रहो पाकिस्तानात करियर बुडू नये म्हणून युसूफ योहाना, महंमद युसूफ झाला होता. दानिश कनेरियाच्या करियरची वाट लागली.तीलकरत्ने दिलशानला मैदानावर इस्लामचा डोस पाजला होता. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. गल्लीबोळात काय खेळ चालले आहेत हे उघड होऊ द्या की

हा जर मोजायचा म्हटला तर एक हजारबाराशे पानाचा ग्रंथ होईल. अगदी वेगळा धागा होऊन सुपरहिट होण्यापर्यंत!

In reply to by प्रचेतस

ह्या ना त्या मार्गाने, हिंदूचे धर्मांतरण होत आहे... बरं, हे मनाचे खेळ आहेत, असेही नाही.... छापील बातम्या आहेत.... लहान मुले आणि स्त्रीया, अशा गोष्टींना पटकन बळी पडतात... जे काही समाजांत होत आहे, त्याचीच लिंक दिली आहे....

In reply to by प्रचेतस

माझे मत थोडे वेगळे आहे. समाजात घडणाऱ्या गोष्टीं काही लोकांना चहाच्या पेल्यातले वादळ वाटते तर काही मुळापासून अस्वस्थ होतात. काही त्याला लोकांसमोर मांडून अस्वस्थ मनाला शांत करायचा प्रयत्न करतात. आपल्या सारखा सामान्य माणूस या पेक्षा जास्त काहीच करू शकत नाही. समाज हा हत्तीसारखा आपल्याच धुंदीत चालत असतो. होणाऱ्या घटनांचे संकलन आहे. मुवी धन्यवाद. प्रतिसाद वाचतोय. फा पा व चौकस भौ चे निरिक्षण खरे आहे. कालाय तस्मै नमः.

In reply to by कर्नलतपस्वी

@मुवि, @कर्नलसाहेब आपल्या मताचा आदर आहेच, मात्र मला जे पटलं नाही ते स्पष्टपणे सांगितलं इतकंच.

बॉलिवूडमध्ये सिनेमात इस्लामचे उदात्तीकरण हे तर कायमचे आहे. सरदारजी मूर्ख, पंडित लालची वा स्त्रीलंपट, पारसी विनोदी, नेपाळी गुरखा अशी पात्रयोजना फार वेळा दिसून येते. मुसलमान पात्र मात्र धार्मिक, जीवनाचे मूल्य जाणणारा, मदत करायला तत्पर, वाईटाविरुद्ध लढताना प्रसंगी प्राणाची आहुती देणारा असेच दाखवणार. मला आठवते काही चित्रपटात खलनायक असलेले मुस्लिम पात्र देखील परिस्थितीने मजबूर दाखवले गेले होते. मुकद्दर का सिकंदरमध्ये अमजदखान रेखावर प्रेम करतो म्हणून अमिताभशी लढताना दाखवले आहे. या शृंखलेमध्ये सगळ्यात घातक कलाकार असेल तर तो आमिर खान! संसदेवर हल्ला 2002 साली झाला होता. 2006 पर्यंत चित्र स्पष्ट झाले होते की काश्मिरी फुटीरतावादी पाकिस्तानच्या मदतीने हे घडवत होते. 2006 साली आलेला रंग दे बसंती हा चित्रपट या घटनेचे उदात्तीकरण करणारा होता. सरफरोश चित्रपटात नसिरुद्दीन खलनायक होता तो पण मरताना परिस्थितीमुळे गांजलेला दाखवला होता, आणि हे कमी पडले म्हणून एक मुसलमान इन्स्पेक्टरचे (मुकेश ऋषी) पात्र देशभक्तीपर टाकून बॅलन्स केला होता. अशी असंख्य उदाहरणे आहेत

In reply to by फाटक्यात पाय

आदरणीय श्री फाटक्यात पाय महोदय,
सरफरोश चित्रपटात नसिरुद्दीन खलनायक होता तो पण मरताना परिस्थितीमुळे गांजलेला दाखवला होता, आणि हे कमी पडले म्हणून एक मुसलमान इन्स्पेक्टरचे (मुकेश ऋषी) पात्र देशभक्तीपर टाकून बॅलन्स केला होता.
सरफरोश चित्रपटाबद्दल अजूनपर्यंत कुणी असा विचार केलाच नव्हता. पण आपण आपल्या प्रतिसादातील हा मुद्दा मांडून नक्कीच सर्व हिंदूंचे डोळे उघडले असतील. मुसलमान इन्स्पेक्टर सलीम (मुकेश ऋषी) हा चांगला, देशभक्त दाखवला. असे दाखवणे हा तर खरा देशद्रोह होता. खरेतर पोलीस दलात असलेले सगळे मुस्लिम अधिकारी हे नक्कीच भ्रष्ट, देशद्रोही, अतिरेक्यांना मदत करणारे असणार आणि सरफरोश चित्रपटातून "चांगला मुस्लिम पोलिस अधिकारी" असा गैरसमज जनतेत पसरवला गेला नसता तर २०१४ साली सत्तेत आलेल्या स्वच्छ, प्रामाणिक , राष्ट्रहितवादी सरकारला अशा सगळ्या (मुस्लिम) पोलिस अधिकार्‍याविरुद्ध व्यापक कारवाई आरंभता आली असती (निदान या सरकारने व्यापक राष्ट्रहित लक्षात घेवून पोलिस व लष्करी दलातील मुस्लिमांची नवीन भरती तर नक्कीच थांबवली असेलच म्हणा) . त्यामुळे सरफरोश चित्रपटाने केलेले राष्ट्राचे नुकसान किती खोलवर आणि दूरगामी आहे हे समजते. पण साध्या भोळ्या , भाबड्या हिंदू जनतेने हा चित्रपट डोक्यावर घेतला ही त्यांची गंभीर चूक म्हणायला हवी आणि आपण लोकांचे डोळे उघडलेत याबद्दल हिंदूच्या अनेक पिढ्या आपल्या शतशः ऋणी राहतील यात शंकाच नाही. आता प्रायश्चित्त म्हणून सरफरोश बघितलेल्या प्रत्येक हिंदूने "द केरल स्टोरी" किमान दहा वेळा तरी बघायलाच हवा. तसेच "I Hate sarfarosh" वा तत्सम हॅशटॅग जोरदारपणे चालवायला हवा. जाता जाता - सरफरोश चित्रपटाची खरीखुरी श्रेयनामावली देत आहे. तर कंसातली नावे ही त्या हरामखोर आमिर खानने भोळ्याभाबड्या हिंदूंचा बुद्धीभ्रम करण्याकरिता प्रसिद्ध केलेली फसवी नावे आहेत निर्माता - आमिर खान (जॉन मॅथ्यू मॅथन) दिग्दर्शक - आमिर खान (जॉन मॅथ्यू मॅथन) कथा - आमिर खान (जॉन मॅथ्यू मॅथन) पटकथा - आमिर खान (जॉन मॅथ्यू मॅथन) संवाद - आमिर खान (हृदय लानी, पथिक वत्स)

In reply to by तर्कवादी

सरफरोश चित्रपटाबद्दल मी मांडलेले मुद्दे तुम्हाला कदाचित कळले नाही. आमिर खान चित्रपटसृष्टीत परफेक्शनिस्ट मानला जातो, याचा अर्थ तो त्या चित्रपटाची कथा , पार्श्वभूमी, कॅरेक्टर सर्व तपासत असणार! मुस्लिम कॅरेक्टर पोलीस असण्याला नाही तर त्यात जे उदात्तीकरण आहे त्याला विरोध आहे. एका सीनमध्ये मुकेश ऋषीला इस्लामचा हवाला देऊन अतिरेक्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर मुकेश इस्लामवर प्रवचन देतो. जरा ते रंग दे बसंती वर देखील आपले मत व्यक्त करावे.

In reply to by फाटक्यात पाय

रंग दे बसंती आणि संसदेवर हल्ल्याचा काय संबंध ? (नाही, रंग दे बसंती सिनेमा ठीकठाक असला तरी त्यातला राजकारण्यांना ठार करा, रेडिओ स्टेशन हैजॅक करा संदेश बकवास आणि खूप चुकीचा आहे ह्याबद्दल दुमत नाहीये.) पण त्याचा संसदेवर हल्ल्याशी काय संबंध बुवा ? उलट विमान क्रॅश होऊन अनेक पायलट मृत्युमुखी पडत होते, विमान खरेदीत (काँग्रेस) सरकारने भ्रष्टाचार केला असे सुचविणारा सिनेमा आहे तो. संसदेवर हल्ल्याचे उदात्तीकरण कुठूनही दिसत नाही. आणि का बुवा ? मुस्लिम लोक आपल्या धर्माचा हवाला देऊन काही चांगले बोलू शकत नाहीत ? हा कोणता नियम आहे ?

In reply to by कॉमी

संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू हा उच्चशिक्षित होता, आपल्या चित्रपटातील तरुण मंडळी देखील आहेत. अफझलच्या मते व काश्मिरी फुटीरतावाद्याच्या मते हे कृत्य देशहितासाठी होते. पण आपल्या न्यायालयाने ते अतिरेकी मानून फाशीची शिक्षा दिली. कदाचित अफझल न्यायालयाला ते पटवू शकला नव्हता की त्याने हे कृत्य का केले, आमिरने चित्रपटाच्या माध्यमातून पटवून दिले. चित्रपट हिट जाण्याचा अर्थ हाच होतो की लोंकाची सहानभूती अतिरेकी प्रवृत्तीच्या कॅरेक्टरना होती. मुस्लिमांनी सिनेमात जरूर त्यांच्यात जे चांगले आहे ते दाखवावे. पण त्यांच्यातल्या वाईट चालीरीती मांडल्या की तो इस्लामोफोबिया होतो. आतापर्यंत हिंदू संघटनांनी कधीही जो हिंदूंचा वा हिंदू संस्कृतीची चेष्टेवर टोकाला जाऊन विरोध केला नव्हता, पण परत आमिरचाच पिके आला आणि हिंदुत्ववाद्याच्या हातात कोलीत देऊन गेला. तिथूनच हे उदात्तीकरण मोजायला सुरुवात झाली. धर्मेंद्रचा बाजी चित्रपट. मिथुन हे मुस्लिम कॅरेक्टर दाखवले आहे, हा इस्लामचा सच्चा उपासक बांगेचा आवाज ऐकल्यावर नमाज पढायला वाकतो. तेव्हा आठवत नाही कोणी इस्लामी विद्वान पुढे येऊन बोलला की बाबा आझान नमाज पढायला बोलावली जाणारी खूण आहे, आझानला नमाज पढत नाही. कारण त्यावेळी इस्लामी कट्टरपंथीना पण माहीत होते की यात इस्लामचे उदात्तीकरणच दाखवले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत

In reply to by फाटक्यात पाय

(आमिर खान पीके बनवत असताना) राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा (तर अभिजात जोशी बहुधा हे छायाचित्र टिपत होता) photo बरं आता आमिर खानचा विषय चाललाच आहे तर आमिरच्या (हो ..इथे तर सहनिर्माता म्हणून त्याने स्वतःचं नाव अधिकृतरीत्या दिलंय !!) "सिक्रेट सुपरस्टार" चित्रपटाबद्दलही ज्ञानामृताचे काही थेंब पाजलेत तर अज्ञानी आणि भोळे भाबडे हिंदू आपले ऋणी राहतील.

In reply to by तर्कवादी

सिक्रेट सुपरस्टार पाहिला आहे. इस्लामवर टीका नसून व्यक्तिदोष दाखवला आहे. आपल्या मुलीला बुरख्यात ठेवत असताना त्याला विरोध करणारी आई वा मुलगी कुठेही इस्लाममधील कुप्रथेवर बोलत नाही. रच्याकने ती बुरसटलेला गुलामी पडदा त्यागणारी सुपरस्टार आजकाल बुरख्यातच असते म्हणे! आमचा सुपरस्टार कधी उल्लेख पण नाही करत याचा! याचसाठी प्रबोधन केले होते का?

In reply to by फाटक्यात पाय

सरफरोश चित्रपटाबद्दल मी मांडलेले मुद्दे तुम्हाला कदाचित कळले नाही.
अरे बापरे.. अजूनही कळले नाही का मला .... अरे कर्मा.. आता काय नी कसं होणार माझं !!
आमिर खान चित्रपटसृष्टीत परफेक्शनिस्ट मानला जातो
चित्रपटसृष्टीला जे मानायचं ते मानूद्या हो.. तुम्ही (आणि आता तुम्ही डोळे उघडल्यावर मी) तर त्याला हरामखोर, घातक , हिंदूविरोधी मानतो ना मग झालं तर.
मुस्लिम कॅरेक्टर पोलीस असण्याला नाही तर त्यात जे उदात्तीकरण आहे त्याला विरोध आहे.
तेच तर ना.. म्हणजे मुस्लिम कॅरक्टर पोलीस दाखवला तर त्याला देशभक्त दाखवायला नको.. देशद्रोहीच दाखवायला हवा.. बरोबर ना ? म्हणजे मला मुद्दा कळाला की ओ..
एका सीनमध्ये मुकेश ऋषीला इस्लामचा हवाला देऊन अतिरेक्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर मुकेश इस्लामवर प्रवचन देतो.
तेच तर .. . त्याऐवजी मुकेश ऋषी गुपचूपपणे अतिरेक्यांना मदत करतो असे दाखवले असते तर आणि तरच ते वास्तववादी झाले असते पण हरामखोर आमिर खान असे का दाखवेल ना !!
जरा ते रंग दे बसंती वर देखील आपले मत व्यक्त करावे.
काय झालं ना की ते सरफरोश डोक्यावर घेतलेल्या अज्ञानी, भोळ्याभाबड्या जनतेत माझाही सामावेश होता, पण मग तुम्ही असे खाडकन डोळे उघडलेत... मग रंग दे बसंती बद्दल आणखी मी काय बोलणार तसाही मला तो चित्रपट फारसा आवडला नव्हताच.. नीटसा आठवतही नव्हता. पण एका केंद्रीय मंत्र्याची हत्या होते असं काहीसं त्यात आहे आणि आता विकीपीडीयावरही तपासलं. त्यामुळे संसदेवरील हत्येचा संबंध कळाला नव्हता आणि अजूनही कळाला नाही.. आता माझ्या बुद्धीचा आवाका थोडा मर्यादित असल्याने असं होत असावं.. पण तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच काहीतरी जबरदस्त संबंध असेल. बाकी इथेही आमिर खानने कथेसाठी कमलेश पांडे, निर्माता दिग्दर्शक म्हणून राकेश ओमप्रकाश मेहरा अशी खोटी नावं प्रसिद्ध केलेली दिसतायंत. खरंतर या सगळ्या जबाबदार्‍या त्यानेच पार पाडल्या असणार नाहीतर कोणता निर्माता दिग्दर्शक नायकाला आपला अजेंडा राबवू देईल ना

बॉलिवूडमध्ये सिनेमात इस्लामचे उदात्तीकरण हे तर कायमचे आहे. आणि जाहिरात क्षेत्रात पण ती चहाची जाहिरात आठवा , संकुचित पणा काय तो फक्त हिंदूकडे भरलेला आणि उदारमतवादी विचार मात्र मुसलमानांचे ... हेच जर उलटे दाखवले असते तर "चार्ली हबदू " कि काय ते झाले असते ब्रुक बॉण्ड च्या हाफिसाचे ! आपण हिंदू षंढ मग काय बनवा असल्या जाहिराती, https://www.youtube.com/watch?v=TzbUSXhV9Go

In reply to by चौकस२१२

इतक्या साध्या सुध्या जहिरातीवरून बुडाला आग लागली ख्याख्याख्या, सांभाळा स्वताला.
हेच जर उलटे दाखवले असते तर "चार्ली हबदू " कि काय ते झाले असते ब्रुक बॉण्ड च्या हाफिसाचे !

काहीही


In reply to by कॉमी

फार वर्षांपूर्वी कमल हासन (हासन, हसन नव्हे) याचा एक चित्रपट आला होता, विश्वरुपम. यात एक दृश्य असे होते की एक शांतिदुत पंडित हातात पवित्र पुस्तक घेऊन शांतीप्रिय समाजाला आत्मघातकी हल्ला, बाँबस्फोट आदी समाजपयोगी गोष्टी करण्यास चिथावणी देतो. बस आपला शांतीप्रिय समाज शांती खुंटीला बांधून रस्त्यावर येऊन कमल हासनच्या मातोश्रीच्या तब्येतीची विचारपूस करत होता. (जगजाहीर आहे की शांतिदुत अल्ला हो अकबरचे नारे देत फुटतात. नवीन काय दाखवले?)

In reply to by कॉमी

तुमचा मुद्दा वा मुद्दे पटवून न देता आल्यामुळे, वर चिल्लर विनोद केल्याने आपण फार मोठे समाजसुधारक आहोत असा आव आणल्यामुळे , आणि त्यावर एकाही मिपाकरांने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे, तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे. उगी उगी आपण मुविकाकांचे घर उन्हात बांधू

In reply to by फाटक्यात पाय

कसले मुद्दे ? तुम्ही मधूनच झटका आल्यासारखे कुठल्यातरी कमल हसनच्या सिनेमाबद्दल बोलायला लागला आणि काय डोंबलाचे मुद्देसूद उत्तर मी देणार तुम्हाला ?

२०२४ मध्ये विलेक्शन आहे त्याची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. ये तो अभी झांकी है, आणखीन काय काय विषय वर येतील पाहत राहा.

In reply to by साहना

पण .... केरला फाइल्स, ह्या सिनेमात दाखवल्या प्रमाणे, खरोखरच लव जिहाद आहे का? हे शोधतांना बातम्या मिळत गेल्या .... मग, गेम जिहाद, मनोरंजन जिहाद, शैक्षणिक जिहाद अशाही बातम्या मिळत गेल्या... नौकरी जिहाद बाबतीत, माझा स्वानुभव आहे .... आणि तुम्ही जर आखातात नौकरी शोधत असाल तर काही कंपन्या सरळ सांगतात की, Muslims and Christians are preferred.... आता, तुम्ही म्हणता तसे, कॉंग्रेसने स्वातंत्र्या नंतर, हिंदू हितवादी निर्णय घेतले आहेत का? हे पण शोधतो.... कारण, इलेक्शनचा किडा, तुम्हीच माझ्या डोक्यात सोडला आहे....

In reply to by मुक्त विहारि

आता, तुम्ही म्हणता तसे, कॉंग्रेसने स्वातंत्र्या नंतर, हिंदू हितवादी निर्णय घेतले आहेत का? हे पण शोधतो....
त्याबरोबरीनेच काँग्रेसचे कोणकोणते निर्णय हिंदूंच्या अहिताचे होते/ठरले हेही शोधत-लिहीत रहावे. आगामी संशोधनासाठी शुभेच्छा.

अस्मानी सुलतानी | परचक्र निरूपण (हे लेखन्/ग्रंथ जालावर सापडले नाहीत, कुणाला सापडल्यास कळवावे). https://www.youtube.com/watch?v=MNE0PS7iYGc