ताज्या घडामोडी - मे २०२३
१) आज क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी आहे. त्या चित्रफितीतून क्रेमलिनचे काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पुतिनना मारण्यासाठी युक्रेनने ड्रोनमधून हे क्षेपणास्त्र सोडले असा रशियाचा दावा आहे. युक्रेनकडे कोणत्याही तंत्रज्ञानाला सुगावा लागू न देता थेट मॉस्कोपर्यंत पोहोचून क्रेमलिनच्या मध्यभागी कळसावर सोडता येईल असे ड्रोन असण्याची शक्यता अत्यल्प आहे. कदाचित रशियाने स्वत:च हे नाटक केले असावे व सूड घेण्यासाठी आता रशिया युक्रेनवर कदाचित अण्वस्त्रे सोडू शकेल.
२) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मत देण्याचा दिनांक १० मे आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांनी कॉंग्रेसला २२४ पैकी ११५+ व भाजपला ७० पेक्षा कमी जागांचा अंदाज दिलाय. कर्नाटकात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होत असल्याने कॉंग्रेसच्या विजयाचे नवल नाही.
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सारांश.
धरणात पडलेला भ्रमणध्वनी संच
धन्य ते सरकारी अधिकारी, धन्य तो माज
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या
हिंदू से मुस्लिम बनाने का हैरान कर देने वाला खेल
राष्ट्रपती या मुख्य अतिथी आहे
अशा गोष्टींकडे कानाडोळा करायचा ....
गोमांस वापरून तयार केलेल सामोसे विकत होता .....
चीनला घेरण्यासाठी रणनीती
हा प्रतिसाद मुवी ला आहे.
पैलू पाडत आहेत
भाजप, चोंबडेपणा वगैरे
मुलाखती घेणार्या अँकर्सवर
बऱ्याच अंशी सहमत!
ह्या पक्षांत मोदी, योगी, हिम्मत बिश्वास शर्मा व अण्णामलाई सोडून इतर सर्व बोलघेवडे आहेत.अगदी. महाराष्ट्रात अश्या भाजप नेत्यांची भाऊगर्दी आहे. आचरट बोलणे, पोकळ वल्गना, शून्य कृती, वेळ येताच शेपूट घालून पळणे याचा महाराष्ट्रात अतिरेक झालाय.आणि त्यांच्या चाणक्यनीतिचे फलित तर महाराष्ट्र, बिहार येथे आपण बघतोच आहोत. स्थानिक छोट्या पक्षांना अकारण महत्व देणे, नंतर विपक्षांतील भ्रष्ट नेत्यांची पक्षांत आयात करणे ह्यामुळे पक्षाचे पुढे काय भले होणार आहे, हे आपण पाहूयाच!नितीशकुमार, उठा, राठा, शिंदे अश्यांना भाजपने विनाकारण महत्त्व देऊन डोक्यावर चढवून स्वत:चंं खूप नुकसान करून घेतलंय. पण डोक्यात प्रकाश पडत नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत कळेलच. अत्यंत घाणेरडे, भ्रष्ट नेते पक्षात आणून भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. राठासारख्या अत्यंत नगण्य माणसाला अवास्तव महत्त्व देऊन वारंवार घरी जाऊन भेटून भाजपला काय मिळते राम जाणे. उठासमोर तर भाजप नेत्यांनी लाळघोटेपणाचा कळस केला होता. या प्रकाराला चाणक्यनीति समजमाऱ्यांची कीव येते.नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची
उद्घाटनात
आमच्या सूदैवाने नवीन संसद
नवीन संसद भवनाच्या
बरं झालं बऱ्याच विरोधकांनी या