Skip to main content

चालु घडामोडी - नोव्हेंबर २०२२

लेखक पॉल पॉट यांनी बुधवार, 02/11/2022 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्य ठाकरे यांनी फडणवीस ह्यांचं खोटं ऊघड केलं. ज्या फोक्सकोन बद्दल फडणवीस सांगून महाराष्ट्राची दिशाभूल करत होते ती फोक्सकोन वेगळी होती हे आदित्य ठाकरेंनी ऊघडे केले. तसेच टाटाच्या त्या अधिकार्याचे नाव सांगावे असे आव्हानही त्यांनी फडणवीसांना दिले. एकदंरीत फडणवीसांना भविष्य कठीण जानार आहे असे दिसते. आदित्य ठाकरेंसारखे तरूण व धडाडीचे अभ्यासू नेते असंच ऊघडे पाडत राहीले तर महाराष्ट्राची जास्त वेळ दिशाभूल करता येनार नाही हे फडणवीसांनी ओळखून ह्या विषयावर पुन्हा तोंड ऊघडणे टाळलेय. बातमी. https://www.loksatta.com/mumbai/aditya-thackeray-criticized-devendra-fa… मोदी येनार म्हणून मोरबीच्या सरकारी दवाखान्याची रातोरात रंगरंगोटी करण्यात आली. मोदींच्या फोटोग्राफी इवेंट साठी हे करण्यात आल्याची टिका आप ने केलीय. आता पर्यंत गुजरात मध्ये मोदींचे नी भाजपचेच सरकार होते. मोदींनी किती भ्रष्टाचार केला असावा हे ह्या घटनेवरून कळते. https://m.thewire.in/article/government/morbi-gujarat-bridge-collapse-n…

वाचने 7936
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी ‘वेदांत्न-फॉक्सकॉन’ प्रकल्पाबाबतही तारखांसह तपशील देत झालेल्या बैठका, दिलेली पत्रे व सवलतींबाबत तपशील दिले. हा प्रकल्प राज्यात यावा, यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. तो गुजरातला जाणार, हे सप्टेंबर २०२१ मध्येच ठरले होते, हा फडणवीस यांचा दावा खोटा असून फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाइल निर्मितीचा होता. तर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हा सेमिकंडक्टर निर्मितीचा होता. वेदांता-फॉक्सकॉनचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याबरोबर झालेली भेट, उच्चपदस्थांनी तळेगावला प्रकल्प जागेवर दिलेली भेट, उच्चस्तरीय समितीने देऊ केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या सवलती, सरकार व फॉक्सकॉनदरम्यान झालेला पत्रव्यवहार आदींबाबत ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. जर वर्षभरापूर्वी हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचे ठरले होते, तर कंपनी व राज्य सरकारचे उच्चपदस्थ उगाच वेळ घालवत होते का, असा सवाल ठाकरे यांनी केला. चांगलीच पिसे सोललेली दिसताहेत.

In reply to by कपिलमुनी

मालकापती चाटूपणा करून पदं मिळवण्यासाठी भाजप नेत्यांनी लाज लज्जा सोडलीय. महाराष्ट्रातील काही नेते तर आई वडीलांनी शिव्या द्या ती संस्कृती आहे पण मोदींना नको असे म्हणतात. काही नेते स्वाभिमान सोडून मामूचं उपमामूपद स्विकारतात. आपल्याच राज्याच्या वाट्याचे प्रकल्प गुजरातला पाठवतात. पत्रकार परिषदेत धडधडीत खोटं बोलतात.

In reply to by कपिलमुनी

मराठी वर्तमानपत्रे वाचायची बंद केली हा आमचा निर्णय योग्यच होता. मराठी पत्रकार/संपादक असा हा अजेण्डा का राबवतात ते कळत नाही. "पंतप्रधान मोदींनी दोन करोना लसी तयार केल्या" खाली भाषणाची लिंक दिली आहे. नड्डा ह्यांनी असे काहीही म्हंटले नाही. नीट ऐकलेत तर नड्डा म्हणतात- "जनवरी २०२० को करोना आया. ऐप्रैल को मोदीजीने टास्क फोर्स बिठाया|और नौ महिने मे एक नही ,दो दो वॅक्सिन भारतने दे दी, ये आत्मनिर्भर भारत है|" (९.२१ ते ९.२४, नीट ऐका) https://www.youtube.com/watch?v=22begtIVvbA&t=586s

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

क्लिक बायटी मथळे टाकुन आत भाराभर चिंध्या टाकणे हा आजकाल सकाळ / माठ टाईम्स / लोक्मत वगेरे वार्तापत्रांचा धंदा झाला आहे. मालकाप्रती निष्ठा दाखवण्याचा तो एक प्रकार आहे. लोक आता शहाणे झाले आहेत. चटकन ओळखतात. काही लोक अजुनही झापडे बांधुन फिरतात. तोंडावर आपटतात. पुन्हा नवीन खुसपट काढतात. चालायचेच ... व्यक्ती तितक्या प्रव्रुत्ती...

In reply to by सुक्या

नुसती घाणेरडी वाक्ये वापरून टीका करून काही होत नाही . फक्त मराठी नाही तर सर्वत्र बातमी आहे. ए एन आय ने सुद्धा बातमी दिली आहे. उघडा डोळे.. बघा नीट..

Hindu Minority: 14 राज्यों और 3 केंद्र शासित प्रदेशों में हिंदुओं को अल्पसंख्यक दर्जा? केंद्र ने सुप्रीम कोर्ट से मांगी चौथी बार मोहलत https://www.jansatta.com/national/govt-asked-time-from-supreme-court-on…

...तर तांडव करू, लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा इशारा, कोल्हापूरचं वातावरण तापलं! https://lokmat.news18.com/maharashtra/kolhapur/kolhapur-love-jihad-alle… सक्तीने धर्मांतरण विरोधात कठोर कायदे आणण्याची गरज आहे ....

In reply to by मुक्त विहारि

Breaking: कथित लव्ह जिहाद जिहाद प्रकरणातील ती तरुणी तब्बल १७ दिवसांनी सापडली; कर्नाटकातून पोलिसांनी घेतले ताब्यात https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/kolhapur-breaking-the… बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये सापडली आहेत.

Praveen Nettaru Murder Case : भाजयुमो कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या चार सदस्यांची माहिती देणाऱ्यांसाठी NIA कडून बक्षीस जाहीर https://www.loksatta.com/desh-videsh/nia-has-announced-a-cash-reward-fo… PFI वर बंदी आणून, ह्या केंद्र सरकारने, योग्य ती पावले नक्कीच उचलली आहेत.....

संरक्षण क्षेत्रात नवी भरारी ; लांब पल्ल्याच्या ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्राची ‘डीआरडीओ’कडून यशस्वी चाचणी https://www.loksatta.com/desh-videsh/india-successfully-tests-long-rang… देशाच्या संरक्षणा बाबतीत, हे केंद्र सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे.....

मोदी सरकारचा मोठा निर्णय! गुजरातमध्ये आलेल्या पाकिस्तानसहित ‘या’ दोन देशांमधील अल्पसंख्यांकांना देणार नागरिकत्व https://www.loksatta.com/desh-videsh/mha-to-grant-citizenship-to-minori… अतिशय उत्तम निर्णय .....

Red Fort Attack Case : सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद आरिफला मोठा झटका; फाशीची शिक्षा ठेवली कायम https://www.esakal.com/desh/red-fort-attack-case-2000-supreme-court-dis… 2000 साली ही घटना घडली होती ..... निर्णय द्यायला इतका उशीर का लागला? आतंकवादी हल्ला झाला असेल तर, त्वरित निर्णय आणि निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हायला हवी...अशा गुन्हेगारांना पोसत का रहायचे? कालापव्यय झाला की, गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावतच जाण्याची शक्यता जास्त आहे.....

पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर https://www.loksatta.com/maharashtra/pm-narendra-modi-announce-2-lakh-c…

मोदी सरकारचा मोठा प्लान; 'त्या' ४० हजार कंपन्यांना टाळं ठोकणार; पण पै न पै वसूल करणार https://maharashtratimes.com/india-news/central-govt-decided-to-de-regi… हे केंद्र सरकार, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे...

प्रताप सरनाईकांना ईडीचा झटका, तात्पुरती ताब्यात घेतलेली ११.२ कोटींची मालमत्ता जप्त होणार! https://www.loksatta.com/maharashtra/pratap-sarnaik-11-crore-property-t… आता मालमत्ता जप्त झाली तरी, भाजपला दोष देण्यात येईल आणि जप्त नाही झाली तर, आयतेच कोलीत मिळेल.... ED ही केंद्रीय संस्था आहे आणि तिची स्वतःची अशी नियमावली आहे, ही मुलभूत गोष्ट, भाजपद्वेषी लक्षांत घेणारच नाहीत ...... डब्बल ढोलकी लोकांची जगांत कमतरता नाही....

In reply to by मुक्त विहारि

शिंदे गटातील आमदार पुन्हा शिवसेनेत जानार अश्या चर्चा सुरू आहेत. ठाकरेंवर टिका करण्याचं आमदारांनी टाळलंय. त्या आमदारांना शिवसेनेत जायची भिती वाटावी ह्या साठी भाजपने ही कारवाई केलीय. आता मंत्रीमंडळ विस्तार झाला की नाराजी ऊफाळून येईल. पुन्हा शिवसेनेत गेलात तर तुमचा संपत्ती जप्त करू असा इशारा भाजपने ह्यातून दिलाय.

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…” https://www.loksatta.com/maharashtra/nana-patole-comment-on-maha-vikas-… म्हणूनच तर काही काळा नंतर, बाळासाहेब ठाकरे यांनी, कॉंग्रेस बरोबर युती केली न्हवती....

Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/the-kerala-story-film-tea…

केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष! ; मुख्य आयुक्त राजीव कुमार यांचा दावा https://www.loksatta.com/desh-videsh/central-election-commission-is-100… निवडणुकीची घोषणा केली की, राजकीय पक्ष वा उमेदवार विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

"संभाजी भिडे गुरुजींचा आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहेत. पण महिलांनी काय करावं, कसं जगावं, हे कोणी सांगू नये,"असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. धारकर्यांना कुठे तोंड लपवावं असं झालं असेल

भिडे गुरुजींचे वक्तव्य चुकिचे आहे मात्र, बुरख्याचे समर्थन करणारे फुरोगामी आज टिकलीला विरोध करत आहेत. यावरुन हे फुरोगामी किती दोगले असतात हे कळते.

In reply to by प्रसाद_१९८२

मतितार्थ कळला परंतु "दोगले" शब्दावर अडलो. गोगलदेवाला साकडे घातले तेव्हा त्याने संकर जाति का, विधि विस्र्द्ध, ग़ैरक़ानूनी, अवैध, घिनौना, जारज, नफ़रत पैदा करनेवाला असे अर्थ आणून ओतले. "दुतोंडी" म्हणायचे आहे का?

गेले कित्येक दिवस ह्या विषयांवरच्या उलटसुलट बातम्या तसेच मिपावर आरोप-प्रत्यारोप झडलेले वाचत आहे. प्रत्येक व्यक्ती किंवा ग्रुप आपलेच म्हणणे कसे खरे आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करत असताना दिसतो, तरी शेवटी त्याचा निष्कर्ष काय हे कळत नाही. अश्यावेळी भारतात अशी एखादी विश्वसनीय संस्था किंवा सोर्स आहे का की जिच्या सांगण्यावर सर्वांचा विश्वास बसेल. अशी संस्था जर नसेल तर आर टी आय चा वापर करून सत्य जाणून घेता येईल का ? असले जर काहीच नसेल तर ह्या चर्चांच्या गुऱ्हाळातून काहीच निष्पन्न होणार नाही असे वाटते.

Electoral bond माहितीच्या अधिकारा अंतर्गत आणले तर सध्या प्रकल्प पळवणे किंवा ठरावीक उद्योगपतींची भरभराट करणे असले प्रकार बंद होतील. Electoral bond मुळे Crony capitalism जोरात चालू आहे. सरकार जनतेच्या कमाईचा पै पैचा हिशोब मागणार, परंतू राजकीय पक्षांची कमाई जनतेपासून लपवणार.

Nawab Malik : जेलमधल्या मलिकांना ईडीचा दणका; राहत्या घरासह कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेणार https://www.esakal.com/maharashtra/nawab-malik-ed-custody-it-would-seiz…

पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढलेल्या अंधेरी मतदार संघात दिवंगत शिवसैनिक रमेश लटके ह्यांच्या पत्नींचा विजय झालाय. शिवसेनेच्या ह्या पहील्या वहील्या विजयाने मराठी तरूणांत आणी महाराष्ट्रात ऊत्साहाची लाट आलीय. भाजपच्या गुजरातवादी धोरणाला आपण टक्कर देऊ शकतो असा आत्मविश्वास मराठी जनतेत येऊ लागलाय. विजयी ऊमेदवार, ऊध्दव ठाकरे व शिवसैनिकांचं अभिनंदन. ऊध्दव ठाकरेंनी करून दाखवलं. https://zeenews.india.com/marathi/live-updates/andheri-bypoll-result-20…

मोरबी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या ओरेवा कंपनीच्या एका व्यवस्थापकाने ही दुर्घटना म्हणजे देवाची करणी असल्याचे विधान केल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. - (मटा बातमी संदर्भ ३नोव्हें.२२) -दिलीप बिरुटे

महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांची भाषा सध्या चर्चेर्त आहे. ”ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लोडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासू. त्यांचे पतीदेव उद्योगपती आहेत. मग त्यांना उद्योगतीचा दर्जा द्यायचा का, असे सत्तार म्हणाले” ( संदर्भ लोकसत्ता बातमी) महाराष्ट्रभर पावसाने शेतक-यांच्या पिकांचे नुकसान केले आहे. शेतक-यांना मदतीची गरज आहे. हेक्टरी केली जाणारी मदत थेट शेतक-यांना दिली पाहिजे त्याचं नियोजन त्याच्या चर्चेपेक्षा तुतु मै मै मधे रमणा-या सरकारने जनतेकडे लक्ष दिले पाहिजे. इतके निर्णय घेतले तितके निर्णय घेतले. प्रत्यक्षात मदत मिळाली पाहिजे यावर भर देणे गरजेचे आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे सरकार फक्त गुजरातला प्रकल्प पाठवणे ह्या साठीच स्थापन झालेय. महाराष्ट्र, इथले शेतकरी ह्यांच्याशी फडणवास व त्यांच्या हाता खाली काम करनार्या एकनाथ शिंदेंना काहीही घेणेदेणे नाही. २५०० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राचे १ लाख ८० खोक्यांचे प्रकल्प गुजरातला पळवले गेलेत.

गुजरातला बदनाम करनार्यांना……- मोदी. गुजरातच्या पंतप्रधानांचा गुजराती अस्मिता जागली. पंतप्रधान देशाचा असतो असं समजनार्यांना दोन मिनीटे ऊभे राहून श्रध्दांजली वाहुयात. शिंदे- फडणवीस ह्यांचा मराठी असेमिता कधी जागनार?? की सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलाय?? https://www.jagran.com/lite/politics/state-prime-minister-narendra-modi…

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल. हजारो कार्यकर्त्यांचा राहूल गांधी ह्यांच्या सोबत मशाल मोर्चा. ऊत्स्फूर्त प्रतिसाद. ही यात्रा महाराष्ट्र भाजपपासून वाचवण्यास कारणीभूत ठरो. https://www.abplive.com/news/india/rahul-gandhi-bharat-jodo-yatra-enter…

सूप्रिया सुळेंना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करनार्या भाजप- शिंदे गटातील मंत्री अब्दूल सत्तारांविरूध्द राज्यभरात राष्ट्रवादीने आंदोलनं सुरू केले आहेत. विरोधकांनी आतारसंहीता पाळावी असे आवाहन देवोंद्र फडणवीसांनी केले आहे. https://www.loksatta.com/maharashtra/abdul-sattar-again-basude-supriya-…

'आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी' - नितीन गडकरी चला भाजपमधील कुणालातरी मनमोहनसिंग ह्यांची महती कळली. https://pudhari.news/latest/370559/country-indebted-to-former-pm-manmoh…

संजय राऊतांना जामीन मंजूर. भाजपेयींना आता धडकी भरली असेल. घरात १२ लाख सापडले म्हणून मोदींची बटीक झालेल्या ईडीला ही चपराक म्हणावी लागेल.

खा.संजय राऊतांची अटक बेकायदेशीर होती' असे मा.न्यायालयाने म्हटले आहे, हे धक्कादायक आहे. त्याचबरोबर ईडीलाही फटकारतांना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असेही मत व्यक्त केल्याच्या बातम्या येताहेत. महाराष्ट्र आणि देशभर एकुणच केंद्रसरकारच्या धोरणावर टीका करणा-याची जूनी काही प्रकरणे उकरुन त्यांच्यावर खोटीनाटी प्रकरणे उभी करून त्यांचा आवाज दाबला जातो. न्यायालयाच्या फटकारानंतर ही व्यवस्था सुधारेल वगैरे असे कोनास वाटेल तर ते दिवास्वप्न ठरेल असे वाटते. -दिलीप बिरुटे