Skip to main content

मिरची भजी

लेखक Bhakti
मंगळवार, 20/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
च पाऊस तर काही जायचं नाव घेत नाही तेव्हा म्हटलं जे करायचे राहिले आहे.. ते मिरचीचे भजे आज करावे. अगदी झणझणीत!!! साहित्य: सात आठ कमी तिखट मिरच्या एक छोटी वाटी तांदळाचे पीठ एक मोठी वाटी डाळीचे पीठ जिरे ओवा, हिंग हळद चवीपुरतं मीठ हवा असेल तर खायचा सोडा मिरचीसाठी सारण- बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला. कृती: पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि मध्ये चिरून त्यातील बिया काढून घ्याव्यात. चिरलेल्या मिरच्या मीठ चोळून बाजूला ठेवाव्यात. आता सारण साठी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात थोडासा डाळीचे पीठ हळद गरम मसाला तिखट एकत्र करावे आणि हे सारण मिरचीच्या आत भरावे व मिरची थोडीशी दाबून बंद करावी. मिरची तळण्यासाठी ज्याप्रमाणे आपण भजाचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे, ओवा, हळद एकत्र पाणी टाकून भिजवावे हवे असेल तर किंचित सोडा टाकावा. मिरची डाळीच्या पिठात घोळवून घेऊन गरम गरम तेलात खरपूस होईपर्यंत तळून घ्यावी. ज्यांना तिखट खायची सवय नाही त्यांनी या मिरचीच्या भज्यांचा पोळीबरोबर स्वाद घ्यावा.

वाचने 9644
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मिरची भज्यामुळे पोट गुबारुन जाते म्हणून आमची गंगुबाई अज्याबात डाळीचं काय करीत नाय.

मस्त. अजून येऊ द्या. वेगवेगळ्या पाकृत्या. -दिलीप बिरुटे

एकदम कड्डक!

अमच्याइथे आंध्रभजी मिळतात. मिरचीचे पोट फाडून त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ मिश्रित मसाला घालतात आणि ही मिरची पिठात घोळवून तळतात.

In reply to by नागनिका

होय होय कालच सर्च करतांना हे नाव वाचलं :) आणि सारणात ओलं खोबरंही वापरू शकता. मिरच्या लांबीने फार मोठ्या होत्या, तेव्हा काही मिरच्या मधोमध‌ चिरून तळल्या.

In reply to by Bhakti

सोलापूर वगैरे भागात जिथे तेलुगुभाषिक वस्ती आहे तिकडे ही भजी मिळतात, आंध्र भजी किंवा गुंटूर भजी म्हणतात. मिरच्या जरा मोठ्या असतात. मिरचीत चिंचेच्या कोळाचे सारण भरले जाते. भज्याचे पीठ जरा जाडसर असते पण टेस्ट काय म्हण्ता...अहाहाहा. नुसती मिरची भजी ही सुभानल्ला. हाहाहूहू करत खायला जी मजा येते त्याला तोड नाही.

धन्यवाद मंडळींनो| पण शुद्धलेखनाचे फारच हाल‌ केलेत राव मी :( इडिटचा पर्याय पाहिजे होता.

तोंपासु, मिरची भजी असे नुसते कोणी म्हटले तरी तोंडाला पाणी सुटते, इथेले फोटो पाहुन बादली घेउन बसावे लागले. खवय्यांकरता फक्त एक सुचवणुक :- कमी तिखट मिरची न घेता तिखटच मिरची घावी आनि बिया अजिबात काढून टाकू नयेत. पैजारबुवा,

सेहेचाळीस वर्षापुर्वी राजस्थानी मिर्चीबोंडा आणी मावा कचोडी दोघी जणीशी प्रेम झालं होते ते आजतागायत कायम आहे. जमल्यास आठवण डकवतो.

एकदम तोंपासु . भजी फुलण्यासाठी काय करावे लागते. विकतच्या भजी एकदम मस्त फुगलेली असते