आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
वर्गीकरण
वाचने
63905
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच छान
In reply to बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करार by निनाद
भारताचे पंतप्रधान श्री
- पंतप्रधान मॉरिसन यांना ऑस्ट्रेलिया इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फोरमचा शुभारंभ केला.
- बेंगळुरूमध्ये नवीन महावाणिज्य दूतावास होणार आहे.
- नवीन ऑस्ट्रेलिया-भारत इनोव्हेशन नेटवर्क स्थापन केले जाते आहे.
- आर्थिक सहकार्य करार (CECA) वाटाघाटी चालू ठेवण्यासाठी दोन्ही देश प्रतिबद्ध
- पर्यटन सहकार्यावरील ऑस्ट्रेलिया भारत सामंजस्य कराराचे नूतनीकरण
- ऑस्ट्रेलिया-इंडिया स्ट्रॅटेजिक रिसर्च फंड (AISRF) चा विस्तार
- व्यापक ऊर्जा सहकार्याला समर्थन
- सायबर प्रशासन, सायबर सुरक्षा, क्षमता निर्माण, सायबर गुन्हे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील सहकार्य
- बेंगळुरूमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी पॉलिसी स्थापन केली जाईल
- भारताच्या गगनयान अंतराळ कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा
पंतप्रधान मॉरिसन यांनी नवीन मैत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम, मैत्री अनुदान आणि फेलोशिप कार्यक्रम आणि ऑस्ट्रेलिया-भारत मैत्री सांस्कृतिक भागीदारी व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया-भारत संबंध केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय प्रसार भारती, आणि SBS, ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रसारणावरील सहकार्य करार पुर्ण झाला आहे. यामुले आता भारतातील अधिकृत बातम्या ऑस्ट्रेलियामध्ये दाखवल्या जातील अशी अपेक्षा आहे. या पुर्वी येथे बातम्यांच्या नावाखाली NDTV या माध्यमाचा प्रोपोगंडा(?) चालवला जात असे. मुख्य म्हणजे भारतातील लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर करतांना शैक्षणिक पात्रता ओळख आता अजून सुलभ केली जाणार आहे. अधिकाधिक भारतीयांनी नोकरी साठी याचा लाभ घेतला पाहिजे असे वाटते. अधिक माहिती येथे पहा https://immi.homeaffairs.gov.au/visas/permanent-resident भारतीय कायमस्वरूपी व्हिसासाठी अर्ज करून आणि मंजूर झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे कायमचे रहिवासी होऊ शकतात.नेपाळ भारत करार
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा तुर्कमेनिस्तान दौरा
- इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि ट्रान्झिट कॉरिडॉरवरील अश्गाबात कराराचे महत्त्व अधोरेखित.
- इराणमध्ये भारताने बांधलेल्या चाबहार बंदराचा उपयोग भारत आणि मध्य आशियामधील व्यापार सुधारण्यासाठी
- तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) पाइपलाइनच्या सुरक्षेशी संबंधित समस्या तसेच तांत्रिक आणि तज्ञ स्तरावरील बैठकांना वेग
- दोन्ही देशांनी आपत्ती व्यवस्थापनासारख्या सहकार्याची नवीन क्षेत्रे
- भारतीय कंपन्यांच्या तांत्रिक आणि तांत्रिक क्षमतांचा उपयोग तुर्कमेनिस्तानच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राच्या पुढील विकासासाठी
अफगाणिस्तान, अंमली पदार्थांची तस्करी या मुद्द्यांवरही चर्चा या दर्म्यान झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी एकुणच भारताबाहेर असणारी प्रत्येक भेट भारतासाठी सत्कारणी लावल्याचे दिसून येते आहे. भारताने एकुणच यादेशा सोबत आपले संबंध चांगलेच विकसित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत असे दिसते. तसेच तुर्कमेनिस्तानचे परराष्ट्र मंत्री २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते, तर २०१६ मध्ये मोदी तुर्कमेनिस्तानला गेले होते. तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) पाइपलाइन झाली तर भारताला अव्याहत तेल पुरवठा होईल. यासाठी सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान येथील अशांतता हा प्रमुख अडसर आहे.ब्रिटन आणि भारत संरक्षण सहकार्य करार
क्वाड
- हवामान बदल देखरेख
- आपत्ती प्रतिसाद आणि तयारी
- महासागर आणि सागरी संसाधनांचा शाश्वत वापर
- इतर
असे चार मुद्दे आहेत. यातले इतर म्हणजे काय हे स्पष्ट नाही आणि ते बहुदा लष्करी सहकार्य असावे असा माझा कयास आहे. पुढील बैठकीसाठी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया यजमान असणार आहे.महत्त्वाच्या पण उपेक्षित घडामोडी
पॅसिफिक आयलँड फोरम
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करणार
पंतप्रधानांनी मागच्या वर्षी
भारत आणि दक्षिण अमेरिका वाढते सहकार्य!
निजरमध्ये बंड
एकामागून एक दणकट करार!
मग शेअर मार्केट झोपूनच का आहे
In reply to एकामागून एक दणकट करार! by निनाद
नक्कीच!
In reply to मग शेअर मार्केट झोपूनच का आहे by अमरेंद्र बाहुबली
ऑप सिंदूर
In reply to नक्कीच! by निनाद
ऑप सिंदूर- आपण पाकिस्तानला सांगून त्यांच्या विमान धावपट्टीवर हल्ले केले, (जी लगेच ४ दिवसात तयार झाली) - ड्रोन हल्ल्याना आपण रॉकेट सोडून उत्तर देत होतो. - एकही विमान पडले नाही असे देशाला खोटे सांगण्यात आले. - ट्रंपने सिझफायरच करण्याची आज्ञा सोडली, आपण केले पण तिकडून पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार सुरूच होता, आपली अवस्था केविलवाणी होती. असो.तरी नशीब आपण पहिल्या
In reply to ऑप सिंदूर by अमरेंद्र बाहुबली
कुठे तुम्ही भुजबळांच्या
In reply to नक्कीच! by निनाद
https://www.misalpav.com
In reply to मग शेअर मार्केट झोपूनच का आहे by अमरेंद्र बाहुबली
भारत इटली ऐतिहासिक करार
भारत आणि इटली यांच्यातील ऐतिहासिक कराराची फारशी चर्चा झाली आही.
दोन्ही देशांनी आपल्या मैत्रीला 'विशेष धोरणात्मक भागीदारी' या सर्वोच्च पातळीवर नेले असून, लष्करी साहित्य उत्पादनासाठी एक संरक्षण औद्योगिक आराखडा जाहीर केला आहे. हा करार केवळ दोन देशांमधील राजकीय देवाणघेवाण नसून, याचे भारत, इटली आणि संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर आणि सुरक्षेवर मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत असे वाटते.
या ऐतिहासिक करारामुळे भारतावर अनेक परिणाम होतील. या नव्या आराखड्यामुळे भारत केवळ परदेशी लष्करी साहित्याचा खरेदीदार न राहता इटलीसोबत मिळून अत्याधुनिक शस्त्रे, हेलिकॉप्टर्स आणि नौदलाची जहाजे भारतातच तयार करणार आहे. यामुळे मेक इन इंडिया अजून गती मिळेल.
भारताची वाढती डिजिटल ताकद आणि ईटलीचे उत्पादन कौशल्य एकत्र येत आहेत. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून अत्याधुनिक चिप्स आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी लागणारी दुर्मिळ खनिजे मिळवण्याचे प्रगत तंत्रज्ञान इटली भारताला देणार आहे.
या कराराचा इटलीवर परिणाम होणार आहे. इटालीने काही काळापूर्वी चीनच्या वादग्रस्त बी आर आय मध्यून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशासोबत भागीदारी करून इटलीला चीनच्या आर्थिक प्रभावाला टक्कर देणारा एक सुरक्षित मार्ग मिळाला आहे.
इटालीने भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार येत्या काळात अनेक अब्ज युरों पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताची अफाट बाजारपेठ आणि इथले कुशल तरुण अभियंते इटलीच्या उद्योगांना वेग देतील असे वाटते आहे. म्हणजे भारतीय लोकांना ईतली मध्ये काम मिळण्याचीही शक्यता आहे.
मिडल ईस्ट भागातील वाढत्या तणावाच्या काळात आपल्या ऊर्जा वाहिन्या आणि सागरी व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी इटलीला भारतीय नौदलाचे मोठे सहकार्य मिळणार आहे. यामुळे चाचेगीरी वर प्रतिबंध होईल असे वाटते.
याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि राजकारणावर परिणाम होतील का? तर नक्की होतील.
हा करार आशिया, मध्य पूर्व आणि युरोप खंडाला थेट जोडणाऱ्या महाकाय आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी मेन काम करेल. आधुनिक रेल्वे आणि सागरी मार्गांचे हे जाळे जागतिक व्यापाराचा वेग वाढवेल आणि वाहतुकीचा खर्च कमी करेल. आणि हा खरा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गेम ठरेल!
आशिया प्रशांत क्षेत्र आणि भूमध्य समुद्र आता परस्परांशी जोडले गेले आहेत. हा करार जागतिक व्यापारावरील चीनची एकाधिकारशाही मोडून काढण्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात समतोल साधण्यास मदत करेल असे ही वाट्स्ते.
दहशतवाद, सायबर हल्ले आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यांसारख्या मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी जगातील दोन प्रमुख लोकशाहींनी एकत्र येणे, हे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आणि स्थिरतेसाठी एक उत्तम पाऊल आहे.
भारत आणि इटली दरम्यान झालेला हा करार केवळ कागदावरच्या स्वाक्षऱ्यांपुरता मर्यादित नाही. हा आशिया आणि युरोपला जोडणारा, भारताला संरक्षणात आत्मनिर्भर करणारा आणि जागतिक व्यापाराला नवा, सुरक्षित मार्ग देणारा एक मैलाचा दगड ठरणार आहे. दोन्ही देशांची ही नवी मैत्री येणाऱ्या काळात जागतिक राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद ठेवते.
राजकारण बाजूला ठेऊअन याकडे पाहतांना तुम्हाला काय वाटते?