ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.
पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?
दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?
उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोरोनात केलेले काम साक्षीला
काय केल ते सांगा, राऊत
अडीच वर्षे सरकार पडू दिले
दारूवरचा कर न मागता कमी केला
दारूवरचा कर न मागता कमी केला
भाजपा -
गणेशाजी,
परकीय चलनाचा साठा सुद्धा कमी
२०१८ पासून भारतातील महागाई
शिंदे गट कायदेशीर कात्रीत
शिंदे गट कायदेशीर कात्रीत
शिंदे गटात मतभेद; २० ते २५
रेडे काय, गद्दार काय, घाण
सेना सोबत होती तो पर्यंत
अशीही एक कॅान्पीरेसी थेअरी
एकनाथ शिंदे सर्वोच्च
पाहू झाली असेल हिरवळ
पवार ह्यातून नक्कीच काहीतरी
पवार ह्यातून नक्कीच काहीतरी
काका जो काही मार्ग काढतील तो
काका जो काही मार्ग काढतील तो भाजपा पेक्षा जास्त शिवसेनेला हानिकारक असणार आहे असे राहुन राहुन वाटते.सेनेची काळजी भाजप समर्थक करतात तेव्हा नक्कीच भाजपचे नूकसान होनार असते. पवार साहेबानी मागेच सांगीतले होते की भाजपचे सरकार सेऊ देनार नाही. बाकी पवारांनी काढलेल्या मार्गातून सेनेपेक्षा भाजपचंच नूकसान होनार आहे. पाच वर्षे भाजप पक्ष विरोधात बसला की आमदारांना कळेल की १०५ आणून ना नंतर अनेक कपटं करूनही सत्ता मिळत नाही म्हटल्यावर आमदार चुपचाप भाजप सोडतील.शिवसेनेची काळजी व भाजप समर्थन
राऊत साहेब जप करताहेत. इथे
राऊत साहेब जप करताहेत. इथे सरळ सरळ शिवसेनेचे राष्ट्रवादी करण होताना दिसते आहे.पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्याना सरकार चालवायचा अनूभव जास्त आहे, त्यांच्या सल्ल्याने आम्ही सरकार चालवतो असं राऊत म्हणत असतात. ह्याचा अर्थ असा नाही की सेनेचं राष्च्रवादीकरन होतंय. मागे मोदींना पवार माझे गुरू आहेत, त्यांचं बोट धरून राजकारनात आलो असं सांगीतलं ह्याचा अर्थ असा नाही की भाजपचं राष्ट्रवादीकरन होतंय.ह्यातुन शिवसेना जरी टिकलीशिवयेना अनेक छोट्या मोठ्या संकटातून टिकलीय. त्यामुळे सेनेची काळजी आजिबात वाहू नये.बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहेसेना बाळासाहेबांचीच आहे नी राहील. ह्या बद्दल भाजप समर्थक का काळजी वाहतात हा प्रश्नच आहे. भाजप अटल बिहारी/ अडवाणींची राहीली नाही तरी लोक झेलतच आहेत ना?ह्यातुन शिवसेना जरी टिकली तर
ह्यातुन शिवसेना जरी टिकली तर ती बाळासाहेबांची शिवसेना कितपत असेल ह्याबद्दल शंकाच आहे.बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व आताची सेना यात काही फरक आहे का? असल्यास कोणता?बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व
बाळ ठाकरेंच्या काळातील सेना व आताची सेना यात काही फरक आहे का? असल्यास कोणता?बाळासाहेबांच्या काळात सेनेची युती भाजपशी असल्याने ती हिंदूत्ववादू सेना होती. आता ऊध्दव ने भाजपला गाडीतून ऊतरवल्याने ती हिंदूत्ववादी सेना राहीली नाहीये- ईती भाजप समर्थक. :)मलाही तोच प्रश्न पडलाय
वेळी व्यूहरचना आहे. सध्या
एकदम बरोबर
मस्त ओब्सर्वेशन गुरूजी. आवडलं
ही पुन्हा मतदारांची शुद्ध
फसवणूक कसली? ही चतुर आकडेमोड
आकडेमोड
एकदम बरोबर
मूळात फडणविसांचं राजकारण २०१४
+१
काकांसारख्या मदार्याकडुन
काकांसारख्या मदार्याकडुन शिवसेनेचे स्वतःचेच माकड करुन ठेवले आहे आणि शिवसेनेकडे ते समजण्याइतपत गंभीरता नाहीअसं फक्त भाजप समर्थकांना वाटतं. बाकी सेनेचं नूकसान होत असेल तर भाजप समर्कानी खुश व्हायला हवे. पण ते का काळजी करतात हा अनाकलनीय प्रश्न आहे. :)काकांनी भविष्यात पुन्हा कधी शिवसेना व भाजप हे पक्ष एकत्र येणार नाहीसेना भाजप कधीही एकत्र येऊ नये हे सोना आणी महाराष्ट्राचेया दृष्टाने हीताचं आहे.बाकी सेनेचं नूकसान होत असेल
पण सध्याची परिस्थिती पाहता
पण सध्याची परिस्थिती पाहता काका सेनेला अक्षरशः मांडलिक बनवत आहेत.असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं. पण असं त्यांना काहीही वाटलं तरी सेना भाजप सोबत आज्बात जाणार नाही. ऊध्दव ठाकरे खमके आहेत.>>असं फक्त भाजप समर्थकांना
एका बापाची अवलाद, मढी,
शाखा
दुर्दैवाने राऊत जे बोलले ते
या धाग्यावर अ बा यांचे इतके
हाहाहा
हाहाहा खरंय
सतरंज्या उचलणाऱ्या
आज न्यायालयात दोन्हीकडून बाज मांडली गेली.