ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.
पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?
दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?
उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संदर्भ
आता काय होणार? भाषणे बाजूला ठेवून.
उत्तरे
(१) मतांसाठी मराठी माणसाचे
(१) मतांसाठी मराठी माणसाचे भले,हिंदुत्व हे सांगणारे एकमेव नाहीत.शिवसेना हा पक्ष कधीही मराठीवादी किंवा हिंदुत्ववादी नव्हता व नाही. फक्त मतांसाठी त्यांनी ते सोंग घेतले होते.२) बालेकिल्ला / किल्ले कोणते म्हणता येतील? पश्चिम मुंबई, आणि उत्तर कोकण?मराठी बहुल मुंबईत व काही प्रमाणात कोकणात सेनेचा थोडा समर्थक वर्ग अजून शिल्लक आहे. हे भाग बालेकिल्ला वगैरे नाहीत. महाराष्ट्राच्या इतर भागात सेनेला स्थान नाही.३) किती उमेदवार निवडून आणतील ? १०?/२०?स्वबळावर वढले तर जास्तीत जास्त १०, इतर एक दोन पक्षांशी युती केली तर जास्तीत जास्त २०.४) मुंबई महापालिका ताब्यात राहील का आणि कशी?आता कोणत्याही महापालिकेत (सेनेकडे चारच महापालिका आहेत) सत्ता मिळणार नाही.५) त्राता कोण? बारामतीकर काका ?/ पिताश्री बाळासाहेब/ आजोबा प्रबोधनकार ?/शिवाजी महाराज?कोणीही नाही. पिताश्री, आजोबा, शिवाजी महाराज वगैरे सेनेला मते देऊ शकत नव्हते. जे काही यश मिळालंय ते भाजपशी युती करून भाजपच्या मतांवर. बारामतीकर काका योग्य वेळी लाथाडतील किंवा आपल्या तालावर नाचवतील.६) कोणता सामाजिक गट आपला म्हणेल? हा फार कळीचा मुद्दाच.बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही.शिवसेना हा पक्ष कधीही
शिवसेना हा पक्ष कधीही मराठीवादी किंवा हिंदुत्ववादी नव्हता व नाही. फक्त मतांसाठी त्यांनी ते सोंग घेतले होते.+१ खरा हिंदूत्ववादी पक्ष “गोव्यात बीफ कमी पडू देनार नाही“ असं म्हणणार्या पर्रीकरांचा होता. तसेच मेहबूबा शी युती करनारा होता.मराठी बहुल मुंबईत व काही प्रमाणात कोकणात सेनेचा थोडा समर्थक वर्ग अजून शिल्लक आहे. हे भाग बालेकिल्ला वगैरे नाहीत. महाराष्ट्राच्या इतर भागात सेनेला स्थान नाही.+१ सेनेची ईतका कमी समर्थक वर्ग आहे की सेनेचा आज फक्त मुख्यमंत्रीच आहे. :) तसेच मालेगाव ग्रामीण ह्या मध्यमुंबईतील भागात एकेकाळी आदित्य ठाकरे ऊभे राहनार होते. पण तो “महाराष्ट्राच्या ईतर भागात येत नाही.स्वबळावर वढले तर जास्तीत जास्त १०, इतर एक दोन पक्षांशी युती केली तर जास्तीत जास्त २०.२०१४ ला स्वबळावर फक्त ६३ जागा मिळाल्या होत्या. :)जे काही यश मिळालंय ते भाजपशी युती करून भाजपच्या मतांवर.२०१४ ला ६३ आमदार स्वबळावर भाजपमुळे मिळाले होते. :) २०१९ ला तर ठाकरे अमात शहांचा घरी गेले होते युती करा म्हणून नाहीतर सेना संपली असती. पण विकल्या गेलेल्या मीडीयाने सांगीतलं की युती करायला अमीत शहा मातोश्रावर आले होते. :)बाळ ठाकरेंच्या काळातील आता ७०+ वय असलेले थोडे ब्ल्यू कॉलर कामगार सोडले तर इतर कोणीही नाही.७० + लोकांनी ६३ आमदार निवडूण दिलेत. श्रिगुरूजी तुम्ही भावनेच्या भरात फारच वाहवत आहात. हे निरीक्षण नोंदवून खाली बसतो.अबा, तुमचे मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत.
मतदारांनी स्मरण शक्ती वापरली
मतदारांनी स्मरण शक्ती वापरली
का?
६) कोणता सामाजिक गट आपला
राज्यापुरतं बोलायचे तर
राज्यापुरतं बोलायचे तर तळागाळातील कार्यकर्ते असलेले फक्त काँग्रेस ( यात राष्ट्रवादी गृहीत धरलेले आहे ) आणि भाजपखिक्क. भाजपचे कार्यकर्ते ते पण तळागाळात :)गोहाटीत बसलेल्या शिवसेनेच्या
संजय राऊतांचा इशारा
संजय राऊत हे सेनेचे अधिक्रूत
१०००० % सहमत !!
केंद्र सरकारने कोणताही
केंद्र सरकारने कोणताही मुलाहीजा न ठेवता, पुढे रस्त्यावर युऊ घातलेली हाणामारी रोखण्यासाठी मविआ सरकार बरखास्त करुन रा ष्ट्रपती राजवट लागु करावी.दुर्देवाने भारत लोकशाही देश असल्याने राष्ट्रपती भाजप पुरस्कृत असले तरी त्याना कायदा पाळावाच लागनार आहे.अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते
अस तुम्ही म्हणूच कस शकता, ते
अगदी अगदी
आता बॉलीवूड निर्माते 'बालासाहेब हमारे'
झिरवळ यांचा आमदारांना निलंबीत
एकनाथ शिदेंच्या शिवसेना
तरडे डायरेक्टर असल्याने
गणैशा यांचे चर्चेत स्वागत!!!!
धन्यवाद.
का? तरडे उघडपणे "माझ्यावर
शिवसेना मला आधी कधीच आवडली
उद्धव ठाकरेंना लोकं संयमी कसा
+ १
उद्धव ठाकरे यांनी मागे
भाजपची समाजवादी विचारसरणी -
बाळासाहेबांनी हिदूत्वाचा झेंडा हातात घेतल्यावरच शिवसेनेची वाढ झाली. ती इतकी दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती की भाजपानेही समाजवादी विचारसरणी सोडून हिंदूत्वाची कास धरली होती.१९८६ नंतर श्रीरामजन्मभूमी आंदोलन वाढायला लागले. त्याच सुमारास राजीव गांधींनी शहाबानो खटला प्रकरणात मुस्लिम धर्मांधांसमोर पूर्ण लोटांगण घातल्याने देशात हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत होती. त्याचवेळी आपली मराठीवादी विचारसरणी बाजारात अजिबात खपत नाही हे सेना स्थापनेनंतर जवळपास २२ वर्षांनंतर बाळ ठाकरेंनी ओळखले. त्याचवेळी देशात हिंदुत्ववादी विचारसरणी वाढत असल्याने बाळ ठाकरेंनी आपला मराठी बाण्याचा मुखवटा उतरवून हिंदुत्वाचा मुखवटा परीधान केला. भाजपने बाळ ठाकरेंनंतर समाजवादी विचारसरणी सोडून हिंदुत्व विचारसरणी धरली हा दावा पूर्ण असत्य आहे. दुसरं म्हणजे सेनेची वाढ दैदिप्यमान व आश्चर्यकारक होती व ती हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे झाली हे दोन्ही दावे सुद्धा पूर्ण असत्य आहेत.दुसरं म्हणजे सेनेची वाढ
आपली राजेश१८८ उपाख्य कचुरे
बरं. पण आम्ही तुमचे भाजपनेच
अतिशय सुंदर प्रतिसाद गणेश सर.
बदलते शीर्षस्थ नेतृत्व आणि न बदलणारे शिवसैनिक
विश्लेषण आवडले
संस्थान खालसा होणं अवघड आहे
पटले
कळीचा मुद्दा
जय शहा आणि अमृता फडणवीस
पक्षश्रेष्ठी त्यांच्या उपनेत्यांसाठी अचानक नॉट रीचेबल होतात,
छान निरीक्षण!
आज जर सेनेत अंतर्गत लोकशाही असती तर हि वेळ आली नसती
शिवसेना हि जगावी, एक मराठी
शिवसेना हि जगावी, एक मराठी माणूस म्हणून अनेकांनाही वाटते पणमी मराठी असलो तरी मला तसे कधीही वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे सेना हा मराठी माणसांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे आणि मध्यरात्री दुचाक्या जाळणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या, गणेशोत्सवात अगदी गरीब परिस्थितीतल्यांकडून टोळक्याने जाऊन खंडणी वसूल करणाऱ्यात आणि यांच्यात फरक नाही.माझ्य म्हण्यायचा अर्थ केवळ
पुढे गुंड प्रवृत्ती वाढली?
असं असूनही
निखिल वागळेला व कृष्णा देसाई
श्रेय