Skip to main content

शशक'२०२२ - बाप

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको? रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली. कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको? नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं. बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं “शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”

वाचने 34686
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

+१ आवडली. असं बर्‍याचदा घडताना पाहिलंय !

In reply to by चौथा कोनाडा

अगदी!

+१

कथा आवडली. पण शेवटच्या २ ओळी अधिक आकर्षक पद्धतीने लिहिता आल्या असत्या.

In reply to by तर्कवादी

मतादानाचा विचार करता ही शशक प्रथम क्रमांकाची दावेदार दिसत आहे सध्यातरी. (अजून ४ दिवस मतदानाचे बाकी आहेत म्हणा). सामान्य माणसाच्या भावभावना मांडणारे कथानक नक्कीच वाचकांच्या भावनेला हात घालणारे आहे. पण तरीही काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात. लेखक या मुद्द्यांचा नक्कीच विचार करतील ही आशा आहे. १) टंकनचुका - उदा. "शेताततला लाखाचा माल" २) र्हस्व-दीर्घच्या चुका - उदा. बूडवून नसून बुडवून असायला हवे. ३) कथानक छोटंसं असल्याने एखादी गोष्ट सांगायला अधिकाधिक शब्द वापरलेत असं दिसतंय उदा. १
शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?
याऐवजी "शेतातला लाखाचा माल वेळेत मार्केटला न पोहोचल्याने खराब होवून वाया गेला. बापासाठी एवढं करायला नको ?" असं कमी शब्दांत जमलं असतं. बाप महत्वाचा होता हे अध्याहृतच आहे. खरंतर "बापासाठी एवढं करायला नको" ह्या प्रश्नाचीही गरज नव्हती. उदा. २ -
त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता - ही यादी विनाकारण वाढवल्याप्रमाणे वाटते. त्याऐवजी आदरातिथ्य किंवा सरबराई यापैकी एखाद्या शब्दाने काम झाले असते. उदा. ३
ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना
बोचला आणि लागला हे दोन्ही शब्द एकच भावना व्यक्त करतात. अशाप्रकारे अनावश्यक पुनरुक्ती टाळून वाचलेले शब्द दुसरं काही व्यक्त करण्याकरिता अजून परिणामकारकरित्या वापरता आले असते. ४) कथा ही कथानायकाचे स्वगत यास्वरुपात मांडलीय. पण ह्या स्वगताचा भाव अगदी पहिल्या वाक्यापासून असा आहे की "मी माझ्या बापाकरिता नुकसान सोसलं, त्रास सोसला, मला डॉक्टरांनी शाबासकी दिली " ई ई सगळा मीपणा दिसतो आहे. तो टाळता आला असता तर बरं झालं असतं. नायकाची भावना अधिक गहिरी झाली असती. कथानक थोडं वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करता आला असता. उदा. संवादांच्या माध्यमातून कथा उलगडत गेली असती तर अजून परिणामकारक झाली असती.

+१

+१ सं - दी - प

+१ भिडली

+१

कथा आवडली.

+१

+१

या स्पर्धेतील सर्वोत्तम कथा..ओढून ताणून काही नाही

In reply to by कपिलमुनी

या स्पर्धेतील सर्वोत्तम कथा..ओढून ताणून काही नाही
+१ - (कथा आवडलेला ) सोकाजी

सगळीकडेच लागु होते अशी शुक्रवारची कहाणी. भारत/परदेशी असलेल्या मुलान्मधे पण होतो कळत्/नकळत दुजाभाव

मी १०१ शब्द मोजलेत ... कुणी खात्री करु शकेल काय ? (वर्डमध्ये पेस्ट केल्यावर मात्र १०० दाखवत आहे)

In reply to by तर्कवादी

१०१ शब्द आहेत. "रात्रीअपरात्री हा एक शब्द पकडला तर मग १०० होतात शब्द. सं - दी - प

+१

+१

फारच वाईट , बापाचे बोचरे बोलणे असेच मलाही नेहमी जवळचे आईवडिल सख्खी भावंडे, मुले कृतघ्नतेने वागण्याचे अनुभव व नंतर मी मनांतच तडफडत बसणे मलाच का असे मनापासून घरातल्यांचे करूनही , पैसे खर्च करून आसे अनुभव सर्वांकडून अगदी मित्रमैत्रिंणीकडूनही येतात, आपल्यावेळी कोणीही आपले नाही तरी नोकरीत तर हा रोजचाच अनुभव असतो त्यामुळे मन मेलेलेच असते व मग जगरहाटी साठी साधारण 22/23 वयापासून निब्बर झालेले असते पण कधीच कृतघ्न घरच्यांकडून पोचपावती स्वतःहून दिलेली नसते व नेसमीचाच हा अनुभव म्हणून वाईट वाटायचे रहात नसते.

+१

+१

+१ हे सार्वत्रिक आहे. भारतीय मानसिकताच पैशाला किंमत देणारी आहे. संस्कारक्षम पण कमी कमवणारा मुलगा हा पैसे कमावणाऱ्या पण शारिरीक कष्ट/जबाबदारी न उचलणाऱ्या मुलापेक्षा नेहमी कमीच कौतुकाला पात्र ठरतो. शारीरिक कष्ट करुन जबाबदारी उचलणाऱ्यांना समाजात किंमत/मान/कौतुक दिले जात नाही , ही वस्तुस्थिती आहे. आई वडील सर्व मुलांना समान वागवतात यावरुन तर कधीच विश्वास उडाला आहे. ज्यांचे आईवडील समान वागवत असतील ती मुले सुदैवी. असो.

In reply to by श्वेता२४

जो करतो त्याची किंमत, जाऊ दे, खरेच आवडली कथा आणि अभिप्रायही

+१

+१

+१

+१

+१

चांगली आहे गोष्ट.

In reply to by कॉमी

तुमच्या प्रतिक्रीये बरोबर +१, -१ असं काहीही नसतं. मत कसं मोजलं जानार? स्पर्धेचे नियम माहीत आहे की नाही?

+१

+१

+1

+१

+१

+1

ऐसैच होता हैं +1

+१

मतदान

+१

+१ खरी व्यथा. कथा आवडली.

+१

+१

+१

+१

बिनधास्त पहिला नंबर देऊन टाका.

बाप ह्या कथेविषयी:- खरं तर ही आमची घरातीलच कथा. मी पुण्यात नोकरील असतो लहान भाऊ गावी. ही कथा जन्मली त्याच्या सुपीक डोक्यातून. आमचे शेत वगैरे काही नाही. सुरूवातीला मी कथा लिहून त्याला दाखवली पण त्याला ती आवडली नाही. गावाकडच्या मूलाचं लाखाचं नूकसान हवंच असं त्याचं म्हणणं. मग कथानक दोन वेळा बदलवून त्याच्या कडून तपासून घेतलं, त्याला पुर्ण आवडली नी मग त्याने प्रकाशीत करायला परवानगी दिली. मला ही कथा ईतकी आवडली नव्हती. पहीली येईल हे तर आजिबातच वाटलं नव्हतं. त्यापेक्षी “नवाकाळ“ ही कथा जास्त प्रसिध्द होईल असं वाटलेलं. नवाकाळ ने सुरूवातीला आघाडी ऊघडलेली पण ससा कासवाच्या कथेतील सस्या सारखी मध्येच झोपली. अनेकांना बाप ही कथा भावली. पण ह्या कथेला दुसरी बाजू देखील आहे. नवाकाळ प्रसिध्द केली नसती तर शहरातील मुलाची बाजूही लिहीनार होतो.

In reply to by काड्यासारू आगलावे

पण ह्या कथेला दुसरी बाजू देखील आहे
हो. दुसरी बाजू असायला हवीच ना. मलाही सुचलं दुसर्‍या बाजूचं कथानक.. पण मुळ कथा तुमची असल्याने तुमचा हक्क पहिला. मात्र जर तुम्ही लिहिणार नसाल तर मात्र मला सांगा, मी लिहीन माझ्या मनातली कथा.