परदेशी गेलेले भारतीय
दरवर्षी लखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. लाखो भारतीय नागरीक नोकरीसाठी परदेशी जातात. कधीतरी अनपेक्षितरित्या परदेशात गंभीर परिस्थिती निर्माण होते, जीवीताला धोका नोर्माण होतो. अशावेळी परदेशस्थ भारतीय साहजिकच भारत सरकारने आपली सुटका करुन आपलाला भारतात सुखरूप परत न्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतात, सरकारला विनंती करतात, त्यांचे नातेवाईक सरकारला विनंती करतात. सरकारही तसा प्रयत्नं करतं
सध्या युक्रेन युद्धामुळे तिथे असलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आणि सरकारने आपली सुटका करावी अशी विनंती विद्यार्थी व पालक यांनी केली. सरकारने अर्थातच योग्य हालचाली करुन त्यांना परतही आणलं. अशा घटना यापूर्वीही घडल्या होत्या.
मात्र यावेळचं चित्र जरा वेगळं, किंबहुना विपरीत आहे.
हे सर्व विद्यार्थी स्वांत सुखाय, स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी गेले आहेत. युद्ध सुरु होण्याआधी अनेक दिवस या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला फुकट नेलं पाहिजे असा त्यांचा आणि पालकांचा आग्रह का? आखातात गेलेया हातावर पोट असलेल्या कामगारांना फुकट आणणं समजण्यासारकहं आहे. सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एकिकडे अनेक विद्यार्थी व पालक कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक विद्यार्थी उद्धटपणे बोलताना, अरेरावी करताना दिसून आले आहेत. "आम्हाला अनेक मैल चालावं लागलं मग सरकारी विमान मिळालं, जेवणखाण चांगलं नव्हतं, स्वच्छ्तागृहं स्वच्छ नव्हती, आम्हाला आणलं तर उपकार केले का? अशी भाषा वापरताना काही विद्यार्थी दिसत आहेत. काही वायरल व्हिडीओ मध्ये विमानतळावर स्वागथार्थ आलेले सरकारी अधिकारी/ मंत्री यांची दखल न घेता वा त्यांनी केलेल्या स्वगताला प्रतिसादही न देता विद्यार्थी दिसत होते.
तर अशा स्वस्खुशीने स्वांतसुखाय परदेशी गेलेल्या आणि जाणीवपूर्वक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने फुकट का आणावे?
आता तर या विद्यार्थ्यांना तिथे परत जाणं शक्य नसेल तर इथल्या वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी यांच्यापायी आपलं नुकसान का सहन करावं?
हे म्हणजे बँकेत व्याज कमी मिळतं म्हणून नफा कमावण्यासाठी शेअरमध्ये पैसे गुंतवणार्यांनी बाजार आपटल्यावर सरकारकडे नुकसान भरपाई मागण्यासारखं आहे
मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओ तै
युक्रेनच्या सुमी शहरात
हे एकदम साफ आहे
लोक म्हणजे तुम्ही ना? शक्य
भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा
थेट नेहरूंच्या काळापासून
"भारत सरकार काही ही करत नाही.
51
आणी हो
मला प्रतिक्रिया पाहून हसावे की रडावे हे कळत नाही