Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ४

लेखक निनाद यांनी सोमवार, 21/02/2022 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकमध्ये २६ वर्षीय हिंदू कार्यकर्त्याची हत्या. अभिनेत्री कंगना रणौत आणि रवीना टंडनपासून ते भाजप नेते आणि समाजातील प्रमुख सदस्यांनी हर्षाच्या थंड रक्ताच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. रुपेश कुमारचीही झारखंडमध्ये याच मानसिकतेच्या लोकांनी हत्या केली गेली आहे. भारतात हिंदु असुरक्षित होत चालले आहेत.

वाचने 15982
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

अमेरिकेने युनायटेड नेशन्सला कळवले आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या विश्वासार्ह माहिती नुसार लष्करी कब्जानंतर ठार मारण्या साठी किंवा छळ छावण्यांमध्ये पाठवण्यासाठी मॉस्को युक्रेनियन लोकांच्या याद्या संकलित करत आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबतीत बातमी दिली आहे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

वॉशिंग्टन पोस्टने याबाबतीत बातमी दिली आहे.
ह्या बातमीची विश्वासार्हता येथे संपली आहे. धवा.

In reply to by प्रदीप

पण हा वॊशिंग्टन पोस्ट चा तर्क नव्हे. अमेरिकेने असे पत्र लिहिले आहे ही बातमी आहे. तर्क अमेरिकन फॉरीन ऑफिस चा असावा. आणि अगदीच खोटा ही मानता येत नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

अमेरिकन सुरक्षा यंत्रणेवरील माझा विश्वास शून्य असला तरी ह्या रशियन कथानकांत अमेरिकेने कमालीची विश्वासार्हता आणि पारदर्शीता दाखवली आहे.

In reply to by साहना

निदान या बाबतीत तरी माझा पाश्चिमात्य जगाला पाठिंबा असेल. कारण काश्मीर बाबत हेच अर्ग्युमेंट आहे. तेव्हा युक्रेन ने सर्व रशियन धार्जिण्या लोकांनी हा प्रदेश सोडून निघावे हा स्टान्स घेणे योग्य होईल.

राजकोट येथील वकील सोहिल हुसेन मोर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या, मारहाण करणे आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याच्या आरोपावरून दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले. मुंजकाजवळील शामाप्रसाद मुखर्जी नगर आवास येथे रविवारी सायंकाळी वकील सोहिल हुसेन मोरने गोंधळ घातल्याची घटना घडली. मोर यांनी निवासी सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद टिप्पणी पोस्ट केली होती. गटातील एक सदस्य ज्योती सोढा यांनी यावर आक्षेप घेत मोर यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. मात्र, संतापलेल्या मोर यांनी सोढा यांना सांगितले की, “हा आता पाकिस्तान बनला आहे, इथे सगळे मुस्लिम आहेत, सर्व हिंदूंनी आता येथून निघून गेले पाहिजे,” असे हा वकील म्हणाला. मोर याने रागाच्या भरात तिला चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि गणपतीची मूर्ती फोडली. काही वेळातच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस हवालदार रवत डांगर यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला असता मोर याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. गेल्या रविवारी हर्षा या २६ वर्षीय कर्नाटकातील तरुणाने हिजाब विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे.

In reply to by निनाद

हे उघडकीस येणारे प्रकार अद्याप तुरळक आहेत. हिंदूंच्या अतिसाहिष्णू वृत्तीमुळे किंवा नामर्द भ्याडपणामुळे हे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. जोपर्यंत हिंदू समाज कट्टर सनातनी होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील. भर मुंबईत दिवसा ढवळ्या कुर्ला स्थानकाच्या फलाटावरून अंत्ययात्रा काढण्याची मुजोरी हे धर्मांध लोक करू शकतात. 'Now or Never' आणि 'Do or Die' ही वेळ हिंदूंवर आता येऊन ठेपलेली आहे.

In reply to by Nitin Palkar

हिंदूत्वाच्या नावाने नतो मागून सत्ता मिळवनारे काय करत आहेत? हा ही मोठ् प्रश्न आहे. सत्तेपुरते हिंदूत्व.

In reply to by मुक्त विहारि

CAA आणि NRC काय आहे? ----- स्वघोषित, हिंदू हितवादी "शिवसेना" , ह्यांना का बरे विरोध करत आहे? ------ आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांनी, ह्यावर काही माहिती दिलीत तर उत्तम...

In reply to by मुक्त विहारि

२०१४- २०१९ - राजिनामे द्या. २०१९- ते पुढ…. सेनेने गद्दारी केली वगैरे वगैरे… काय ते एक ठरवा. वैचारीक गोंधळातून बाहेर या. जनतेची सेवा करायला सत्ताच असावी असं काही नसतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रश्र्न काय आणि उत्तर काय? बाय द वे, राजीनामे, शिवसेनेने का दिले नाहीत? आणि आमच्या कडे तर, युती आहे... असाच प्रचार केला होता...शिवसेनेने, आमच्या सारख्या, सामान्य माणसालाच धोबी पछाड दिली ... ------- जनतेची सेवा करायला सत्ताच असावी असं काही नसतं. ------ हे तुमचे मत नक्की आहे का? मग, तुम्ही घराणेशाहीला विरोध करणार तर!!!!!

In reply to by मुक्त विहारि

भाजपा नी सत्तेत न राहता जनतेची सेवा करायची. आणि तिघाडी सरकार मात्र वाटेल त्या मार्गाने सत्तेवर रहाणार आहे.... त्याना त्या शिवाय जनतेची सेवा करवत नाही.

भारतीय डॉक्टर आता हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी 'चरक' शपथ घेणार आहेत. चरक शपथेतून आपली प्राचीन संस्कृती दिसून येईल, मात्र चरक हे आद्य आयुर्वेदाचार्य होते. चरक शपथ ही मूलभूत वैद्यकीय नैतिकतेच्या दृष्टीने जुन्या हिप्पोक्रेटिक शपथे सारखीच आहे. नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस आणि IMS BHU च्या ENT विभागाचे डॉ. विश्वंभरनाथ सिंह म्हणाले की महर्षी चरक हे भारताचे आद्य गुरू आहेत आणि आमची संस्था १९७७ पासून त्याचा प्रचार करत होती. हे पाऊल तरुण वैद्यकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच नैतिक मूल्ये रुजवेल. आजपर्यंत वैद्यकीय शिक्षणासंदर्भात ‘इंडियन मेडिकल काउन्सिल’ ही संस्था सर्व काही एकाधिकारशाहीने निर्णय घेत असे. इंडियन मेडिकल काउन्सिल हे भ्रष्टाचाराचे कुरण बनलेले होते असे म्हणतात. त्यामुळे ते बरखास्त करून त्याऐवजी नॅशनल मेडिकल कमिशनची नियुक्ती केली गेली आहे.

In reply to by निनाद

ते तर ठिक आहे. हे पुढचे बघा. श्री जयालाल उघड - उघडपणे क्रिश्चन रिलीजनचा प्रचार करत असत. Dr J A Jayalal याचिकेत असे म्हटले आहे की ट्रायल कोर्टाने "अपीलकर्त्याने कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी IMA च्या व्यासपीठाचा वापर करू नये असे प्रतिकूल विधान निर्देशित करण्यात आणि पास करण्यात चूक केली", जे अपीलकर्त्याने "कधीही केले नाही". परंतु अशी टिप्पणी देऊन, न्यायालयाने प्रथमदर्शनी अपीलकर्ता ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी दोषी असल्याचे मानले, "जे पूर्णपणे चुकीचे आहे आणि कोणत्याही चाचणीशिवाय आणि अंतिम निर्णयाशिवाय अंतिम निर्णयाचे प्रमाण आहे," असे त्यात म्हटले आहे. The plea stated that the trial court “errored in directing and passing adverse statement that appellant shall not use the platform of IMA for propagating any religion”, which the appellant “never did”. But by passing such remark, the court prima facie held the appellant was guilty of propagating Christianity, “which is completely wrong and amounts to final judgment without any trial and final adjudication,” it stated. https://indianexpress.com/article/cities/delhi/ima-president-moves-hc-n… https://www.opindia.com/2021/05/complaint-filed-against-ima-president-j… https://www.opindia.com/2021/03/ima-president-dr-ja-jayalal-wants-to-us…

In reply to by Trump

डॉ जॉनरोज ऑस्टिन जयलाल म्हणाले होते
धर्मनिरपेक्ष संस्था, मिशन संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक काम करण्यासाठी आम्हाला अधिक ख्रिश्चन डॉक्टरांची गरज आहे. मी एका वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रियेचा प्राध्यापक म्हणून काम करत आहे, त्यामुळे तेथे सर्वांगीण उपचारांची तत्त्वे पुढे नेण्याची माझ्यासाठी ही एक चांगली संधी आहे. मला पदवीधर आणि इंटर्न्सना मार्गदर्शन करण्याचा विशेषाधिकार देखील मिळाला आहे.
डॉ जॉनरोज ऑस्टिन जयलाल त्यांच्या वेबसाइटनुसार ख्रिश्चन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया, गुड समरिटन क्लब आणि रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत . ख्रिश्चनिटी टुडेला दिलेल्या मुलाखतीत डॉ जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचा वापर करून ख्रिश्चन डॉक्टरांची संख्या वाढवण्याच्या त्यांच्या योजने बद्दल ते बोलत होते. मला अडचणींमध्येही, अगदी सरकारच्या नियंत्रणातही, निरनिराळ्या मार्गांनी ख्रिस्ती धर्म वाढत आहे - हे मी पाहू शकतो. पण मिडियामध्ये गाजावाजा झाल्यावर हा भाग नंतर काढला गेला. त्यांच्यामते ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी कोव्हिड ही एक संधी होती. आजही डॉ जॉनरोज ऑस्टिन जयलाल त्यांच्या वेबसाईटवर तेच अध्यक्ष असल्याचा दावा करत आहेत. त्यांचा मुलगा ही डॉक्टर आहे डॉ. जेकिन जे शेरॉन एमबीबीएस

ते कोणतेच प्रकरण गंभीर घेण्याची गरज नाही असे वाटते. कंगना सामाजिक विषयावर मत मांडणार? हास्यास्पद.

In reply to by sunil kachure

चारित्र्य हत्या केली की त्या व्यक्तीने कितीही योग्य मत मांडले तरी - विश्वासार्हता कमी आहे असे म्हणत रहायचे! हा कंगनाच्या विरुद्ध समस्त बॉलिवुडनेने राबवलेल्या "स्मीअर मोहिमेचा" भाग आहे. यामध्ये एखाद्या तीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कमी करण्यासाठी हेतुपुरस्सर, पूर्वनियोजित प्रयत्नांचा समावेश केलेला आहे. कंगनाला याची शिकार बनवले गेले आहे. स्मीअर हा समूह किंवा व्यक्तीची विश्वासार्हता कमी करण्याच्या उद्देशाने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे - आणि कंगनाच्या केस मध्ये ते स्पष्ट दिसते आहे. कंगना चे नाव आले की ते कोणतेच प्रकरण गंभीर घेण्याची गरज नाही असे वाटते. हे वाक्य म्हणजे नकारात्मक प्रचार करून एखाद्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा किंवा त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात कंगनाच्या मुलाखती पाहिल्या तर अनेक मुद्दे ती योग्य प्रकारे मांडते असे दिसून येते. काहीवेळातर तर ती बॉलीवुड आणि काही पक्षांच्या विरोधात व्यवस्थित मांडणी करत जाते. हे काही लोकांना टोचते! ती राष्ट्रप्रेमी असल्याने कराचीप्रेमी मंडळींना आणि डाव्या लोकांना आवडत नाही - म्हणून तिच्या विरुद्ध "स्मीअर मोहिमा" चालवल्या जातात. कंगनाच्या बाबतीत टॅब्लॉइड पत्रकारितेशी साधर्म्य राखणारी टिव्हीची रणनीती म्हणून स्मीअर मोहिमेचा वापर केलेला दिसून येतो.

In reply to by sunil kachure

बोलू द्या हो कंगनाबाईंना, तेव्हडीच सगळ्यांची चार घटका करमणूक होते. कंगना ताई आणि मुनावर "हिंदू देवतांवर ज्योक" फारुकी यांचा एकत्र शो येत आहे. बिचाऱ्या मुनावरला कोणी कामच करू देत नव्हतं, कंगणाबाईंनी त्याला मदतीचा हात दिला, लाईमलाइट आणि प्लॅटफॉर्म दिला हे कौतुकास्पद आहे.

अधिकारी टेंडर स्वीकारत नव्हते; कंत्राटदाराने असं काही केलं की, घरी गेलेले कर्मचारी पळत कार्यालयात आले https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/attempted-self-immo… ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे?

“मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात, कधीकाळी टीका-आरोप झाले, पण…”, शरद पवार यांचं वक्तव्य https://www.loksatta.com/mumbai/sharad-pawar-comment-on-allegations-on-… 1981-82 च्या सुमारास, मुंबई पोलीसांनी संप केला होता ... तेंव्हा सत्ता तर कॉंग्रेसचीच होती, तेंव्हा का नाही, पोलीसांना घरे बांधून दिली? गेली 70-80 वर्षांत, कॉंग्रेसने, पोलीसांसाठीच कशाला? सामान्य जनतेसाठी देखील काही केलेले नाही.

In reply to by मुक्त विहारि

गेली 70-80 वर्षांत, कॉंग्रेसने, पोलीसांसाठीच कशाला? सामान्य जनतेसाठी देखील काही केलेले नाही.
असं कसं? आय.आय.टी, आय.आय.एम, एम्स वगैरे विसरलात का? नेहरूंनी भारतात लोकशाही आणली आणि रूजवली हे विसरलात का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे नक्की का? ---- चीनला बळकटी देणे, काश्मीर सोडून देणे, पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंना वार्यावर सोडून देणे, हे पण केले आहेच की ... बाय द वे, व्हीजेटीआय, जेजे, वगैरे उत्तम शिक्षण देणार्या संस्था ब्रिटिश कालापासूनच आहेत. असो, तुम्ही तिरकस प्रश्र्न विचारला असण्याची शक्यता जास्त आहे, पण काही मानसिक गुलामगिरी पत्करणारे, इतिहास वाचत नाही.

In reply to by मुक्त विहारि

तक्षशिला आणि नालंदा विश्वविद्यालय पण होतेच की, आत्ता जे बुरखा आंदोलन करत आहेत, त्याच धर्मातील लोकांनी ही विद्यापीठे तोडली. हा इतिहास, उदारमतवादी हिंदू लक्षांत घेत नाहीत. शिक्षण महत्वाचे, धर्म नाही, ह्याच उद्देशाने, नालंदा विश्वविद्यालय आणि तक्षशिला विश्वविद्यालय, कार्य करत होते.. बौद्ध धर्मिय देखील, ह्या विद्यापीठांत शिक्षण घेत होतेच की...

नवाब मलिकला अटक. महाभकास आघाडी सरकारमधील दुसरा मंत्री आत गेला आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे ..... ! “आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत” सुसुताईंनी नवाब मलिक यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच आपण कुणासमोर झुकणार नसल्याचं म्हटलं आहे. “ते इतका अतिरेक करतील हे जरा आश्चर्यकारक होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरं झालंय. कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल” - सुसुताईं अरेरे ..... !

नवाब मलिकांना ईडीकडून अटक, कारण ठरला डॉन दाऊद इब्राहिम; काय आहे प्रकरण? जाणून घ्या… https://www.loksatta.com/maharashtra/nawab-malik-dawood-ibrahim-relatio… राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट आखला जात असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही गुंतवला असल्याचा संशय होता. त्यानंतर ईडीने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने मुंबईत छापादेखील मारला होता. ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली. तो सध्या ईडी कोठडीत आहे.

In reply to by मुक्त विहारि

“…हा भाजपाचा नवा धंदा!” ; नवाब मलिकांवरील कारवाईवरून नाना पटोले संतापले https://www.loksatta.com/maharashtra/nana-patole-on-nawab-malik-ed-enqu… कर नाही त्याला डर कशाला?

In reply to by मुक्त विहारि

“महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका…”, नवाब मलिकांच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया! https://www.loksatta.com/maharashtra/ncp-supriya-sule-reaction-on-nawab… गुन्हा केलाच नसेल तर, घाबरायचे कशाला?

In reply to by मुक्त विहारि

Nawab Malik Arrested by ED live : दाऊद इब्राहिम कनेक्शन ; आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ‘ईडी’कडून अटक ; राजकीय घडामोडींना वेग https://www.loksatta.com/mumbai/ncp-leader-and-maharashtra-minister-naw… आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.

In reply to by मुक्त विहारि

नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं…” https://www.loksatta.com/mumbai/ncp-sharad-pawar-on-ed-investigating-na… धार्मिक रंग देण्याची गरज नाही .... ----- शिवाय याआधीच माननीय शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे की ... “मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात, कधीकाळी टीका-आरोप झाले, पण…”, शरद पवार यांचं वक्तव्य (https://www.loksatta.com/mumbai/sharad-pawar-comment-on-allegations-on-…) “मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात काम करतो. आम्ही महाराष्ट्रात आणि देशात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. कधीकाळी टीका-आरोप झाले, पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आलं नाही. असे प्रकल्प राबवताना काही घटक नाराज होतील, आरोप करत बसतील त्याची फिकीर बाळगत बसू नका,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

In reply to by मुक्त विहारि

नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही लढाई…” https://www.loksatta.com/mumbai/shivsena-sanjay-raut-on-ncp-nawab-malik… मग CBIला विरोध करायला नको होता ...

In reply to by मुक्त विहारि

https://www.loksatta.com/mumbai/ncp-leader-and-maharashtra-minister-naw… समान शीले आणि समान व्यसने मैत्री होते, असे म्हणतात...इतक्या एकजुटीने, "समान नागरी कायदा हवाच" ह्यासाठी का येत नाहीत?

In reply to by मुक्त विहारि

दाऊदच्या बहिणीला नवाब मलिकांनी ५५ लाख दिले, ईडीकडे पुरावे आहेत : देवेंद्र फडणवीस https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/devendra-fadanvis-comme… ही गोष्ट जर खरी असेल तर, मतदारांनी, आपण कुणाला मत देत आहोत? याचा विचार करणे गरजेचे आहे ... नाहीतर, ह्याच देशांत, उपेक्षित बलवान माणसांचे काही खरे नाही....

In reply to by मुक्त विहारि

मलिकांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही: भुजबळ https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/minister-chhagan-b… एकदम योग्य बोलले.... अर्थात, गुन्हा सिद्ध झाला तर? ... ह्याचे उत्तर दिलेले नाही .... कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याची चौकशी होणे, ही महाराष्ट्रातील जनतेसाठी, भूषणावह बाब नाही... ED किंवा CBI सारख्या केंद्रीय संस्था स्वायत्त पणेच काम करतात, हा मला तरी विश्र्वास वाटतो...मोदींची देखील केंद्रीय संस्थेने चौकशी केली होतीच की आणि त्या चौकशी वेळी, मोदींनी कधीच केंद्र सरकारला जबाबदार धरले न्हवते... आडातच नाही तर पोहर्यात कसे येईल? कर नाही त्याला डर कशाला?

In reply to by मुक्त विहारि

नोटीस न देता मलिकांच्या ED चौकशीला गृहमंत्र्यांचा आक्षेप; कायदा काय म्हणतो, सांगताहेत उज्ज्वल निकम… https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/nawab-malik-ed-inquiry-ho… ------ उज्ज्वल निकम म्हणाले की, ज्या वेळेस कोणत्याही व्यक्तीविरोधात काहीतरी पुरावा असतो, त्याचवेळेस त्याला चौकशीकरता बोलावण्यात येतं. उडवाउडवीची उत्तर दिलं, नीट उत्तर दिली नाहीत, तर पोलिस कस्टडी मागता येते.आता या प्रकरणात काय पुरावेत आहेत, सकृत दर्शनी पुरावे आहेत, की राजकीय हेतूनं वापर केला जातोय यावर तातडीनं भाष्य करणं कठीण. उज्ज्वल निकम म्हणाले की, प्रीवेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्टचा वापर कशाही पद्धतीनं केला जाऊ शकतो, याची भीती सामान्यांमध्ये वाढतेय. जामीन मिळतच नाही, असंही नाही. कोणत्याही प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा तपास करतात, तेव्हा चौकशीअंती बोलावलं जातं. मनात आलं म्हणून बोलावलं, असं करता येत नाही. उज्ज्वल निकम म्हणाले की, एक गोष्ट नक्की की, काँग्रेसच्या राजवटीत हा कायदा आला. अशाप्रकराचा कायदा, ज्यात अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. ज्या कायद्याचा कशाही पद्धतीनं वापर केला जाऊ शकतो. पण या कायद्यावर सर्वागीण चर्चा झाली आहे, हे दुर्दैवं आहे. काहीकडून या कायद्याचा गैरवापर केला जातो, असा आरोप होतो. -------

In reply to by मुक्त विहारि

मलिकांवरील कारवाईनंतर घडामोडींना वेग, पवारांकडून तातडीची बैठक https://www.esakal.com/mumbai/ajit-pawar-calls-urgent-meeting-after-naw… ----- 1. निवृत नौसैनिकाला मारहाण केली, तेंव्हा बैठक का नाही घेतली? माननीय शरद पवार, तर संरक्षण मंत्री होते 2. साधू हत्याकांड झाले, तेंव्हा बैठक का नाही घेतली? साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, ही तर ह्या देशाची शिकवण आहे . 3. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, तेंव्हा बैठक का नाही घेतली? All are equal. But some are more equal...असे काही धोरण आहे का? एक धोरण ठरवा ना... न्याय सगळ्यांना सारखाच मिळाला पाहिजे .... मग ते भाजप सरकार असो किंवा कॉंग्रेस सरकार असो ...

In reply to by मुक्त विहारि

नवाब मलिक ठरले होते यापूर्वीही वादग्रस्त; तरीही राष्ट्रवादीसाठी का महत्त्वाचे? https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-on-nawab-malik-hi… अल्पसंख्याक समाजाला आपलेसे करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने अल्पसंख्याक विकास हे खाते मागून घेतले होते. मलिक यांनी या खात्याच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मलिक यांना अटक झाली तरी त्यांना बेदखल करणे राष्ट्रवादीला शक्य होणारे नाही. कारण राष्ट्रवादीकडे तेवढ्या तोडीचा दुसरा अल्पसंख्याक समाजातील नेता नाही. मलिक यांच्यावरील कारवाईनंतर शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी कारवाईचा निषेध करीत मलिक यांच्या पाठीशी ठाम राहण्याचे संकेत दिले. -------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत, हे माझे वैयक्तिक मत, अधिकाधिक दृढ होत चालले आहे...

In reply to by मुक्त विहारि

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे? https://www.loksatta.com/mumbai/explained-the-case-against-nawab-malik-… दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे... -------

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर दुकानांवर मराठी पाट्या…”, उच्च न्यायालयानं व्यापारी संघटनांना फटकारलं! https://www.loksatta.com/maharashtra/bombay-high-court-rejects-plea-of-… व्यापाऱ्यांनी केलेली याचिका न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड लावून फेटाळली. मराठी भाषा मरणासन्न झाली आहे आणि मराठी शाळा बंद होत असताना व्यापाऱ्यांवर अशा प्रकारे मराठी फलकांची सक्ती केली जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. -------- यथा राजा तथा प्रजा .. नेत्यांची मुले जर, मराठी माध्यमातून शिकत नसतील तर सामान्य जनता, आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून कशाला शिकवायला पाठवेल?

यूक्रेन संकट को लेकर भारत सरकार ने जारी की एडवायजरी....भारतीयों को स्वदेश लौटने की दी सलाह https://www.sudarshannews.in/Russia-Ukraine-Government-of-India-issued-… हे केंद्र सरकार, योग्य तो निर्णय नक्कीच घेईल... अर्थात, भारतीय मंडळी सुखरूप परत आली तरी, काही लोकांच्या पोटात दुखायची शक्यता आहे ...

डोंबिवली: माजी आमदार संजय दत्त यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल https://www.esakal.com/mumbai/police-complaint-filed-against-congress-f… काय बोलावं, ते सुचेना....

https://www.lokmat.com/crime/crime-against-shiv-sena-mla-in-bhavjayi-as… ह्याच राजवटीत, निवृत्त नौसैनिकाला मारहाण करून झाली... ह्याच राजवटीत, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली गेली... आणि आता घरातील सदस्यांना मारहाण... ह्या राजवटीत, अजून काय काय वाचावे लागेल? ते सांगता येत नाही ....

In reply to by मुक्त विहारि

ह्याच राजवटीत, पेट्रोल चे भाव गगनाला भिडले ह्याच राजवटीत, डिझेलते भाव गगनाला भिडले ह्याच राजवटीत, गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले ह्याच राजवटीत कोरोना निधी सरकारी नाही तर खासगी घोषीत झाला ह्याच राजवटीत,साडे आठ हजार करोडचै विनान वेकत घेतले गेले ह्याच राजवटीत, भर कोरोनात लाखोंचे रोड शो केले गेले ह्याच राजवटीत, महाराषट्रातून कारियालये गपजरात ला हलवले गेले ह्याच राजवटीत, पहाटे शरथा घेतल्या गेल्या ह्याच राजवटीत, कोरोना लस लोकाना विकत घ्यावी लागली तरी फूकट दिली म्हणून बॅनर लावले गेले ह्याच राजवटीत, हजारो कोटींचे ड्रग्स गुजरातच्या बंदरात सापडले. मिपा मंडळास विनंती की निवृत्त नौसैनीक, घरी बोलावून मारहाण असे शब्द आलेकी तिथे बाय डिफोल्ट वराल प्रतिक्रीया यावी अशी काहीतरी सोय करावी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

1. ह्याच राजवटीत, पेट्रोल चे भाव गगनाला भिडले ह्याच राजवटीत, डिझेलते भाव गगनाला भिडले ह्याच राजवटीत, गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले ----- कृपया दोन पुस्तके वाचा... हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलियाने.... उत्तरे मिळतील 2. ह्याच राजवटीत कोरोना निधी सरकारी नाही तर खासगी घोषीत झाला... मग ते सगळ्याच राज्यात झाले, काही ठराविक राज्यातच विरोध का? 3. ह्याच राजवटीत,साडे आठ हजार करोडचै विनान वेकत घेतले गेले... ते पंतप्रधानांसाठी आहे, उद्या कुठलाही सामान्य नागरिक जरी पंतप्रधान झाला तरी ते विमान मिळेल ... अर्थात, सध्या तरी घराणेशाहीच्या पाईकांना, ते विमान देखील शक्यता नाकारता येत नाही... 4. ह्याच राजवटीत, महाराषट्रातून कारियालये गपजरात ला हलवले गेले... आपल्याला कदाचित टाटाचा एक प्रकल्प, बंगाल मधून गुजरातला गेला, ते आठवत नसेल ... 5. ह्याच राजवटीत, पहाटे शरथा घेतल्या गेल्या.. हो ना ... पण का? आणि त्या औटघटकेच्या कालावधीत, किती कागदपत्रांचे काय झाले? हे ना केंद्र सरकार सांगणार ना राज्य सरकार ... केद्र सरकारने, सामान्य माणसाला नक्कीच न्याय दिला असणार, हे माझे वैयक्तिक मत आहे ... 6. ह्याच राजवटीत, कोरोना लस लोकाना विकत घ्यावी लागली तरी फूकट दिली म्हणून बॅनर लावले गेले... मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींना, फुकटच मिळाली... 7. ह्याच राजवटीत, हजारो कोटींचे ड्रग्स गुजरातच्या बंदरात सापडले... सुरक्षा केंद्रीय आहे ... बंदराची मॅनेजमेंट कुणीही करो ... जाताजाता, विमानतळाची मॅनेजमेंट खाजगी असली तरी, सुरक्षा केंद्रीय पातळीवर आहे... आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, हा माझा स्वभाव नसल्याने, मी स्वतःच वाचन करून, मनन करून, चिंतन करून आणि वेळ आलीच तर, योग्य माणसाला विचारूनच निर्णय घेतो आणि चूक झाली तर, मान्य पण करतो ... बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली... बाळासाहेब ठाकरे यांचा, तो निर्णय मला तरी पटला नाही ... बाय द वे, तुमचे प्रतिसाद वाचतांना छान वाटते ... माझे वाचन विस्तृत होत जाते ...