Skip to main content

कझाखस्तानमधील अशांतता

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 14/01/2022 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले. पाठोपाठ देशात 19 जानेवारीपर्यंत आणीबाणी जाहीर केली. त्याचवेळी हिंसाचार करणारे दहशतवादी असून त्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षादलांना दिले. त्यापाठोपाठ सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या (Collective Security Treaty Organisation/CSTO) शांतिरक्षक दलाला तातडीने मदतीला बोलावून घेतले. कोविड-19 संकटाचा कझाख अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पोलिसांची दमननीती आणि देशातील स्रोतांच्या वितरणातील प्रचंड असमतोल या कारणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढलेला होताच, त्यातच इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमधील सरकारविरोधी भावना आणखी भडकल्या. देशातील सध्याची अशांतता पाहून कझाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रयासाठी जाण्यास सुरुवात केली होती. या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या आडोशाने दंगलखोरांनीही पलायन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कझाख पोलिसांनी सर्व सीमा बंद करत तपासणी सुरू केली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या काही दंगलखोरांच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की, त्यांना अन्य देशांमधून पैसे देऊन तिथे दंगे घडवण्यासाठी आणले गेले होते. देशामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी बाहेरून मदत मिळत असल्याच्या कझाख राष्ट्रपतींच्या आरोपाला पकडलेल्या दंगलखोरांच्या चौकशीतून पुष्टी मिळू लागली. कझाखस्तानमधील काही सरकारविरोधी गटांनीही सरकार बदलण्यासाठीच आपण या आंदोलकांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले. कझाखस्तानने स्वातंत्र्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी कझाखस्तानसाठी परराष्ट्र धोरणात रशियाबरोबरच्या पारंपारिक, राजकीय, लष्करी आणि आर्थिक संबंधांचे महत्व अनन्यासाधारण राहिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कझाखस्तानने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढत गेली. आज त्याची अमेरिकेबरोबर व्यूहात्मक भागीदारी आहे. कझाखस्तानात ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे कझाखस्तानात अस्थिरता वाढणे अमेरिकेला नको आहे. मात्र त्याचवेळी मध्य आशियात रशिया असलेला आणि सध्या चीनचा वाढत असलेला प्रभाव याकडे वॉशिंग्टनकडून गांभीर्याने पाहिले जात आहे. मध्य आशियाचे रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे तेथे आपली पकड कायम ठेवण्यासाठी मॉस्को जागरूक आहे. रशियाचा मध्य आशियावर असलेला प्रभाव कमी करण्यासाठी या क्षेत्रातील देश स्वतंत्र झाल्यापासून वॉशिंग्टनहून सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. पुढे अमेरिकेने सैन्य काढून घेण्याची मागणी या देशांकडून होऊ लागली होती. 2014 मध्ये या क्षेत्रात अमेरिकन सैन्याचे अस्तित्व संपुष्टात आले; मात्र उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझस्तानात मूलतत्ववादी कायम राहिले. त्यांचा प्रभाव मध्य आशियात वाढणे रशियालाही धोकादायक वाटत आहे. म्हणूनच कझाखस्तानच्या विनंतीनंतर मॉस्कोने तातडीने कझाखस्तानला CSTO चे शांततारक्षक सैन्य पाठवले. या मूलतत्ववाद्यांबरोबरच गुन्हेगारी गटही या हिंसाचारात सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच रशिया, अमेरिका, चीन आणि अन्य देशांसाठीही व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या क्षेत्रात प्रत्येकाकडून आपला प्रभाव वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मध्य आशिया भारतासाठीही सामरिकदृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे कझाखस्तानमधील हिंसक परिस्थितीबाबत नवी दिल्लीहून चिंता व्यक्त केली गेली होती. तसेच तेथे लवकरात लवकर शांतता पुन:स्थापित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आले होते. लिंक कझाखस्तानमधील अशांतता (avateebhavatee.blogspot.com)

वाचने 30849
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही आव आणताय कि महागाई गेल्या ७ वर्षात झाली ! काय वाटेल ते ... मागील वर्षी मिपावर एक सध्या प्रयोगाने मी दाखवून दिले कि पेट्रोल चे दर अनेक देशात वाढले आहेत ..फक्त भारतात नाही त्यावर तुमच्यासारखे मंडळी गप्प!

In reply to by चौकस२१२

सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली
खरंतर, "सुरुवातीची अनेक वर्षे काँगेसची सत्ता असूनदेखील देश उभारणीची कामे झाली" असं म्हणावं लागेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावडतीचे मिठ अळणी.
Same to you! --- बाकी, आमचं आवडतं-नावडतं असं काही नाही हो; केवळ देशप्रेम व धर्मप्रेम, दुसरं काही नाही; जय माहिष्मती! --- जय हिंद! 🇮🇳

In reply to by अमरेंद्र बाहुबली

देशप्रेम आणि संविधान प्रेम असे पाहिजे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

महागाई नक्कीच वाढलेली आहे आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच त्रास होत आहे, तरीपण आंदोलन वगैरे होताना दिसत नाहीत कदाचित ही काही कारणे असतील. 1) साध्याला पायाभूत सुविधांमध्ये भरपूर कामे होताना दिसत आहेत, नवीन महामार्ग, मेट्रो इत्यादींची कामे भरपूर होताना दिसत आहेत त्यामुळेच जनतेला आपला पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय खात्री वाटतेय आणि म्हणूनच बरीचशी जनता शांत आहे. 2) हीच गोष्ट defence च्या बाबतीत, माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी सरंक्षण हा आवडीचा विषय असतो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सरंक्षणसंबंधित बरीच मोठी कामे केली आहेत किंवा चालू आहेत. राफेल विमाने, S-400 ची डील नाहीतर भारत चीन सीमेवर वाढवलेल्या पायाभूत सुविधा ह्यात पैसा हा लागणारच. 3) भ्रष्टाचार: मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार झालाच नाही असे कोणीही म्हणणार नाही परंतु झालाच असेल तर तो खालच्या पातळीवर आणि मोठ्या भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण आणखीन तरी उघडकीस आलेलं नाही. हिंदू वर्तमानपत्राने राफेल प्रकरण भरपूर ताणून धरलं होत परंतु खुद्द सुप्रीम कोर्टानेच त्याच्यातली हवा काढून घेतली त्यामुळे सामान्य जनतेचा अजूनही मोदी सरकारवरती विश्वास आहे. 4) सध्याला भारतात अतिशय कमकुवत विरोधी पक्ष आहे, काँग्रेस अजूनही राहुल आणि प्रियांका गांधींना चिकटून बसलेली आहे. आणि लोकांचा ह्या दोघांवर आजीबतही विश्वास नाहीत्यामुळेच भाजप नाही तर कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर जनतेजवळ नाही. त्यात भाजपात घराणेशाही तुलनेत कमी आहे त्यामुळेच सध्यातरी भाजपाच लोकांची पसंती असणार आहे. परंतु समजा अशीच चढती महागाई राहिली आणि सध्यातरी अशक्य वाटणारा महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर भाजपा समोर नक्कीच आव्हान उभे राहू शकते.

In reply to by रात्रीचे चांदणे

>> महागाई नक्कीच वाढलेली आहे आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच त्रास होत आहे, आभारी आहे. >>तरीपण आंदोलन वगैरे होताना दिसत नाहीत कदाचित ही काही कारणे असतील. आपण जी कारणे सांगितली त्याबद्दलही चर्चा होऊ शकते पण लोक आता केंद्रसरकार आणि मोदींच्या धोरणांवर टीका करायला लागले आहेत. बोलायला लागले आहेत. लोकांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न कोणते आहेत आणि सरकार लोकांना कोणत्या प्रश्नांवर भूलवत आहेत त्याची जनतेला समज येत आहे. मला वाटतं सरकारच्या विरोधात स्वतः जनता रस्त्यावर येईल हे यातलं पहिलं पाऊल वाटत आहे. >>> समजा अशीच चढती महागाई राहिली आणि सध्यातरी अशक्य वाटणारा महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर भाजपा समोर नक्कीच आव्हान उभे राहू शकते. जनतेची यानिमित्ताने महागाईच्या विळख्यातून सुटका होऊन आपण म्हणता तसे देशपातळीवर प्रयोग व्हावा, बाकी आपल्या तरी मनात दुसरं तरी काय आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर प्रयोग? कि खेळ १०० + ५२ असे सरळ मत दिले असताना , तीन पायाची मोट जनतेचं कौलाला डावलून बांबूंची तिरडी बांधली आणि म्हणे प्रगल्बह पुरोगामी महाराष्ट्र्र अरे पृष्ठभागात दम होता तर स्वतःचं बळावर १६० मिळवयाचे ना ! जाणत्या राजा च्या मार्गदर्शनाखाली !

जो पर्यन्त देशातील एकमेव मर्द इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या तो पर्यंत काँग्रेस वर कोणता भ्रष्टाचार चा आरोप झाला . येथील आयडी नी संगावेच प्रशासन,सर्व तपास यंत्रणा,स्वतःचा पक्ष ह्याच्या वर पूर्ण command इंदिराजी ची होती आरोप कोण करणार आणि समजा केला तर तपास कोण करणार. आता मोदी त्या स्थिती मध्ये आहेत. मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या मालकांना दहशती खाली ठेवले आहे विविध केंद्रीय यंत्रणा मोदी च्या गुलाम आहेत राज्य घटनेशी त्यांना काही देणेघेणे नाही. कोण मोदी सरकार वर भ्रष्टाचार चा आरोप करेल. सरकार बदलू ध्या सर्व काळे व्यवहार बाहेर येतील .

In reply to by sunil kachure

जो पर्यन्त देशातील एकमेव मर्द इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या तो पर्यंत काँग्रेस वर कोणता भ्रष्टाचार चा आरोप झाला . येथील आयडी नी संगावेच
बोंबला. संजयच्या मारूतीसाठी सरकारी यंत्रणा दावणीला बांधणे, तुलमोहनराव-ललितमोहन मिश्रा आंतरराष्ट्रीय व्यापार परवाने लायसेन्स प्रकरण, नगरवाला प्रकरण वगैरे सगळे प्रकार आणि ते आरोप कोणाच्या कारकिर्दीत झाले होते? तुलमोहन राव- ललितमोहन मिश्रा प्रकरणात सी.बी.आय चौकशी झाली होती त्याचे पुढे काय झाले? ललितमोहन मिश्रांच्या मृत्यूचे गूढ उकलले का? ते नक्की कधी उकलले? संजय गांधींच्या मारूतीला सरकारी बँकांमधून वारेमाप कर्जे दिली जात होती यावर आक्षेप घेणार्‍या आर.बी.आय गव्हर्नर एस.जगन्नाथन यांचे पुढे काय झाले? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच असतील ना?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही कुठे त्या कागलकरांच्या नादाला लागताय? कुत्रं वाकडं होईल पण ते शेपूट सरळ होणार नाही! ))--((

In reply to by sunil kachure

प्रशासन,सर्व तपास यंत्रणा,स्वतःचा पक्ष ह्याच्या वर पूर्ण command इंदिराजी ची होती आरोप कोण करणार म्हणजे ते तुम्हाला मान्य होते तर मग मोदींची ( तुमचं आणि प्रोफेश्वरनच्या मनातील) का चालत नाहो हो? मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या मालकांना दहशती खाली ठेवले आहे चला हे खरे आहे असे गृहीत धरुयात मग ते एन दि टी व्ही चे मालक , चालक राबिश कुमार आणि राजदीप "सरडा " देसाई कोणत्या तुरंगात खितपत आहेत ? सांगा ? सरकार बदलू ध्या सर्व काळे व्यवहार बाहेर येतील ह हा पुवा गणित साधं आहे तुमचं सारख्यांना लोकशाही मार्गाने ५०-६० वर्षांनंतर निवडून सरकार पचतच नाही पचतच नाही पचतच नाही पचतच नाही

In reply to by चौकस२१२

हे धोकादायक च आहे. म्हणून इंदिराजी चे उदाहरण दिले. प्रचंड बहुमत लोकशाही साठी हानिकारक च आहे. प्रचंड बहुमतातील सरकार अस्तित्वात असेल तर सर्व सरकारी यंत्रणा जीव मुठीत धरून असतात. सर्व अधिकार केंद्रीय सरकार la असतात. ते काही ही करू शकतात बहुमत च्या जोरावर हवे ते कायदे ,नियम बनवू शकतात .कोणावर पण कारवाई करू शकतात. कोणी अशा सरकार च काहीच वाकडे करू शकत नाही आणि हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करता येते .न्यायालय पण काही करू शकत नाहीत.

In reply to by sunil kachure

हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करता येते .न्यायालय पण काही करू शकत नाहीत. मोगा खान चष्मा काढा आणि अभ्यास वाढवा NJAC बद्दल केलेली घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने ४-१ बहुमताने रद्दबातल केली आहे. UPHOLDING JUDICIAL SUPREMACY IN INDIA: THE NJAC JUDGMENT IN COMPARATIVE PERSPECTIVE https://www.google.com/search?q=njac+case+summary&rlz=1C1CHBD_enIN915IN…

धागा आवडला. कझाकस्थान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले लोकं पाहुन आनंद झाला ! =)))) असो ह्या निमित्ताने दोन मिनिट शांतता पाळुन कझाकिस्तान चे राष्ट्रगीत ऐकुयात =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

धागा उघडल्याउघडल्या माझे हात शिवशिवलेले पण गंभीर धागा आहे म्हणून गप बसलेलो. काझाकस्तान, काझाकस्तान, यू व्हेरी नाईस प्लेस पूर्ण व्हर्जन-https://youtu.be/PxwylahBfp4

In reply to by धनावडे

नवरा मेला तरी चालेल पण सवत *** झाली पाहिजे..
नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.. अशी मूळ म्हण आहे. रंडकी याचा अर्थ 'विधवा' असा असल्याने यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. हे उगाचच सोवळे पाळण्यासारखे झाले. एवढे बोलून खाली बसतो.

भारतात एकदाच्या राज्यांच्या निवडणुका संपल्या. राज्याच्या निवडणुका असल्यामुळे डिझेल-पेट्रोलचे १३७ दिवस दर स्थिर राहिले, हा एक वेगळा विक्रम राहिला. पण हा बोळा फार काळ राहु शकणार नव्हता हे चाणाक्ष भारतियांना माहिती होते. पहिली दरवाढ २२ मार्च २०२२ ला सुरु झाली. दिनांक २२ ते २९ अशी सात दिवस डीझेल मागे 'विकासदर' साधारणपणे प्रत्येक दिवशी ८० पैसे प्रती दिवस जवळ जवळ पाच रूपये वाढले. तर पेट्रोल मागे जवळ जवळ पाच रूपये वाढले. वृत्तपत्रीय बातम्यानुसार केंद्र सरकारने डिझेल-पेट्रोलच्या उत्पन्नातून ३.३१ लाख कोटी उत्पादनावरील कराच्या माध्यमातून कमावले. अभिनंदन शेठ. दुसरीकडे घरगुतीगॅसच्या दरातही वाढ झाली आहे. ऑक्टोबर पासून त्याचेही दर स्थिर होते. पण मंगळवार पासून त्याचेही रु. ५० ने वाढ झाली आहे. आपला प्रश्न लोक महागाई विरोधात जागृत होत आहेत का ? काही लोक म्हणायचे करोना पळविण्यासाठी, थाळी, मशाल मोर्चा काढला गेला तसा उद्या, डिझेल- गॅसच्या टाक्या घेऊन उद्या ३१ मार्चला विरोधी पक्ष आणि जनता महागाईचा विरोध करण्यासाठी, केंद्रसरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. अशा शांततेने निदर्शने आणि केंद्रसरकारच्या धोरणाचा निषेध करणा-या भारतीय जनतेस मन:पूर्वक शुभेच्छा. आपापल्या गावात जर असे निदर्शने होणार असतील तर चार मित्रांना घेऊन सहभागी व्हावे, असे सुचवावे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंधन दरवाढ जागतिक आहे. त्यात सरकार काय करणार? सरकारने त्यांच्या स्तरावर रशियातून स्वस्त तेल मिळवले. इराण बरोबर जुने करार केलेले आहेत. सरकारी कर कमी केले आता अजून ते काय करणार?