Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 12/03/2021 - 11:06
१. मिपावर साहित्य संमेलनावर धागा नाही हे पाहुन आश्चर्य वाटले ! म्हणजे धागा कदाचित आलाही असेल पण मला तरी दिसला नाही ! २. ह्यावेळी काही अध्यक्षपदाची निवडणुक वगैरे नाही , शिवाय दिब्रिटो, सबनीस सारखा कोणी विवादास्पद अध्यक्ष नाही , जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव . ३. मुळात साहित्यसंमेलनाचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय ? तिथे सामान्य वाचकांचे मुद्दे चर्चेला घेतले जातात का काही ? ४. साहित्यसंमेलनाला काही सरकारी फंडिंग बिंडिंग असते का ? स्वागताध्यक्ष म्हणुन भुजबळ साहेब दिसले म्हणुन विचार आला की संमेलनाच्या पैशाचे गणित काय ? ५. मिपाच्या धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात , किमान आमचे तरी उडवले जातात म्हणुन ही एक्ष्ट्रा लाईन विनाकारण अ‍ॅड केली आहे !
  • Log in or register to post comments
  • 17591 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/07/2021 - 09:55

Permalink

एकंदर सा सं जेमतेमच झाले,

एकंदर सा सं जेमतेमच झाले, गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे. बरेचसे साहित्यिक आणि कवी (स्वप्रसिद्ध- सुप्रसिद्ध नव्हेत) लोकांना माहिती सुद्धा नाहीत. कविसंमेलन एकंदरीत धन्यवाद होते. बहुसंख्य लोक नुसती पुस्तके चाळून पाहतात असे एका पुस्तक विक्रेत्याने निराशेने त्याला सांगितले. अर्थात जालावर आणि किंडल वर पुस्तके उपलब्ध आहेत आणि पी डी एफ वर बरीच पुस्तके फुकट मिळत असल्याने लोकांची विकत घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. विकत घेऊन वाचायची आणि वाचून झाल्यावर ठेवायची कुठे असे प्रश्न असल्यामुळे असे होत असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/07/2021 - 10:52

In reply to एकंदर सा सं जेमतेमच झाले, by सुबोध खरे

Permalink

अंहं

>>>एकंदर सा सं जेमतेमच झाले. असे काही नाही. उत्तम झाले. >>>गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे. गर्दी तुडुंब होती. लशीचे दोन्ही डोसेस झालेले असतील तर त्यांना सोडत होते. अनेक रसिक प्रमाणपत्र न दाखवता आल्याने परत गेले. मुख्य सभा मंडप भरलेला नव्हता. लोक एका जाग्यावर बसत नव्हते. 'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो. विद्यार्थी विद्यार्थिनी खुप दिसत होते. >>>>बरेचसे साहित्यिक आणि कवी (स्वप्रसिद्ध- सुप्रसिद्ध नव्हेत) लोकांना माहिती सुद्धा नाहीत. साहित्य संमेलन त्याला काय करू शकते. >>>>बहुसंख्य लोक नुसती पुस्तके चाळून पाहतात असे एका पुस्तक विक्रेत्याने निराशेने त्याला सांगितले. डॉ. साहेब, पुस्तके चाळण्यात शप्पथ लै आनंद मिळतो. बाकी, या साहित्य संमेलनात रेकॉर्डब्रेक पुस्तकांची खरेदी झाल्याच्या बातम्या आहेत. दोन कोटी रुपयांची पुस्तके विकल्या गेली आहेत. (संदर्भ : ६ डिसेंबर २०२१ मटा. पृ.क्र.२) >>>विकत घेऊन वाचायची आणि वाचून झाल्यावर ठेवायची कुठे असे प्रश्न असल्यामुळे असे होत असावे. हं... मुद्दा चर्चेचा आहे. डॉक्टर साहेब काल एक व्यक्ती मला वाट्सपवर भेटली.आपल्याकडील संग्रहित पुस्तके तो ज्याला आवडतील त्याला विकतो.ही आयडिया मस्त होती. मला आवडली. -दिलीप बिरुटे ( अभासासं उपस्थित रसिक)
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 12/07/2021 - 11:05

In reply to अंहं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

'कविकट्टा' यात गर्दी होत

'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/07/2021 - 11:15

In reply to 'कविकट्टा' यात गर्दी होत by आग्या१९९०

Permalink

हा हा हा

हे राम....! =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/07/2021 - 11:49

In reply to 'कविकट्टा' यात गर्दी होत by आग्या१९९०

Permalink

पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही

पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही तर "चिच्चा जान" चे नाव देऊन पहा तुडुंब गर्दी होईल. हा का ना का
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 12/07/2021 - 11:54

In reply to पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही by सुबोध खरे

Permalink

अर्रर्रर्रर्र

काय हे !
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 12/07/2021 - 12:43

In reply to पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही by सुबोध खरे

Permalink

ह्याचा अर्थ सावरकर प्रेम हे

ह्याचा अर्थ सावरकर प्रेम हे बेगडीच होतं तर?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Fri, 12/10/2021 - 08:01

In reply to अंहं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

गर्दी तुडुंब होती.

गर्दी तुडुंब होती. मुख्य सभा मंडप भरलेला नव्हता. लोक एका जाग्यावर बसत नव्हते. 'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो. विद्यार्थी विद्यार्थिनी खुप दिसत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 12/07/2021 - 12:04

Permalink

लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का?

किंवा इतर जिल्ह्यांतील काही नामचीन लेखकांच्या नावे?
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 12/07/2021 - 13:01

In reply to लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का? by कंजूस

Permalink

लुनावाले ब्रह्मे

लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का?

😀

लुनावाल्यांना टाळून पुढे जाणे हे आखिल मराठी साहित्याचे मोठे नुकसान असेल !
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 12/07/2021 - 13:36

Permalink

मी काय म्हणतो

गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे.
मित्र &#129315 &#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com