Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 12/04/2021 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents… दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचने 62167
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

ह्या अशा कठीण प्रसंगी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ह्यांनी राजकारण चुलीत घालून एक होवून संकटाचा सामना केला पाहिजे. सरकार ला सहकार्य केले पाहिजे . पण भारताच्या इतिहासातील एक मेव गैर जिम्मेदार केंद्र सरकार आणि देशाच्या इतिहासातील एकमेव बेजबाबदार पंतप्रधान देशाने बघितला. आणि राज्याच्या इतिहासातील सर्वात नालायक विरोधी पक्ष राज्य नी बघितला . संकट काळात पण ह्यांचे स्वार्थी राजकारण चालू आहे. शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी असा अभंग आहे. ह्यांचे बीज च शुद्ध नाहीं

In reply to by Rajesh188

धकावून घ्या. 2024 मध्ये मतदान करायला विसरू नका अन तुमच्या लोकलिटीमधल्या किमान 100 लोकांना सुद्धा ह्या सरकार विरुद्ध मतदान करायला लावा :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

पर्याय काय आहे यावर ठरविणार की सरकार विरोधात मतदान करायचे का नोटा वापरायचा.

In reply to by Rajesh188

वा रे बहाद्दर एकीकडे म्हणायचे "राजकारण चुलीत घालून एक होवून संकटाचा सामना केला पाहिजे." आणि दुसरी कडे फक्त एका पक्षाला शिव्या द्यायच्या !

महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे ह्या आधीच्या धाग्यात सांगून झालीय. त्यामुळे तो निरर्थक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जाऊ नये.

1)मेट्रो carshed ची जागा बदलली आणि आरे जंगल वाचवले . मेट्रो च्या नावाखाली आरे ची जमीन हडपण्याच कारस्थान धुळीस मिळवले. २) बुलेट ट्रेन का सहकार्य करण्याचे नाकारले. maharashtra ची जमीन जास्त जाणार,फंड जास्त जाणार आणि फायदा फक्त गुजरात ला. सहकार्य करणे नाकारले हे उत्तम केले. ३) धार्मिक उन्माद राज्यात वाढून दिला नाही. जातीय मोर्चे काढून वातावरण बिघडवण्या च काम करणाऱ्या लोकं चे गुप्त पाठीराखे कोण आहेत हे फक्त सरकार नी शोधावे. ४) वाट्याला आलेल्या रेशन चे वितरण योग्य रिती नी केले. ५) अनेक खोटे आरोप करून सरकार करून आणि बटिक मीडिया नी सरकार ला बदनाम करून संयम सोडला नाही. मुंबई ,पुण्या सारखी अती प्रचंड शहर असून सुद्धा काविळ सेंटर योग्य रिती नी चालवली. केंद्र नी मात्र spl train च्या नावाखाली निरंतर बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात आणून सोडली.आणि राज्यावरच बोजा वाढवला. एवढे गंभीर संकट असून सुद्धा अंतर राज्य वाहतूक ,आणि अंतर राष्ट्रीय वाहतूक अडाणी केंद्र सरकार बंद करत नाही. ह्यांना covid च फायदा घेवून सर्व कंपन्या,बँका विकायच्या आहेत. शेतकरी ,कामगार ह्यांचे कायदे बदलून त्यांना गुलाम करायचे आहे. म्हणून corona अजुन जास्त कसा वाढेल हेच bjp करत आहे. लाखो च्या सभा,कुंभ मेळा सर्व कस प्लॅन नुसार चालू आहे.

In reply to by Rajesh188

+१ हि कामे आधीही सांगून झालीत. पण तरी ठाकरे सरकारच्या नावाने रडगाणे गायचेच असे काहींना ठरवलेले आहे. असो आता पुढे कायम विरोधी पक्शातच दिवस काढायचेय भाजपला. विरोधी पक्शनेते बनण्या पुरते तरी त्याना जागा मिळों :)

. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ८२२ रुपये झालीय तिथे कडाडून विरोध केलेला का ? २. गॅस सिलिंडरची सबसिडी गुपचूप बंद केलीत त्याला कडाडून विरोध केलेला का ? ? ३. डिझेल पेट्रोलच्या किंमती वाढल्या, डिझेल ८० च्या पुढे आणि पेट्रोल ९० च्या पुढे गेल्यावर कडाडून विरोध केलेला का ? ४. खताच्या गोणीचे भाव थेट ७०० रुपयांनी वाढल्यावर कडाडून विरोध केलेला का ? ५. केंद्राने जीएसटीचे पैसे दाबून ठेवले तेव्हा कडाडून विरोध केलेला का ? ६. कोरोनासंबंधी पीपीई किट, मास्क, औषध खरेदीचे अधिकार राज्यांकडून काढून घेतले तेव्हा कडाडून विरोध केलेला का ? ७. लसीचा पुरवठा करताना मापात पाप केले गेले, तेव्हा कडाडून विरोध केलेला का ?

In reply to by Rajesh188

+१ केंद्र सरकार कामाच्या बाबतीत कर्तृत्व शून्य आहे. हे भक्ताना माहीत असल्यानेच ते ठाकरे सरकारकडून अपेक्शा ठेवून आहेत. ;)

In reply to by Rajesh188

लसीचा पुरवठा, कोरोनासंबंधी पीपीई किट, मास्क, औषध खरेदीचे अधिकार यासगळ्यांसाठी पाठपुरावा करायलाही तुम्हाला भक्तांचीच मदत घ्यावी लागते?? अरेरे, काय दिवस आलेत? अगदी तुमचे ते नाना साहेव सत्तेत असुनही विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगत आहेत केंद्रात त्यांचे वजन वापरायला... विरोधी पक्षानेच सगळे करायचे तर मग सत्तेत बसुन तुम्ही काय करताय?? गोल भाषणांची चमकोगिरी?

In reply to by सॅगी

मोदींनी दिलेली लस अजिबात घेणार नाही इथपासून मोदी आम्हाला कमी लस देत आहेत इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोदींनी दिलेली लस अजिबात घेणार नाही इथपासून मोदी आम्हाला कमी लस देत आहेत इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
+१

In reply to by वामन देशमुख

+2

In reply to by सॅगी

लस कोणाला किती द्यायची ह्याचा हक्क नालायक केंद्र सरकार नी स्वतः कडे ठेवला आहे त्या मुळे तर सर्व गोंधळ निर्माण झाला आहे.विरोधी पक्षाच्या सरकार ना सहकार्य न करता त्यांची अडवणूक केली जात आहे तिचं ppe किट,ऑक्सिजन,औषध ह्या बाबत पण आहे . सर्व अधिकार हुकूम शाह नी स्वतः कडे ठेवले आहेत. Gst मुळे राज्यांना केंद्राकडे भीक मागावी लागत आहे.स्वतःचेच पैसे केंद्र कडून भीक मागून घ्यावे लागत आहेत. निदान महाराष्ट्र ला मोकळीक ध्या ह्या राज्याला बिलकुल केंद्र सरकार ची गरज लागणार नाही.

In reply to by Rajesh188

महाराष्ट्र सरकार कोर्टात का नाही जात? होऊन जाऊ दे एकदाच काय तो सोक्षमोक्ष... कर नाही त्याला डर कशाला? का केंद्राशी पंगे घ्यायला भीती वाटते? सभेमध्ये तर मोठमोठ्या डरकाळ्या फोडत असतात ना मा.मु.?

महाराष्ट्रा मध्ये ऑक्सिजन ची वाढती मागणी बघता राज्याला 100 मेट्रिक टन ऑक्सिजन reliance च्या जामनगर च्या प्लांट मधून मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

In reply to by रात्रीचे चांदणे

रिलायन्सचा गुजरात मधील ऑक्सिजन चालतो का? मध्यंतरी श्रीमती रश्मी ठाकरे सुद्धा रिलायन्सच्याच रुग्णालयात भरती झाल्या होत्या. अडाणी याना दिघी बंदर पण देऊन टाकल्याची बातमी पण वाचली होती. अंबानी अदानी याना भरपूर शिव्याही देऊन झाल्या. कुठे गेली महाराष्ट्राची अस्मिता?

In reply to by सुबोध खरे

टॅक्स चा पैसा केंद्र सरकार ला चालतो ना. तो कसा काय चालतो. रिलायन्स फुकट देत आहे का? नाही देणार म्हणून स्पष्ट सांगावे. महाराष्ट्र la केंद्र मदत करणार नाही. कोणतेच राज्य मदत करणार नाही. उद्योगपती मदत करणार नाही. हे स्पष्ट bjp नी जाहीर पने सांगावे . महाराष्ट्र स्वतः त्या मधून मार्ग काढेल. फक्त पायात पाय घालू नये.

In reply to by Rajesh188

भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, CISF, CRPF, इतर सुरक्षा दले ह्यांची सुरक्षा चालते ना? भारतीय रेल्वे चालते ना? NHAI च्या अधिपत्त्याखालील राष्ट्रीय महामार्ग चालतात ना? हे सर्व चालणार नाही असे जाहीर पणे तुमच्या सरकारने सांगावे... मग बघु..

In reply to by सॅगी

दोन तीन राज्यांनी तुम्ही लिहलेल कोणत्याच सुविधा आम्हाला नकोत त्या तुम्हालाच luck लाभ होवोत असे ठणकावून सांगितले होते. त्याचे काय झाले पुढे. महाराष्ट्र चा दणका सोसेल का.

In reply to by Rajesh188

बरळण्याला ठणकावणे म्हणत असाल तर असे ठणकावणे तुम्हालाच लखलाभ..

गुजरात, ला चालते ना,केंद्राला पण चालते ना. ती कशी काय चालते.

In reply to by Rajesh188

केंद्राने फुकट दिलेली लस महाराष्ट्रातील जनतेला चालते ना? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, चाणक्यांना आणि इतर भाजपद्वेषींना चालते ना? तशीच...

असे जाहीर पण bjp नी सांगावे आम्ही दिलेली लस तुमच्या वर उपकार म्हणून देत आहोत. महाराष्ट्रात आघाडी चे सरकार असल्या मुळे. महाराष्ट्र शी ,महाराष्ट्र मधील जनते शी केंद्र सरकार ल काही देणे घेणे नाही. महाराष्ट्र मधील स्वाभिमानी मराठी लोक रोगांनी मरतील पण केंद्र सरकार ची लस,औषध,ऑक्सिजन,वापरणार पण नाहीत.

In reply to by Rajesh188

महाराष्ट्र मधील स्वाभिमानी मराठी लोक शहाणी देखील असतात, ते कुठल्या एक पक्षाचा घाऊक द्वेष करुन स्वतःचे नुकसान वगैरे करुन घेणार नाहीत.. अगदी कट्टर, बंधन बांधलेले सैनीक असले तरीही...

In reply to by मुक्त विहारि

सोडून दिली अहो हे तर फार सभ्य भाषेत झाले... आपण तर श्राद्ध केलं सेनेच्या नावाने .. जेवहा २ कुबड्या घेऊन " वडिलांना दिलेलं वचन पूर्ती " हि "डरपोक डरकाळी" ऐकली तेव्हा बाळासाहेब होते तेवहा ते आणि त्यांचे सहकारी आणि मूळ कारण "मुंबईत मराठी माणसाची बाजू घेणे" याबद्दल आदर होता .. मग हळू हळू सेना म्हणजे ठाकरे खानदानाचा उद्योग सुरु झाला शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात कधी या बाजूल कधी त्या बाजूला उड्या मारणे हे होतेच ! - महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेऊन म्हणून पण सुरवातील "मित्र पक्ष" म्हणून आदर होता .. तो हि गेला - राज्य स्तरीय पक्ष म्हणून आदर ठेवावा तर संजय उवाच आणि मामू जे काही बोलतात त्यात "देश गेला चुलीत राज्यापुढे याचा अतिरेक दिसतो " त्यामुळे "भारत या संकल्पनेलाच यांना आता विरोध आहे कि काय असे वाटू लागते " त्यामुळे अजून एक कारण श्राद्ध घालायला ! डिस्क्लेमर: टू बी फेअर तो येव्हारीवन - पहाटेच्या युतीच्या प्रयोगाच्या दिवशी महाराष्ट्र्र भाजप बद्दल चा आदर हि कमी झाला - त्यात सामील झालेल्या पुंतन्या आणि त्यांच्या काकांच्या पक्षा बद्दल तर आदर कधीच नव्हता ( पुलोद च्या वेळेस होता पण पुढे त्यांचे घाणेरडे जातीय राजकरण दिसले आणि... )

In reply to by चौकस२१२

- महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेऊन म्हणून पण सुरवातील "मित्र पक्ष" म्हणून आदर होता ... संपूर्ण असहमत. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी अशी होती. १९६७ - ४, १९७२ - ५, १९८० - १४, १९८५ - १६ याच काळात शिवसेनेची कामगिरी अशी होती. १९६७ - ०, १९७२ - ०, १९७८ - ०, १९८० - ०, १९८५ - १ १९८५ पर्यंत महाराष्ट्रात भाजपचा मताधार कमी होता, परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागात भाजपचे २-३ आमदार निवडून येत होते. याच काळात शिवसेनेचा मताधार शून्य होता व मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर अस्तित्व नव्हते. १९८५-१९९० या काळात शहाबानो, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, बोफोर्स या प्रकरणांचा वापर करून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये आपली ताकद बरीच वाढविली होती व १९८९-९० मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही राज्यात सत्ता मिळवून व अनेक जागा जिंकून हे सिद्ध केले. महाराष्ट्रातही भाजपने त्याच पद्धतीने ताकद वाढविली होती. भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुक युती न करता स्वतंत्र लढली असती तर किमान ५-६ खासदार व ६०-७० आमदार निवडून आले असते. त्यामुळे "महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेतले" हा निष्कर्ष वस्तुस्थितीवर आधारीत नाही. परंतु दुर्दैवाने तत्कालीन भाजप नेतृत्वाने जवळपास शून्य अस्तित्व असलेल्या शिवसेनेशी २५ वर्षे युती करून शिवसेनेला आपल्यापेक्षा खूप जास्त जागा देण्याची गंभीर घोडचूक केली ज्याचे परीणाम पुढील २५ वर्षी भाजपला भोगावे लागले. सुदैवाने भाजपने २०१४ मध्ये चूक सुधारून आपली ताकद दाखवून सत्ता मिळविली. परत २०१९ मध्ये फडणवीसांच्या नाकर्तेपणामुळे भाजपला पुन्हा एकदा अवदसा आठवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेला खूप जास्त जागा देऊन युती करण्याची घोडचूक केली.

राम जन्म भूमी आणि हिंदुत्व ह्यांनी उत्तर भारतीय लोक BJP ल मत देवू लागली पण महाराष्ट्रात त्या दोन्ही गोष्टी ना गौण स्थान आहे . महाराष्ट्रात मध्ये ते विषय चालले नसते. सेने शी युती नसती तर bjp ची ताकत जशी उत्तर भारतात राम जन्म भूमी मुळे वाढली तशी महाराष्ट्रात वाढली नसती हे bjp चे त्या वेळ चे नेते चांगले ओळखत होते .इथे सत्ता पाहिजे तर सेने शी युती करण्या शिवाय पर्याय नाही. राम जन्म हा फक्त उत्तरेत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र सहित दक्षिण भारतात तो प्रश्न लोकांना महत्वाचा वाटत नाही

In reply to by Rajesh188

राजकीय अज्ञानाचे आता हसू सुद्धा येत आ आणि कीवही वाटत नाही. महाराष्ट्रात हिंदुत्व आणि श्रीरामजन्मभूमी या विषयांना गौण स्थान असते तर बाळ ठाकरेंनी भगवी कफनी परीधान करून गळ्यात रूद्राक्षांच्या माळा घालून हिंदुत्वाचे सोंग आणले नसते आणि शिवसेनेने श्रीरामजन्मभूमी आंदोलनात कणभरही सहभाग नसतानाही आम्हीच बाबरी पाडली अशा सातत्याने थापाही मारल्या नसत्या. अगदी २०२१ मध्ये सुद्धा शिवसेनेला हिंदुत्वाचे सोंग आणावे लागते व आम्हीच बाबरी पाडली अशी थाप वारंवार मारावी लागते.

In reply to by श्रीगुरुजी

इथे सत्ता पाहिजे तर सेने शी युती करण्या शिवाय पर्याय नाही. आता ह्याची काय कारणे मिळतील किंवा आधीच्या 70 वर्षांचा इतिहासातील उदाहरणे मिळतील का? ह्याची अपेक्षा, राजेश कडून करत आहे... अर्थात, ते नेहमी प्रमाणे, पळपुटेपणा करणार किंवा गोल गोल राणी, खेळत बसणार...

In reply to by Rajesh188

हे नक्की का? तुम्ही पळपुटेपणा कधी सोडून देणार?

सेना BJP युती का 37 वर्ष झाली आहेत .त्या अगोदर दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या खूप कमजोर होते सत्ता मिळणे कठीण होते.1990 च्या अगोदर bjp देशातील कोणत्याच राज्यात सत्तेवर नव्हती. म्हणजे 70 वर्ष पूर्वी ची काहीच उदाहरण आहेत. जो पर्यंत सेना BJP युती होती तो पर्यंत bjp राज्यात सत्तेवर आली . आता युती तुटली आणि bjp सत्तेवर नाही पुढे पण असेच रिझल्ट असतील जो पर्यंत सेना बरोबर येणार नाही तो पर्यंत इथे सत्ता नाही.

In reply to by Rajesh188

+१ सेनेशी अतिहुशारी नडली. आता बसलेत खडे फोडत. सत्ता हवी तर मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेवण्याशीवाय पर्याय नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सत्तेसाठी फडणवीस मातोश्रीवर झाडलोट करून धुणीभांडी सुद्धा करतील. हा अत्यंत स्वाभिभानशून्य व कणाहीन माणूस आहे. स्वपक्षातील सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला पण मातोश्रीवर जाऊन हुजरेगिरी केली.

In reply to by Rajesh188

1990 च्या अगोदर bjp देशातील कोणत्याच राज्यात सत्तेवर नव्हती.
१९९० पूर्वी जनसंघाचे विविध राज्यात झालेले मुख्यमंत्री-- १. मध्य प्रदेशः कैलाशचंद्र जोशी, विरेंद्रकुमार सखलेचा, सुंदरलाल पटवा २. राजस्थानः भैरोसिंग शेखावत ३. हिमाचल प्रदेशः शांताकुमार उत्तर प्रदेशात १९६७ मध्ये चरणसिंग मुख्यमंत्री असताना जनसंघाचे रामप्रकाश गुप्ता उपमुख्यमंत्री होते. हरियाणात १९८७ मध्ये देवीलाल मुख्यमंत्री असताना भाजपचे सूरज भान, रामविलास शर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मंत्री होते. बिहारमध्ये १९७७ मध्ये कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना मुळचे जनसंघाचे कैलाशपती मिश्रा अर्थमंत्री होते. उत्तर प्रदेशमध्ये १९७७ मध्ये रामनरेश यादव मुख्यमंत्री असताना मुळचे जनसंघाचे कल्याणसिंग, केशरीनाथ त्रिपाठी आणि रामप्रकाश गुप्ता हे मंत्री होते. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१९७८ मध्ये महाराष्ट्रात काका पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुळचे जनसंघाचे हशू अडवाणी आणि उत्तमराव पाटील हे पण मंत्री होते.

पेंग्विनसेनेचा जन्मही होण्यापूर्वी जनसंघाचे दोन खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण देशात जनसंघाला चार जागा मिळाल्या होत्या त्यापैकी दोन जागा महाराष्ट्रातील होत्या. त्या जागा होत्या प्रेमजी असर यांची रत्नागिरी आणि उत्तमराव पाटील यांची धुळे. इथल्या धुळ्याच्या आर्मस्ट्राँगना त्याची कल्पना नसावी. आणि म्हणे महाराष्ट्रात शिवसेनेमुळे भाजप पक्ष वाढला. हा हा हा. नेहमीची सेनासमर्थक गँग आहे ते लोक यावर एकतर काहीही बोलणार नाहीत (कारण मुद्देसूद आणि आकडेवारी देऊन प्रतिसाद दिला तर त्याला प्रतिवाद कोणीही सेना समर्थक करूच शकत नाही) किंवा नेहमीप्रमाणे कशाचा कशाशी संबंध नसलेले निरर्थक पालुपद चालू ठेवणार.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जनसंघ/भाजपच्या १९८५ पर्यंत निवडून आलेल्या आमदारांचे आकडे मी वर दिले आहेत. यांना हवी असल्यास आमदारांची नावे पण लिहितो.

हिंदू महासभा पर्यंत जाणार आहे का? जनसंघ चे रूपांतरण bjp मध्ये झाले हे खरे असले तरी जनसंघ ची भूमिका आणि bjp ची भूमिका ह्या मध्ये फरक आहे. जनसंघ हिंदुराष्ट्र वादी नव्हता तर भारत राष्ट्र वादी होता. हिंदू राष्ट्र ही bjp ची भूमिका आहे संघाची ती भूमिका नव्हती. त्या मुळे BJP स्थापन झाल्यानंतर कधी सत्तेत आली हीच आकडेवारी ध्या.

In reply to by Rajesh188

हिंदू राष्ट्र ही bjp ची भूमिका आहे संघाची ती भूमिका नव्हती.
हे असले दिवज्ञान आपण कुठून मिळवता.. ,?? इतका strong माल कुठं मिळतो. ??

जर आली तर मी माझे राजकीय अज्ञान मान्य करून तुमची माफी मागेन पण एकट्या च्या जीवावर bjp नी सत्ता नाही मिळवली तर तुम्ही तुम्हाला जे कळत ते ज्ञान नसून फक्त आत्मप्रौढी आहे हे कबूल करायचे. अजुन तीन वर्ष तर निवडणुकीला बाकी आहेत . तेव्हा आपण बघू कोण अज्ञानी आहे ते.

In reply to by Rajesh188

राज्यात भाजपच्या सत्तेने दिलेला हा शेवटचा आचका होता. ह्या नंतर भाजप कधीही सत्तेत येणार नाही. ( ठाकरे किंवा पवार ह्यांना दया आली तरच शक्य आहे. )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काही चुका टाळल्या असत्या तर ऑक्टोबर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. त्या चुकांमुळेच काही इतर मागासवर्गीय मतदार व काही ब्राह्मण मतदार भाजपविरोधात गेले आहेत व राखीव जागा देऊनही मराठा मताधार वाढलेला नाही. आगामी काळात भाजपने नेतृत्वबदल केला (चंद्रकांत पाटील व फडणवीस यांच्या जागी नवीन नेतृत्व आणणे) तरच भाजपची घसरण थांबू शकते.

In reply to by श्रीगुरुजी

+१ सहमत. खडसेंसारखा हाडाचा नेता भाजपने गमावला. दरेकरांसारखे इतर पक्षातून आलेले नेते वरच्या पदावर बसवले जातात. तरीही भाजप समर्थक समर्थन करतच राहतात. पण जनता आंधळी नाहीये. 122 वरून १०५ वर आले पुढील निवडणुकीत भयंकर पानिपत होणार आहे भाजपचं.