Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 05/03/2021 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात जवळपास २०० प्रतिसाद होत आले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या कलकत्ता शहरातील भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक न लढवता पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. एखादा माणूस इरेला पेटला तर तो कशी चूक करतो याचे हे एक उदाहरण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमधून तृणमूल काँग्रेसला २२, भाजपला १८ तर काँग्रेसला २ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपची राज्याच्या मध्य आणि उत्तर भागात कामगिरी खूपच चांगली होती. पण राज्याच्या दक्षिण भागात तृणमूलने विजय मिळवला होता. विकीपीडीयावरून घेतलेल्या या नकाशावरून आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. bengal या नकाशात चौकटीत कलकत्ता शहरातील लोकसभा मतदारसंघ आहेत तर ३० आणि ३१ क्रमांकाचे अनुक्रमे तामलूक आणि कंठी मतदारसंघ आहेत. तर १९ आणि २० क्रमांकाचे अनुक्रमे जॉयनगर आणि मथुरापूर हे लोकसभा मतदारसंघ आहेत. या सगळ्या दहाच्या दहा मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये तृणमूलने विजय मिळवला होता. यावरून बंगालचा दक्षिण भाग तृणमूलसाठी किती महत्वाचा आहे याची कल्पना येईल. तामलूक मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलचे नेते शुभेंदू अधिकारी जिंकले होते. ते २०१६ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून बंगाल विधानसभेवर निवडून गेले आणि ममतांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. २००६ मध्ये सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जमिन संपादनाविरूध्द ममतांनी लढा उभा करून नंतर डाव्यांची ३४ वर्षे जुनी राजवट जमिनदोस्त करून टाकली होती. त्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी आंदोलनात पुढे होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली ६७% मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता. हा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ शुभेंदू अधिकारी पूर्वी निवडून गेले होते त्या तामलूक लोकसभा मतदारसंघात येतो. शुभेंदू अधिकारी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या जागेवर शुभेंदूंचे बंधू दिब्येंदू अधिकारी पोटनिवडणुकीत निवडून आले. तामलूकच्या शेजारी असलेल्या कंठी लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून शुभेंदू-दिब्येंदू या बंधूंचे वडील शिशिर अधिकारी लोकसभेवर निवडून येत आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे नकाशात दाखविलेल्या ३० आणि ३१ या मतदारसंघांच्या क्षेत्रात या अधिकारींची पकड चांगली आहे. त्याच मतदारसंघांच्या बाजूला असलेल्या ३४ (मेदिनीपूर- पूर्वीचे मिदनापूर) मतदारसंघातून भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्या बाजूलाच असलेल्या ३३ (झारग्राम), ३५ (पुरूलिया), ३६ (बांकूडा) आणि ३७ (विष्णूपूर) या लोकसभेच्या जागाही भाजपनेच जिंकल्या होत्या. या सगळ्या जागा राज्याच्या मध्य आणि पश्चिम भागातील आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या शुभेंदू अधिकारींनी ममतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला २०१९ मध्ये राज्याच्या ज्या दक्षिण भागातून फार यश मिळाले नव्हते त्या भागात या अधिकारींच्या मदतीने हातपाय रोवायची संधी भाजपला मिळणार आहे. अशावेळी ममता बॅनर्जी इरेला पेटून शुभेंदू अधिकारींविरूध्द त्यांच्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. हा मतदारसंघ आणि आजूबाजूचा तामलूक लोकसभा मतदारसंघात येणारा भाग या अधिकारींचे प्रभावक्षेत्र आहे. तसेच बाजूलाच पश्चिमेला भाजपचे प्रभावक्षेत्र आहे. अशावेळी इरेला पेटून स्वतःचा हक्काचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ सोडून आपल्या प्रतिस्पर्ध्याविरूध्द लढायला त्याच्याच प्रभावक्षेत्रात ममतांनी जायची काही गरज आहे का? खरं तर मुख्यमंत्री वगैरेंना स्वतःच्या मतदारसंघाची कधी काळजी नसते त्यामुळे ते राज्याच्या इतर भागात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला मोकळे असतात. आणि तृणमूल काँग्रेस मते ममतांच्या नावावर मागणार असेल तर स्वतः ममतांनी प्रचारात मोठा भाग घ्यायला हवा. अर्थात बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तेव्हा नंदीग्राममध्ये नक्की कधी मतदान होणार आहे हे बघायला हवे. पण निदान काही दिवस तरी ममता आपल्याच मतदारसंघात अडकणार आहेत. त्यातून शुभेंदू अधिकारींनी ममतांना हरवले तर ममतांच्या भविष्यातील राजकारणाला मोठा धोका पोहोचेल. आणि ममता जिंकल्या तरी त्याची किंमत मोठी भरावी लागणार आहे. वास्तविक पक्षाचे सर्वोच्च नेते आपल्याला गमावण्यासारखे फार काही नसेल तरच अशा मोठ्या लढाया लढायला जातात. उदाहरणार्थ राममनोहर लोहियांनी जवाहरलाल नेहरूंविरूध्द निवडणुक लढवली होती किंवा केजरीवालांनी शीला दिक्षित यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. असे असताना इतके इरेला पेटायचे कारण समजत नाही. बघू पुढे काय होते ते. घोडामैदान जवळच आहे.

वाचने 46920
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे. सरकारी खर्चाने इतका प्रचंड प्रोपागांडा केला आहे की ज्यांच्याशी मोदींचा काही संबंध नाही तेही मोदी मोदी ओरडायला लागले आहेत असा त्याचा अर्थ होतो. बाकी विमानात गैरवर्तणूक करणारे बरेच असतात; परंतु विद्यमान पंतप्रधानाचे नाव घेऊन आरडाओरडा करण्याची व गोंधळ घालून विमानाचे इमर्जन्सी लेंडिंग करायला लावण्याची पहिलीच वेळ. विमानात हवाईसुंदरींशी गैरवर्तणूक करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे मग आदिक असो की आणखी कोणी. परंतु, ह्या नाकर्त्या सरकारला तेही जमलेले नाही. उलट तोंडाने बेटी बचाओ म्हणणार्‍या ह्या मनुवादी लोकांनी कठुआ, ऊन्नाव आणि हाथरसमध्ये बलात्कार्‍यांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारे हे सरकार केवळ हिंदू उच्चवर्णीयांच्या हिताचेच रक्षण करण्यात रस घेतेय हे इतर हिंदूंच्या लक्षात आलेले नाहीय असे नाही.

In reply to by नगरीनिरंजन

नशेत किंवा मानसिकदृष्ट्या आस्थिर आसलेली व्यक्ती मोदी मोदी करुन ओरडत असेल तर चिंतेची बाब अधिकच आहे. त्यात कसली चिंता आणि कोणाला चिंता? नशा उतरली की येईल तो ताळ्यावर. मुळात असल्या तद्दन फालतू, संध्यानंद टाईप सनसनाटी घडामोडी येथे टाकणे व त्या निमित्ताने दुरान्वयाने संबंध नसलेल्या मोदींना झोडपण्याची खाज शमविणे हा मोदीद्वेष्ट्यांचा आवडता छंद आहे कारण प्रतिसादातील उर्वरीत भाग तसाच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी ह्यांचा फक्त एकच निर्णय आणि त्याची अंमलबजावणी सांगा . त्या मुळे सर्व स्तरातील हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम होण्याची संधी उपलब्ध झाली. मुकेश ,अदानी हे हिंदू नाहीत व्यापारी आहेत उद्या इम्रान नी जरी ह्यांचा फायदा केला तर तिकडे जावून हिंदू ना शिव्या देतील.

In reply to by श्रीगुरुजी

किती निरागस आहात तुम्ही! मोदींनी द्वेषाला अधिकृतताच नव्हे तर राजमान्यता दिली आहे. ट्वीटरवर गरळ ओकणार्‍या आयडींना स्वतः मोदी फॉलो करतात. कोणत्याही समुदायाला सरसकट शिव्या घालणे, गौरी लंकेश सारख्या पत्रकारांच्या मृत्युवर हत्येवर अत्यंत हीणकस भाषेत शेरेबाजी करणे असल्या उद्योगांना शिक्षा करायची सोडून मोदी त्यांना फॉलो करतात. हा विद्वेष आता अधिकृतच नव्हे तर विभूषण ठरायला लागला आहे. ह्य विद्वेषाने लोकांची मानसिकता बदलते आहे. बाबू बजरंगी व साध्वी प्रज्ञांची उदाहरणे पाहून लोकांना त्यात वावगं वाटतच नाही. पोलिसांच्या देखत आंदोलकांवर बंदूक चालवणार्‍या उच्चवर्णीय हिंदू मुलाला काहीच होत नाही; जेएनयुमध्ये जाऊन झोडपलं विद्यार्थ्यांना तरी काहीही होत नाही हे कोणी दाखवून दिलं? हे कोणी घडवलं? विद्वेषाला खतपाणी घालून असे रेबीड लोक तयार करण्याचे काम कोण करतंय हे सगळ्या जगाला कळतंय; परंतु उच्चवर्णीय हिंदूंचे हितसंबंध गुंतलेले असल्याने ते डिनायल मध्ये आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

कसली द्वेषाला मान्यता? द्वेषभावना काय असते ते मी सांगतो. ज्याला बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार, मौत का सौदागर, सैनिकांच्या रक्ताचा दलाल, नीच माणूस, नरराक्षस, हिटलर, चहावाला, फेकू, शेठ, क्रूरकर्मा अशी खास विशेषणे ज्याच्या संदर्भात वारंवार वापरली जातात त्याला द्वेषभावना म्हणतात. असे म्हणणाऱ्यांचे कौतुक करणारेही द्वेष्टेच असतात. द्वेषाचा चष्मा सतत डोळ्यांंवर ठेवलेल्यांना यात द्वेषभावना दिसतच नाही.

सकल हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारे हे सरकार केवळ हिंदू उच्चवर्णीयांच्या हिताचेच रक्षण करण्यात रस घेतेय हे इतर हिंदूंच्या लक्षात आलेले नाहीय असे नाही. ◆◆आता इथून सुरुवात करायची का ?? ■■ मुस्लिम हिताचा तर विषय सुद्धा नसेल , नाही का

In reply to by स्वलिखित

तेवढे कमजोर,असमर्थ मोदी काळात झाले. आर्थिक विवंचनेत हिंदू मोदी ह्यांच्या काळात च राहू लागले. बहुसंख्य हिंदू परावलंबी झाले कृषी कायद्यांनी अजुन हिंदू अशक्त होतील. हा कसला हिंदू हित वादी पंतप्रधान .. त्या पेक्षा औरंगजेब उत्तम होता.

In reply to by Rajesh188

आपला औरंगजेबाबद्दलचा अभ्यास बराच [कमी] आहे असं दिसतं. आपण काय लिहिता आहात याचं काही भान? अवांतरः मालक, केवळ धागा भरकटवण्यासाठी जरी आपण काही[बा]ही लिहित असलात तरी एक ताळतंत्र असावा. आपल्याला जरा आरामाची गरज आहे. काही दिवस वाचनमात्र राहावे अशी आपणांस सूचना कराविशी वाटते. कृपया जरा मनावर घ्यावे.

In reply to by स्वलिखित

अर्थातच. बीजेपीला पूर्वापार स्वच्छपणे “बामन-बनियोंकी पार्टी” असेच म्हटले जातेय हे आपल्याला विदीत असेल वा नसेलही. पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते. नवीन “टेकसॅव्ही” पिढीला तंत्रज्ञान कळत असेल; परंतु स्वतःचा इतिहास माहित असेलच असे नाही. अन्यथा “हिंदू एकता” ह्या शब्दाला इतिहासात काहीही आधार नाहीय हे त्यांना कळले असते.

पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट इतका नसल्याने व्हॉट्सॅपवर वगौरे खोटे संदेश पाठवून लोकांना ब्रेनवॉश करणे अवघड होते. काहीही. शालेय पाठ्यपुस्तके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, मुद्रित माध्यमे, सेन्सॉरशिप या माध्यमातून पन्नासेक वर्षे लोकांचे ब्रेनवॉश सुरू होते की. आता आंतरजाल, सामाजिक माध्यमे वगैरे असल्याने लोकांना वस्तुस्थिती समजायला लागली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आंतरजाल, सामाजिक माध्यमे आज नसती तर सरकारी व मुद्रित माध्यमांनी राहुलची प्रतिमा पुरोगामी, विचारवंत, तत्वज्ञ, दूरदृष्टी असलेला बुद्धिवंत अशीच केली असती.

In reply to by श्रीगुरुजी

इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आंतरजाल, सामाजिक माध्यमे आज नसती तर सरकारी व मुद्रित माध्यमांनी राहुलची प्रतिमा पुरोगामी, विचारवंत, तत्वज्ञ, दूरदृष्टी असलेला बुद्धिवंत अशीच केली असती.
जशी राजीव गांधींची प्रतिमा केली गेली होती त्याप्रमाणेच. मला कधीकधी वाटते की राजीव गांधींच्या काळात सोशल मिडिया असता तर राहुल गांधींऐवजी त्यांचे वडील आद्य पप्पू ठरले असते.

In reply to by नगरीनिरंजन

भारत माता कि जय च्या घोषणा बंद करून , सोनिया गांधी आणि तत्सम गांधी परिवाराच्या घोषणा दिल्या जातात ह्याला बहुतेक चाटूकारिता (शुद्ध मराठी शब्द आहे , हात किंवा तळवे चाटण्याविषयी वापरला आहे ) म्हणत असतील बहुतेक , आणि हो जसे काय पहिल्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे नवीन पिढीचे असं वाटतंय का तुम्हाला ?? जाऊद्या नंतर कधी तरी ...

अगदी नरसिंहराव, देवगोंड,vp सिंग ह्या देशाच्या पंतप्रधान असलेल्या लोकांना देश हित समजत होते. मोदी आणि त्यांची तुलना होवूच शकत नाही इतिहासातील सर्वात सुमार दर्जा चे पंतप्रधान आहेत ते . . मोदी ह्यांना अतुलनीय हुशार ज्यांना वाटत असतील तर त्याची उदाहरणे द्यावीत. फक्त फेका फेकी करू नये.

In reply to by Rajesh188

राजेश साहेब शंभरातील नव्याणव भंकस प्रतिसाद देण्याचा तुमचा स्ट्राईक रेट अलौकिक आहे. _/\_

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दोनही तुल्यबळ पक्ष आहेत त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार हे नक्की. ममता बॅनर्जी या आपणहून आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत असे वाटते... कारण जय श्री राम बोलल्यावर त्या अश्या काही रिअक्शन देत आहेत जणू काही त्यांना शिवी दिली... त्यामुळे बहुसंख्य हिंदू लोकं नाराज होत आहेत.. भाजप त्याच आगीत तेल ओतून आपली पोळी शेकून घायचा प्रयत्न करतेय.. हा फक्त एक मुद्दा आहे.. अजुन बरेच मुद्दे आहेत त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि TMC दोघांसाठी प्रतिष्टेची आहे.. काँग्रेस आणि लेफ्ट यात कुठेही दिसत नाहीयेत.

In reply to by बापूसाहेब

भाजप रडीचा डाव खेळतय असं वाटतं. बंगाल इलेक्शनमधे, किंबहुना केरळ, दिल्ली किंवा अगदी हैद्राबादच्या नगरपालिका निवडणुकांमधे रामाच्या नावाने राजकारण करणं योग्य नाहि. आपल्याकडे राजकारणाचा पोत जात-धर्मावर जातो हे खरं असलं, आणि ममता, ओवेसी वगैरे मंडळींना दुसरी भाषा कळत नसली तरी भाजप जे बाय डिफॉल्ट धर्माधारीत राजकारण करतं ते चुकीचं आहे. आता निवडणुका जिंकायला एव्हरीथिंग इज फेअर म्हटलं तर मग काहि मुद्दा राहात नाहि.

In reply to by सुक्या

मतांना किंवा निर्णयांना विरोध जरूर असावा पण भाषा संयत असावी अर्थात, जिथे एखाद्या व्यक्तीच्या शारिरीक व्यंगांवरून, नेतेच टीका करत असतील किंवा आडनावावरून नेतेच एकमेकांची टिंगलटवाळी करत असतील, तिथे सामान्य जनता पण तसेच वागायचा प्रयत्न करणार...

नगरीनिरंजन,
अन्यथा “हिंदू एकता” ह्या शब्दाला इतिहासात काहीही आधार नाहीय हे त्यांना कळले असते.
हे साफ तथ्यहीन विधान आहे. बंगालची फाळणी रद्द झाली ती संपूर्ण भारतातल्या हिंदूंनी ऐक्य दाखवल्यानेच. फाळणी जाहीर केली १९०४ साली. त्याच सुमारास वंदे मातरम हे गीत जन्मलं. ते भारतातल्या सर्व हिंदूंनी ( व मुस्लिमांनीही ) इतकं उचलून धरलं की इंग्रज सरकारला त्यावर बंदी घालावी लागली. तसल्या बंद्यांना न जुमानता आणि १९०६ साली जन्मलेल्या मुस्लीम लीगला जराही धूप न घालता हिंदूंनी सणकून आंदोलनं केली. परिणामी १९११ साली बंगालची फाळणी रद्द झाली. तरीही बंगाल उभा आडवा पेटलेलाच राहिला. म्हणून इंग्रजांना १९१२ साली भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलवावी लागली. हा हिंदू ऐक्याचा विजय आहे. आ.न., -गा.पै.