कार्बन प्रदूषण
कार्बन प्रदूषण
ग्लोबल वॉर्मिंग ह्या विषयवार खूपच लिहिले जाते पण बहुतेक माध्यमे (जी डाव्यांच्या खिश्यांत आहेत) ह्यावर लिहिताना अतिशय एकांगी पणे लिहितात. जणू काही पुढील काही वर्षांत जग नष्ट होणार आहे आणि हे रोखायचे असेल तर सर्व सत्ता आणि सूत्रें आम्हा 'एक्सपर्ट' मंडळींच्या हाती द्या असा सूर ह्या मंडळींचा असतो.
पण प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू असते. हि बाजू मांडणे महत्वाची आहे. सर्वच बाजू मांडायची झाली तर मग खूप लेख लिहावे लागतील पण दोन प्रमुख "खोट्या समजुतीचे" भेद इथे केले आहेत. वाचकांनी ह्यावर विचार केला होता कि नाही हे प्रतिक्रियांत सांगावे.
१. झाडे हि जगाची फुफ्फुसे आहेत.
असे अनेक लोक लिहितात. हे खोटे आहे. झाडे हवेंत असलेला co2, जमिनीतून शोषून घेतलेले h २ o आणि सूर्यप्रकाश ह्यांच्या माध्यमातून जी प्रक्रिया आपल्या शरीरांत करतात त्यातून दोन प्रमुख घटक निर्माण होतात. प्राणवायू आणि असंख्य प्रकारचे कार्बन आणि हैड्रोजन ह्यांचे हायड्रोकार्बन. झाडे मग हे हैड्रोकार्बन आपल्या शरीरांत लाकूड, पाने, मुळे, फळे म्हणून स्टोर करतात ज्याला आपण झाडाची वाढ म्हणतो.
फुफ्फुसे प्राणवायू हवेंतून शोषून घेतात आणि आपण खालेलले हायड्रोकार्बन, रक्त इत्यादी पदार्थ वापरून त्यांच्यापासून ऊर्जा निर्माण करतात ज्याद्वारे आम्ही मसल वापरून ती ऊर्जा इतर गोष्टींत ट्रान्स्फर करतो. बदल्यांत आम्ही हवेंत co2 सोडतो. पण माणूस ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही. खूप माणूस पृथ्वीवर असले तर मोठ्या प्रमाणावर c02 निर्माण होत जाईल. पण खूप झाडे असली तर खूप प्रमाणावर हवेंत प्राणवायू सोडला जाईल का ?
झाडाची पाने गळतात तेंव्हा त्यातील हैड्रोकार्बन जीवजंतू खाऊन हवेंत पुन्हा c02 सोडतात. आपण फळे खातो तेंव्हा पुन्हा त्या फळांतील c02 ला आपण मुक्त करतो. झाडाची कात कुसून पडते तेंव्हा पुन्हा त्यातील c02 ला छोटे जीव जंतू मुक्त करतात.
चाणाक्ष वाचकांना इथे लक्षांत आले असेल कि एखादे झाड पूर्ण वाढले म्हणजे त्याची वाढ थांबली तर त्याचाच अर्थ असा होतो कि हवेंतून c02 शोषून घेण्याची त्याची क्षमता शून्य झाली. म्हणजे साधारण वर्षाला जितका c02 हे झाड आपल्या शरीरांत साठवते तितकाच बाहेर सुद्धा फेकून देते. कॅनडा ह्या देशांत प्रचंड जंगले आहेत. जी जंगले खूप मोठी असली तरी c02 च्या दृष्टिकोनातून कार्बन पॉसिटीव्ह आहेत. म्हणजे हि c02 हवेंत सोडतात, कमी करत नाहीत. जे जंगल वेगाने वाढत आहे ते c02 हवेंतून शोषत आहे असे आपण म्हणून शकतो पण ज्या जंगलाची वाढ थांबली आहे त्याचा वातावरणातील c02 वर परिणाम शून्य असतो.
हे शालेय विज्ञान आहे. अर्थांत c02 वर झाडांचा विशेष परिणाम होत नाही ह्याचा अर्थ झाडे निरुपयोगी आहेत असा होत नाही झाडांचे आणि जंगलांचे प्रचंड फायदे पर्यावरण दृष्टिकोनातून आहेत आणि झाडांचे संवर्धन महत्वाचे आहे पण c02 आणि त्यांचा संबंध नाही.
आता एक झाड मारून तुम्ही त्याचे लाकूड घरबांधणीसाठी किंवा फर्निचर साठी वापरले आणि हे फर्निचर तुम्ही पुढील १०० वर्षे वापरले तर त्याचा पर्यावरणावर जास्त चांगला परिणाम होतो. कारण झाड मारून (ज्याने कदाचिन्त १ टन कार्बन आपल्या शरीरांत ठेवला होता) आपण तो कार्बन पुढील १०० वर्षे वापरणार आहात पण झाड मारल्याने त्याजागी नवीन झाड येऊन ते आणखीन १ टन कार्बन आपल्या शरीरांत साठवेल त्यामुळे एकूण दोन टन कार्बन आपण हवेंतून कमी केला.
ह्याउलट पेपर आहे. आपण कागद वापरला कि तो फेकून देतो, तो तात्काळ कुजतो आणि त्यातील c02 पुन्हा हवेंत जातो. कागदा ऐवजी कपड्याची पिशवी जास्त चांगली कारण हि तुम्ही वर्षभर वापरू शकता. किंवा १०० कागदांच्या पिशवी ऐवजी प्लास्टिक ची एक पिशवी वर्षभर वापराने सुद्धा जास्त चांगले. c02 हवेंत न सोडण्यासाठी.
दीर्घकाळ वापरासाठी लाकूड वापराने हे स्टील किंवा प्लास्टिक पेक्षा c02 च्या दृष्टिकोनातून नेहमीच चांगले.
जर जगांतील जंगले वाढत नसतील तर मानव जो c02 बाहेर फेकत आहे ( श्वास घेऊन किंवा प्रेट्रोल जाळून) तो रिसायकल होतच नाही असा त्याचा अर्थ होतो का ? किंवा उद्या सर्व झाडे गायब झाली तर हवेंतील c02 चे प्रमाण अचानक वाढून आम्ही मरणार नाही असा ह्याचा अर्थ होतो का ?
इतकेच नाही तर निव्वळ उदाहरण द्यायचे म्हणून जर आपण ह्या जगांतील प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक झाड, गावत, लाकडी वस्तू, जंतू, प्राणी, माणूस ह्या सर्वाना आग लावून जाळले तर जो c02 हवेंत निर्माण होईल तो इतका कमी असेल कि हवेंतील एकूण प्राणवायूचे प्रमाण विशेष बदलणार नाही (जमिनीत असलेला कोळसा आणि इतर खनिज तेल ह्यांचा मी समावेश केला नाही). (प्राणवायूचे प्रमाण २०.९ टक्क्यावरून २०.४ वर येईल आणि c02 चे प्रमाण ४०० ppm वरून ९०० ppm वर येईल).
पण पृथ्वीवरील कार्बन इतका कमी कसा झाला ? तर करोडोवर्षांपूर्वी जी झाडे आणि प्राणी होते ते अचानक जमिनीच्या खाली गेले. त्यातून कोळसा आणि ईथर तेलांच्या स्वरूपांत पृथ्वीवरील कार्बन हा जमिनीच्या आंत गडप झाला. आपण आता हा बाहेर काढून जाळत आहोत. तुम्ही जेंव्हा आपल्या दुचाकीत तेल घालता तेंव्हा प्रत्यक्षांत तुम्ही कोट्यवधी पूर्वीचे जंगल आणि प्राण्यांची शरीरे जाळत आहात.
पण हा कार्बन सुद्धा जास्त नाही. पण आपण हवेंतील c02 वाढवत आहोत हे नक्की.
झाडे हि जगाची फुफुसे नाहीत. हवेंतील c02 कमी करण्यासाठी झाडे उपयुक्त नाही आहेत.
२. c02 मुळे हवेचे प्रदूषण होते
मानवी शरीरासाठी c02 हानिकारक नाही. आपण c02 फुफुसांत घेतला म्हणून काहीही नुकसान होत नाही. c0 ह्याच्या उलट आहे. c0 मुळे शरीराला खूप नुकसान होते त्याशिवाय so२ इत्यादी मुळे शरीराला अपाय होतो पण c02 निरुपद्रवी आहे.
c02 हा झाडांसाठी खूप चांगला आहे. हवेतील c02 चे प्रमाण वाढल्याने बम्पर पीक येते, झाडांचा गवताचा, वाढण्याचा दर वाढतो. हवेंतील c02 चे प्रमाणे थोडे जर वर गेले तरी ऍमेझॉन, भारत चीन मधील जंगले वेगाने वाढतात. ह्या उलट प्राणवायूचे प्रमाण वाढले तर जंतू, जीव इत्यादींचा आकार आणि संख्या दोन्ही वाढते.श्वास ह्या दृष्टिकोनातून c02 हा हानिकारक नाही तर इतर वायू जास्त हानिकारक असतात. हवेंतील c02 चे प्रमाण ह्याचे इतर दुष्परिणाम असू शकतात पण हवेंतील c02 चे प्रमाण आणि हवेची स्वच्छता ह्याचा थेट संबंध नाही.
पण मग ग्रीन हाऊज इफेक्त्त चे काय ? c02 वाढत जाऊन पृथ्वी एखाद्या भट्टी प्रमाणे पेटणार ह्याचे काय ? c02 हा ग्रीन हाऊज गॅस आहे ह्यांत काहीही दुमत नाही. प्रयोगशाळेंत प्रयोग करून ते पाहणे सहज शक्य आहे पण संपूर्ण पृथ्वी हि प्रयोगशाळा नाही.
जेंव्हा आधी ग्रीन हाऊज इफेक्त्त चा शोध लागला होता तेंव्हा संशोधकांनी ह्या प्रकारातील क्लिष्टता समजून घेतली नाही पण विविध राजकीय संस्थांना हे चांगले हत्यार मिळाले. c02 चे निमित्त देऊन ऊर्जा व्यवस्थेला आपल्या हातांत घेतले तर इतर सर्व उद्योग आपोआप आपल्या हातांत येतील हे अनेक राजकीय पक्षांनी ताडले. ब्रिटन मधील कोळसा युनियन बलाढ्य युनियन होती आणि पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांच्या पायातील काटा बनून राहिली होती. ग्लोबल वॉर्मिंग हे एक शस्त्र थॅचर नी त्यांच्या विरोधांत उगारले. आज ग्लोबल वॉर्मिंग हि डाव्या लोकांची मुव्हमेंट आहे पण ह्याचा पाय थॅचर ह्यांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थॅचर ह्यांनी फूस लावून २००० मध्ये पृथ्वी वगैरे नष्ट होणार असली भाकिते सरकारी कृपेवर जगणाऱ्या "एक्स्पर्ट" नी सुरु केली. UN वगैरे शेवटी अमेरिका, इंग्लंड ह्यांच्या तालावर नाचत होती (आता चीन सुद्धा ह्यांत आलाय) त्यांनी सुद्धा री ओढली. [१]
c02 आणि त्याचा परिणाम ह्या विषयावर उपलब्ध असलेले एकूण संशोधन १९८० मध्ये विशेष नव्हते. c02 मुले गरमी वाढेल इतकेच काय ते भाकीत होते पण २००० पर्यंत अनेक संशोधकांनी ह्या विषयांत मोलाची भर घातली होती. १९८० मध्ये भाकितांना चुकीचे सांगणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली जात आहे. ग्रीन हाऊस गॅस हे साधे सोपे विज्ञान आहे आणि जास्त co2 म्हणजे जास्त गरमी हे ज्यांना समाजत नाही ते मूर्ख आहेत असे संशोधक तसेच राजकारणी मंडळी सांगत फिरत होती. पण साधारण १९९६ पर्यंत ह्या सर्व संशोधकांचे १००% भाकिते चुकलीच पण महा प्रचंड फरकाने चुकली. [३]
त्यातून आम्हाला कळले कि पृथ्वीचे तापमान हे इतिहासांत नेहमीच बदलत आले आहे. ते कधी थोडे थंड होते तर कधी जास्त गरम. हे नक्की का होते ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आज सुद्धा नाही पण मानव सोडून इतर अनेक गोष्टीवर हे अवलंबून आहे. c02 हा एकमें ग्रीन हाऊज गॅस नाही खरेतर सर्वांत महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे बाष्पीभूत झालेले पाणी. ह्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते पण वाढलेल्या तापमानाने आणखीन पाणी बाष्पीभूत होते आणि आणखीन गरमी वाढते. (ह्यामुळे अंटार्टिकावरील बर्फ वाढत आहे कमी होत नाही [२] ). समुद्र गरम झाला कि समुद्रांत विरघळलेला co2 बाहेर येतो आणि आणखीन गरमी वाढवतो. मग असे असेल तर आजची पृथ्वी महा प्रचंड गरम का नाही ? ह्याचे नक्की उत्तर आम्हाला ठाऊक नसले तरी विविध थेयर्या आहेत. शीत युगाचे सुद्धा मग असेच आहे. एकदा तापमान कमी झाले कि मग पाऊस जास्त पडतो, जास्त पावसाने तापमान आणखी कमी होते, जास्त पावसाने वृक्ष वल्ली आणखीन वाढून आणखीन तापमान खाली जाते, तापमान कमी असलेल्या समुद्रांत आणखीन co2 विरघळतो आणि तापमान आणखी कमी होते. असे असेल तर मग संपूर्ण पृथ्वी बर्फ आच्छादित का नाही ? ह्यावर सुद्धा १००% माहिती कुणालाच नाही.
पण २०२० मध्ये विविध विषयांवर जास्त संशोधन होऊन जास्त माहिती पुढे आली आहे. हि सर्वच माहिती नकारात्मक नाही तर वाढत्या co2 मुले पृथ्वीवर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सुद्धा त्यातून सामोरे आले.
पण अश्या संशोधनाची भीती विविध राजकारणी मंडळींना वाटत आली आहे त्यामुळे मिळेल तो मार्ग वापरून अश्या संशोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. सध्या प्रकरण इतक्या पराकोटीच्या लेव्हल ला पोचले आहे कि विज्ञान सोडून ग्रेटा सारख्या मतिमंद मुलांना आणि इंस्टाग्राम वर लाईक्स च्या शोधांत असणाऱ्या २१ वर्षीय पोरींना पुढे करून "भावनिक तर्क" वापरून लोकांना गप्प केले जात आहे. विज्ञानाच्या शोधांत काही लोक खोटे आणि काही लोक खरे ठरणार त्यांत काहीच वावडे नाही. पण ग्रेटा सारख्या लोकांना पुढे करणे किंवा बिल नाय सारख्या अभिनेते मंडळींना "संशोधक" म्हणून सर्वत्र फिरवणे हे माझ्या मते खोटारडे पणाचा पुरावा आहे.
co2 मुळे हवेचे तापमान थोडेफार वाढत असले तरी ह्याला प्रदूषण म्हणून संबोधने, ह्याचे फक्त नकारात्मक परिणामच होतील अशी भीती घालणे आणि त्यासाठी सत्ता आपल्या हातांत घेऊन बाबू आणि एक्स्पर्ट मंडळींना इतर लोकांवर राज्य करू देणे हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंग पेक्षा जास्त धोक्याचे आहे. कारण हि मंडळी आपल्याच लोकांवर जी बंधने टाकतील त्यानून आर्थिक प्रगती कमी होईल आणि त्यामुळे लक्षावधी लोक आता मरतील पण पुढील १०० वर्षांत पृथ्वीचे तापमान १ अंशाने वाढले म्हणून कोणी मरेलच ह्याची काहीही शक्यता नाही उलट कोणीही मरणार नाही ह्याची शक्यता जास्त आहे.
अमेरिकन राजकारणाचे परिणाम सर्वत्र होतात. रिपब्लिकन मंडळींनी जास्त टोकाची भूमिका घेऊन खनिज तेलाच्या मागे भक्कम सरकारी पाठिंबा ठेवला आहे. आणि डेमोक्रॅट मंडळींनी अगदी उलट दिशेने पाऊल ठेवले आहे. भारतांत महिलांना गर्भपात करण्यासाठी अमेरिकेने मदत केली पाहिजे अशी अनेक डाव्या मंडळींची भूमिका होती, तिथे बरणी सँडर्स ह्यांनी सहमती सुद्धा दर्शवली होती. प्रसंगी जे संशोधक ग्लोबल वॉर्मिंग विषयी साशंक आहेत त्यांना कैदेत डांबणार अशी भूमिका काही डेमोक्रॅट मंडळींची होती.
https://youtu.be/7I5RLbbXgPc
वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे आम्हाला आधीपासूनच ठाऊक आहे. अमेरिकेतून कुणी येऊन शिकवायला गरज नाही. पण अति सर्वत्र ... हेही आम्हाला ठाऊक आहे त्यामुळे सर्व भूतांशी प्रेम असले तरी खालील प्रकारच्या विकृती आपल्या समाजांत नकोच आणि विज्ञान सुद्धा हेच शिकवते.
- https://www.bbc.com/worklife/article/20190920-the-couples-reconsidering-kids-because-of-climate-change
- https://www.foxnews.com/politics/bernie-sanders-climate-change-abortion-birth-control-julian-castro-aoc-family-cycle
- https://www.heritage.org/environment/commentary/prosecuting-climate-change-deniers-abuse-power
- https://www.foxnews.com/politics/professor-fired-after-expressing-climate-change-skepticism
- https://abcnews.go.com/blogs/technology/2012/07/climate-denialists-worse-than-tobacco-ceos-lying-under-oath-says-mann/
[१] https://www.history.com/news/margaret-thatcher-miners-strike-iron-lady
[२] https://insideclimatenews.org/news/31052016/why-antarctica-sea-ice-level-growing-while-arctic-glaciers-melts-climate-change-global-warming/
[३] https://www.johnstossel.com/climate-myths/
टीप : प्रतिक्रियांना प्रत्युत्तर देण्याची प्रक्रिया मी बदलणार आहे. प्रामाणिक प्रश्न असला तरच उत्तर देणार आहे. माझ्यावर काहीही टीका केली तरी चालेल, वैयक्तिक हल्ले करायचे असल्यास कृपया विनोदी पद्धतीने लिहा म्हणजे करमणूक तरी होते. नाहीतर उगाच बॅण्डविड्थ खराब होऊन ऊर्जेची नासाडी.
ग्लोबल वॉर्मिंग ह्या विषयवार खूपच लिहिले जाते पण बहुतेक माध्यमे (जी डाव्यांच्या खिश्यांत आहेत) ह्यावर लिहिताना अतिशय एकांगी पणे लिहितात. जणू काही पुढील काही वर्षांत जग नष्ट होणार आहे आणि हे रोखायचे असेल तर सर्व सत्ता आणि सूत्रें आम्हा 'एक्सपर्ट' मंडळींच्या हाती द्या असा सूर ह्या मंडळींचा असतो.
पण प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू असते. हि बाजू मांडणे महत्वाची आहे. सर्वच बाजू मांडायची झाली तर मग खूप लेख लिहावे लागतील पण दोन प्रमुख "खोट्या समजुतीचे" भेद इथे केले आहेत. वाचकांनी ह्यावर विचार केला होता कि नाही हे प्रतिक्रियांत सांगावे.
१. झाडे हि जगाची फुफ्फुसे आहेत.
असे अनेक लोक लिहितात. हे खोटे आहे. झाडे हवेंत असलेला co2, जमिनीतून शोषून घेतलेले h २ o आणि सूर्यप्रकाश ह्यांच्या माध्यमातून जी प्रक्रिया आपल्या शरीरांत करतात त्यातून दोन प्रमुख घटक निर्माण होतात. प्राणवायू आणि असंख्य प्रकारचे कार्बन आणि हैड्रोजन ह्यांचे हायड्रोकार्बन. झाडे मग हे हैड्रोकार्बन आपल्या शरीरांत लाकूड, पाने, मुळे, फळे म्हणून स्टोर करतात ज्याला आपण झाडाची वाढ म्हणतो.
फुफ्फुसे प्राणवायू हवेंतून शोषून घेतात आणि आपण खालेलले हायड्रोकार्बन, रक्त इत्यादी पदार्थ वापरून त्यांच्यापासून ऊर्जा निर्माण करतात ज्याद्वारे आम्ही मसल वापरून ती ऊर्जा इतर गोष्टींत ट्रान्स्फर करतो. बदल्यांत आम्ही हवेंत co2 सोडतो. पण माणूस ऑक्सिजन निर्माण करू शकत नाही. खूप माणूस पृथ्वीवर असले तर मोठ्या प्रमाणावर c02 निर्माण होत जाईल. पण खूप झाडे असली तर खूप प्रमाणावर हवेंत प्राणवायू सोडला जाईल का ?
झाडाची पाने गळतात तेंव्हा त्यातील हैड्रोकार्बन जीवजंतू खाऊन हवेंत पुन्हा c02 सोडतात. आपण फळे खातो तेंव्हा पुन्हा त्या फळांतील c02 ला आपण मुक्त करतो. झाडाची कात कुसून पडते तेंव्हा पुन्हा त्यातील c02 ला छोटे जीव जंतू मुक्त करतात.
चाणाक्ष वाचकांना इथे लक्षांत आले असेल कि एखादे झाड पूर्ण वाढले म्हणजे त्याची वाढ थांबली तर त्याचाच अर्थ असा होतो कि हवेंतून c02 शोषून घेण्याची त्याची क्षमता शून्य झाली. म्हणजे साधारण वर्षाला जितका c02 हे झाड आपल्या शरीरांत साठवते तितकाच बाहेर सुद्धा फेकून देते. कॅनडा ह्या देशांत प्रचंड जंगले आहेत. जी जंगले खूप मोठी असली तरी c02 च्या दृष्टिकोनातून कार्बन पॉसिटीव्ह आहेत. म्हणजे हि c02 हवेंत सोडतात, कमी करत नाहीत. जे जंगल वेगाने वाढत आहे ते c02 हवेंतून शोषत आहे असे आपण म्हणून शकतो पण ज्या जंगलाची वाढ थांबली आहे त्याचा वातावरणातील c02 वर परिणाम शून्य असतो.
हे शालेय विज्ञान आहे. अर्थांत c02 वर झाडांचा विशेष परिणाम होत नाही ह्याचा अर्थ झाडे निरुपयोगी आहेत असा होत नाही झाडांचे आणि जंगलांचे प्रचंड फायदे पर्यावरण दृष्टिकोनातून आहेत आणि झाडांचे संवर्धन महत्वाचे आहे पण c02 आणि त्यांचा संबंध नाही.
आता एक झाड मारून तुम्ही त्याचे लाकूड घरबांधणीसाठी किंवा फर्निचर साठी वापरले आणि हे फर्निचर तुम्ही पुढील १०० वर्षे वापरले तर त्याचा पर्यावरणावर जास्त चांगला परिणाम होतो. कारण झाड मारून (ज्याने कदाचिन्त १ टन कार्बन आपल्या शरीरांत ठेवला होता) आपण तो कार्बन पुढील १०० वर्षे वापरणार आहात पण झाड मारल्याने त्याजागी नवीन झाड येऊन ते आणखीन १ टन कार्बन आपल्या शरीरांत साठवेल त्यामुळे एकूण दोन टन कार्बन आपण हवेंतून कमी केला.
ह्याउलट पेपर आहे. आपण कागद वापरला कि तो फेकून देतो, तो तात्काळ कुजतो आणि त्यातील c02 पुन्हा हवेंत जातो. कागदा ऐवजी कपड्याची पिशवी जास्त चांगली कारण हि तुम्ही वर्षभर वापरू शकता. किंवा १०० कागदांच्या पिशवी ऐवजी प्लास्टिक ची एक पिशवी वर्षभर वापराने सुद्धा जास्त चांगले. c02 हवेंत न सोडण्यासाठी.
दीर्घकाळ वापरासाठी लाकूड वापराने हे स्टील किंवा प्लास्टिक पेक्षा c02 च्या दृष्टिकोनातून नेहमीच चांगले.
जर जगांतील जंगले वाढत नसतील तर मानव जो c02 बाहेर फेकत आहे ( श्वास घेऊन किंवा प्रेट्रोल जाळून) तो रिसायकल होतच नाही असा त्याचा अर्थ होतो का ? किंवा उद्या सर्व झाडे गायब झाली तर हवेंतील c02 चे प्रमाण अचानक वाढून आम्ही मरणार नाही असा ह्याचा अर्थ होतो का ?
इतकेच नाही तर निव्वळ उदाहरण द्यायचे म्हणून जर आपण ह्या जगांतील प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक झाड, गावत, लाकडी वस्तू, जंतू, प्राणी, माणूस ह्या सर्वाना आग लावून जाळले तर जो c02 हवेंत निर्माण होईल तो इतका कमी असेल कि हवेंतील एकूण प्राणवायूचे प्रमाण विशेष बदलणार नाही (जमिनीत असलेला कोळसा आणि इतर खनिज तेल ह्यांचा मी समावेश केला नाही). (प्राणवायूचे प्रमाण २०.९ टक्क्यावरून २०.४ वर येईल आणि c02 चे प्रमाण ४०० ppm वरून ९०० ppm वर येईल).
पण पृथ्वीवरील कार्बन इतका कमी कसा झाला ? तर करोडोवर्षांपूर्वी जी झाडे आणि प्राणी होते ते अचानक जमिनीच्या खाली गेले. त्यातून कोळसा आणि ईथर तेलांच्या स्वरूपांत पृथ्वीवरील कार्बन हा जमिनीच्या आंत गडप झाला. आपण आता हा बाहेर काढून जाळत आहोत. तुम्ही जेंव्हा आपल्या दुचाकीत तेल घालता तेंव्हा प्रत्यक्षांत तुम्ही कोट्यवधी पूर्वीचे जंगल आणि प्राण्यांची शरीरे जाळत आहात.
पण हा कार्बन सुद्धा जास्त नाही. पण आपण हवेंतील c02 वाढवत आहोत हे नक्की.
झाडे हि जगाची फुफुसे नाहीत. हवेंतील c02 कमी करण्यासाठी झाडे उपयुक्त नाही आहेत.
२. c02 मुळे हवेचे प्रदूषण होते
मानवी शरीरासाठी c02 हानिकारक नाही. आपण c02 फुफुसांत घेतला म्हणून काहीही नुकसान होत नाही. c0 ह्याच्या उलट आहे. c0 मुळे शरीराला खूप नुकसान होते त्याशिवाय so२ इत्यादी मुळे शरीराला अपाय होतो पण c02 निरुपद्रवी आहे.
c02 हा झाडांसाठी खूप चांगला आहे. हवेतील c02 चे प्रमाण वाढल्याने बम्पर पीक येते, झाडांचा गवताचा, वाढण्याचा दर वाढतो. हवेंतील c02 चे प्रमाणे थोडे जर वर गेले तरी ऍमेझॉन, भारत चीन मधील जंगले वेगाने वाढतात. ह्या उलट प्राणवायूचे प्रमाण वाढले तर जंतू, जीव इत्यादींचा आकार आणि संख्या दोन्ही वाढते.श्वास ह्या दृष्टिकोनातून c02 हा हानिकारक नाही तर इतर वायू जास्त हानिकारक असतात. हवेंतील c02 चे प्रमाण ह्याचे इतर दुष्परिणाम असू शकतात पण हवेंतील c02 चे प्रमाण आणि हवेची स्वच्छता ह्याचा थेट संबंध नाही.
पण मग ग्रीन हाऊज इफेक्त्त चे काय ? c02 वाढत जाऊन पृथ्वी एखाद्या भट्टी प्रमाणे पेटणार ह्याचे काय ? c02 हा ग्रीन हाऊज गॅस आहे ह्यांत काहीही दुमत नाही. प्रयोगशाळेंत प्रयोग करून ते पाहणे सहज शक्य आहे पण संपूर्ण पृथ्वी हि प्रयोगशाळा नाही.
जेंव्हा आधी ग्रीन हाऊज इफेक्त्त चा शोध लागला होता तेंव्हा संशोधकांनी ह्या प्रकारातील क्लिष्टता समजून घेतली नाही पण विविध राजकीय संस्थांना हे चांगले हत्यार मिळाले. c02 चे निमित्त देऊन ऊर्जा व्यवस्थेला आपल्या हातांत घेतले तर इतर सर्व उद्योग आपोआप आपल्या हातांत येतील हे अनेक राजकीय पक्षांनी ताडले. ब्रिटन मधील कोळसा युनियन बलाढ्य युनियन होती आणि पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांच्या पायातील काटा बनून राहिली होती. ग्लोबल वॉर्मिंग हे एक शस्त्र थॅचर नी त्यांच्या विरोधांत उगारले. आज ग्लोबल वॉर्मिंग हि डाव्या लोकांची मुव्हमेंट आहे पण ह्याचा पाय थॅचर ह्यांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थॅचर ह्यांनी फूस लावून २००० मध्ये पृथ्वी वगैरे नष्ट होणार असली भाकिते सरकारी कृपेवर जगणाऱ्या "एक्स्पर्ट" नी सुरु केली. UN वगैरे शेवटी अमेरिका, इंग्लंड ह्यांच्या तालावर नाचत होती (आता चीन सुद्धा ह्यांत आलाय) त्यांनी सुद्धा री ओढली. [१]
c02 आणि त्याचा परिणाम ह्या विषयावर उपलब्ध असलेले एकूण संशोधन १९८० मध्ये विशेष नव्हते. c02 मुले गरमी वाढेल इतकेच काय ते भाकीत होते पण २००० पर्यंत अनेक संशोधकांनी ह्या विषयांत मोलाची भर घातली होती. १९८० मध्ये भाकितांना चुकीचे सांगणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली जात आहे. ग्रीन हाऊस गॅस हे साधे सोपे विज्ञान आहे आणि जास्त co2 म्हणजे जास्त गरमी हे ज्यांना समाजत नाही ते मूर्ख आहेत असे संशोधक तसेच राजकारणी मंडळी सांगत फिरत होती. पण साधारण १९९६ पर्यंत ह्या सर्व संशोधकांचे १००% भाकिते चुकलीच पण महा प्रचंड फरकाने चुकली. [३]
त्यातून आम्हाला कळले कि पृथ्वीचे तापमान हे इतिहासांत नेहमीच बदलत आले आहे. ते कधी थोडे थंड होते तर कधी जास्त गरम. हे नक्की का होते ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आज सुद्धा नाही पण मानव सोडून इतर अनेक गोष्टीवर हे अवलंबून आहे. c02 हा एकमें ग्रीन हाऊज गॅस नाही खरेतर सर्वांत महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे बाष्पीभूत झालेले पाणी. ह्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते पण वाढलेल्या तापमानाने आणखीन पाणी बाष्पीभूत होते आणि आणखीन गरमी वाढते. (ह्यामुळे अंटार्टिकावरील बर्फ वाढत आहे कमी होत नाही [२] ). समुद्र गरम झाला कि समुद्रांत विरघळलेला co2 बाहेर येतो आणि आणखीन गरमी वाढवतो. मग असे असेल तर आजची पृथ्वी महा प्रचंड गरम का नाही ? ह्याचे नक्की उत्तर आम्हाला ठाऊक नसले तरी विविध थेयर्या आहेत. शीत युगाचे सुद्धा मग असेच आहे. एकदा तापमान कमी झाले कि मग पाऊस जास्त पडतो, जास्त पावसाने तापमान आणखी कमी होते, जास्त पावसाने वृक्ष वल्ली आणखीन वाढून आणखीन तापमान खाली जाते, तापमान कमी असलेल्या समुद्रांत आणखीन co2 विरघळतो आणि तापमान आणखी कमी होते. असे असेल तर मग संपूर्ण पृथ्वी बर्फ आच्छादित का नाही ? ह्यावर सुद्धा १००% माहिती कुणालाच नाही.
पण २०२० मध्ये विविध विषयांवर जास्त संशोधन होऊन जास्त माहिती पुढे आली आहे. हि सर्वच माहिती नकारात्मक नाही तर वाढत्या co2 मुले पृथ्वीवर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सुद्धा त्यातून सामोरे आले.
पण अश्या संशोधनाची भीती विविध राजकारणी मंडळींना वाटत आली आहे त्यामुळे मिळेल तो मार्ग वापरून अश्या संशोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. सध्या प्रकरण इतक्या पराकोटीच्या लेव्हल ला पोचले आहे कि विज्ञान सोडून ग्रेटा सारख्या मतिमंद मुलांना आणि इंस्टाग्राम वर लाईक्स च्या शोधांत असणाऱ्या २१ वर्षीय पोरींना पुढे करून "भावनिक तर्क" वापरून लोकांना गप्प केले जात आहे. विज्ञानाच्या शोधांत काही लोक खोटे आणि काही लोक खरे ठरणार त्यांत काहीच वावडे नाही. पण ग्रेटा सारख्या लोकांना पुढे करणे किंवा बिल नाय सारख्या अभिनेते मंडळींना "संशोधक" म्हणून सर्वत्र फिरवणे हे माझ्या मते खोटारडे पणाचा पुरावा आहे.
co2 मुळे हवेचे तापमान थोडेफार वाढत असले तरी ह्याला प्रदूषण म्हणून संबोधने, ह्याचे फक्त नकारात्मक परिणामच होतील अशी भीती घालणे आणि त्यासाठी सत्ता आपल्या हातांत घेऊन बाबू आणि एक्स्पर्ट मंडळींना इतर लोकांवर राज्य करू देणे हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंग पेक्षा जास्त धोक्याचे आहे. कारण हि मंडळी आपल्याच लोकांवर जी बंधने टाकतील त्यानून आर्थिक प्रगती कमी होईल आणि त्यामुळे लक्षावधी लोक आता मरतील पण पुढील १०० वर्षांत पृथ्वीचे तापमान १ अंशाने वाढले म्हणून कोणी मरेलच ह्याची काहीही शक्यता नाही उलट कोणीही मरणार नाही ह्याची शक्यता जास्त आहे.
अमेरिकन राजकारणाचे परिणाम सर्वत्र होतात. रिपब्लिकन मंडळींनी जास्त टोकाची भूमिका घेऊन खनिज तेलाच्या मागे भक्कम सरकारी पाठिंबा ठेवला आहे. आणि डेमोक्रॅट मंडळींनी अगदी उलट दिशेने पाऊल ठेवले आहे. भारतांत महिलांना गर्भपात करण्यासाठी अमेरिकेने मदत केली पाहिजे अशी अनेक डाव्या मंडळींची भूमिका होती, तिथे बरणी सँडर्स ह्यांनी सहमती सुद्धा दर्शवली होती. प्रसंगी जे संशोधक ग्लोबल वॉर्मिंग विषयी साशंक आहेत त्यांना कैदेत डांबणार अशी भूमिका काही डेमोक्रॅट मंडळींची होती.
https://youtu.be/7I5RLbbXgPc
वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे आम्हाला आधीपासूनच ठाऊक आहे. अमेरिकेतून कुणी येऊन शिकवायला गरज नाही. पण अति सर्वत्र ... हेही आम्हाला ठाऊक आहे त्यामुळे सर्व भूतांशी प्रेम असले तरी खालील प्रकारच्या विकृती आपल्या समाजांत नकोच आणि विज्ञान सुद्धा हेच शिकवते.
- https://www.bbc.com/worklife/article/20190920-the-couples-reconsidering-kids-because-of-climate-change
- https://www.foxnews.com/politics/bernie-sanders-climate-change-abortion-birth-control-julian-castro-aoc-family-cycle
- https://www.heritage.org/environment/commentary/prosecuting-climate-change-deniers-abuse-power
- https://www.foxnews.com/politics/professor-fired-after-expressing-climate-change-skepticism
- https://abcnews.go.com/blogs/technology/2012/07/climate-denialists-worse-than-tobacco-ceos-lying-under-oath-says-mann/
[१] https://www.history.com/news/margaret-thatcher-miners-strike-iron-lady
[२] https://insideclimatenews.org/news/31052016/why-antarctica-sea-ice-level-growing-while-arctic-glaciers-melts-climate-change-global-warming/
[३] https://www.johnstossel.com/climate-myths/
टीप : प्रतिक्रियांना प्रत्युत्तर देण्याची प्रक्रिया मी बदलणार आहे. प्रामाणिक प्रश्न असला तरच उत्तर देणार आहे. माझ्यावर काहीही टीका केली तरी चालेल, वैयक्तिक हल्ले करायचे असल्यास कृपया विनोदी पद्धतीने लिहा म्हणजे करमणूक तरी होते. नाहीतर उगाच बॅण्डविड्थ खराब होऊन ऊर्जेची नासाडी.
लेखाबद्दल धन्यवाद. तुमच्या
माहिती बद्दल धन्यवाद
त्यातून आम्हाला कळले कि
रॉबिन कुक (किंवा कदाचित दुसरा
In reply to रॉबिन कुक (किंवा कदाचित दुसरा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मायकल क्रायटन-स्टेट ऑफ फियर
लेख वाचला
रोचक विषय ! चर्चेकडे लक्ष
मराठी विश्वकोश मधील ही माहिती उपयोगी पडेल
लेखाशी सहमत
सहना जी. तुमच्या विचारांशी
अभ्यास पूर्ण मराठी विश्व कोश मधील लेख
लेख आणि मते आवडली ...
अतिशय अभ्यापूर्ण विश्वकोश मधील अजुन एक लेख
बोंबला...
In reply to बोंबला... by अर्धवटराव
आधी बायको कडे बघावे ....
In reply to बोंबला... by अर्धवटराव
कारण climatology हे परिपूर्ण
In reply to कारण climatology हे परिपूर्ण by पिनाक
मी 1975 पासून, कोकणात जातो....
मध्यंतरी नेटफ्लिक्स वर एक सिरीज बघितली होती.
> हरितद्रव्याधारीत सजीव
टेक्सास मध्ये जे घडले आहे
लेख वरवर वाचला. अजिबात
अमेरिका सुद्धा पॅरिस करतात
एखादे झाड पूर्ण वाढले म्हणजे
In reply to एखादे झाड पूर्ण वाढले म्हणजे by मराठी कथालेखक
वलय वाढले तरी झाड वाढले असा
In reply to वलय वाढले तरी झाड वाढले असा by साहना
शेवटी संपूर्ण जंगल कार्बन
In reply to शेवटी संपूर्ण जंगल कार्बन by मराठी कथालेखक
झाडे नकोत असे लेखांत कुठेही
In reply to झाडे नकोत असे लेखांत कुठेही by साहना
तुम्ही दिलेल्या पहिल्या
मग काय करायचं?
In reply to मग काय करायचं? by कंजूस
झाडे लावायची
मझ्या माहिती नुसार
माणसाचे येथील अस्तित्व हेच मुळी विविध घटका वर अवलंबून आहे